नुकतेच सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी केले. वाहतूकदारांनी देशव्यापी संप करून सरकारला हे करायला भाग पाडले. पेट्रोल , गॅस चे भाव कमी झाल्याकारणाने रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे कमी केल्याची बातमीही वर्तमानपत्रात अलिकडेच वाचली. पण हे मुंबईच्या हद्दीबाहेर. मुंबईतल्या जनतेचे काय ?
एरवी पेट्रोल-डिझेल महागले सांगून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तातडीने वाढवणार्^यांनी पेट्रोल-डिझेल सवस्त झाल्याकडे सोयीस्कर डोळेझाक का केली ? कच्चा माल महागला म्हणून एकदा वाढलेले भाव नंतर कच्चा माल स्वस्त झाला की कमी का होत नाहीत ?
२३ जानेवारीच्या लोकसत्तेत याच विषयावर एक कार्टून छापून आलं होतं...
एकीकडे आर्थिक मंदीच्या नावाने बोंबाबोंब करणारे दुसरीकडे आयपीएल मध्ये कोटींमध्ये खेळतात. अनेक तरूण नोकरी गमावायच्या परिस्थित असताना , कोंबड्यांच्या झुंजींसारख्या खेळाडूंच्या झुंजी लावून स्वतःच्या तुंबड्या भरतात. किती विरोधाभास आहे, एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी, नोकरी गमावणारे तरूण, आणि कोटींमध्ये लोळणारे क्रिकेटपटू.
एकीकडे आर्थिक मंदीच्या नावाने बोंबाबोंब करणारे दुसरीकडे आयपीएल मध्ये कोटींमध्ये खेळतात. अनेक तरूण नोकरी गमावायच्या परिस्थित असताना , कोंबड्यांच्या झुंजींसारख्या खेळाडूंच्या झुंजी लावून स्वतःच्या तुंबड्या भरतात. किती विरोधाभास आहे, एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी, नोकरी गमावणारे तरूण, आणि कोटींमध्ये लोळणारे क्रिकेटपटू.
वाचने
2549
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी जगलो.. मी
विरोधाभास
क्रीकेट हा
मत
लोकं