भटकंती इर्शाळगडची
नमस्कार मंडळी
एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो. घाट उतरून खोपोलीला उतरल्यावर उजवीकडे भीमाशंकर आणि पदरगड सोबत करू लागतात तर दुरवर डावीकडे कर्नाळ्याचा अंगठा थम्ब्स अप करून दाखवत असतो.जरा पुढे पनवेलजवळ आले की प्रबळ आणि इर्शाळ स्मित करून स्वागताला सज्ज असतात.कळंबोलीहून पुढे निघाले कि दूरवर हाजी मलंग तीन बोटे आणि करंगळी उंचावून आशीर्वाद देत असतो.
यापैकी बरेचसे किल्ले आतापर्यंत बघून झाले असले तरी प्रबळ आणि इर्शाळ मला नेहमीच हुलकावणी देत आले आहेत. त्यापैकी इर्शाळचा बेत अचानक ठरला आणि बघता बघता ८ -१० जण तयारही झाले.
वन डे ट्रेक असल्याने फार तयारी किंवा प्लॅनिंग न करता, पुणेकरांनी सरळ ट्रेनने कर्जतला जायचे आणि मुंबईकरांनी त्यांना तिथेच भेटून पुढचा प्रवास टमटम ने करायचं असा सोपा बेत ठरला.
मात्र ऐनवेळेला मरेने दगा दिला आणि डेक्कन क्वीन सोडून सर्व गाड्या रद्द केल्या. त्यामुळे आयत्या वेळी बेत बदलावा लागला आणि पुणेकर 2 गाड्यांमधून चौक फाट्याला येतील आणि मुंबईकर त्यांना तिथेच भेटतील असे ठरले.
यथासांग सर्वजण चौक फाट्याला भेटले आणि प्रथेप्रमाणे मिसळपाव चहा वगैरे होऊन मोरबे धरणाच्या
मार्गाला लागले (चौक फाट्यापासून 1 कि.मी. पुढे उजवीकडे छोटा रस्ता चौक रेल्वेस्टेशनला जातो. चौक गाव डावीकडे आहे तिकडे न जाणे ).
एकीकडे खेडेगावचे मोकळे वातावरण दिसू लागले. धरणाच्या भिंतीच्या कडेने गाड्या चालल्या होत्या.
आदिवासी पाडे दिसू लागले. एक दोन ठिकाणी थांबून रस्ता विचारला आणि एका ठिकाणी रस्ता संपला तिकडे गाड्या लावून चढाईला सुरुवात केली. साधारण १०चा सुमार होता पण ऊन तापत चालले होते. त्यामुळे पटापट पाय उचलू लागलो.
उजवीकडे मोरबे धरणाचा विशाल जलाशय सोबत करीत होता आणि त्यातील पाणी चमचमत होते.
दूरवर कर्जत पनवेल रेल्वे मार्ग दिसत होता आणि आगगाड्यांचे हॉर्न ऐकू येत होते.क्वचित पक्ष्यांचे सुस्वर ऐकू येत होते.डावीकडे एक दोन छोटी धरणे तलाव दिसत होते पण त्याकाठी बंगले असल्याने ते खाजगी तलाव आहेत कि काय असे वाटत होते. याना सी.आर.झेड वगैरे कसे लागू होत नाहीत कोण जाणे?
असो. वाट चढणीची असल्याने आणि डोक्यावर सूर्य तळपत असल्याने चांगलीच दमछाक होत होती आणि सारखे थांबून पाणी प्यावे लागत होते. तशातच एक म्हातारबुवा उतरताना दिसले. आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. म्हातारबुवा लंगडत आमच्याजवळ आले आणि आम्हाला विचारले " किल्ल्यावर चालला का?रस्ता माहित आहे का तुम्हाला ?" माझे शहरी मन मला सांगू लागले कि आता हा वाट दाखवतो म्हणणार आणि पैसे मागणार. म्हणून मी त्याला म्हटले कि आमचे लोक पुढे गेलेत त्यांना वाट माहितेय. तरी तो म्हणाला कि डाव्या बाजूनेच जात राहा ..म्हणजे वाट चुकणार नाही. आणि वरती पाणी भरपूर आहे. काळजी करू नका.पुढे त्याने पायाला बांधलेली चिंधी दाखवली आणि म्हणाला "कोयता लागला पायाला.खूप रक्त गेले. आता चौक ला जाऊन इंजेक्शन आणि पट्टी करून येतो. पुन्हा माझे शहरी मन सांगू लागले कि आता हा उपचारासाठी पैसे मागणार. पण त्याने तसे काहीच केले नाही. त्याची मुलगी का सून पाठून येत होती . ती आली आणि हा निघाला.
आता मात्र मलाच माझ्या विचारांची लाज वाटू लागली.शहरात येणाऱ्या एक एक अनुभवांमुळे आपली विचार करायची पद्धत कशी बिघडून गेलेय आजकाल.असोच.
मध्ये एक आदिवासी पाडा लागला. ते म्हातारबुवा तिथूनच आले होते. इकडे नाचणी आणि तांदुळाची शेती खूप दिसली. नाचणी विकतही घेता आली.
पाडा सोडून पुढे निघालो.आता आम्ही इर्शाळ उजव्या हाताला ठेवून चाललो होतो.इथून वर बघितले कि झोपलेल्या बुद्धाची पोझ दिसते असे म्हणतात.
ऊन तापत चालले होते. पण मधेच झाडी आली कि विसावा मिळत होता.पावसाळ्यातील गवतात अनेक किडे होते आणि अधे मध्ये चावून त्रासही देत होते.
एकीकडे आमचे फोटो ग्राफीचे प्रयोगही चालू होते. कुठे मधमाशीचा फोटो कधी, कुठे फुलाचा तर कुठे फुलपाखराचा.
नाहीतर पावलागणीक जवळ येत जाणारे इर्शालची शिखरे टीप असे चालेले होते.ऍपर्चर,वाईड अँगल, 18 ठेवायचे 55, 5.6 कि 11, पर्स्पेक्टिव ,आय. एस.ओ असे काय नी काय विषय बोलत बोलत आम्ही इर्शाळ च्या शिखराला येऊन भिडलो.
हायवेवरून दिसणाऱ्या दोन शिखरांपैकी हे उजवे शिखर. पण शिखरावर सरळ चढाई करता येत नाही. त्यासाठी डाव्या बाजूने झाडीत घुसावे लागते. दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथे येण्याआधी एके ठिकाणी वाट चुकून खालच्या दिशेने जाण्याचा संभव आहे. तेव्हा सतत वरती जाणारीच वाट घ्यावी.
(आम्हीपण चुकलो होतो पण वाटेतील एका झोपडीतील गोड आदिवासी मुलीने (बकुळा) आम्हाला योग्य वाटेला आणून सोडले) अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथवर मोरबे धरणाचे पाणी आपल्याला उजवीकडे दिसत राहते.ते दिसेनासे झाले तर समजावे कि वाट चुकली.
तर आता आम्ही सुळक्याच्या डावीकडून झाडीत घुसलो आणि वर जायला सुरुवात केली.शेवटची १०० मीटर चढाई राहिली असेल आणि एक पाण्याचे मधुर टाके लागले . अहाहा ..सकाळपासून ज्याची वाट पाहत होतो ते शेवटी मिळाले.
सगळ्यांनी पोटभर पाणी पिऊन घेतले आणि हात पाय सुद्धा धुतले.सगळे एकदम फ्रेश झाले.
आता एक कठीण टप्पा आहे पण कोणी भल्या ग्रुप ने एक लाकडी शिडी इथे भक्कमपणे अडकवली असल्याने सर्वजण तो टप्पा लीलया पार करून गेले आणि लवकरच वर नेढ्यात पोचले.
हे नेढे इर्शालच्या दोन्ही शिखरांच्या मध्यभागी आहे. नेढ्यात ३-४ लोक बसू शकतात आणि आसपासही थोडी मोकळी जागा आहे. सावलीही होती
दुपारचा १ वाजला होता त्यामुळे सर्वांनी शिदोर्या सोडल्या आणि सहभोजन केले.पुन्हा फोटोग्राफीचे काही प्रयोग झाले.
त्यानंतर नेढ्यावर चढून मागच्या बाजूला लावलेल्या झेंड्याबरोबर फोटो वगैरे झाले.
इर्शालची दोन्ही शिखरे अजून शंभरेक मीटर वर होती.आणि आमच्याकडे रोप होता पण आम्ही काही कसलेले गिर्यारोहक नाही.शिवाय उन्हाने खडक पार तापला होता. त्यामुळे दर्शनमात्रें समाधान मानले आणि उतरायला लागलो.
ट्रेक मस्त झाला याचे समाधान मनात होते. पण काही जण त्यावर संतुष्ट नव्हते. पनवेलच्या एका ग्रुपने काही वर्षांपुर्वी इर्शालच्या पोटात एक विवर शोधून काढले होते ते त्यांना बघायचे होते.त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. पाण्याच्या टाक्या पर्यन्त खाली उतरलो आणि जरा उजवीकडे गेलो.थोड्या शोधानंतर वरच्या दिशेला एका लैला मजनूचे नाव लिहिलेले दिसले आणि त्यावरून तिकडे जायला वाट असावी असे कळले. मग काही उत्साही लोकांनी वाट शोधली आणि ५० फूट सोप्या चढाई नंतर ते विवर मिळाले.
हे म्हणजे अक्षरश: "चेरी ऑन द केक" होते. ईर्शाळाच्या डाव्या शिखराच्या पोटात हे आडवे विवर जवळ जवळ सत्तरेक फूट आतवर गेले आहे. ते कोणी आणि का खोदले असावे माहित नाही पण ते वाऱ्या पावसाने तयार झालेले नाही एव्हढे नक्की. आतमध्ये बघण्यासारखे काही नाही पण विझलेल्या शेकोटीवरून कोणीतरी ही जागा मुक्कामाला वापरल्याचे समजले.
काळजीपूर्वक खाली उतरलो. 3 वाजत आले होते.त्यामुळे आता झपाझप पावले उचलली आणि खाली उतरू लागलो. तासाभरात गाड्या लावलेल्या ठिकाणी पोचलो आणि पुढचा ट्रेक कोणता करावा याचा खल करीत परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप.. सर्व छायाचित्र माझा मित्र श्री. प्रवीण पाटील याच्या सौजन्याने
यापैकी बरेचसे किल्ले आतापर्यंत बघून झाले असले तरी प्रबळ आणि इर्शाळ मला नेहमीच हुलकावणी देत आले आहेत. त्यापैकी इर्शाळचा बेत अचानक ठरला आणि बघता बघता ८ -१० जण तयारही झाले.
वन डे ट्रेक असल्याने फार तयारी किंवा प्लॅनिंग न करता, पुणेकरांनी सरळ ट्रेनने कर्जतला जायचे आणि मुंबईकरांनी त्यांना तिथेच भेटून पुढचा प्रवास टमटम ने करायचं असा सोपा बेत ठरला.
मात्र ऐनवेळेला मरेने दगा दिला आणि डेक्कन क्वीन सोडून सर्व गाड्या रद्द केल्या. त्यामुळे आयत्या वेळी बेत बदलावा लागला आणि पुणेकर 2 गाड्यांमधून चौक फाट्याला येतील आणि मुंबईकर त्यांना तिथेच भेटतील असे ठरले.
यथासांग सर्वजण चौक फाट्याला भेटले आणि प्रथेप्रमाणे मिसळपाव चहा वगैरे होऊन मोरबे धरणाच्या
मार्गाला लागले (चौक फाट्यापासून 1 कि.मी. पुढे उजवीकडे छोटा रस्ता चौक रेल्वेस्टेशनला जातो. चौक गाव डावीकडे आहे तिकडे न जाणे ).
एकीकडे खेडेगावचे मोकळे वातावरण दिसू लागले. धरणाच्या भिंतीच्या कडेने गाड्या चालल्या होत्या.
आदिवासी पाडे दिसू लागले. एक दोन ठिकाणी थांबून रस्ता विचारला आणि एका ठिकाणी रस्ता संपला तिकडे गाड्या लावून चढाईला सुरुवात केली. साधारण १०चा सुमार होता पण ऊन तापत चालले होते. त्यामुळे पटापट पाय उचलू लागलो.
उजवीकडे मोरबे धरणाचा विशाल जलाशय सोबत करीत होता आणि त्यातील पाणी चमचमत होते.
दूरवर कर्जत पनवेल रेल्वे मार्ग दिसत होता आणि आगगाड्यांचे हॉर्न ऐकू येत होते.क्वचित पक्ष्यांचे सुस्वर ऐकू येत होते.डावीकडे एक दोन छोटी धरणे तलाव दिसत होते पण त्याकाठी बंगले असल्याने ते खाजगी तलाव आहेत कि काय असे वाटत होते. याना सी.आर.झेड वगैरे कसे लागू होत नाहीत कोण जाणे?
असो. वाट चढणीची असल्याने आणि डोक्यावर सूर्य तळपत असल्याने चांगलीच दमछाक होत होती आणि सारखे थांबून पाणी प्यावे लागत होते. तशातच एक म्हातारबुवा उतरताना दिसले. आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. म्हातारबुवा लंगडत आमच्याजवळ आले आणि आम्हाला विचारले " किल्ल्यावर चालला का?रस्ता माहित आहे का तुम्हाला ?" माझे शहरी मन मला सांगू लागले कि आता हा वाट दाखवतो म्हणणार आणि पैसे मागणार. म्हणून मी त्याला म्हटले कि आमचे लोक पुढे गेलेत त्यांना वाट माहितेय. तरी तो म्हणाला कि डाव्या बाजूनेच जात राहा ..म्हणजे वाट चुकणार नाही. आणि वरती पाणी भरपूर आहे. काळजी करू नका.पुढे त्याने पायाला बांधलेली चिंधी दाखवली आणि म्हणाला "कोयता लागला पायाला.खूप रक्त गेले. आता चौक ला जाऊन इंजेक्शन आणि पट्टी करून येतो. पुन्हा माझे शहरी मन सांगू लागले कि आता हा उपचारासाठी पैसे मागणार. पण त्याने तसे काहीच केले नाही. त्याची मुलगी का सून पाठून येत होती . ती आली आणि हा निघाला.
आता मात्र मलाच माझ्या विचारांची लाज वाटू लागली.शहरात येणाऱ्या एक एक अनुभवांमुळे आपली विचार करायची पद्धत कशी बिघडून गेलेय आजकाल.असोच.
मध्ये एक आदिवासी पाडा लागला. ते म्हातारबुवा तिथूनच आले होते. इकडे नाचणी आणि तांदुळाची शेती खूप दिसली. नाचणी विकतही घेता आली.
पाडा सोडून पुढे निघालो.आता आम्ही इर्शाळ उजव्या हाताला ठेवून चाललो होतो.इथून वर बघितले कि झोपलेल्या बुद्धाची पोझ दिसते असे म्हणतात.
ऊन तापत चालले होते. पण मधेच झाडी आली कि विसावा मिळत होता.पावसाळ्यातील गवतात अनेक किडे होते आणि अधे मध्ये चावून त्रासही देत होते.
एकीकडे आमचे फोटो ग्राफीचे प्रयोगही चालू होते. कुठे मधमाशीचा फोटो कधी, कुठे फुलाचा तर कुठे फुलपाखराचा.
नाहीतर पावलागणीक जवळ येत जाणारे इर्शालची शिखरे टीप असे चालेले होते.ऍपर्चर,वाईड अँगल, 18 ठेवायचे 55, 5.6 कि 11, पर्स्पेक्टिव ,आय. एस.ओ असे काय नी काय विषय बोलत बोलत आम्ही इर्शाळ च्या शिखराला येऊन भिडलो.
हायवेवरून दिसणाऱ्या दोन शिखरांपैकी हे उजवे शिखर. पण शिखरावर सरळ चढाई करता येत नाही. त्यासाठी डाव्या बाजूने झाडीत घुसावे लागते. दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथे येण्याआधी एके ठिकाणी वाट चुकून खालच्या दिशेने जाण्याचा संभव आहे. तेव्हा सतत वरती जाणारीच वाट घ्यावी.
(आम्हीपण चुकलो होतो पण वाटेतील एका झोपडीतील गोड आदिवासी मुलीने (बकुळा) आम्हाला योग्य वाटेला आणून सोडले) अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथवर मोरबे धरणाचे पाणी आपल्याला उजवीकडे दिसत राहते.ते दिसेनासे झाले तर समजावे कि वाट चुकली.
तर आता आम्ही सुळक्याच्या डावीकडून झाडीत घुसलो आणि वर जायला सुरुवात केली.शेवटची १०० मीटर चढाई राहिली असेल आणि एक पाण्याचे मधुर टाके लागले . अहाहा ..सकाळपासून ज्याची वाट पाहत होतो ते शेवटी मिळाले.
सगळ्यांनी पोटभर पाणी पिऊन घेतले आणि हात पाय सुद्धा धुतले.सगळे एकदम फ्रेश झाले.
आता एक कठीण टप्पा आहे पण कोणी भल्या ग्रुप ने एक लाकडी शिडी इथे भक्कमपणे अडकवली असल्याने सर्वजण तो टप्पा लीलया पार करून गेले आणि लवकरच वर नेढ्यात पोचले.
हे नेढे इर्शालच्या दोन्ही शिखरांच्या मध्यभागी आहे. नेढ्यात ३-४ लोक बसू शकतात आणि आसपासही थोडी मोकळी जागा आहे. सावलीही होती
दुपारचा १ वाजला होता त्यामुळे सर्वांनी शिदोर्या सोडल्या आणि सहभोजन केले.पुन्हा फोटोग्राफीचे काही प्रयोग झाले.
त्यानंतर नेढ्यावर चढून मागच्या बाजूला लावलेल्या झेंड्याबरोबर फोटो वगैरे झाले.
इर्शालची दोन्ही शिखरे अजून शंभरेक मीटर वर होती.आणि आमच्याकडे रोप होता पण आम्ही काही कसलेले गिर्यारोहक नाही.शिवाय उन्हाने खडक पार तापला होता. त्यामुळे दर्शनमात्रें समाधान मानले आणि उतरायला लागलो.
ट्रेक मस्त झाला याचे समाधान मनात होते. पण काही जण त्यावर संतुष्ट नव्हते. पनवेलच्या एका ग्रुपने काही वर्षांपुर्वी इर्शालच्या पोटात एक विवर शोधून काढले होते ते त्यांना बघायचे होते.त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. पाण्याच्या टाक्या पर्यन्त खाली उतरलो आणि जरा उजवीकडे गेलो.थोड्या शोधानंतर वरच्या दिशेला एका लैला मजनूचे नाव लिहिलेले दिसले आणि त्यावरून तिकडे जायला वाट असावी असे कळले. मग काही उत्साही लोकांनी वाट शोधली आणि ५० फूट सोप्या चढाई नंतर ते विवर मिळाले.
हे म्हणजे अक्षरश: "चेरी ऑन द केक" होते. ईर्शाळाच्या डाव्या शिखराच्या पोटात हे आडवे विवर जवळ जवळ सत्तरेक फूट आतवर गेले आहे. ते कोणी आणि का खोदले असावे माहित नाही पण ते वाऱ्या पावसाने तयार झालेले नाही एव्हढे नक्की. आतमध्ये बघण्यासारखे काही नाही पण विझलेल्या शेकोटीवरून कोणीतरी ही जागा मुक्कामाला वापरल्याचे समजले.
काळजीपूर्वक खाली उतरलो. 3 वाजत आले होते.त्यामुळे आता झपाझप पावले उचलली आणि खाली उतरू लागलो. तासाभरात गाड्या लावलेल्या ठिकाणी पोचलो आणि पुढचा ट्रेक कोणता करावा याचा खल करीत परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप.. सर्व छायाचित्र माझा मित्र श्री. प्रवीण पाटील याच्या सौजन्याने
वाचने
6992
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
चांगली भटकंती
चांगली भटकंती
In reply to चांगली भटकंती by चाणक्य
मलातरी इर्शाळगड म्हणुनच माहितेय
मस्त लिहिलंय. फोटोदेखील छान.
सुंदर वर्णन, फोटोही छान. त्या
छान भटकंती. इर्शाळगडाचे सुळके
मस्तच लिहिले आहे. शहरी
तसा उंच नसला तरी घातकी
वाचकांना धन्यवाद
मस्त लेख !
सुरेख वर्णन
In reply to सुरेख वर्णन by हकु
धन्यवाद हकु
छान वर्णन.
मस्त लेख, मस्त फोटो