Skip to main content

शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?

लेखक mayu4u यांनी शनिवार, 24/12/2016 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?

वाचने 26959
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

रोजगार आणि महसूल निर्मिती हा निर्मितीचा उद्देश नाहीच. पण जे लोक्स फायदा तोट्याचा विषय काढून स्मारकाला विरोध करत आहेत त्यांचासाठी म्हणालो की काहीशे लोकांना रोजगार मिळेलच मिळेल. अवाढव्य खर्च जस्टीफाय करायचा म्ह्टला तर गेल्या सरकारने सींचनावर केलेला अवाढव्य खर्च कसा काय जस्टीफाय करता येइल? कीत्येक धरणे फक्त आणि फक्त काँट्रॅक्टर लोकांची (आणि पर्यायाने स्वतःची) सोय पहाण्यासाठी बांधली गेली. कोकणात माझ्या आजोळी बांधलेले अवाढव्य धरण कवडीमोलाचे ठरले आहे. कारण साठलेल्या पाण्याचे वितरण करण्याची योजनाच नाही. परीणामी धरण तुडंब भरुन वाहते आणि पाणी समुद्राला जाउन मिळते. थोड्याफार प्रमाणात वीहीरीतील पाण्याची पातळी वाढली. भूजल पातळीही वाढली असेल. पण त्यासाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवत्या आल्या असत्या. अवांतराबद्दल क्षमस्व पण सरकारचे डब्यात गेलेले प्रोजेक्ट शोधणे कठीण नाही. त्यामुळे मुळात फायदा ग्रुहीत न धरता सुरु केलेल्या या प्रोजेक्टला व्यवहारीतेच्या नावाखाली विरोध करणे उचीत नाही.

शिवस्मारक करून ते पाहण्यासाठी भक्कम तिकिट आकारले तर एक नवीन पर्यटनस्थळ निर्माण होऊन भरपूर कमाई होऊ शकेल.
नंतर शिवस्मरकाला जाण्यासाठी खुप खर्च येतो म्हणून ओरडा होइल. सरकार सबसिडि चालू करेल. फेरी साठी लागणारे खर्च पण सरकार उचलेल. महानगरपालिका ला पैसे देइल. आणि राजकारण ढॅण ढॅण ढॅण चालू होइल. असो.

शिवस्मारक ही अस्मितेची गरज आहे. अस्मिता ही प्राथमिक गरज नव्हे (मॅसलॉच्या रचनेनुसार ३ की ४थ्या क्रमांकावरची). अस्मितेची गरज ही वेगवेगळ्या लोकांत वेगवेगळी असते. सरकारने शक्यतो प्राथमिक गरजांवर लक्ष केंद्रीत करावं जी संपूर्ण जनतेची गरज आहे. बाकी गोष्टी व्हाव्यात पण सरकारी कोषातून शक्यतो टाळाव्यात. जर खरच जनतेची अस्मिता प्रखर असेल तर पैसाही गोळा होइल त्यासाठी. त्यातून होणारे कामही जास्त चांगल्या प्रतीचे होइल.. त्याची निगराणीही तितकीच चांगली होउ शकेल. हौसेला मोल नसतं पण एकासाठी हौस ही दुसर्‍याला पैसा उधळणे वाटणारच. पण हे सरकारी पैशातून नसेल तर इतका नक्कीच आक्षेप नसेल.

शिवरायांच्या "विचार" व "प्रेरणा" किंवा इतिहासाच "भान" याच गोष्टी महत्व्याच्या असतील. म्हणजे या स्मारकामागे असा उद्देश असेल तर शिवरायांचा "विचार" प्रसार करण्याचे अनेक क्रिएटीव्ह मार्ग कमी या इतक्या खार्चिक प्रोजेक्ट पेक्षा कमी पैशात होऊ शकतात. किंवा इतके पैसे खर्चुन याहुन उत्तम विचार प्रसार करता येइल. उदा.असे करता येइल ( मी महापालिकेच्या उंदीर मारण्याच्याच विभागात काम करतो याची पुर्ण जाणीव ठेऊन ही सुचवणी ) १- सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरेंची ( वादग्रस्त भाग एडिट करुन बाकी सर्वमान्य ) आणि गजानन मेहेंदळें या सारख्या दिग्गजांची शिवाजीवरील पुस्तके शासनाने भरपुर सबसिडी लावुन. प्रति विकत घेऊन शाळा व महाविद्यालयीन तरुणांना मोफत वा कमी किमतीत उपलब्ध करुन द्यावीत. २-आवडेल तो किल्ला बघा. एस टी महामंडळाकडुन किल्ला दर्शन योजना राबविता येइल. ज्या विद्यार्थ्यांना वरील पुस्तके वाचुन कॅसेट ऐकुन शिवरायांचे गड किल्ले बघण्याची इच्छा होइल व अनेक ग्रामीण तरुणांना खर्च परवडणारा नसेल किंवा अशा विद्यार्थ्यांना. किल्ला पास योजना राबवावी. वेगवेगळे पॅकेज बनवावे. दक्षिणेतले किल्ली काही मिळुन एक संच असा. व कुठलाही संच कुणालाही कधीही घेता येइल असा ठेवावा. त्यात किल्यावर रजीस्टर एंट्री घेऊन परतीचे तिकीट वगैरे बाबी दुरुपयोग टाळण्यास इ. करता येतील. ३- अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट सर्व साडेतीनशे किल्ल्यांसाठी शिवाय परमनंट स्वच्छता दुतांची नियुक्ती.इ, करुन किल्ले संवर्धन इ. करता येइल. प्रत्येक ठिकाणी उच्च प्रशिक्षीत गाईड ची नेमणुक करावी जो आलेल्या प्रवाश्यांना अचुक इतिहास सांगेल माहीती देईल. ४- काही शिबीर डिझाइन करता येतील बेसीक इंटरमिजीएट अ‍ॅडव्हान्स अशा श्रेणी ठेऊन ज्याचे स्ट्डी मटेरीयल व्हीजीट प्रोग्राम तज्ञांकडुन बनवुन घेता येइल. व तो सर्वत्र उपलब्ध करुन देता येइल. ५- आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य जागतिक इतिहासाच्या प्रवाहात जिथे जिथे संशोधन होते तिथे शिवाजी त्या काळातील सर्वच संबंधित बाबींवरील संशोधनाला सरकारकडुन प्रोत्साहन देता येइल. ६- पुरंदरे सारख्या व्यक्तीकडुन आयडीयाज घ्याव्यात जसे त्यांची एक आयडीया होती डिस्नेलॅन्ड च्या धर्तीवर शिवसृष्टी इ. म्हणजे सांगायचे असे आहे की एकदम इतका मोठा खार्चिक प्रोजेक्ट घेण्यापेक्षा टप्प्या टप्प्यात ग्राउंडलेव्हल ला काम करत शिवरायांच्या "विचारा" चा प्रसार प्रचार करता येइल. प्रेरणा अधिक सकारात्मकतेने संक्रमित करता येइल. अर्थात या प्रकारात भडक भव्यपणाचा सोस नसेल यात राजकीय पक्षाला इन्स्टंट प्रसिद्धी मिळणार नाही. म्हणजे अजुन विचार करता येइल अनेक सकारात्मक पर्याय शोधता येतील. आणि एक जनसहभागाने जर काही झाल तर तेच अधिक उत्तम आणि त्याने होत नसेल तर मग एक अर्थ जनतेची इच्छाही नसेल सहमतीही नसेल कदाचित.

थे दिल्लीतली एकाआड डॉन घाटांची जमीन विकून पैका इन का? कायप्पा म्हणे 9 हजार करोड ची जमीन हाय थे?