Skip to main content

मराठा मोर्चा भाग 2

लेखक वाल्मिक यांनी सोमवार, 26/09/2016 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt

वाचने 100562
प्रतिक्रिया 363

प्रतिक्रिया

संमं, आता हे असले धागे खरंच आवरा. वाल्मिक, दोन महिने निःशब्द रहाणार असल्याचे मागे तुम्हीच जाहिर केले होते ना? मग पुन्हा हा आणखी एक धागा कशाला? धागा काढल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का?

या मोर्चाशी संबधित दोन मित्रांबरोबर या शनिवारी चर्चा झाली (हे मित्र आधीपासून होते.. मोर्चाशी संबधित आहेत हे परवा कळले).. चर्चेचे निमित्त नेहेमीचेच... वीकेंड पार्टी.. या चर्चेचा सारांश : ह्या मोर्चामागची भावना उत्स्फूर्त आहे. यामागे नेहेमीचे यशस्वी नेते नाहीत त्यामुळे हा मोर्चा उत्स्फूर्त वाटू शकतो पण यामागे भरपूर प्लॅनिंग आहे. हे सर्वा करणारे राजकीय नेते नाहीत.. (भविष्यात ते राजकीय नेते म्हणून पुढे आले तर फार आश्चर्य वाटणार नाही).. ह्या मोर्चाच्या सर्वा मागण्या जरी पाटल्या नाहीत तरी शांततापूर्ण मार्गाने केलेले शक्ति प्रदर्शन म्हणून या अनोख्या घटनेची नोंद घ्यावीच लागेल या चर्चेतील सर्वा मुद्दे व शब्द येथे देता येणार नाहित.. पण चर्चेच्या अनुषंगाने बाकीच्या मुद्द्य्यांवर जरूर लिहायला आवडेल.

हे लै डेन्गेर बघा फिल्म बनेल याच्यावर जबरा जर तरुण लोक असे सगळे करत असतिल अन वाढत्या जातियतेबद्दल त्याना काही वाटत नसेल तर अवघड आहे

वाढत्या जातियतेबद्दल त्याना काही वाटत नसेल... हा निष्कर्ष तुम्ही कसा कढला हे कळले नाही.. मी असे कुथलेही विधन केले नाही..

In reply to by भोळा भाबडा

मराठा क्रांतीला पाठींबा देणे आणि त्यांनी स्वतःसाठी आरक्षण मागणे हे दोन्ही वेग्वेगळे आहे. बातमीत्पून पहिल्या बाबीचा अर्थबोध होतो पण दुसरी बाब नसताना तशी दिशाभूल करून ब्राह्मण संघ आरक्षणाची मागणी करत आहे असे का भासविता. तुम्ही ना भोळा आहात ना भाबडा. अजूनही पहिल्या धाग्यातील काही प्रश्नांचि उत्तरे दिली नाहीत. अत्ताच का? आरक्षण फक्त याच सरकारची जबाबदारी आहे काय? मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला.

In reply to by नाखु

मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला. मागिल सरकारला महित होते कि ते सत्तेत येणार नहि आहेत, त्यामुळे हे पिल्लु तर जाणिवपुर्वक सोडण्यात आल. त्यामधुन अनेक हेतु साध्य करायचा प्रयत्न होतोय. बोत लंबा गेम है काका ये.

In reply to by नाखु

अत्ताच का? आरक्षण फक्त याच सरकारची जबाबदारी आहे काय? मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला.
तुम्हीच भोळे आहात हो!! हे सरकार हलवण्यासाठी मराठे बाहेर पडलेत किंबहुना त्यांना बाहेर पाडलं गेलं आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे,त्याचा तुम्हाला लखलाभ. >>> मोर्चा अत्ताच का? → दूध कडक तापल्यावरच ऊतू जातं ओ,त्यामुळे तुमचा प्रश्न अस्थानी आहे. >>> मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला → मागचे सरकार नालायक होतेच, पण मराठ्यांनी सेना भाजपला रेकाॅर्ड मतदान केले आहे हे का विसरता,सरसकटीकरण कशाला ओ करता? मराठा म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण तुमच्या डोक्यात फिट्ट झालयं आता त्याला माझ्याकडे औषध नाय.

In reply to by भोळा भाबडा

आधिच बदनाम आहेत जात्यान्ध म्हणून त्यावर शिक्कामोर्तब होइल Actually Brahmins should never ask for caste based reservation. They should participate in no reservation movement.

एकदा हॉस्टेलमधे थर्डयिअर फोर्थयीअर पोरांची मारामारी झाल्यावर आमच्या रेक्टरने सर्वांना फैलावर घेतले. आमच्यासारख्या काही दोन्ही वर्गातल्या काही 'नामांकित' धुरंदरांना साहेबांनी क्रॉसचेक केले. प्रत्येकजण आपण मारामारी करत नव्हतो तर मारामारी करणार्‍यांना रोखत होतो, आवरत होतो असे सांगत होता. साहेब थोड्यावेळाने वैतागून बोललं, "भेंडी, तुम्ही सगळे मारामारी रोखत होते तर मग मारामारी नेमकी कोण करत होतं?" -आमच्यावर अन्याय झाला अशी हाकाटी करणार्‍या सर्वांचीच कैफियत ऐकून मलाही हल्ली हाच प्रश्न पडायला लागलाय-

सध्या ह्या राज्यत मराठा समाजाचे अभुतपुर्व व शातंतामय असे मोर्चे व तेहि सपुंर्ण महाराष्ट्र भर निघत आहेत. फक्त काही मागण्या ! आता पर्यंत ह्या राज्यात भरपुर मोर्चे , आदोंलन निघाले/झाले. तसा तो प्रत्येक समाजाचा कायदान्वये अधिकार पण आहे.व त्याचा समाजजीवनवर प्रतिक्रिया म्हणुन काही फारसा फरक पडत नव्हता . पण आता वेळी मात्र तसे झाले नाही. ह्या मोर्चे विषयी सहानुभुती राहु द्या पण ह्या संस्थंळावर टोकाची मते वाचायला मिळाली. मागच्या धाग्यावर जास्ती करुन एकतर्फी भुमिका बघायला मिळाली. कारण दुसरी बाजु मांडणारे इथे कमी असतिल कींवा जास्त कळफलक बडवता येत नसेल . मागच्या धाग्यावर प्रतिक्रिया विक्रमी संख्येत नेण्या मधे प्रा. बिरुटे यांचा मोलाचा वाट राहीला. त्यानी जे मत प्रदर्शन व तेही इतक्या हिरीरीने केले त्याचे खुप आश्चर्य वाटले. माणुस हा समाज जीवनात वेगळा व खर्या आयुष्यात वेगळा वागतो हे खरे असेल, तरीही त्यांना सांगु इच्छितो की जर त्यांचे कोणी मराठा मित्र असतील तर ते ही मते त्यांना सरळ सांगु शकतील का ? खरे म्हणजे हाच एकमेव असा समाज आहे त्याने आता पर्यंत जाती विरहीत मतदान केले आहे. फार पुर्वी पसुन मग कान्ग्रेस असेल आता राष्ट्र्वादी असेल, शिवसेना, भाजपा, शेकाप, फार काय जनसंघ लाही मत दिले आहे. पन एकगठ्ठा मते क्वचित दिली असतिल. त्या मुळे ह्या समाजाला आपल्याला वापरुन घेतल्याची भावन आहे व ती अगदी अनाठाही नाही. आजचे जे सरकार आहे त्यात ही त्याचा मोठा वाटा आहे. आज तो समाज आत्ममग्नेतुन बाहेर पडुन आत्मचिंतन करतोय व त्याला आता कुठे आत्मभान येत आहे. हा समाज जो आता पर्यंत सिनेमा , कथा कादंबर्या त दाखवता तसा नाहिहे. व कोणताही समाज जसा वाटतो तसा नसतो. हा एक सभ्य, शिक्षित , समजुतदार समाज आहे.व जसे अपवाद कोणत्याही समाजात असतात तसे तेही ह्या समाजात आहेत हे ही मान्य करायला हवे. म्हणुन ह्या समाजा कडे शकेंने पहायला पाहीजे असे नाही.

In reply to by अशोक पतिल

इथे मांडले गेलेले चिकित्सक प्रतिसाद हे कोणीतरी मराठासमाजाचा भयंकर द्वेषच करतंय म्हणून विरोधाच्याच भूमिकेतून मांडले गेलेत इतका ठाम विश्वास का बरे आहे?

चान चान बाकि चालुद्या...

ह्या आरक्षणाच्या लढाईत, जे खुल्या वर्गातले आहेत, त्यांची स्थिती, 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे. आरक्षणाने २७ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर झेप घेतली तेंव्हाच ते समजून चुकले की एकदिवस हे आरक्षण १०० टक्के होईल! त्यादृष्टीने त्यांची मानसिक तयारी झालीच आहे. त्यानुसार त्यांनी अन्य पर्यायांचा मार्ग शोधला आहे. ज्यांनी अजून शोधला नसेल त्यांनी तो लवकर शोधावा. आणि पुढे मागे खाजगी क्षेत्रातही हे लोण पोचले तर देशांतराचा पर्याय खुला ठेवावा. लोकानुनय म्हणजेच राजकारण, असे सिद्धांत असलेल्या देशांत , पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.

In reply to by तिमा

ह्या आरक्षणाच्या लढाईत, जे खुल्या वर्गातले आहेत, त्यांची स्थिती, 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे. आरक्षणाने २७ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर झेप घेतली तेंव्हाच ते समजून चुकले की एकदिवस हे आरक्षण १०० टक्के होईल! त्यादृष्टीने त्यांची मानसिक तयारी झालीच आहे. त्यानुसार त्यांनी अन्य पर्यायांचा मार्ग शोधला आहे. ज्यांनी अजून शोधला नसेल त्यांनी तो लवकर शोधावा. आणि पुढे मागे खाजगी क्षेत्रातही हे लोण पोचले तर देशांतराचा पर्याय खुला ठेवावा. लोकानुनय म्हणजेच राजकारण, असे सिद्धांत असलेल्या देशांत , पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.
+१ परंतु मराठ्यांची राखीव जागांची मागणी न्यायालयात टिकणार नाही. जाट आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आर्थिक आधारावर आरक्षण इ. खटल्यात न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यापेक्षा वेगळा निर्णय मराठा आरक्षणाच्या बाबतीत होण्याची शक्यता नाही. जर कदाचित न्यायालयाने मराठ्यांना जातीवर आधारीत राखीव जागा दिल्या तर गुजरातमध्ये पटेल, उत्तरेत जाट इ. ठिकाणी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन पेटेल व देशात यादवी माजेल.

पण, विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे कुणीच समाधानकारक देऊ शकला नाही. मागच्या धाग्यात जे प्रश्न बिरुटे संरानी आणि इतरानी विचारले तेच प्रश्न मला पण पडले आहेत मोर्चा आत्ताच का? मोर्चाची प्रमुख मागणी कोणती? आरक्षण हे पन्नास टक्क्यावरती देता येत नाही अस ऐकल, मग मोर्चा का काढायचा. मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला.मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा नेमका समाजाचा सर्वांगीण विकास नेमका कसा झाला ते कोणी सांगू शकेल काय. उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा. तो नेमका का द्यावा व् त्यानी प्रश्न कसा सुटणार. खरतर ह्याची उत्तर कोणीच देऊ शकला नाही. इथे पण उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण अजुन मिळाली नाहीत.

In reply to by मन्याटण्या

मोर्चा आत्ताच का?
दोन मुख्य कारणे. दोन्ही कारणे जातीयवादी आहेत. (१) राज्यातील सर्वोच्च स्थानावर मराठा नसून दुसर्‍याच जातीचा माणूस आहे आणि (२) आपल्या जातीच्या मुलीवर अत्याचार करणारे "दलित" आहेत. इतर दुय्यम कारणे म्हणजे (३) मराठा जातीचे प्राबल्य असलेल्यांच्या हातातून केंद्रातील व राज्यातील सत्ता गेली व आता सहकारातील सत्तेवरही गदा येत आहे आणि (४) या पक्षातील मराठा नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई सुरू झाली आहे
मोर्चाची प्रमुख मागणी कोणती?
सांगण्यात येणार्‍या प्रमुख मागण्या - (१) कोपर्डीच्या गुन्हेगारांनी तात्काळ फाशी द्या, (२) राखीव जागा द्या, (३) अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. छुप्या मागण्या - (१) अमराठा मुख्यमंत्र्याला हटवा, (२) भ्रष्टाचारावरील कारवाईत बहुसंख्य मराठा नेते असल्याने ही कारवाई बंद करा, (३) सहकारक्षेत्रातील आमच्या मक्तेदारीला धक्का लावू नका, (४) कोणत्यातरी मार्गाने कोठेतरी आम्हाला पुन्हा सत्ता द्या.
आरक्षण हे पन्नास टक्क्यावरती देता येत नाही अस ऐकल, मग मोर्चा का काढायचा.
कायदा व घटनेतील तरतुदी सामान्य माणसाला फारश्या माहिती नसतात. कोपर्डी, आरक्षण इ. मुद्द्यांवरून भावना अगदी सहज भडकावता येतात. यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या ३-४ महिने आधी मतदारांना राखीव जागा, स्मारके, पुतळे, कर्जमाफी, नामांतर अशांसारख्या अफूच्या गोळ्या देऊन पुढील ५ वर्षांसाठी मते मिळवून सत्ता टिकविली जायची. २०१४ मध्ये या गोळ्यांचा प्रभाव पडला नाही. म्हणून आता नवीन गोळ्या आणल्या आहेत.
मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात.
बलदंड व धनाढ्य नेते यामागे असल्याशिवाय हे मोर्चे शक्य नाहीत.
ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला.मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा नेमका समाजाचा सर्वांगीण विकास नेमका कसा झाला ते कोणी सांगू शकेल काय.
विकास कधीच झाला नव्हता. परंतु हीच मंडळी कायम निवडून यायची कारण प्रत्येक निवडणुकीच्या काही महिने आधी सवंग, लोकानुययी घोषणा केल्या जायच्या.
उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा. तो नेमका का द्यावा व् त्यानी प्रश्न कसा सुटणार. खरतर ह्याची उत्तर कोणीच देऊ शकला नाही.
तो त्यांनी द्यावा अशी मागणी होतेय कारण ते अमराठा आहेत. महाराष्ट्रात गेल्या ४१ वर्षात एकाही अमराठा मुख्यमंत्र्याला आपली कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही.
इथे पण उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण अजुन मिळाली नाहीत.
उत्तरे मिळाली असावीत अशी आशा आहे.

In reply to by मन्याटण्या

मोर्चा आत्ताच का>>>>>> - ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून, त्याला खाली खेचायला. मोर्चाची प्रमुख मागणी कोणती>>>>>> - अख्या महाराष्ट्रात मोर्चे झाले, अजून तुम्ही अज्ञानी कसे? मग मोर्चा का काढायचा>>> -माज दाखवायला मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. -श्री शरदचंद्रजी पवार साहेब ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला>>>> - हो...तुम्हाला काही ही समज करून घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते>>>>> -ते सगळे झोपा काढत होते उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा>>>> - राजे हे पण म्हणाले बलात्काऱ्यांना सगळ्या समोर गोळ्या घाला, आता न्यायालय असाच निर्णय देणार आहेत. उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण >>> -प्रयत्न करा प्रयत्न करा तुम्हाला शुभेच्छा कारण शेवटी "गरज ही शोधाची जननी आहे" मन्याटण्या-तुमच्या मनासारखी (खोडसाळ) उत्तरे दिली आहेत... समाधान नाही झालं तर अजून विचारू शकता.

At least private sector is open today. Why to look at government jobs and institutes. Work hard and smart and sky is the limit.

In reply to by सुखीमाणूस

We are actively working towards getting reservations in Private Sector. In fact Maha Govt has tried to do so couple of years back, not sure what happened there.

In reply to by वाल्मिक

वल्मिक सर इ फ़ुल्ल्य अन्द सोलेम्न्ल्य एन्दोर्से योउर विएव्स अस फ़र अस थे उसे ओफ़ लङुअगे ओन मिसल्पव इस चोन्चेर्नेद्. मिसल्पव शोउल्द हवे naay naay o मिसल्पव मुस्त् हवे मरथि ओन्ल्य नो एङ्लिश् कृ ह घे लो अ ही वि

ओ गुर्जी साहेब तुम्ही आमच्या मागच्या प्रतिसादाची नवी येडीशन काढली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रुपांतर अधिकृतपणे मराठवादी कॉंग्रेस असे करावयाचे आहे. आमच्या येथील मराठा आमदाराना मानाचे परत मराठवादी कॉंग्रेसमधे आणायचे आहे. जे भाजपाने फोडले त्याना पुन्हा पदे द्यावयाची आहेत. आम्हाला असे वाटते कारण.... दलित ओबीसी जाट हे गप्प बसणार नाहीत , एका दिवसात कोणाला ( अगदी कसाबला देखील ) फाशी देता येत नाही. फेअर ट्रायल द्यावीच लागते. हे आरक्षण ओपन वाले ही टिकू देणार नाहीत. फकस्त येकच शॉर्टकट आहे. मराठा व कुणबी या काही दोन वेगळ्या जाती नव्हेत हे कोर्टाला पटववून देणे. हे सगळे " जाणत्या" ना ही माहीत आहेच.

In reply to by चौकटराजा

मराठा व कुणबी या काही दोन वेगळ्या जाती नव्हेत मराठा आणि कुणबी रोटी बेटी व्यवहार करीत नाहीत आणि मराठा कुणब्याना तुच्छ मानतात ..... खासकरून हे 96 कुळी बद्दल पहिले aahe आता मात्र लोकसंखयेचे मोठे आकडे पाहिजेत म्हणून मराठयांना कुणबी लोणचं पुळका आलेला दिसतोय ? कोण्या 96 कुळाने आपली मुलगी कुणब्यांच्या घरी दिली ती कळेल का ??

आमच्या गावात संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष ह्यांनी नाशिक च्या मोर्चाचे नियोजन केले, आणी कोण म्हणत कि मोर्चाला नेतृत्व नाही ,धुळे जिल्ह्यात होणार्‍या २८ तारखेच्या मोर्चासाठी एन सी पी आणी आय एन सी चे माजी मंत्री आमदार सारे झाडुन कामाला लागलेत.ह्या मोर्चामुळे एकच वाईट झाल जे अगोदर बिग्रेडी मानसिकता ठरावीक मेंदुत होती ती आता बर्‍याच मराठ्यांच्या मेंदुत झिरपली आहे.

खाणे के दात और दिखाने के दात अलग, म्हणून वाईट वाटले मोरच्याबद्दल, सामान्य लोकांना घोळात घेता येतील अशा परस्पर संबंध नसलेल्या मागण्या पाहून आम्हाला सामान्य नागरिकांबद्दल वाईट वाटत आहे, लोकांना आम्ही मराठविरोधी आहोत असं सोयीस्कर वाटून घ्यायचं आहे

कित्येक दिवस आजारी असल्यामुळे (सध्या दिल्लीत इमान्दारीचे राज्य आहे, डासांना मारणे सुद्धा पाप आहे). मिसळपाव वर जास्त फिरकत आले नाही. 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? दिल्लीत आम्हाला हि असे वाटले होते. पण आता कळले एका वर्षात मोठ्या संख्येने दारूची दुकाने व बार का उघडले. १५०० DTC बसेस scrap केल्या गेल्या फक्त १०० नवीन विकत घेतल्या गेल्या. निजी मिनी बसेस का चालू लागल्या. ऑटो मागे लागणार्या पोस्टर्स साठी आठवड्याचे १००० रुपये ६ महिन्यासाठी, नुक्कड नाटक कलाकारांना ५०० रुपये रोज शिवाय नाश्ता पाणी (?), टोप्या, प्रभात फेर्या. शिवाय १ बाटली १ नोट. कोट्यावधी रुपये खर्च झाला होता. करणारा कोण किंवा खर्च झाला होता, सांगता येणे कठीण. इथे तर नक्कीच त्या पेक्षा जास्त खर्च होत असेल. 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? कुणाचा हात आहे, हे सर्वांना चांगलेच माहित असेल. जाट आणि पटेलांचे आरक्षण कोर्टाने रद्द केले. कोर्टासमोर आरक्षणची पात्रता पुराव्या सहित सिद्द करावी लागेल. मोर्चे काढण्याने ती सिद्द होऊ शकत नाही. राज्य सरकारने मोर्च्यांना घाबरून आरक्षण दिले तरी कोर्ट रद्द करेल. atrocityचा कायदा हि राज्य सरकार दुरुस्त करू शकत नाही. तो अधिकार केंद्राचा आहेत. आणि कायदा आणखीन सक्त करण्याची मागणी केंद्र सरकार नाकारू शकत नाही. अर्थात हे ज्या नेत्याला चांगले माहित आहे, त्याचाच अदृश्य हात आहे. 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ?- 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? मीटिंग इत्यादी निश्चित होत असणार, काय आणि कसे करायचे ठरत असेल. समाचार वाहिनींवर काही नेत्यांचे वक्तव्य पहिले असेल तर नेतृत्व करणाऱ्यांची कल्पना करता येते. पटेल आणि जाट समुदाय मूर्ख बनले. शेकडो जाट तरुण आज जेल मध्ये आहे. त्या पैकी अधिकांश तरुणांना त्यांच्या कर्माचे फळे भोगावीच लागणार आहे. नेते अदृश्य झाले आहेत. पण जाट आणि इतर समुदायांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. महाराष्ट्रात हि असे घडण्याची शक्यता नाकारता नाही. जर अक्कल असेल तर मराठा तरुणांनी या मोर्च्यान्पासून दूर राहावे. खरे तर या नेत्यांचा बहिष्कार करावा. पण तसे घडणार नाही. आरक्षणाची लालसा प्रत्येकाला आहे. फक्त १% टक्के लोकांना सरकारी नौकरीचा लाभ होतो. पण ९९ टक्के मूर्ख बनतात. बाकी विधी लिखित अटळ असते.

In reply to by विवेकपटाईत

शेवटचा परिच्छेद खासकरून
पटेल आणि जाट समुदाय मूर्ख बनले. शेकडो जाट तरुण आज जेल मध्ये आहे. त्या पैकी अधिकांश तरुणांना त्यांच्या कर्माचे फळे भोगावीच लागणार आहे. नेते अदृश्य झाले आहेत. पण जाट आणि इतर समुदायांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. महाराष्ट्रात हि असे घडण्याची शक्यता नाकारता नाही. जर अक्कल असेल तर मराठा तरुणांनी या मोर्च्यान्पासून दूर राहावे. खरे तर या नेत्यांचा बहिष्कार करावा. पण तसे घडणार नाही. आरक्षणाची लालसा प्रत्येकाला आहे. फक्त १% टक्के लोकांना सरकारी नौकरीचा लाभ होतो. पण ९९ टक्के मूर्ख बनतात. बाकी विधी लिखित अटळ असते.
जाती आणि धर्मांमध्ये आगी लावण्याचे परिणाम दिसू लागले आहेत. हिन्दू तालिबानी प्रवृत्ती झालेली काही मुले पाहण्यात आहेत. मराठ्यांचा घाऊक द्वेष करणारे ब्राह्मण व ब्राह्मण आणि दलितांचा घाऊक द्वेष करणारे मराठे पाहण्यात आहेत. कुणालाच काही समजावून उपयोग नसतो. अश्या मनोवृत्तींपुढे लॉजिक व रिजनिंग चालतच नाही. कदाचित येत्या ३-४ वर्षांमध्ये तेढ कधीही न भरून येण्याएवढी वाढेल.

आरक्षन हे ५१% चे वर नेता येत नाही. ठीक आहे. पण कुठलीच गोष्ट अशक्य नसते. सध्या तामिळनाडुत ६९ % आहेच. सुप्रिम कोर्टाने ते जरी अमान्य केले असले तरीही ते सध्या लागु आहेच. पटेल व जाट समुदाय ह्यांनी हिंसक मार्ग अवलंबिला म्हणुन ते टिका योग्य आहेत. पण आता समुदायांचा आकांक्षा वाढल्याने समाजात असंतोष आहे. राहील मुद्दा atrocityचा कायदा हा जरी कायदा केद्रांचा असला तरी त्याची अमंलबजावणी राज्या ची आहे. तो कडक काय म्हणुन करायचा ? त्यात संशोधन नक्कीच करता येवु शकेल . तसे संकेत श्री रामदास आठवले व प्रकाश आबेंडकर यानी दिलेच आहेत. खरे तर जर आरक्षन हे फक्त गुनवत्तेवर जसे अपंग , निराधार , आर्थिक दुर्बल असेच फार अगोदर दिले असते तर आज इतक असंतोष नसता.

In reply to by अशोक पतिल

तामिळनाडुत ६९ % आहेच. कारन असे असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असेल. खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ५० कि ५१ % पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. खात्रीशीर पुरावा देणे. या सगळ्या गदारोळात करते कर्विते साहेब म्हटले होते ते सगळे मिपाकर साफ विसरले

अ‍ॅट्रोसिटीचा गैरवापर/दुरुपयोग सर्वात जास्त बहुजनांनीच केला मग त्यात त्या कायद्याचा काय दोष?

लोक्सत्तामध्ये अशी थेट बातमीही आहे.

In reply to by नाखु

६९ टक्के ची केस सर्चोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असी पुसट माहिती आहे.

गुरुजी उत्तर द्या दोन मुख्य कारणे. दोन्ही कारणे जातीयवादी आहेत. (१) राज्यातील सर्वोच्च स्थानावर मराठा नसून दुसर्‍याच जातीचा माणूस आहे आणि (२) आपल्या जातीच्या मुलीवर अत्याचार करणारे "दलित" आहेत.>> Bjp सत्तेत आल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळ जवळ नक्की होते तरीपण मराठा लोकांनी बाजप ला का मत दिल आणि थे पण मराठा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असेलेल्या पक्ष्यांना न देऊन. आणि तसेही भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे आसा समज/गैरसमज असून सुद्धा मराठा समाजाने भाजप ला मतदान केले म्हणजे ब्राम्हण मुखमंत्री हटाव हि मागणी आहे असे मानाने चुकीचे आहे ...मराठ्यांना दलित मुख्यमंत्री चालतो तर ब्राम्हण का नाही चालणार. 2-या पक्षातील मराठा नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई सुरू झाली आहे>> कुठे आहे कारवाई, भाजप ला कारवाई करायला कोणी थांबवले आहे उलट ह्या लोकांनी भ्रष्ट्राचार केला म्हणूनच भाजपा ला लोकांनी मतदान केले. पण 1 भुजबळ वगळता दुसऱ्या कोना वरती कारवाई का होत नाही ते समजत नाही कंदाचीत मराठा समाज दुखावेल ह्या जातीयवादी भावनेतून भाजपा कारवाई करत नाही असे दिसतंय 3-भ्रष्टाचारावरील कारवाईत बहुसंख्य मराठा नेते असल्याने ही कारवाई बंद करा>> कारवाई चालूच नाही तर बंद करा हि मागणी कशी ? 4- यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या ३-४ महिने आधी मतदारांना राखीव जागा, स्मारके, पुतळे, कर्जमाफी, नामांतर अशांसारख्या अफूच्या गोळ्या देऊन पुढील ५ वर्षांसाठी मते मिळवून सत्ता टिकविली जायची. २०१४ मध्ये या गोळ्यांचा प्रभाव पडला नाही. म्हणून आता नवीन गोळ्या आणल्या आहेत.>> म्हणजे भाजपा ला मतदान केलं कि विकासाला मतदान आणि दुसऱ्या पक्ष्याला केलं कि अफूची गोळी हे चुकीचं आहे आणि राखीव जागा पुतळे ह्या पैकी किती मागण्याला भाजपा चा विरोध आहे. 2014 चा आधी हि भाजपा चा मराठा आरक्षण ला सपोर्ट होता आणि आत्ताही आहे. 5-मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. बलदंड व धनाढ्य नेते यामागे असल्याशिवाय हे मोर्चे शक्य नाहीत.>> आस काही नाही, लोक स्वतः खर्च करून मोर्चाला जातात तो त्यांनी द्यावा अशी मागणी होतेय कारण ते अमराठा आहेत. महाराष्ट्रात गेल्या ४१ वर्षात एकाही अमराठा मुख्यमंत्र्याला आपली कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही.>> त्या मध्ये मराठ्यांचा काय दोष. ex - मनोहर जोशींना राजीनामा द्यायला काय मराठ्यांनी सांगितलं का ? हिते काही लोक असं म्हणत आहेत कि मोर्च्या मागे ncp आहे आणि आत्ता फडणवीस असे म्हणत आहेत कि मराठ्यांना आरक्षण देऊच तर मग ncp आणि bjp मध्ये फरक कसा काय ?

In reply to by सन्दिप मोहन नलवदे

Bjp सत्तेत आल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळ जवळ नक्की होते तरीपण मराठा लोकांनी बाजप ला का मत दिल आणि थे पण मराठा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असेलेल्या पक्ष्यांना न देऊन. आणि तसेही भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे आसा समज/गैरसमज असून सुद्धा मराठा समाजाने भाजप ला मतदान केले म्हणजे ब्राम्हण मुखमंत्री हटाव हि मागणी आहे असे मानाने चुकीचे आहे ...मराठ्यांना दलित मुख्यमंत्री चालतो तर ब्राम्हण का नाही चालणार.
भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. खडसे सर्वात वरीष्ठ असल्याने आपणच मुख्यमंत्री होणार असे त्यांना वाटत होते. नितीन गडकरीसुद्धा मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून होते. गोपीनाथ मुंड्यांची लेक व इतर मागासवर्गियांपैकी असल्याने व महिला असल्याने आपलाच नंबर लागणार असे पंकजाताईंना वाटत होते. आपण तरूण व मराठा असल्याने आपणच अशी विनोद तावड्यांची समजूत होती. मुनगंटीवारसुद्धा शर्यतीत होते. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निवडणुकी अजिबात ठरलेले नव्हते. निकाल लागल्यावर पवारांनी गडकरींसाठी गुपचुप प्रयत्न केले. गडकरी व त्यांचे सख्य असल्याने पवारांना गडकरी मुख्यमंत्री हवे होते. परंतु सर्वांना बाजूला करून मोदी-शहांनी धक्कातंत्र वापरून फडणविसांना निवडले. असेच धक्कातंत्र त्यांनी हरयाना व झारखंडमध्येही वापरले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी फडणविस या ब्राहमणाची निवड होणार हे माहित असूनही मराठ्यांनी भाजपला मत दिले हा निष्कर्ष वस्तुस्थितीला धरून नाही.
2-या पक्षातील मराठा नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई सुरू झाली आहे>> कुठे आहे कारवाई, भाजप ला कारवाई करायला कोणी थांबवले आहे उलट ह्या लोकांनी भ्रष्ट्राचार केला म्हणूनच भाजपा ला लोकांनी मतदान केले. पण 1 भुजबळ वगळता दुसऱ्या कोना वरती कारवाई का होत नाही ते समजत नाही कंदाचीत मराठा समाज दुखावेल ह्या जातीयवादी भावनेतून भाजपा कारवाई करत नाही असे दिसतंय 3-भ्रष्टाचारावरील कारवाईत बहुसंख्य मराठा नेते असल्याने ही कारवाई बंद करा>> कारवाई चालूच नाही तर बंद करा हि मागणी कशी ?
राष्ट्रवादीतील अजित पवार व तटकरेंची चौकशी सुरू आहे. रमेश कदम व भुजबळ अनेक महिन्यांपासून तुरूंगात आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व सहकारात २ टर्म पद भोगलेल्यांना नवीन कायद्यानुसार निवडणुक लढायला बंदी घातली आहे (सहकार क्षेत्रात मराठा सर्वाधिक आहेत).
4- यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या ३-४ महिने आधी मतदारांना राखीव जागा, स्मारके, पुतळे, कर्जमाफी, नामांतर अशांसारख्या अफूच्या गोळ्या देऊन पुढील ५ वर्षांसाठी मते मिळवून सत्ता टिकविली जायची. २०१४ मध्ये या गोळ्यांचा प्रभाव पडला नाही. म्हणून आता नवीन गोळ्या आणल्या आहेत.>> म्हणजे भाजपा ला मतदान केलं कि विकासाला मतदान आणि दुसऱ्या पक्ष्याला केलं कि अफूची गोळी हे चुकीचं आहे आणि राखीव जागा पुतळे ह्या पैकी किती मागण्याला भाजपा चा विरोध आहे. 2014 चा आधी हि भाजपा चा मराठा आरक्षण ला सपोर्ट होता आणि आत्ताही आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीने पुतळे, स्मारके, कर्जमाफी, फुकट माफी इ. लोकानुययी घोषणांशिवाय दुसरे काहीच केले नाही. लोकांना भुलविणे व मनसोक्त भ्रष्टाचार करणे एवढेच त्यांनी १५ वर्षे केले. निदान भाजपतरी निव्वळ लोकानुययी घोषणा न करता विकासाच्या मार्गाने जाईल या भावनेतून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी बसवून भाजपला सत्तेत आणले.
5-मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. बलदंड व धनाढ्य नेते यामागे असल्याशिवाय हे मोर्चे शक्य नाहीत.>> आस काही नाही, लोक स्वतः खर्च करून मोर्चाला जातात
आधीच्या धाग्यात याविषयीची सविस्तर माहिती आली आहे.
तो त्यांनी द्यावा अशी मागणी होतेय कारण ते अमराठा आहेत. महाराष्ट्रात गेल्या ४१ वर्षात एकाही अमराठा मुख्यमंत्र्याला आपली कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही.>> त्या मध्ये मराठ्यांचा काय दोष. ex - मनोहर जोशींना राजीनामा द्यायला काय मराठ्यांनी सांगितलं का ?
सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून काढून विलासरावांना का परत आणले? सुधाकरराव नाईकांना का जावे लागले?
हिते काही लोक असं म्हणत आहेत कि मोर्च्या मागे ncp आहे आणि आत्ता फडणवीस असे म्हणत आहेत कि मराठ्यांना आरक्षण देऊच तर मग ncp आणि bjp मध्ये फरक कसा काय ?
राष्ट्रवादी व भाजपमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे.

In reply to by वगिश

सिलेक्टीव वाचू नका हो. भुजबळ राष्ट्रवादीचे माजी उपमु होते आणि साहेबांच्या कृपाशीर्वादाने माया गोळा केली त्याची फळे भोफत आहेत आणि पुढील नंबर अजित पवार-सुनील तटकरे लागू शकतो (कंबहुना लागेलच कारण तशी कागदपत्रे केंन्द्रीय पुन्हा एकवार केंद्रीय तापास पथकाने तयार केलेली आहेतच ) मग सगळ्यांचे लक्ष विचलित करण्याचा हा अतिषय आत्मघातकी व जाती-जातीत द्वेष निर्माण करणारा प्रकार चालू केला आहे. कोपर्डी घटना निंदनीय आहेच पण त्याचा जितका पाठपुरावा आपल्याच सुप्रिया सुळे करतात (आणि रोज अगदी खालच्या भाषेत देवेंद्र फडवणिसांना शिव्या देत असतात) तोच बाणा या पुर्वी इतर संतापजनक घटनांमध्ये दाखविला नाही अखैर्लारलांजी असो,की कोल्हापुरातील ऑनर किलींग असो. इकडे दुस्र्यांना जातीचे राजकारण करतात म्हणून भाजपाला (याच धाग्यात ब्राह्मणांचा पक्ष असा शिक्काही मारला आहेच) आणि स्वतः फक्त स्वजातीवर झालेल्या अन्यायाचे भांदवल करायचे. जरा सोलापुरात निघालेल्या ओबीसी मोर्चातील फलक पहा (खैरलांजी साठी). या मोर्चाने महाराष्ट्राला किमान १५-२० वर्षे मागे नेऊन ठेवले आहे सामाजीक अभिसरणाबाबत (जाती-पाती तून वर येण्यामध्ये) कारण आंतरजालाचा वापर करून अतिष्य विखारी प्रचार-मते-विचार धुमाकुळ घालीत आहे. ज्यांना मिपावर मराठी मोर्चा अत्ताच का निघाला याचे संयुक्तीक आणि खरे उत्तर देता येत नाही त्यांनीच अन्यायाची आणि आरक्षणाची लंगडी सबब दिली. आरक्षणाचा मुद्दा आधीच्या सरकारने (हो उपमुख्यमंत्री मराठाच होता तेही पॉवरबाज) तरीही शेवटच्या सहा महिन्यात तकलादू निर्णय घेतला आणि समीती कुणाची तर नारायण राणेंची (त्यांच्या सारखे अभ्यासू व्यक्तीमतव पाहता काय दिवे लागणार आहेत हे माहीत असूनही) पहिल्या धाग्यात इतर राज्यांनी ५१% पेक्षा आरक्षन जास्त कसे दिले याचे कुणीही समाधान-स्पष्टीकरण दिले नाहीच आणि देणारही नाहीत. बाकी चालू द्या...

In reply to by नाखु

+ १ भुजबळ मराठा नसले तरी समीर भुजबळ, छगन भुजबळ, रमेश कदम इ. नंतर कुर्‍हाड आपल्यावर चालणार हे अजित पवार, तटकरे इ. नी ओळखलेले आहे. त्यामुळे जितक्या लवकर फडणविस जातील तितका आपला धोका कमी होईल हे ते ओळखून आहेत. २०१४ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री निवडायची वेळ आली तेव्हा थोरल्या पवारांनी नितीन गडकरी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रयत्न केले होते. गडकरींशी असलेल्या 'मित्रत्वाच्या' संबंधांमुळे आपल्या पक्षाच्या भ्रष्टाचारी नेत्यांविरूद्ध ते मऊ असतील अशी पवारांची धारणा होती. परंतु मोदी व शहांनी गडकरींना मुख्यमंत्री न करता अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेल्या व राष्ट्रवादीशी लागेबांधे नसलेल्या फडणविसांना मुख्यमंत्री केले. या मोर्चासाठी कोपर्डी हे केवळ निमित्त आहे. मूळ उद्देश ब्राह्मण वि. मराठा हा जातीयवाद भडकावून फडणविसांना घालविणे हा आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याचे यांना सहन झालेले नाही. आपल्या पक्षातील एकेक प्रकरणे बाहेर येत असून नेते अडकत असल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. फडणविसांना घालविले तर ब्राह्मण मुख्यमंत्री घालविणे व आपल्या पक्षावरील भ्रष्टाचाराची कारवाई थांबविणे असे एका दगडात दोन पक्षी मारता येतील. त्यासाठी यांना कोपर्डीचे आयतेच निमित्त मिळाले आहे. मूळ उद्देश लपविण्यासाठी कोपर्डी, मराठ्यांना राखीव जागा, शेतकरी, शिवाजी महाराजांचे स्मारक इ. विषय घुसडण्यात आले आहेत. सुरवातीला निर्नायकी असलेल्या मोर्चात आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चोरपावलांनी घुसले आहेत.

In reply to by विशुमित

खिक् :-P बरेच प्रतिसाद मलादेखील फारच रोचक आणि उद्बोधक वाटायला लागलेत. अगरोफोबिया आहे की काय इथल्या लोकांना %-) माबोवर यापेक्षा फारच चांगले किंवा अॅटलीस्ट न्युट्रल प्रतिसाद आलेत. === फडणवीस मुख्यमंत्री असूदे नाहीतर उडणसाडेतेहतीस! व्हु केअर्स? निवडून आलेत म्हणजे नक्कीच साडेतीन टक्क्यांखेरीज इतरांनीदेखील त्यांना मतदान केलंय. आणि एकदा निवडून आले म्हणजे ते सगळ्यांनाच रिप्रेझेंट करतायत; मत देणारे असो किंवा न देणारे... आणि तसेही ब्राह्मण फारच कष्टाळू, सरळमार्गी, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या मदतीची अजीबात गरज नसलेले, तरीही प्रगती करणारे इ इ असतात. मगतर नक्कीच मुख्यमंत्री काही ना काही योग्य मार्ग शोधून काढतील. वाय अदर्स आर सो वरीड?

In reply to by एमी

आणि तसेही ब्राह्मण फारच कष्टाळू, सरळमार्गी, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या मदतीची अजीबात गरज नसलेले, तरीही प्रगती करणारे इ इ असतात.
आहेचत ते तसे. घरं जाळली, शेती हिसकावून घेतली, राजकारणातून हद्दपार केलं, राखीव जागा आणून शिक्षण व नोकर्‍यांवर गदा आणली, ब्राह्मणांवर अत्यंत घाणेरडी पुस्तके लिहून बदनामी केली, घडलेला इतिहास नाकारून व खोटा इतिहास लिहून इतिहासातील ब्राह्मणांचे योगदान नाकारले . . तरीसुद्धा कोणाचीही मदत न घेता ब्राह्मण स्वबळावर प्रगती करीत आहेत.
मगतर नक्कीच मुख्यमंत्री काही ना काही योग्य मार्ग शोधून काढतील. वाय अदर्स आर सो वरीड?
मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरजच नाही. ब्राह्मण स्वबळावर, कोणाच्याही मदतीशिवाय प्रगती करण्यास समर्थ आहेत. राखीव जागा, शेती, राजकारण सरकारी मदत इ. चे पाठबळ नसताना ब्राह्मण इथवर आले आहेत. अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच. कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही. ब्राहमणांना काळजी असलीच तर ती १९४८ किंवा १९७८ ची पुनरावृत्ती होऊ नये हीच काळजी असेल. झुंडशाही व गुंडगिरीमुळे सर्वांनाच काळजी वाटू शकते. भांडारकर प्राच्य संधोधन संस्थेमध्ये व जिजामाता बागेतील शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जबरदस्तीने हटविताना झालेली झुंडशाही सर्वांनाच माहिती आहे. मराठे, जाट, पटेल, मुस्लिम किंवा इतरांना राखीव जागा देण्यासाठी आटोकाट प्रयत्न होणारच याची ब्राह्मणांना पूर्ण जाणीव आहे. भविष्यात आता आहेत त्यापेक्षा शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी कमीच होणार आहेत. त्यामागे राखीव जागा हे प्रमुख कारण नसणार आहे व बेसुमार वाढलेली लोकसंख्या हेच मुख्य कारण असणार आहे व ब्राह्मण त्यासाठी तयार आहेत.

In reply to by विशुमित

माझ्या प्रतिसादातील कोणती वाक्ये जातीयवादी आहेत? मी फक्त खालील उपसाहात्मक जातीयवादी प्रतिसादाला जातीयवाद मध्ये न आणता उत्तर दिले आहे.
आणि तसेही ब्राह्मण फारच कष्टाळू, सरळमार्गी, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या मदतीची अजीबात गरज नसलेले, तरीही प्रगती करणारे इ इ असतात. मगतर नक्कीच मुख्यमंत्री काही ना काही योग्य मार्ग शोधून काढतील. वाय अदर्स आर सो वरीड?

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या बऱ्याच प्रतिसादामध्ये असे का उद्घोषित करत आहेत की ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून हे मोर्चे निघत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचं तुमच्या साठी एकवेळ मानू पण शिवसेना, भाजप मधील पदाधिकारी का मोर्चा ला पाठिंबा देत आहेत. भाजप च्या कार्यकारणी बैठकीत का आरक्षण ला पाठिंबा दिला जात आहे? http://www.esakal.com/Tiny.aspx?K=VBGQSK अजून पर्यंत तरी कोण्या मोर्चेकार्यानी मुख्यमंत्रांचा राजीनामा मागितला नाही. मग एवढी धास्ती का वाटत आहे फडणवीसांना? भीती वाटतेय तर पदभार सोडून देऊन राजकीय सन्यास घ्यावा. भाजप ने ब्राह्मण मुख्यमंत्री नव्हे बुजगावणं बसवलं आहे महाराष्ट्रात, असे खेदाने म्हणावं लागतंय. बाकी पवार द्वेष अगदी ठळक उठून दिसतोय

In reply to by विशुमित

काँग्रेस राष्ट्रवादीचं तुमच्या साठी एकवेळ मानू पण शिवसेना, भाजप मधील पदाधिकारी का मोर्चा ला पाठिंबा देत आहेत. भाजप च्या कार्यकारणी बैठकीत का आरक्षण ला पाठिंबा दिला जात आहे? http://www.esakal.com/Tiny.aspx?K=VBGQSK
त्यांचं कारण असं की मराठा आरक्षणाला जाहीर विरोध करणे ही राजकीय चूक ठरेल म्हणून.
अजून पर्यंत तरी कोण्या मोर्चेकार्यानी मुख्यमंत्रांचा राजीनामा मागितला नाही. मग एवढी धास्ती का वाटत आहे फडणवीसांना? भीती वाटतेय तर पदभार सोडून देऊन राजकीय सन्यास घ्यावा.
सुप्रिया सुळे, उदयन भोसले यांच्याकडून ही मागणी आधीच आलेली आहे.
भाजप ने ब्राह्मण मुख्यमंत्री नव्हे बुजगावणं बसवलं आहे महाराष्ट्रात, असे खेदाने म्हणावं लागतंय.
मग तसं म्हणा.
बाकी पवार द्वेष अगदी ठळक उठून दिसतोय
अजिबात नाही. धोरणांना विरोध म्हणजे व्यक्तीद्वेष होत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

धोरणांना विरोध म्हणजे व्यक्तीद्वेष होत नाही. ^^^ बरोबर आहे, अपवाद फक्त मोदी, संघ, भाजप.

In reply to by श्रीगुरुजी

मी फक्त खालील उपसाहात्मक जातीयवादी प्रतिसादाला जातीयवाद मध्ये न आणता उत्तर दिले आहे. >> उपसाहात्मक का वाटला प्रतिसाद? ब्राह्मण आयडींनी या किंवा उडालेल्या धाग्यावर जे लिहलंय तेचतर मीपण लिहलंय. === तरीसुद्धा कोणाचीही मदत न घेता ब्राह्मण स्वबळावर प्रगती करीत आहेत. >> अगदी अगदी. सरकारी कॉलेजातून सबसिडाइज्ड शिक्षण घेणे ही बाकी सगळ्या पब्लिककडून घेतलेली मदत नाहीचय. किंवा जैनमराठ्यांनी उभारलेल्या कॉलेजातील ८०% जागा ना नफा ना तोटापद्धतीने सर्वजातीवर्गात वॉलंटरी वाटल्या तीदेखील मदत नाहीच! === मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरजच नाही. ब्राह्मण स्वबळावर, कोणाच्याही मदतीशिवाय प्रगती करण्यास समर्थ आहेत. >> अहो मराठा मोर्चाच्या गहन प्रश्नावर मुख्यमंत्री योग्य तोडगा काढतील म्हणतेय मी. ब्राह्मणांच्या स्वबळाचा कुठे प्रश्न आला यात? === अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच. कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही. >> अगदी सहमत आहे. म्हणूनचतरते इतकी वर्ष सरकारी आणि जैनमारवाड्यांच्या कॉलेजातील जागा ताठमानेने नाकारतायत. === ब्राह्मण त्यासाठी तयार आहेत. >> अगदी मान्य म्हणूनचतर मराठा शिक्षणसम्राटांनी 'ब्राह्मण क्षमस्व' बोर्ड लावून टाकावा. तो बघायलादेखील कोणी ब्राह्मण तिकडे फिरकणार नाही.

In reply to by एमी

तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो, माबो वॉर चांगली चर्चा झालीये ना! मग सोडून द्या.. इथे मिपावर योग्य चर्चेची अपेक्षा करू नका... काही जण सोडले तर प्रत्येकाला मी कसा शहाणा, आमची जात यांव आमची जात त्यांव हेच सांगायचे असते. तर, आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका कोणाला उत्तरे देण्यात. वयानुसार झालेली/करून घेतलेली लोकांची मते पक्की आहेत ती बदलायची कोणाला पडलेली नाही.

In reply to by एमी

अगदी अगदी. सरकारी कॉलेजातून सबसिडाइज्ड शिक्षण घेणे ही बाकी सगळ्या पब्लिककडून घेतलेली मदत नाहीचय. किंवा जैनमराठ्यांनी उभारलेल्या कॉलेजातील ८०% जागा ना नफा ना तोटापद्धतीने सर्वजातीवर्गात वॉलंटरी वाटल्या तीदेखील मदत नाहीच!
सबसिडाईज्ड शिक्षण ब्राह्मण घेताहेत? काहीतरीच काय? खुल्या वर्गातील सर्वांना जेवढी फी भरावी लागते तेवढीच फी ब्राह्मणही भरतात. इतर मागासवर्गियांना खुल्या वर्गापेक्षा कमी फी भरावी लागते तर मागासवर्गियांना अत्यल्प फी भरावी लागते. खुल्या वर्गाला मात्र संपूर्ण फी भरावी लागते.
जैनमराठ्यांनी उभारलेल्या कॉलेजातील ८०% जागा ना नफा ना तोटापद्धतीने सर्वजातीवर्गात वॉलंटरी वाटल्या तीदेखील मदत नाहीच!
कोणीही कोणालाही जागा व्हॉलंटरी किंवा ना नफा ना तोटा पद्धतीने वाटत नाहीत. भारती विद्यापीठ, सिंहगड, डी वाय पाटील, जयंतराव सावंत इ. संस्था मराठ्यांनी सुरू केलेल्या आहेत. या संस्थातून उदाहरणार्थ अभियांत्रिकीला प्रवेश फक्त सीईटी च्या गुणांवर मिळतो व खुल्या वर्गाला प्रतिवर्ष सुमारे १ लाख रूपये फी भरावी लागते. जागा वाटप व्हॉलंटरी नाही, ना नफा ना तोटा या पद्धतीने नाही व शिक्षण सबजिडाईझ्ड देखील नाही.
मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरजच नाही. ब्राह्मण स्वबळावर, कोणाच्याही मदतीशिवाय प्रगती करण्यास समर्थ आहेत. >> अहो मराठा मोर्चाच्या गहन प्रश्नावर मुख्यमंत्री योग्य तोडगा काढतील म्हणतेय मी. ब्राह्मणांच्या स्वबळाचा कुठे प्रश्न आला यात?
मी आधी म्हटल्याप्रमाणे ब्राहमणांना आरक्षणाची अजिबात काळजी नसून त्या निमित्ताने किंवा आरक्षण न मिळाल्यास १९४८/१९७८ ची पुनरावृत्ती होण्याची काळजी आहे. === अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच. कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही. >> अगदी सहमत आहे. म्हणूनचतरते इतकी वर्ष सरकारी आणि जैनमारवाड्यांच्या कॉलेजातील जागा ताठमानेने नाकारतायत. कसली ताठ मान आणि काय नाकारताहेत? ते जे काही मिळवित आहेत ते राखीव जागांच्या माध्यमातून नसून मिळालेल्या गुणांवर आहे.
=== ब्राह्मण त्यासाठी तयार आहेत. >> अगदी मान्य म्हणूनचतर मराठा शिक्षणसम्राटांनी 'ब्राह्मण क्षमस्व' बोर्ड लावून टाकावा. तो बघायलादेखील कोणी ब्राह्मण तिकडे फिरकणार नाही.
तसा बोर्ड लावायला अजिबात हरकत नाही.