नमस्कार मंडळी..
गेली २ वर्ष झाली सायकलचे थोडे वेड लागले आणि सायकल प्रवास सुरु झाला. अभियांत्रीकी पर्यंत पूर्ण शिक्षण सायकल ने केले नंतर १४ वर्ष नोकरीच्या मागे धावायला लागलो. त्यामुळे ७० किलोचा मी ८८ किलोचा कधी झालो कळालेच नाही. सर्व डाएट प्लॅन करून झाले पण ते फक्त काही दिवसांपुरतेच आणि नंतर ये रे माझा मागल्या प्रकार चालू व्हायचा आणि वजनाची गाडी पुढे पुढेच धावायची. दोन वर्षांपूर्वी माझे मित्र गजानन खैरे यांनी मला सायकलींग बद्दल सांगितले. तो दररोज आपले सायकलींग बद्दलचे फिटनेस अॅप चे फोटो व्हाट्सपवर पाठवत होता. सुरवातीला हे फोटो बघून दुर्लक्ष करत होतो पण नंतर विचार केला कि आपण पण सायकलींग सुरु करावे आणि हे सायकलींग चे वेड सुरू झाले.
दिवसा १० किमी सायकलिंग या गतीने सुरूवात केली आणि हळू हळू चक्क २०० किमीचा टप्पाही गाठला. या प्रवासामध्ये खुप सारे छान मित्र भेटत गेले आणि हा प्रवास आणखी मजेदार होत गेला. मिपाची ओळखपण सायकलिंग मुळेच झाली. मी प्रशांतसोबत सायकलने लोहगड ला गेलो होतो आणि त्या प्रवासात मिपा बद्दल समजले नंतर मोदक, सागर कल्पेश आणि बरेच मिपा सदस्य भेटले. मागील वर्षी मी पुणे ते गोवा सायकल प्रवास केला पण वेळेअभावी माझ्या गावी (पोखले) जाता आले नाही. ती रुखरुख कुठेतरी मनात बरेच दिवस घर करून होती. मी गावी जाण्याचा बेत आखात होतो पण काही ना काही कारणामुळे शक्य होत नव्हते
नुकतीच मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती आणि आमचे कुटूंब कोल्हापूरला सुट्टीला गेले होते. जर आठवड्याचा शेवटी शनिवार व रविवार आमच्या इंडो सायकलिस्ट क्लबचा सायकलींगचा कोणता ना कोणता कार्यक्रम असतोच, पण येणाऱ्या शनिवार व रविवार काहीतरी वेगळा बेत आखायचा विचार करताना अचानक गावी जाण्याचा विचार मनात आला.अशा कडक उन्हाळ्यामध्ये सायकलने २४७ किमी एका दिवसात जायचे थोडे कठीणच वाटले. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग तसे झाले आणि गावी जायचे ठरवले. सुरवातीला एकट्यानेच हा प्रवास करायचा ठरवले कारण माझा बेत नक्की ठरत नव्हता आणि ऐन उन्हाळामध्ये इतका लांबचा सायकल प्रवास कोणी येईल असे वाटले नाही. पण कदाचित माझ्यासारखे अजून कोणालातरी गावी जायची इच्छा असेल म्हणून मी माझी हि कल्पना आमच्या ICC अॅक्टिव्ह ग्रुप मध्ये टाकली आणि लगेचच मला गुणवंत आणि दत्तात्रय या दोन मित्रांचा चा होकार मिळाला. गुणवंतला इस्लामपूर आणि दत्तात्रयला तासगावला जायचे होत. म्हणजे मला इस्लापूर नंतरचा प्रवास एकट्यानेच करावा लागणार होता, पण तो किरकोळ प्रवास होता. माझा ग्रुप मधला निरोप पाहून आशिषही सोबत यायला तयार झाला आणि असे आमचे चार जणांचे मिशन कोल्हापूर ठरले .
प्रवास थोडा लांबचा असल्यामुळे मी शनिवारी सकाळी पहाटे ४ वाजता जायचे ठरवलं, कारण उन्हाच्या आधी आम्हाला जास्तीत जास्त प्रवास करता येईल आणि घरी लवकर पोचता येईल. पण गुणवंत माझ्याहूनही जास्त उत्साहाने म्हणाला कि आपण पहाटे ३ वाजता निघू आणि त्याला सगळ्यांनी होकार दिला. प्रवासाची सगळी तयारी झाली. सोबत आणखी एक टयूब, पंक्चर किट, टूल बॉक्स, पंप इत्यादी लागणारे साहित्य सगळयांनी घेतले जेणे करून प्रवासामध्ये काही अडचण येणार नाही. उद्या प्रवासामध्ये कुणालाही डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आदल्या दिवशी सर्वाना भरपूर पाणी पिण्यास सांगीतले. गोवा प्रवासामध्ये बरेच काही अभिजितकडून शिकलो होतो. तो अनुभव पाठीशी होता पण त्यावेळी जास्तीत जास्त १८५ किमी चा प्रवास एका दिवसात केला होता. यावेळी कात्रज आणि खंबाटकी हे दोन घाट व जवळ जवळ २४७ किमी अंतर आणि १४०० मीटरची ऐकून उंची असे गणित होणार होते.
..आणि अखेर तो दिवस उजाडला २० मे २०१७ शनिवार सकाळी अडीचचा गजर वाजला आणि एकदम जाग आली. उठून सर्वाना व्हाट्स अॅप वर सुप्रभात चा मेसेज पाठवला आणि तयारीला लागलो थोड्या वेळाने गुणवंत आणि आशिष ने मेसेज वाचल्याचे व्हाटस अॅप वर कन्फर्म झाले. पण दत्तात्रयाचा काही निरोप मिळाला नाही म्हणून मी त्याला फोन केला पण त्याचा फोन बंद असल्याचे पलीकडून निरोप मिळाला. मला वाटले त्याने यायचा निर्णय बदलला म्हणून फोन बंद ठेवला असेल. मी तयारीला लागलो कारण आम्हाला ३:१५ ला डांगे चौकात भेटायचे होते. तेवढ्या आशिष चा फोन आला कि त्याच्या सायकलच्या पुढील चाकाचा टयूब च्या झडप मधून हवा जात आहे. मी त्याला झडप चेक करायला सांगून बाकीच्या तयारीला लागलो मला थोडा वेळ झाला होता. गुणवंतचा फोन आला 'ते दोघे ठरल्या प्रमाणे डांगे चौकात पोहोचले होते. मी त्यांना सांगितले आम्हाला थोडा वेळ लागेल तुम्ही प्रवास चालू करा आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला गाठतो कारण दत्ताचा हा पहिलाच मोठा प्रवास होता आणि सुरवातीलाच कात्रजचा मोठा चढ होता. त्यांनी प्रवास चालू केला. मी भरभर आवरून सायकल घेऊन खाली आलो. आशिष ने तोपर्यंत टयूब बदली करत होता मी थोडी मदत केली आणि ३:४५ ला आम्ही आमचे फिटनेस अॅप स्ट्रावा आणि एंडोमोनोडो चालू करून व देवाचे स्मरण करून सायकल हाणायला सुरूवात केली.
गुणवंत आणि दत्ता पुढे गेले असल्यामुळे आम्हाला थोडे जलद अंतर कापायचे होते, त्यामुळे आम्ही जोर जोरात पाय फिरवू लागलो. गुणवंतला सांगितले कि तुम्ही कात्रज घाट पूर्ण करून थांबा, पण आम्हाला ३० मिनिट उशीर झाल्यामुळे आम्ही जवळ जवळ १० किमी पाठीमागे होतो. मी गुणवंतला सूचना केली कि, तुम्ही पुढे जाऊन आवडत्या शिरवळचा श्रीराम वडापाव हॉटेल ला जाऊन न्याहारी करायला सांगितले. आम्ही कात्रज चा घाट सर करायची तयारी सुरु केली आणि ५:३० वाजता आम्ही घाट पूर्ण केला. आशिष थोडा मागे होता त्यामळे मी त्याची वाट पाहत होतो. मी फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो पण अजून अंधारच होता. तसेच संधी प्रकाशात थोडे फोटो काढले आणि थोडयाच वेळातच आशिष हि पोहचला. आशिषने थोडी विश्रांती घेतली. नंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरवात केली.















अशा एका सुंदर प्रवासाची सांगता झाली होती. एकूण २४७.५ किमीचा प्रवास ऐकून १८ तासात (११ तास सायकलिंग) करून पूर्ण केला होता. खुप दिवसाचे स्वप्न पूर्ण झाले होते. अजित पाटील
वाचने
9723
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त. कीप इट अप.
फार आवडली सायकल स्वारी.
कहर आहे
मस्त हो अजित साहेब. अभिनंदन.
ICC बद्दल माहितीसाठी उत्सुक
In reply to मस्त हो अजित साहेब. अभिनंदन. by sagarpdy
ICC बद्दल माहितीसाठी उत्सुक आहोत. तसेच सर्वाचा आभारी आहे
In reply to ICC बद्दल माहितीसाठी उत्सुक by दशानन
मस्त
जबरदस्त ...
__/\__
जबरदस्त मालक
मस्त...
लै भारी.
भन्नाट !
लय भारी !!!
जबरदस्तं. परतीच्या
डबल सेन्चुरी ... मान लिया बॉस
आभारी आहे
In reply to डबल सेन्चुरी ... मान लिया बॉस by भ ट क्या खे ड वा ला
जबरदस्त...!
भारीच!!
जबरदस्त प्रवास लेख .
लय भारी
भारी!
अभिनंदन.
अगागागागागा!
अ ति श य ज ब र द स्त . . .