Skip to main content

नास्तिक विचार मंच!!!!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 03/01/2017 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच. मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी /ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले . असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे. तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे. इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत. धन्यवाद.

वाचने 26885
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

भौतिकशास्त्रात सापेक्षता सिद्धान्ताचा विकास होण्यापूर्वी प्रकाशाच्या वेगमर्यादेने घातलेले कोडे समाधानकारकरीत्या सोडविता यावे यासाठी तसेच स्थल व कालाचे विभिन्नत्व आणि त्यापैकी प्रत्येकाचे केवलत्व प्रस्थापित करता यावे यासाठी "ईथर" नामक काल्पनिक द्रव्याचा "शोध" जसा तत्कालीन भौतिक शास्त्रज्ञाना लावावा लागला ...त्याप्रमाणेच ईश्वरवादातील अनेक तार्किक त्रुटिवर मात करण्यासाठी ईश्वरवाद्याना कर्म-सिद्धान्ताचा "शोध" लावावा लागला. फरक इतकाच की सापेक्षता सिद्धान्ताचा विकास झाल्यावर ईथर गरजेअभावी भौतिक शास्त्रातून हद्दपार केले गेले, मात्र कर्म-सिद्धान्त भलताच सोयिस्कर असल्यामुळे टिकून आहे व दीर्घायुष्यीही ठरेल.

In reply to by अनन्त्_यात्री

सापेक्षता सिद्धान्ताचा विकास झाल्यावर ईथर गरजेअभावी भौतिक शास्त्रातून हद्दपार केले गेले, याच्यावर थोडा लाईट मारु शकाल काय?

नास्तिक असण्यात मिरवण्यासारखे काही नाही आणि आस्तिक असण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. हे आयुष्याकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत जे परिस्थिती, संस्कार आणि अभ्यास यांनी घडत असतात. प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन सुखी व्हावं यासाठी धडपडत असते. नास्तिक व्यक्ती ही धडपड करताना स्वतःवरील श्रद्धेचा आधार घेते तर आस्तिक व्यक्ती याला इतर बाह्य गोष्टींवरील श्रद्धेची जोड देते. मार्ग कोणताही असो मात्र या मार्गावरुन चालताना आपली स्वतःकडून आणि इतरांकडून फसवणूक होऊ नये याची काळजी घेतली की झालं.

In reply to by सतिश गावडे

नास्तिक व्यक्ती ही धडपड करताना स्वतःवरील श्रद्धेचा आधार घेते तर आस्तिक व्यक्ती याला इतर बाह्य गोष्टींवरील श्रद्धेची जोड देते
इतका संत साहित्याचा वाचन/ अब्यास करूनही तुम्हाला ईश्वर / परमात्मा हि " बाह्य " गोष्ट वाटते ? अरेरे। एकदम मुक्ताईचा संवाद आठवला इतकी 1400 वर्षे तपस्या करून चांगदेव अजून ह्या पत्रा सारखेच कोरे राहिलेत कि =))))

ज्याच्या अस्तित्वाबाबत आस्तिकान्चीही अशी गोची होते: . . चारी (वेद) श्रमले,परन्तु न बोलवे काही साही (दर्शने) विवाद करीता, पडली प्रवाही . . नास्तिक तर त्याला मुदलातच नाकारतात. तेव्हा ह्या दुपेडी धाग्याची कताई चर्चेच्या चरख्यातून कायमच करता येईल....

संजय क्षीरसागर,
ईश्वर ही सुद्धा एक धारणाच आहे , त्यामुळे `निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे', हे बरोबरे !
निरीश्वरवाद हीसुद्धा एक धारणाच आहे ना? मग ती पकडून अध्यात्म कसं बरं साधलं जाईल? आ.न., -गा.पै.