प्रतिजैविकांचा भडिमार आणि वस्तूस्थिती
काय म्हणताय लोक्स बरे आहात ना? मिपाची राजधानी वाशी(:):)) येथील महाकट्टा मस्तच झाला खूप मिसला मी . असो
टीप: या चर्चेतून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. तसे वाटल्यास हा धागा लगेच काढून टाकावा ही संपादक मंडळाला नम्र विनंती!
सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. जीवसृष्टी फुलत आहे. मग "विषाणू" .... जे जीवच असतात ते याला अपवाद कसे असणार? या दिवसात तो एक ताप असतो. केव्हा विषाणूसंसर्ग होईल याचा नेम नसतो आणि मग फ्ल्यू, चिकन गुनिया असे अनेक आजार होतात आणि बळावतात.मग आपण दुखणे अंगावर न काढता फॅमिली डॉक्टर कडे धाव घेतो. बऱ्याच वेळा हे डॉक्टर त्यांच्याकडील औषधे आणि इंजेकशन्स देतात आणि त्याशिवाय काही औषधे लिहून देतात. त्यातील ९९% औषधे ही प्रतिजैविके ज्याला इंग्रजीत अँटी बायोटिक म्हणतात ती असतात पण हि औषधे लिहून देताना डॉक्टर रॅशनल विचार करीत नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णाना भोगावे लागतात. प्रतिजैविकांचा धंदा वाढत चालला आहे. पण प्रतिजैविके ही सरसकट वापरावयास सांगणे अनैतिक आहे. याबद्दल मि माझी मते येथे मांडत आहे. या विषयावर साधक चर्चा व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच !
माझा अनुभव...... मी घराजवळच असलेल्या डॉक्टर कडे जातो आणि ते वरील प्रकार नेहमी करतात. परंतु नंतर नंतर मी त्यांना अशा प्रकारची औषधे देऊ नका म्हणून विनंती केली मग त्यांनी सुरुवातीला डोस कमी करून नंतर नंतर ती लिहून देणे बंद केले, पण इतरांचे काय?
आता अँटी बायोटिक बद्दल वस्तुस्थिती :
१. अँटी बायोटिक म्हणजे असे औषध जे विषाणूंची वाढ खुंटवते किंवा विषाणू मारून टाकते.
२. असे औषध सरसकट देणे योग्य नाही.
३. अँटी बायोटिक आणि हर्बल मेडिसिन एकत्र घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
४. अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते. याशिवाय अनेक गंभीर साईड इफेकट होतात.
५. आजकाल उठसूट अगदी सध्या आजारातही, अँटी बायोटिक घ्यायला सांगितले जाते यात औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात.
६. अँटी बायोटिक चा कोर्स पूर्ण करावाच लागतो. त्यात हलगर्जी झाल्यास विषाणू औषधाला दाद देत नाहीत .
७. आपणाला आठवत असेल की चार पाच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या लॅन्सेट जनरल मध्ये एक संशोधन आले होते त्यात भारतातील अँटी बायोटिक च्या अयोग्य वापरामुळे एक नवीन विषाणू "न्यू दिल्ली व्हायरस " उद्भवला आहे असे उल्लेखिले होते. याबद्दल खूप गोंधळ माजला होता आणि भारतातील वाढत चाललेले मेडिकल टूरीजम रोखण्यासाठी हा कांगावा केला होता अशी चर्चा होती.
एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात पण कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी याकडे दुर्लक्ष करतात हे माझे मत आहे.
आपला व्यवसाय चालवणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे पण त्यासाठी नैतिकता महत्त्वाची असते हे समजले पाहिजे.
याबद्दल जाणकारांनी आपलीही मते मांडून एक निरोगी चर्चा करावी ही नम्र विनंती!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
ळॉळ्ळ्ळ
टका..................
खरं आहे. पण एक दुरुस्ती. अँटी
धन्यवाद स्नेहांकिता.
संजीवनीच
आता अँटी बायोटिक बद्दल
.... एक डॉक्टरकी!
टंकनश्रम वाचवल्याबद्दल
धन्यवाद खरे डॉ
कमाले! सहा मुद्दे चूक मांडून
झेंडा कसला? विट्टला?
द्येवा,
परत एकदा सहमत! विषाणू वाचून
सर्व वैद्य* मंडळी यांस नम्र
या बाबतीत ...
वेगळा धागा काढीत आहे
तो वेगळा धागा ईथे वाचा...