स्वान्तसुखाय लिहिणे हासुद्धा उत्तम हेतू आहे.
तुमच्या शाळेनंतरचा प्रवास यशस्वी होवो.
एखादा तयारीचा गवई स्वान्तसुखायच रियाझ करतो, तरी आजूबाजूचे तल्लीन होतात. नवशिक्याचा स्वान्तसुखाय रियाझ ऐकून मात्र कधीकधी शेजारीपाजारी निष्ठुरपणे बोलतात. मग हळूहळू मागच्या वर्षी सुख देत होते, ते या वर्षी नवशिक्यालाच बेसुर वाटू लागते. कारण तोवर त्याच्या स्वान्तसुखाचा दर्जा, आणि गाणेही सुधारले असते. हा बदल चिवटपणे रियाझ केल्यामुळेच.
लिहिण्याचा सराव होईल, तसा स्वान्ताला सुख देईल त्याचा दर्जा उंचावत जाईल. तसे तुमचे लेखन बदलेल, किंवा तुमच्यासारखीच अभिरुची असलेले वाचक तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला स्वतःला वाटणारे सुख बाकीच्यांतही वाटले जाईल. लेखनाचा सराव करण्याची ही तुमची धमक अशीच राहो, अशा शुभेच्छा.
प्रतिक्रिया
शुभेच्छा