नमस्कार !
२००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले.
मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या !
यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते.
२०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात.
२०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती.
सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती )
या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या
या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ !
त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही !
दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते !
त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही )
५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१
डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती.
मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे !
मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत !
जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे !
पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे !
अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !
वर्गीकरण
वाचने
129324
प्रतिक्रिया
173
मिसळपाव
प्रतिक्रिया
२००७ पूर्वी वेगवेगळ्या
अभिनंदन विटू काका आणि विटू काकू!
शुगर्स अॅडव्होकेट
मलाही काहीसे असेच वाटले होते.
In reply to शुगर्स अॅडव्होकेट by राजेश घासकडवी
बऱ्याच पेशंट चा जवळच नातेवाईक
In reply to मलाही काहीसे असेच वाटले होते. by संदीप डांगे
Ok. Fine. Thanks for the
In reply to बऱ्याच पेशंट चा जवळच नातेवाईक by सामान्य वाचक
घासुगुरुजीआपल्याला पडणारा
In reply to शुगर्स अॅडव्होकेट by राजेश घासकडवी
जर तुम्हाला थोडी औषधे आणि
In reply to घासुगुरुजीआपल्याला पडणारा by सुबोध खरे
बहुसंख्य डॉक्टर हे रोज पाहत
In reply to जर तुम्हाला थोडी औषधे आणि by राजेश घासकडवी
अतिशय महितीपूर्ण धागा आणि तितकेच माहितीपूर्ण
काही माझी निरीक्षणे आणि
ह्म्म...
मूळात मधुमेह होतो ( टाईप २)
In reply to ह्म्म... by विटेकर
मुद्दा
In reply to मूळात मधुमेह होतो ( टाईप २) by राजेश घासकडवी
You are not scared of meds because
In reply to मूळात मधुमेह होतो ( टाईप २) by राजेश घासकडवी
मला हेच म्हणायचे होते
In reply to ह्म्म... by विटेकर
होय
In reply to मला हेच म्हणायचे होते by सामान्य वाचक
अभिनंदन विटूकाका
डॉ सुबोध खरे, डॉ आनंदी गोपाळ,
मला एक शंका आहे. मधुमेह
सर्वप्रथम विटेकर काका आणि काकूंचे अभिनंदन!
इथे काही वाचा...
लिन्क
In reply to इथे काही वाचा... by चौकटराजा
खुपच छान लेख व प्रतिसादही
फार चांगला धागा लिहिला आहे ,
अपील
मधुमेहींसाठी गहू पीठ, तांदूळ, पोहे
होय
In reply to मधुमेहींसाठी गहू पीठ, तांदूळ, पोहे by धर्मराजमुटके
लॅब टेस्टचे रिपौर्ट विश्वासहार्य नसतात.
In reply to मधुमेहींसाठी गहू पीठ, तांदूळ, पोहे by धर्मराजमुटके
आशिर्वाद हा unilever ह्या
In reply to लॅब टेस्टचे रिपौर्ट विश्वासहार्य नसतात. by जालिम लोशन
जेविद्वि व्रताचे पालन केले तर वजनाबरोबर मधुमेह देखील कमी होतो अस
जेविद्वि व्रताचे पालन केले
In reply to जेविद्वि व्रताचे पालन केले तर वजनाबरोबर मधुमेह देखील कमी होतो अस by चामुंडराय
जेविद्वि व्रत म्हणजे डॉ. J. V. दीक्षितांचे दोन वेळा जेवायचे व्रत
In reply to जेविद्वि व्रताचे पालन केले by धर्मराजमुटके