दुर्गदुर्गेश्वर रायगड ------ एक स्वर्गीय अनुभव!
नमस्कार मित्रहो. मैत्रिणींनो ,
सर्व प्रथम सर्व मिपाकरानी मला रायगडाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास , शिवचरित्र वाचून कृतकृत्य झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले बघण्याचा मनोदय अतिशय उशिरा आणि हळूहळू का होईना पूर्ण होत आहे. आतापर्यंत सिंहगड, सज्जनगड कित्येक वेळा पाहिला. पण इतर किल्ले पाहण्याचे जमत नव्हते. दुर्गदुर्गेश्वर रायगड रोपवेसकट पाहण्याचे मनात होते. आणि हा योग २० ऑगस्ट ला जमून आला. सुरुवातीला पाच जण मित्राच्या कारमधून जाण्याचा बेत होता पण नेहमीच्या अनुभवाप्रमाणे पाच पैकी तीन गळलेच! पण ही इष्टापत्ती होती. कारण आम्ही शांतपणे दोघे जण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकलो. तसेच रायगड पाहाताना तो दैदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.
या सफरीत जो माझा मित्र तुषार याने संपुर्ण वेळ सारथ्य केले, येतानाचा खराब रस्त्याचा ५० किमी वरंध घाटही त्याने गाडीतून सर केला म्हणूनच आम्ही एका दिवसात हि भटकंती पूर्ण करू शकलो. त्याचे शतश: आभार! मुख्य म्हणजे गणसंख्येअभावी हि भटकंती रद्द करणे आमच्या मनात आले नाही हे बरे!
पाऊस हजर पण मुसळधार नाही, लवकर निघाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नाही आणि श्रावणातील ऋतू हिरवा ऋतू बरवा , अशा सर्वच गोष्टी दुधात साखर मिसळल्याप्रमाणे जमून आल्या होत्या!
सकाळी ६३० वाजता कोथरूड डेपो इथून आम्ही निघालो. सुखद गारवा, आणि मधूनमधून येणाऱ्या सरी यांनी आमच्या भटकंतीला शेवट पर्यंत साथ केली.
कोथरूड वरून भूगाव मार्गे मुळशी सरोवरापर्यंत आल्यावर निसर्गाचा शृंगार दिसणे सुरु झाले.
हिरवीगार वनराई , भव्य मुळशी सरोवर , ढगांचे धुके आणि पाऊस उन्हाचा लपंडाव हे सर्व पाहत पाहत आम्ही ताम्हिणी गावापर्यंत कसे पोहोचलो कळलेच नाही. आणि मग ताम्हिणी घाटात
नटून थटून असलेल्या छोट्या मुलीला बाबांनी कडेवर घ्यावे तसे , डोंगर या वनराईला अंगाखांद्यावर खेळवत होते, ठिकठिकाणी दिसणारे छोटे जलप्रपात व लांब डोंगरावर दिसणारे मोठे उंचच उंच
धबधबे अतिशय सुंदर दिसत होते.
धबधब्यांजवळ मर्यादित वेळ थांबून आम्ही किल्ले रायगडाचा दिशेने कूच झालो, ताम्हिणी घाट संपल्यानंतर सुमारे १५ किमी वर एक रस्ता सरळ कोलाड कडे जातो व
डावीकडे महाड आहे. या रस्त्याने प्रथम विळे हे गाव लागते. माझ्या आधीच्या माहितीप्रमाणे मग नंतर निजामपूर व नंतर १५ मिनिटात मुंबई गोवा रस्ता लागतो व माणगाव , महाड करून मग रायगडचा रस्ता आहे . पण
आम्हाला निजामपूर आधीच डाव्या दिशेला रायगडला जाणारा फलक दिसला व आम्ही तिकडे गाडी वळवून पाचाड कडे जाऊ लागलो. सुंदर वनराई , धबधबे , धुक्याची दुलई हे सर्व पदोपदी होतेच. या शॉर्टकट मुळे आमची
२० ते ३० मिनिटे वाचली. मग २० मिनिटात आम्ही पाचाड गावात पोहोचलो. पाचाड गावात जिथे जिजाऊंचा देहांत झाला होता तिथे समाधी उद्यान आहे, जिजाऊ मातेपुढे आम्ही नतमस्तक झालो.
तेथेच शिवरायांचे आज्ञापत्र आहे त्यात वृक्ष हे कसे जपावे व ते किती महत्त्वाचे आहेत हे लिहिले आहे.
मग आम्ही रज्जुरथा जवळ (रोपवे) आलो. तिथे एका हॉटेलात चहापान करून पार्किंग वगैरे करून
रोपवेचे तिकीट काढले. रोपवेचे तिकीट २५० रिटर्न व १५० सिंगल आहे, पाऊस मोठा आलाच तर धोका नको म्हणून आम्ही रिटर्न तिकीट घेतले. माफक गर्दीमुळे आमचा नंबर लगेच लागला. पहिलाच रोपवे चा अनुभव असल्यामुळे आम्ही खूप उत्सुक होतो. मग रोपवे वर जाणे सुरु झाल्यावर काय? स्वर्ग सफारिचा आनंद ! भव्य डोंगर , आणि वेगवेगळे उंची कपडे नेसून स्नेहसंमेलनात अनेक गुणदर्शन करणाऱ्या नटलेल्या विद्यार्थिनींप्रमाणे , निसर्ग पाऊस, उन्ह आणि धुक्याची दुलई अंगावर लेवून
आमच्या डोळ्याचे पारणे फिटवित होता. रोपवेतील प्रत्येक क्षण थरारक आणि तितकाच आनंददायक! एकाच वेळी खालून वर आणि वरून खाली जाणारा रोपवे सुरु करतात त्यामुळे आम्हाला वर जाताना
बाजूला खाली येणारे पर्यटक दिसले. सुमारे १२ मिनिटात आम्ही वर रायगडावर पोहचलो, मग रायगडावर प्रवेश तिकीट काढून वर चालू लागलो. आम्ही गाईड घेतला नाही पण घेतला असता तर बरे झाले असते
असे नंतर वाटले. आमच्या वाचनाप्रमाणे आम्ही तेथील स्थळे पाहून माहिती घेतली,
सुरुवातीला आम्ही मेणा दरवाजा पाहिला मग नंतर खालील ऐतिहासिक ठिकाणे पाहिली.
१. गंगा सागर तलाव एक अप्रतिम मानव निर्मित सरोवर.
२. राजवाडा - राज्याभिषेकाचे ठिकाण.
३. राजांच्या राण्यांचे अंत:पुरातील खोल्या
४. बाजार पेठ.... अतीशय भव्य दालने असलेली दुकाने. असे सांगितले जाते कि घोड्यावरून हि बाजार करणे शक्य होते.
६. सचिवालय आणि खलबत खाना जिथे गुप्त आणि महत्त्वाच्या वाटाघाटी होत असत.
७. जगदीश्वर मंदिर
८. शिवराय समाधी
९. वाघ्या समाधी
१०. टकमक टोक ,, येथून
गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
हे सर्व स्थळे पावसामुळे झिजत चालली आहेत , तंत्रज्ञानाचा वापर करून , मूळ गाभ्याला धक्का ना लावता , डागडुजी करणे गरजेचे आहे.
टकमक टोकाजवळच एका कुटीत आम्ही झुणका भाकरी व भजीचा पुरेपूर आस्वाद घेतला. ऑर्डर दिल्यानंतर २० मिनिटात जेवण बनवले जाते या आम्ही टकमक टोक पाहून
आलो. त्यावेळी आसपासची शेळी सतत आमच्या बरोबर होती.
नंतर रोपवेने खाली येऊन आम्ही वरंधा मार्गे तुलनेने , जास्त अवघड मार्गाने ५ तास प्रवास करून पुण्याला येऊ या भटकंतीची सांगता केली
मेणा दरवाजा
अंत:पूरातील सदनिका
राजवाडा आणि सचिवालय
खलबत खाना
राजांचे सिंहासन
बाजारपेठ
जगदीश्वर मंदिर
शिवरायांची समाधी
वाघ्याची समाधी
गंगा सागर तलाव
टकमक टोक व वरून दिसणारी विहंगम दृश्ये!
कस्टमर केअर
या कुटीत आम्ही झुणका भाकरीचा आस्वाद घेतला.
रोपवे वरून खाली
येताना
शिवराय भाग्य देशाचे , हे संजीवन प्राणांचे , हे रूप शक्ती युक्तीचे !
श्रीमंत योगी शिवरायांना त्रिवार नमन !
वाचने
8135
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
रायगड?.. तो ही एका दिवसात??
फोटो गुगल + वर पब्लिक शेअर
छान लिहिलंय.
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
चला परत
खरोखरच , रायगड एक काय दोन
जळजळ ....
छान.
दुर्गदुर्गेश्वर रायगड ------ एक स्वर्गीय अनुभव!
आजकाल
रायगडला मुक्काम करा एक दिवस
छान!जगदिशराचा बाहेरचा फोटो
होय कंकाका,
In reply to होय कंकाका, by शान्तिप्रिय
निजामपूर पाचाड मार्गे गेल्यास
In reply to निजामपूर पाचाड मार्गे गेल्यास by प्रचेतस
+१
In reply to +१ by स्वच्छंदी_मनोज
स्वच्छंदी_मनोज आणि वल्ली,
लिहिण्याच्या ओघात एक राहुन