गोव्यांतील वेताळ मंदिरे
हिंदू धर्मात अनेक प्रसिद्ध प्रथा आणि सण आहेत. पण काही सण आणि परंपरा काही विशेष भागापुरत्याच असल्याने किंवा विशिष्ट जात, समुदाय इत्यादी मध्येच मर्यादित असल्याने इतर लोकांना जास्त माहिती नसते. अश्या प्रकारच्या काही प्रथा परंपरा आपल्याला ठाऊक असतील तर धाग्यावर जरुर लिहा.
गोव्यांतील वेताळ मंदिरे
राजन पर्रीकर ह्यांनी जबरदस्त छायाचित्रे काढली आहेत जरूर पहा. राजन पर्रिकरनी हि छायाचित्रे इतर ठिकाणी टाकण्यास मनाई केल्याने मी चित्र इथे टाकले नाही फक्त लिंक दिली आहे.
http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2016/01/19-16584-post/Vetal-Temple-Priol-Goa-1.jpg
इतर :
http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2013/01/Vetal-Loliem-Babu-Goa.jpg
वेताळ ह्या देवतेची मंदिरे गोव्यांत जागो जागी पाहायला मिळतात. पैगीण गावातील वेताळ मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. वेताळाची मूर्ती म्हणजे अक्राळ विक्राळ दैत्यासारखी असते. बहुतेक वेळा पूर्ण नग्न असते आणि इंग्रजीतील शब्दप्रयोग वापरायचा असेल तर वेल-हँग असते. लांबट आणि खाली असलेला पुरुषी अवयव म्हणजे "अधोरेतस" दर्शवण्यासाठी आहे असे जाणकार सांगतात. शिव हा ऊर्ध्वरेतस असतो. कधी मंदिर असते तर कधी अशीच जंगलात एकटी मूर्ती असते. बरगड्या नेहमीच बाहेर दिसतात आणि पोट अगदी आंत. कमरेचा बंध फार मोठा असतो आणि त्याला एक छोटी घंटा असते. गळ्यांत नागाची रुद्रमाला (मुंडकी) आणि बाजूना नागाचे केयूर आणि अंगद हि आभूषणे असतात. हिंदू धर्मातील इतर मूर्तीप्रमाणेच काही गोष्टींवर मुर्तीकाराने विशेष लक्ष दिले आहे असे वाटते. उदाहरणार्थ कानाच्या पाळी वजनाने जवळ जवळ तुटल्या आहेत असे वाटते. काही ठिकाणी बरगड्यांच्या खाली विंचू असतो. डोक्यावर कधी कधी सर्प असतात. वेताळ बरोबर असलेल्या सर्पांना वत्स असा शब्द आहे. [१]
लोळिये गांवातील (वर दाखवलेली नग्न मूर्ती) गोव्यांतील सर्वांत मोठी मूर्ती असून उंची सुमारे २ मीटर आहे. गोव्यांतील इतर सर्व मूर्ती समभंग असल्या तरी हि एकमेव मूर्थी त्रिभंग स्थितींत आहे. हाय एकाच मूर्तीला प्रभावळ सुद्धा आहे.
बहुतेक वेळा वेताळाची पूजा अर्चा ह्यांत ब्राह्मण शिवाय आदिवासी किंवा इतर जातींचा जास्त सहभाग असतो. बहुतेक ठिकाणी ग्रामदेवता पंचायतन सिस्टम मध्ये वेताळ देवालयाना सुद्धा स्थान मिळाले आहे आणि काही ठिकाणी चित्पावन ब्रह्मन् पूजा अर्चा करतात पण अनेक प्रकारच्या पूजा, प्रथा साठी "घाडी" ह्या ब्राह्मणेतर माणसाची आवश्यकता मात्र नेहमीच असते. घाडी चा इंग्रजी शब्द असेल shaman. घाडीचे इतर जवळचे शब्द आहेत गुरव, जल्मी,रावळ इत्यादी.
घाडीमध्ये कधी कधी अवसर इत्यादी येतो आणि जनावरांचा बळी देण्याचे काम सुद्धा त्याच्यावर असते.
ज्या प्रमाणे इतर देवतांना पाकळी लावून प्रसाद घेतला जातो त्याच प्रकारे इथे सुद्धा अर्चक प्रसाद लावू शकतो. लोकांच्या मनातील वेताळ देवाविषयी भय-पूर्वक आदर स्पष्ट दिसतो. नवस वगैरे करताना विशेष काळजी बाळगली जाते कारण नवस फेडता आला नाही तर वेताळ माफ करत नाहीत अशी लोकांत श्रद्धा आहे. त्याशिवाय ज्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने ह्या देवाला विशेष मान दिला पाहिजे तो नाही दिला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण विध्वंस वेताळ करतो असे म्हणतात. सांगायचं मुद्दा असा कि इतर मंदिरांत ज्या प्रमाणे लोक आनंदात जाऊन येतात त्याप्रमाणे इथे जात नाहीत, इथे थोडे भय मनात घेऊनच जावे लागते.
पैगीण गावांतील वेताळ मंदिराची फार छान कथा आहे. मंदिर अत्यंत पुरातन असून वैदिक पद्धतीने आचरण करणाऱ्या लोकांपेक्षाही हे मंदिर जुने आहे. गोव्यांतील बहुतेक भागांत वेळीप, कुणबी, गावडे, धनगर इत्यादी लोकांचे वास्तव्य होते. ब्राह्मण किंवा इतर आधुनिक हिंदू लोक हळू हळू आले. नवीन लोक बहुतेक करून नदी च्या जवळपास राहायचे तर मूळ निवासी बहुतेक जंगलांत आंत. निसर्गपूजा, प्राणिपूजा सर्वांसाठीच होती.
तर म्हणे वेताळ हा प्रचंड दैत्य एका एका गावांचा विध्वंस करीत जात होता. हळू हळू बातमी पसरून ह्या भागातील लोकांचा जो बुधवंत होता त्याच्या कडे पोचली. वर उल्लेख केलेले लोक छोटया छोट्या गावांत राहत असत आणि त्यांचा गावप्रमुख म्हणजे बुधवंत (बुद्धिमान). तर ह्या वेताळाला आधीच गाठून त्याच्याशी काही तरी तडजोड करावी हा विचार है बुधवंताने केला. त्याप्रमाणे वेताळाला त्याने वाटेत गाठले. वेताळाने त्याच्या समोर काही अटी ठेवल्या.
१. मला गर्भ खायला पाहिजे
बुधवंतने हि भयानक अट तात्काळ मान्य केली.
२. मला दोन पायाच्या जनावराचा बळी पाहिजे.
बुधवंत ने दोनच का ? मी दहा पायाच्या जनावराचा बळी देतो असे सांगितले . वेताळ ने असला प्राणी पाहिलेला नसल्याने त्याने ते मान्य केले.
इत्यादी इत्यादी
प्रत्यक्षांत बुधवंत ने त्याला गर्भ म्हणून केळ गर्भ, खेकडा इत्यादी गोष्टी दिल्या.
ह्या वेताळा चा उत्सव ३ वर्षांनी येतो. दुसऱ्या वर्षाला वेताळाची सेना पंचक्रोशींत फिरून सर्व देवळांना आमंत्रण देते. हे आमंत्रण कुठल्यातरी अगम्य भाषेंत एका कपड्यावर लिहिले आहे शब्दांचे अर्थ सुद्धा लोकांना ठाऊक नाहीत. पण चाल मात्र परंपरागत आठवणीत आहे आणि त्यावरून हि वेताळाची स्तुती असून वेताळाची सेना क्ती पराक्रमाची आहे असे लिहिले असावे असे वाटते. See video : https://www.youtube.com/watch?v=Gb28RjsY6Ww
वेताळ देव इतर सर्व देवाना पुढील वर्षी आपल्या उत्सवाला यावे असे आमंत्रण देतो.
पुढच्या वर्षी गड्यांची जत्रा होते. दोन महा प्रचंड खांब्यावर एक प्रचंड चक्र बसवलेले असते. जमिनी पासून किमान २५-३० फूट उंचीवर रहाट गाड्या प्रमाणे हे चक्र वाटते. गडे हे ठराविक परिवारातील लोकच बानू शकतात. ह्यांना २४ तास मौन व्रत घ्यावे लागते. जत्रेच्या दिवशी ह्यांना भरपूर मान सन्मान. नंतर ह्यांचा पाठीची चामडी ओढून त्यांत गरा म्हणजे एक हुक (मासे पकडण्यासाठी वापरतात तसा ) खुपसला जातो. वेदनेने ब्र निघू नये म्हणून तोंडांत सुपारी धरायला दिलेली असते.
नंतर ह्यांना त्या खांब्यावर चढवले जाते आणि चक्राला बांधले जाते. नंतर काही लोक चक्र फिरवतात आणि तोंडाने मोठमोठ्याने आवाज काढतात. पूर्वीच्या काळी हे चक्र नंतर वरून खाली कोसळत असत आणि कुणी मेला तर त्याला नरबळी समजत असत. (असे म्हणतात).
ह्या शिवाय जत्रेंत काही लोकांना अवसर सुद्धा येतो. रेड्याचा बळी देण्यासाठी अनेक रेडे आणले जातात आणि अवसराने प्रश्न करतंच एखादा रेडा पुढे येतो आणि त्याला बळीसाठी निवडले जाते.
जत्रेंत सर्व जातीच्या लोकांना एकत्र काम करावे लागते आणि भेद भाव असत नाही. प्रत्येक जातीला काही ना काही विशेष कर्तव्य असते. गांवात महार वगैरे नसले तरी कुठून तरी त्यांना बोलावले जाते आणि बळीचा रेडा मारण्यासाठी दिला जातो त्या शिवाय ते मागतील तितके तांदूळ, मसाले, वस्त्रे इत्यादी दिले जातात.
काळाच्या प्रवाहांत तग धरून राहिलेली हि एक सुंदर परंपरा आम्हाला आमच्या पूर्वजांशी जोडते.
[१] http://blog.parrikar.com/wp-content/uploads/2011/11/vetal.pdf
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सदर लेख लिहिण्यासाठी श्री
ते लेख वगैरे उत्तम अन अभ्यासू
> का फक्त कायम वसवस करायची
हे वेताळ नसून मूळचे असितांग
अतिसंग भैरव विषयी जास्त
कुठेच मिळनार नाही कारण अतिसंग
अतिसंग भैरव नावाचं रूप
कदंब-शिलाहारांच्या काळात ह्या
माहिती आवडली, धन्यवाद.
हा माझ्या लोलये गावातला वेताळ
टका आणि जत्रा पैंगिण च्या
पैंगिणला जायचे आहे गं एकदा.
अंदाजे ६५-७० किमी असेल गं.
हो शोधलं, दीडेक तास लागतो. हे
पाळोळे हा समुद्र किनारा जवळ
हैला.. यशोताईला हाटेलात
+१२२
आणि गावातल भगवतीच पठार ,
हो तर, मी, तू, पैताई आणि पिशी
अगदी अगदी!
डन ग यशो. पैताई चालेल. हवा,
फजाव म्हणजे काय?
चवळी सारखं पण आकाराने जरासं
भारीच
हो
धन्स
अळसुंदे रे.
हे ही नाव ऐकलं नव्हतं
हे बघ
पाहिले नाहित इथे कधीच.
हे सगळे बंदुकगॉळ्या आयटेम
कोकणातली खासियत. देशावर सहसा
तिकडे नाही मिळत
चवळीसारखे कडधान्य असते
पण थोडासा कोरडा झाला असं
लोलीये गावांतील मंडळी सुद्धा
तुमी खंयच्या गावांत तर?
महिती आवडली. कोकणात देखिल
आरवलीचा वेतोबा प्रसिद्ध आहे.
उत्तम लेख आहे साहना जी,
पर्रिकर यांचा फोटो ब्लॉग खूप
राजन पर्रीकर शास्त्रीय
छान माहिती.आरवलीचा वेतोबा
अर्रर्र!! आता काही
छान माहीती.
परुले
नंतर ह्यांना त्या खांब्यावर
https:/
बेताळ
देखणा आहे वेताळ. अप्रतिम.