Skip to main content

नोटा बंदी व परिणाम

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 17/11/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत. ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे. इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

वाचने 122496
प्रतिक्रिया 187

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त, हरिश्चंद्री समर्थकांच्या मोहोर उठण्याची गरज आहे वरील फायद्यांवर, म्हणजे सामान्य जनता रामराज्याच्या स्वप्नात दंग होण्यास मोकळी! भावनेच्या भरात घसरण्याचा प्रसंग कसा असतो हे तुम्ही इथे पाहिलेत म्हणून विचारत आहात काय? http://www.misalpav.com/comment/900742#comment-900742

In reply to by संदीप डांगे

विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध हा निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

In reply to by मोदक

सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध ^^^ हे कोण कसे ठरवणार? काही काळापूर्वी नोटबंदीच्या विरोधात भाजपची अधिकृत मते आजच्या विरोधकांच्या मतांसारखीच होती!

In reply to by संदीप डांगे

भाजपाची अधिकृत मते आणि त्यावेळी नक्की कशाने विरोध झाला यावर सवडीने एक लेख लिहा, तेथे बोलूया.

In reply to by मोदक

खाली इंग्रजीत मीनाक्षी लेखी यांच्या प्रेस काँफेरेन्स चा काही भाग इंग्रजीत टाकलाय! मुद्देसूद व सुयोग्य आहे का ते वाचून सांगा! पूर्ण भाषण उडवून टाकलं जायच्या आत युट्युब वर पाहून घ्या

In reply to by संदीप डांगे

नोटाबंदीचे परिणाम
अजून काही परीणाम - ३६) केजरीवाल, उद्धव, ममता इ. गरीबांच्या होणार्‍या हालांमुळे कळवळले. ३७) देशातील नागरिकांची चूल बंद झाली, देश उद्ध्वस्त झाला, लोक हक्काचे पैसे असून उपाशी मरायला लागले. ३८) मोदी सरकार गरीब विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ३९) रतन टाटा, अण्णा हजारे, कैलाश सत्यार्थी, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती इ. बड्या धेंडांना नोटा रद्द करण्याचा निर्णय आधीच समजला होता. त्यामुळे हा निर्णय येण्याआधीच त्यांनी आपापल्या ५००/१००० च्या नोटा बदलून घेतल्या. ४०) जनता रडत असताना मोदी खो खो हसत आहेत. ४१) रद्द केलेल्या नोटांमधून १० लाख कोटी रूपये जमा होणार आहेत. मोदी त्यातील ८ लाख रूपये उद्योगपतींच्या (अडाणी आणि अंबानी) घशात घालून त्यांची कर्जे माफ करणार आहेत. ४२) या निर्णयामुळे अडाणी आणि अंबानी एका रात्रीत धनाढ्य झाले.

In reply to by संदीप डांगे

ओके. प्रश्न प्रामाणिकपणे विचारले आहेत, उपरोधाने नाहीत या गृहितकावर उत्तरे देतो 1.माओवाद्यांना दणका काही प्रमाणात बसला आहे असे बातम्यांवरून दिसते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खंडणीचे पैसे होते व ते ५००/१००० च्या नोटांमध्ये होते आणि आता ते बदलून घेणे अवघड झाले आहे असे बातम्यात सांगण्यात येते. 2.काश्मीरमधील दगडफेक बंद दगडफेक थांबलेली दिसत आहे. 3. काश्मीरमधील शाळा जाळणे बंद शाळा जाळणे बंद झालेले दिसत आहे. शालांत परीक्षेला ९९% उपस्थिती होती असा वृत्तांत आहे. 4.भ्रष्टाचारींनी नोटा जाळल्या काही जणांनी जाळल्या असे दाखविले. परंतु ही संख्या अत्यल्प असावी. 5.तूर दाळीचे भाव कोसळून ८० रु . कल्पना नाही. 6. किराणा दुकान ,भाजीपाला फळ विक्रेते ,पानवाला ,चहावाला यांनी डेबिट कार्ड स्वॅपिंग मशिन बसवले काही जणांनी बसविले आहे. 7.मनपा ,नगरपालिका ,ग्रामपालिका यांची विक्रमी करवसूली मोठ्या प्रमाणात करवसुली झाली आहे. 8.वीज वितरण कंपनीची जुनी बाकी वसूल नक्की आकडा माहित नाही. परंतु काही प्रमाणात थकबाकी वसूल झाल्याचे सांगितले जाते. 9.औषध दुकानांत जोरदार विक्री होय. 10. मेट्रो रेल मध्ये smart cards विक्रीत वाढ कल्पना नाही. 11.अनेक व्यावसायिकांचे ४ वर्षांची जुने येणे वसूल ,वरून नवीन ऑर्डर मिळाल्या . कल्पना नाही. 12.mobile wallets पेमेंटचा वापर वाढला होय 13. बॅंकांच्या तिजोरीत ७ लाख कोटींची वाढ .कर्जावरील व डिपॉझीटवरील व्याजदर कमी होणार .उद्योगाला कमी व्याजात भांडवल मिळणार . ही प्रकिया सुरू झाली आहे. 14. बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाचे चेक किंवा ऑनलाईन पेमेंट .सगळा पैसा अगोदर बॅंकेत येणार . किती प्रमाणात कल्पना नाही. परंतु आजच वाचले की कांद्याचे पेमेंट चेक्सने देण्यात येणार आहे. 15. प्रॉपर्टीतील काळ्या पैशाला ब्रेक यापुढे प्रॉपर्टी खरेदीसाठी के वाय सी आवश्यक . १००% ब्रेक लागणे अशक्य आहे. केवायसी पूर्वीपासूनच सक्तीचे होते. त्यामुळे या क्षेत्रावर फारसा परीणाम झाल्याचे दिसत नाही. 16. प्रॉपर्टींच्या किमतीत 25% घट कल्पना नाही. 17.लोकशाही आणखी भक्कम झाली . सर्व जाती धर्माचे लोक ,गरीब व करोडपती एकाच रांगेत उभे राहिले .भेद नष्ट उपरोधिक विधान 18.नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले . सध्या तरी मोडलेले दिसते. 19.उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीत काळा पैसा वापरू पाहणाऱ्या राजकीय पक्षांना दणका सध्या तरी दणका बसलेला दिसतो. परंतु राजकीय पक्ष यातूनही मार्ग काढणार व मतदारांचे नुकसान होऊन देणार नाहीत. 20 जे एन यु मधील गायब झालेला नजीब आणि वन रॅंक वन पेन्शन चर्चा बंद जेएनयु मधील नजीब ची चर्चा फक्त निधर्मांधच करीत होते. ९९.९९% जनता यात सहभागी नव्हती. परंतु उर्वरीत मुठभरांची सुद्धा चर्चा बंद झाली आहे. ओ आर ओ पी चर्चा ८ नोव्हेंबर पर्यंत बंद होत आलीच होती. आता मात्र ती पूर्ण बंद झाली आहे. 21. Rs.2000 च्या नोटेमुळे सरकारच्या प्रिंटींग खर्चात बचत कल्पना नाही. 22.जाळलेल्या किंवा यापुढे चलनात न राहणाऱ्या नोटांमुळे सरकारची वित्तिय तूट कमी होणार . शक्यता आहे. 21. ड्रग माफिया उध्वस्त ड्रग माफियांवर या निर्णयामुळे फारसा परीणाम झाला नसावा. झाला असल्यास तो तात्पुरता असणार. 22.इन्कम टॅक्सच्या धाडींमुळे काळा पैसा नियंत्रणात काही प्रमाणात 23.पोलिसांच्या नाकाबंदीमुळे काळा पैशाची वाहतूक बंद काही प्रमाणात 27. खरं जीवन जगायला सुरुवात फालतू क्रिकेट मॅच व बॉलिवूड सिनेमे बंद . Facing real life !!! उपरोधिक वाक्य 28. हवाला धंदा मंदीत तात्पुरता परीणाम 29. बेटिंग ,सट्टा यांचे हाल तात्पुरता परीणाम 30. लोकांची मते मिळतील की नाही याची पर्वा न करता पंतप्रधान देशहितासाठी कडक निर्णय घेउ शकतो याची देशाला प्रथमच जाणीव झाली. देश बदलायचा असेल तर काही आवश्यक बदल घडवलेच पाहिजेत असा विचार देशात प्रबळ झाला उपरोध असला तरी नक्कीच तसे झाले आहे. 31.नेता निस्वार्थी असू शकतो हे देशवासीयांना जाणवले . उपरोध असला तरी नक्कीच तसे झाले आहे. 32.दीर्घकाळात देश पुढे जाणार या विश्वासातून देश रांगेत उभा राहिला . अल्प काळ वेदना दीर्घ काळ फायदा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली. भावनेचे माहित नाही, परंतु या निर्णयाला बहुतेकांचा पाठिंबा आहे. 33.भारताचे अनुकरण करा ही मागणी पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात झाली विश्वगुरुकडे भारताची वाटचाल उपरोधिक वाक्य. मात्र पाकिस्तानमध्ये अशी मागणी झालेली आहे. 34. जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेउ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते हा संदेश जगात गेला. उपरोधिक वाक्य 35. कुठेही दगडफेक ,आग ,बस रेल्वे जाळपोळ न होता हा बदल स्वीकारला गेला आता रांगाही कमी झाल्या जनजीवन पूर्वपदावर येतेय .नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे . उपरोधिक वाक्य.

In reply to by आदिजोशी

रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं. --- Rolling on the Floor Laughing

खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख कॅश घेउन फिरत असते तर सगळ्यात जास्त मुडदे त्यांचेच पडले असते...भारतात ट्रकमधून २० लाख कॅश घेउन मालवाहतूक करता येते....ते सुध्धा कोणतेही पिस्तुल...गेलाबाजार गावठी कट्टा सोबत न घेता हे वाचून डोळे पाणावले =))

In reply to by टवाळ कार्टा

२० लाख X भारतातील वाहतूकीसाठी रोज वापरल्या जाण्यार्‍या ट्रक्सची संख्या = ट्रकने रोज चलनवलन होणारे रु(डोळे फिरणारी संख्या)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या हिशोबाने भारतात "टरक"वाल्यांना लग्नाच्या बाजारात सगळ्यात जास्त डिमांड असायला हवी...त्या ऐवजी तेच भलत्या बाजारात जाताना दिसतात म्हणे =))

In reply to by संदीप डांगे

कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
प्रत्येक ट्रक नसला तरी बर्याच केसेस म्हणजे १० पैकी किती ट्रक अपेक्षित आहेत ते जाणून घ्यायला आवडेल

In reply to by संदीप डांगे

ते माझे कल्पनारंजन नाही, तुमचा "विपर्यास" आहे ! "वाहतूकीसाठी रोज वापरल्या जाण्यार्‍या" चा सरळ साध्या शब्दांचा सद्य चर्चेतला अर्थ इतका तिरका केला जाईल असे वाटत नव्हते !!! असो. तेव्हा, अजून बाळबोध शब्दांत तेच समीकरण देतो, त्याचा हिशेब करा, उत्तर तेच येईल :) ... २० लाख प्रतिट्रक X भारतातील वाहतूकीसाठी एका दिवसात वापरल्या जाण्यार्‍या ट्रक्सची अव्हरेज संख्या = ट्रकने रोज चलनवलन होणारे रु(डोळे फिरणारी संख्या)

In reply to by टवाळ कार्टा

नारायण मूर्तींच्या गाडीचा चालक लक्षाधीश असू शकतो तर कारपेक्षा मोठी गाडी (म्हणजे ट्रक) चालविणारा २० लक्ष रूपये खिशात ठेवून का हिंडणार नाही?

In reply to by श्रीगुरुजी

नारायणमुर्तींच्या चालकाला पगार कॅशमध्ये मिळतो??? त्याचे आयकर विवरणपत्र नसण्याची शक्यता किती? तो भारतभर लाखभर रुपये कॅशमध्ये जवळ बाळगून फिरतो?

In reply to by टवाळ कार्टा

उपरोध लक्षात आलेला दिसत नाही. असो. मूर्तींच्या चालकाला आयकर रिटर्न्स भरण्याइतका पगार मिळत नव्हता. त्याला दिल्या गेलेल्या समभागांची किंमत अनेक लक्ष होती. त्याअर्थाने तो लक्षाधीश होता.

२० लाख घेऊन जाणारा ट्रक हा एकटा नसतो जो ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या भारत भर ओळखी असतात . त्यामुळे काही फरक पडत नाही . कुठल्याही परिस्थितीत ते पुढे जाऊ शकतात. छोटे आहेत त्यांचं मानलं जरी प्रॉब्लेम झाला आहे तरी दुसऱ्या दिवशी पोस्ट ऑफिस आणि मनी कुरियर द्वारे पैसे पोचत आहेत . त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडलाय सध्यातरी . बेकायदेशीर रित्या मुंबई मध्ये पैसे कमवणाऱ्या मुली आणि त्यांचे मालक यांनी एकतर बाहेर ट्रान्स्फर केले मालकांनी.जे मालक आहेत त्यांनी . आणि बहुतेक काम मुली या युपी बिहार च्या नेपाळ सीमा जवळ तिकडे केले .पुढचं पुढे .बिल्डर आणि व्यावसायिकांची कहाणी अजून वेगळी आहे .

In reply to by संदीप डांगे

या वरच्या बातमीत जे वीस लाख रुपये पोलिसांनी पकडलेत ते, तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे त्या ट्रक ड्रायव्हरच्या प्रवास खर्चासाठी असल्याचे तरी या वरिल बातमीवरुन दिसत नाही.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या धाग्यातला आशय आणी या दोन्ही बातम्या यांमध्ये परस्पर संबंध नाही हे नमूद करु इच्छितो. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे मालवाहतुकीसाठी लागतच नव्हते हे दोन्ही बातम्यांमधुन स्स्पष्ट होते आहे. अश्या अजुन बातम्या शोधायच्या झाल्या तर कोटींनी पैसे पकडल्याच्या देखील अनेको बातम्या मिळतील. एका बातमीप्रमाणे: १. काळा पैसाच जप्त झाला आहे. तो पैसा अवैध मार्गांनी निवडणुकीत वापरला जाणार होता. २. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालकाने पळुन जायचा प्रयत्न केला ३. या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्ट्मेंट कडे तक्रार देखील केली गेली आहे. दुसर्‍या बातमीप्रमाणे: १. २० लाखाची रोकड देउन व्यवहार केला जात होता. २. सगळ्या नोटा १००० च्या होत्या आणि व्यवहार १००० च्या नोटा रद्द्द झाल्यानंतर केला जात होता. त्यामुळे मुळात हा काळ्या पैशातला व्यवहार होता. ३. २०००० पेक्शा जास्त व्यवहार रोखीने करणे हे बेकायदा आहे. हा नियम अनेक वर्षे अस्तित्वात आहे. तस्मात २० लाखाचा रोखीने व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर आहे. मुळात काळा पैसा हा असाच बेकायदा व्यवहारातुन तयार होतो. वरील दोन्ही प्रकरणांमध्ये पैसा सदर चालकाला मालवाहतुकीसाठी आणि वैध कारणांसाठी लागत नव्हता. तुमच्या धाग्याचा आशय "सामान्य, सुजाण, सजग" नागरिकांना (चालकांना) होणार्‍या त्रासाबद्दल असल्याने वरील दोन्ही लिंका अतिशय निरुपयोगी आहेत असे सांगु इच्छितो. अर्थात माझा परीघ छोटा असल्याकारणाने आपल्या कडुन यावर अजुन विस्तृत विवेचन मिळाल्यास आनंद होइल.

In reply to by संदीप डांगे

http://coastaldigest.com/index.php/news/63149-rs-26-lakh-unaccounted-ca… १. हे २० लाख ट्रकच्या खर्चाचे नव्हते तर दुध उत्पादकांना दुधाची किंमत नकद देण्यासाठी नेले होते असा ट्रकमालकाचा दावा आहे. २. ट्रक स्थानिक स्तरावर एका डेअरीतून दुसर्‍या डेअरीत दुधाची वाहतूक करतो आहे, म्हणजे ट्रकच्या खर्चाकरिता रु२० लाख काय रु२०,००० हजार सुद्धा गरजेचे नसणार. ====== https://www.google.co.in/amp/m.timesofindia.com/city/hyderabad/Rs-20L-i… १. यातील ट्रकमधे सापडलेले रु२० लाख तेथे कसे आणि का आले हे मला माहित नाहीत असे ड्रायव्हरने सांगितले आहे. बातमीप्रमाणे त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच हे, एक एक लाखांच्या बंडलांत काळजीपूर्वक ठेवलेले पैसे (These 20 packets were neatly wrapped and kept in a carry bag in the tool box) ट्रकच्या खर्चाकरिता नक्कीच नसावेत. २. उरलेले रु६.२ पैसे एका खाजगी कारमध्ये सापडले, म्हणजे त्यांचा सद्य चर्चेशी काहीही संबंध नाही. डांगेसाहेब, तुमचे प्रतिसाद वाचण्याजोगे असतात व बर्‍याचदा (कोणतीही बाजू घेऊन का होईना, पण) विचारपूर्वक लिहिलेले असतात असा समज आहे, म्हणून मी ते वाचतो. हा प्रतिसाद त्या प्रतिमेत अजिबात बसणारा नाही. या वेळेस तुम्ही मुद्दा सिद्ध करण्याच्या ओघात वाहवून जाऊन पूर्णपणे असंबधित व चुकीची उदाहरणे दिली आहेत असे खेदाने नमूद करत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार? अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो!

In reply to by संदीप डांगे

बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे मेगाबायटी प्रतिसाद न देता डांगेअण्णांचे पांढरे निशाण? अतर्क्य आणि आश्चर्य कारक

In reply to by संदीप डांगे

बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे मग अशी माहिती येथे देण्याचे कारण..? पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार? अच्छा, हे सगळे तुम्हीच ठरवलेत का..? एकच सल्ला देतो. "मुद्देसूद आणि विषयाशी संबंधित उत्तरे द्या" स्वतः दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यानंतर असे व्हिक्टीम कार्ड वापरणे ही जुनी पद्धत झाली. असो. अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो! अशा गोष्टींसाठीच मोदीसरकारने हे पाऊल उचलले आहे. :) (सगळे व्यवहार ऑनलाईन आले तर अनेकांच्या दोन नंबरच्या कमाईवर आणि पोटावर पाय येणार आहे हे ही उघड आहे.)

In reply to by संदीप डांगे

"बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे" असे कबूल करून तरीही ती आपल्याबाजूचा पुरावा दिल्याने लेखकाची विश्वासार्हता कमी होते, हे सार्वकालीक सत्य सांगायला हवेच असे नाही. अश्या वस्तूस्थितीत, ती चर्चा किंवा बातमी, नरेंद्र मोदी / राहूल गांधी / ओबामा / ट्रंप / आईनस्टाईन किंवा आणखी कोणाच्या संबंधात आहे याने काहीssssssही फरक पडत नाही, असे माझे ठाम मत आहे. कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. हे एका लेखात लिखाणाच्या भरात लिहिलेले पण प्रामाणिक वाक्य, परत परत लिहावे लागेल असे वाटले नव्हते. पण, जग आहे तसे स्विकारून पुढे जावे लागते, हे पुरेसे माहित असल्याने, असो. विश्वासार्हता हा अनावश्यक तपशील नव्हे तर कोणत्याही चर्चेचा जीव असतो. विश्वासार्हता नसलेली चर्चा म्हणजे केवळ वितंडवाद किंवा राजकारणी चलाखी बनते. या दोन्हीतही मला रस नसल्याने व खुद्द धाग्याकर्त्याने विश्वासार्हता हा अनावश्यक तपशील असतो व त्याच्याकडे दुर्लक्ष करावे असा निर्देश केल्याने या धाग्याला माझा रामराम !

तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. हे आपलेच वाक्य आहेना? मग वेगळा संदर्भ देऊन शाब्दिक कोलांट्या मारु नका.

तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. हे आपलेच वाक्य आहेना? मग वेगळा संदर्भ देऊन शाब्दिक कोलांट्या मारु नका.

In reply to by सुबोध खरे

तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. == सुबोध खरे सर, तो त्यांचा फर्स्ट हँड अनुभव आहे. :))

उदाहरण काही झेपले नाही (माझा परीघ थोडा वेगळा आहे). ट्रक ड्राइवर, २ लाख, २० लाख, व्यवहार ठप्प सगळंच अगम्य आहे! दुसऱ्या उदाहरणांची प्रतीक्षा!

मला समाजात नाही की, हे सर्व लोक निरर्थक रडारड का करत आहेत? रोग असाध्य झाल्यावर कधी न कधी तरी शल्यकर्म करावे लागेलच ना ? का त्याचाही मुहूर्त काढायचा ? शल्यकर्म केल्यानंतर काही दिवस तरी त्या टाक्यांमुळे त्रास तर होणारच ना ? आणि पथ्यही पाळावे लागेल शिवाय २-४ वेळा तरी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी लागेल व औषधपाणी वेळेवर करावे लागेल.पण शेवटी जीव तर वाचला ना !!! हेही नसे थोडके !!!

In reply to by उमेश माधवराव मसलेकर

पण काय आहे कि, वर्तमान सरकार वर रोजच्यारोज टिका केल्याशिवाय, देशातील काहि चश्मेबहाद्दूर लोकांना सकाळी प्रेशरच येत नसावे. :))

?

सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: पैचान कोन?? “The present government is not in a position to measure the correct quantum of black money because those who have the black money will actually convert into new currency notes. Now the sufferers are the aam aurats(women) and aadmis(men). Those who are illiterates, who have no access to the banking facilities. And they will be ones, who will affected by such diversionary measures. People who have no bank accounts, their life savings will be targetted.” “They will fall victim to middlemen who will scare them that the notes are worthless and charge them hefty fees to convert them. They will also be ripped off by shopkeepers.” “This policy of Mr. ₹₹₹₹₹₹ is only meant for the blue blood and not for the sweating, red-blooded, toiling millions. It is not going to affect those who have numbered accounts in Swiss accounts, but will hit those who do not have any bank account even in India,” she had said.

In reply to by सुबोध खरे

नै हो ममतांचे नाही हे वाक्य बिजेपीच्या 'मिनाक्षी लेखी' यांचे संसदीय भाषणाचा निवडक चाळणी लावलेला भाग आहे. ६५ टक्के लोकांकडे बँक अकाऊंट नाही अशी त्यांची तक्रार त्या भाषणात होती त्यानंतर मोदी सरकार आले आणि मोदींनी बहुतांशांना रिकामी का होईनात बँक अकाऊंट उघडून दिली

In reply to by संदीप डांगे

तुम्ही असले प्रतिसाद नोटा बदलीच्या दुष्परिणांचा दाखला म्हणुन द्यायला लागला आहात ?

आणि त्या चष्मेबद्दुर लोकांमध्ये शिरोमणि आहेत चुकून दिल्ली सारख्या चिमुकल्या व अर्ध-राज्याची सत्ता मिळालेला अरविंद केजरीवाल !!! ह्या माणसाची नोटबंदीच्या पहिल्या दिवशी प्रतिक्रिया होती "मौन" आणि लगेच हा माणूस विरोधाच्या पवित्र्यात गेला.कॉंग्रेसची आधी प्रतिक्रिया होती की कॉंग्रेस पक्ष काळ्या पैशयाच्या विरोधात ह्या निर्णयाच्या बाजूने आहे आणि नंतर त्यांनीही कोलांट-उडी मारली.आणि हा संधिसाधू अरविंद काल काय म्हणाला की "आझाद भारत का ये सबसे बडा घोटाला है" तरी बरे आहे की आतापर्यन्त मोदी सरकारवर एकही घोटाळ्याचा गंभीर आरोप झालेला नाही.आणि हा म्हणतोय की "घोटाला ". ह्याला तर ह्याच्या मुलाच्या जन्मातही घोटाळच झालेला दिसणार.पंचतंत्राच्या गोष्टीत "धूर्त कोल्हा " हे पात्र दाखवलेले आहे,माझ्या मते भारतीय राजकारणातील धूर्त कोल्हा " अरविंद केजरीवाल " आहे.बिचारे अण्णा हजारे !!! त्यांचा ह्या धूर्त कोल्हयाने शिडीसारखा वापर केला आणि नंतर त्यांना फेकून दिले !!!

जी मांडणी करत आहेत ती ट़क उदाहरण चुकले म्हणुन आता बरे झाले एरवी विरोध करणे अवघड होते डांगेंच्या ट्रकलाच आता धरून ठेवण्यात फायदा आहे ( मी पुर्णपणे मोदी निर्णयाच्या बाजुने आहे )

म्हणणे असे आहे डांगे यांच्या मांडणीचा ट्रकशुन्य प्रतीवाद शक्य नाही का ?

In reply to by मारवा

मी एकाही ठिकाणी ट्रकबद्दल प्रश्न उपस्थित केला नाहीये. तो मुद्दा इतका तकलादू आहे की कोणीही (खराखुरा) फर्स्टहँड अनुभव असलेली व्यक्ती समजेल की तो दावा किती चुकीचा आहे..!

In reply to by मोदक

तो माझा दावाच आहे असं कुठं म्हटलंय? उदाहरण आहे, आता ते ज्यादा विश्लेषण करण्यात पॉईंट नाही, कारण मूळ विषय ट्रकवल्याचा 20 लाख खर्च हा नव्हताच! ;)

In reply to by टवाळ कार्टा

हा प्रश्न तुम्हाला पडलाय म्हणजेच उत्तर देऊन उपयोग नाही असे मला समजते! मेगाबायटीचा त्रासही होतो ना?

आपण ट्रकची टायरची हवाच अनेक प्रतीसादी खिळे मारून कधीचीच काढलेली आहे आता हा ट्रक माहीतीचा महामार्ग अडवुन ट्रॉफीक जाम करत आहे विनंती एकच आहे मुळ मांडणी वर मंथन व्हावे कँसेट अडकलीय

आपण ट्रकची टायरची हवाच अनेक प्रतीसादी खिळे मारून कधीचीच काढलेली आहे आता हा ट्रक माहीतीचा महामार्ग अडवुन ट्रॉफीक जाम करत आहे विनंती एकच आहे मुळ मांडणी वर मंथन व्हावे कँसेट अडकलीय

In reply to by मारवा

धागाकर्त्याने दिलेल्या प्रतिसादांनुसार, त्यांना मूळ मांडणी आणि त्यावर सुयोग्य विचारमंथन यावर भर द्यायचा आहे की विशिष्ट अजेंडा राबवायचा आहे आणि विद्यमान सरकारच्या नावे फक्त खडे फोडायचे आहेत हे नक्की करूदेत.. मग आपण आहोतच चर्चा करायला..! :)

In reply to by मोदक

मोदकराव, ट्रक आणि 20 लाखांचा अत्यन्त गैरलागू मुद्दा लावून धरणारे अजेंडा ठरवून मोकळं झालेत! आता फक्त शिमगा करायचा धाग्यवर... :))

In reply to by मारवा

नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा रजिस्टर नंबर, ड्राईव्हरचे लायसन, पियूसी, इन्शुरन्स, जकात पावत्या यांच्या पंतप्रधान कार्यालयातून अटेस्टड कॉपीज मागितल्या नाहीत. या पुढे कोणीही काहीही नुसतं उदाहरण दिले की त्याचा पूर्ण खरा तपशील मिळाल्याशिवाय चर्चा करायचीच नाही हि आता खूणगाठ!

In reply to by मारवा

नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा रजिस्टर नंबर, ड्राईव्हरचे लायसन, पियूसी, इन्शुरन्स, जकात पावत्या यांच्या पंतप्रधान कार्यालयातून अटेस्टड कॉपीज मागितल्या नाहीत. या पुढे कोणीही काहीही नुसतं उदाहरण दिले की त्याचा पूर्ण खरा तपशील मिळाल्याशिवाय चर्चा करायचीच नाही हि आता खूणगाठ!

In reply to by मारवा

ट्रक काढुन मुद्दा मांडता आला तर विचार करण्यात येइल. अन्यथा ट्रकची हवा गेल्यामुळे मागे मोटारी येउन ट्रॅफिक जाम झाल्याबद्दल मागुन येणार्‍या मोटारीला दोष देण्यात अर्थ नाही, खासकरुन ट्रकची हवा काढणारे खिळे ट्रकचालकानेच पसरवले असतील तर.

नोटाबंदी निर्णयामुळे सरकारी तिजोरीत किती पैसा जमा झाला? किती लोकांच्या मागे आयकरवल्यांची चौकशी सुरू झाली? याचा डिट्टेल तपशील सरकारने येत्या दोन महिन्यानंतर देणे योग्य ठरेल.

नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच. फक्त अंमलबजावणी योग्य रितीने होणे अपेक्षित होते. दोन-तीन दिवसात जर पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध होवून लोक पूढे आपल्या कामाला लागू शकले असते तर ओरड करण्याचं काहीच कारण नव्हतं. ATM पुढे तास न तास उभा राहणारा माणूस काही काळ्याचे पांढरे करत नाहीये इतकं नक्की. पण अशा प्रकारे तास न तास ATM पूढे उभं रहायला लागणं, कोणत्या ATM ला पैसे मिळतील हे सतत शोधत रहावं लागणं (तेही ९ दिवसानंतर) हे अंमलबजावणीचं साफ अपयश आहे. मोदीविरोधक वा मोदीभक्त असण्याचा प्रश्नच नाही. देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर loss off productivity चा विचार करायला हवा.

माझा परीघ लहान आहे.. पण २० एक वर्षांपूर्वी एक ट्रकवाला ओळखीचा होता. त्याच्याकडे व्यापारी मालाच्या बदल्यात दुसऱ्या गावातील व्यापाऱ्याला देण्यासाठी कॅश द्यायचे हे ठाऊक होते. आणि त्याच्याकडे गावठी पिस्तुलही होते. सध्याची परिस्थिती ठाऊक नाही.

In reply to by संपत

संपत भाऊ! तुम्ही खोटं बोलताय, त्या ड्राईव्हरचे नाव नंबर लायसन लागेल, त्या शिवाय तुमचा अनुभव विश्वासार्ह नाही! ;) -आदेशावरून! :))

नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच. फक्त अंमलबजावणी योग्य रितीने होणे अपेक्षित होते. दोन-तीन दिवसात जर पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध होवून लोक पूढे आपल्या कामाला लागू शकले असते तर ओरड करण्याचं काहीच कारण नव्हतं. ATM पुढे तास न तास उभा राहणारा माणूस काही काळ्याचे पांढरे करत नाहीये इतकं नक्की. पण अशा प्रकारे तास न तास ATM पूढे उभं रहायला लागणं, कोणत्या ATM ला पैसे मिळतील हे सतत शोधत रहावं लागणं (तेही ९ दिवसानंतर) हे अंमलबजावणीचं साफ अपयश आहे. मोदीविरोधक वा मोदीभक्त असण्याचा प्रश्नच नाही. देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर loss off productivity चा विचार करायला हवा.

In reply to by मराठी कथालेखक

विरोध शस्त्रक्रियेला नसून 'अर्धवट तयारीनीशी' केलेल्या शस्त्रक्रियेला आहे. इथे रुग्णाला फाडून ठेवलंय पण पुढची काही साधन-सामुग्री अजून यायचीच आहे असं झालंय

In reply to by मराठी कथालेखक

पैसे अकाउंट मधुन काढुन घेता येत आहेत की नाही? माझ्या घरच्यांनी आज स्वतःच्या अकाऊंट मधुन पैसे काढले. १५ - २० मिनिटात काम झाले. मग नक्की काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडचा पैसा पांढरा असेल तर स्वतःच्या अकाउंट मध्ये भरा आणि पैसे काढा. "नोटा "बदलुनच" घ्यायचा अट्टाहास का?

In reply to by मृत्युन्जय

माझा पैसा पांढराच आहे नोटा डिपॉजिट करायला ब्रॅच मध्ये जावे लागेल पण ज्या बँकेत माझे अकाउंट आहे त्याची ब्रँच जवळपास नाही. ATM मध्ये पैसे मिळत नाहीयेत. समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याच्या प्रयत्नांना 'अट्टहास' म्हणणे म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. प्रत्येकाने दुसर्‍याबद्दल संवेदनशील असावे असा माझा 'अट्टहास' नाही. असो.