भरतकुमार राऊत (राज्यसभेवर जाण्या आधी) यशवंतच्या व्ही.आय.पी. मध्ये भेटले. निमित्त "इको फोक्स" ची स्पर्धा. विषय पर्यावरण... बोलताना विषय आधुनिक मराठी वर आला... मुलांना मराठी नीट बोलता-लिहिता येत नाही असा सूर होता. राऊतांचा विरोध... मुलं मराठीच आहेत आणि ती बोलतात ती भाषा ही मराठीच आहे... लिहितात तो प्रकार मराठीत प्रचलित झाला नसेल तर होईल. आणि नाहीच होऊ शकला तर तिसरा नवा प्रकार येईल.
भाषाशुद्धी ही समकालिन संकल्पना आहे आणि तिच्यावर प्रतिगामी विचारांची बळजबरी, संस्कृति या अवजड शब्दा मागून उतरवलेली आहे. मुळात भाषाशुद्धी नावाचा प्रकारच "माझी बोली" या अहं शी निगडित आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा बोलली जाते हे खोटे आहे. अनेक बोली आहेत आणि त्यांना स्वतःची नावे ही आहेत. त्यांना "लिहिते" केले तर तीच बोली तशीच उतरवली जाईल. तिची शुद्धता आणि अशुद्धता ठरवणारे आपण कोण?
मिपा वर विचारवेध सोडून शुद्ध (?) लेखनावर बोट ठेवणारे बरेंच प्रतिसाद दिसतात. खरा प्रतिसाद असतो, 'बघा, तुम्हाला मराठी टंकता येत नाही. काढली का नाही मी चूक?' हे अगदी आवडीने केले जाते. (विचारवेधा ऐवजी मर्मवेध) काळ बदलला, मंद मुलं डॉक्टर, इंजिनिअर्स ऐवजी आय.टी., एम.बी.ए. होऊ लागली तरी प्रकृति बदल होताना दिसत नाही. दॅट केन डॉल लाइक एटिट्युड'ज् नो टेकिंग यू एनिव्हेर... चिको!
- रेझर रेमॉन
वाचने
2261
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> मिपा वर
जी बोलतात
समजले नाही ...
मुळात एक
सहमत
येलो येलो आईज
अशुद्ध लेखन..