उड्डाणापूर्वी दिल्या जाणार्या सुरक्षाविषयक सुचना कधी काळी प्रत्यक्षात वापरता येता येत असतील, असे कधीच वाटले नव्हते! वैमानिक सुलेनबर्गर यांच्या कुशलतेचे आणि प्रसंगावधानतेचे कौतुक करावे तेवढे कमीच.
काल हा प्रसंग घडला आणि आजच कलकत्यालादेखिल सधारण असाच प्रसंग घडल्याचे वृत्त आले आहे.
फियादिन पक्षांसंधीच्या वृतात तथ्यांश किती, ते पहावे लागेल. तसे खरोखरच असेल, तर एका वेगळ्या प्रकारच्या दहशतवाचा सामना करण्याची तयारी करावी लागेल, हे नक्की!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
गटण्या, खरं खरं सांगा हे तू मुद्दाम करतोस का खरंच तू इतका ढढोब्बा आहेस? तुला एकदा भेटलेच पाहिजे बुवा!
बाकी केके, लेख मस्त जमलाय रे! बर्याच दिवसांनी आलास?
अघळ पघळ
कालच या विमानाच्या क्रॅश लॅडिंगचे फूटेज न्युज चॅनलवर पाहिले,,,तो वैमानिक म्हणजे मला देवदूतच भासला,,स्वतःचे संपुर्ण कौशल्य पणाला लावुन त्याने सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले...
त्या वैमानिकाला माझा सलाम !!!
मूक मानवाच्या हत्येचा प्रयत्न करणारया पक्षांना इतके दिवस पाठिशी घालणारया मनेका, अल गोर वगैरे प्रभॄतींना सुद्धा ह्या खटल्यात प्रतिवादी केल्याचे समजते.
परवा ती पामेला आली होती मुंबईत की कुत्र्यांना मारु नका म्हणुन..आईच्च्या गावातं ,,,,या बयेला काय ठावुक की आमच्या झोपचं खांडोळ ही कुत्तरडी कशी करतात ते !!!!
हे वाचा ती काय म्हणाली ते :-- http://www.loksatta.com/daily/20090116/main.htm
(पेटा ?...)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
हे पक्षी फिदायीन असून, आपल्या जीवाची पर्वा न करता विमानाच्या इंजिनात घुसतात. विमानाची आणी पर्यायाने त्यामुळे मोठी जिवीतहानी घडवून आणाण्याचा हा मोठा डाव आहे. ह्या पक्ष्यांना अफगाणिस्ताना खास प्रशिक्षण दिले जात असून, हळूहळू जगातील सर्व महत्त्वाच्या विमानतळांच्याआसपास हे पक्षी आपला तळ ठोकतील.
हे मस्त!!!!!
अशा फीदाइन पक्षांचा आणि अल कायदाचा भारत सरकार जाहीर निशेध करत आहे.पून्हा जर असा प्रयत्न झाला तर भारत सरकार अत्यंत कडक कारवाइ करेल असा अंतीम इशारा देत आहे, तेव्हा सर्व पक्षांनी घाबरून रहावे...!!!
ओंकारचा ब्लोग-सारथी
त्या कर्तव्यदक्ष वैमानिकाला माझाही सलाम !!
.... त्या सर्व प्रवाशांनाही....ज्यांनी सर्व सुरक्षानियमांचे काटेकोर पालन केले.
.... आणि विमानातल्या स्टाफला ही !!
माझाही वैमानिकाला सलाम..
फक्त पक्षीच नाही प्राण्यांना सुद्धा फिदायिन प्रशिक्षण दिले जात आहे. आमचा संशय मुंबईतील भटक्याकुत्र्यांवरही असून त्यांच्यावर आम्ही कडक नजर ठेवून असतो.
मागच्याच वर्षी पार्ले येथे अशाच काही कुत्र्यांनी एका मुलीचे लचके तोडले होते. असेच आमच्या एका भांडकुदळ शेजार्याचा कुत्र्यांनी पाठलाग करून त्याला गटारात पाडले होते.
त्याचा हात त्यामुळे काही दिवस बांधून ठेवावा लागला होता. जरी आमचे त्या शेजार्याबरोबर वैर असले तरी त्याच्यावर झालेल्या या हल्यामुळे आम्ह्यालाही धक्का बसला. तात्पुरते वैर विसरून त्यांच्याबरोबर आम्ही अस्थीरोगतज्ञाकडे गेलो होतो.
खादाडमाऊ
भारतात विशेषतः हवाई दलाची अनेक विमाने पक्षांशी टक्कर झाल्यामुळे कोसळली आहेत.
पैकी अर्ध्याहून अधिक घटना "रॅप्टर" जातीचे पक्षी (गिधाडे आणि घारी) आदळल्यामुळे झालेले आहेत. भारत सरकार फक्त त्याबाबत हे असले अभ्यास करते, काही कार्य करत नाही.
http://medind.nic.in/imvw/imvw14406.html
ही काय अभ्यास करायची वेळ आहे? आपले शूर वायुसैनिक मारणारे हे फिदायीन पक्षी लगेच सगळे धरून नि:शेष मारून टाकायला पाहिजेत. या नाठाळ पक्ष्यांना बंदुकीच्या गोळ्यांशिवाय वेगळी भाषा कळत नाही.
असो, मनेका गांधी वगैरे आचरट लोकांच्या कनवाळूपणामुळे हे शक्य होत नाही तर नाही. पण कमीतकमी भरतपूर वगैरे ठिकाणी मुद्दामून पक्षी-अभयारण्ये बनवून भारत सरकारने लांगूलचालनाची हद्द केलेली आहे. बरे बाकी राष्ट्रे करतात म्हणून केवळ सौजन्यासाठी कधीतरी घोषित केली असतील, ठीक आहे. पण हवाई दलाचे विमान पडल्याबरोबर पुढच्या दिवशी "अभय" देण्याचे पुचाट धोरण बंद केले पाहिजे. जोवर पक्षीलोक हवाई दलाच्या विमानांवर टक्कर देण्याचे कट बांधणारे आपले जातभाई भारताच्या हवाली करत नाही, तोवर पक्ष्यांची अभयारण्ये देणार्या भारत सरकारची मला लाज वाटते.
(वरील प्रतिसादात व्यंग्य आहे हे येथे नमूद करतो. विमानतळांजवळ पक्ष्यांचे या-ना-त्या प्रकारे नियंत्रण करावे, वाटल्यास मारूनसुद्धा नियंत्रण करावे, पण अन्यत्र पक्षी अभयारण्ये शाबूत ठेवावीत, पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ नयेत असे आटोकाट प्रयत्न करावेत - असे माझे गंभीर मत आहे. वरील अभ्यासाचा दुवाही खराखुरा आहे.)
कप्तान सुलेनबर्गर यांना सलाम! (हा सलाम सुद्धा गंभीरच आहे.)
कप्तान सुलेनबर्गर ला सलाम पण ज्या तत्परतेने बचावकार्यासाठी फेरी, पोलिस, कोस्ट-गार्ड आले त्यानाहि लाख लाख सलाम
आमचे पोलिस सगळे झाल्यावर पोहोचतात, शिका काहितरी निकम्मो.
=))
जबरा प्रश्न !
****
विनोद सोडा.... असा प्रसंग कोणावर ही येऊ नये ह्या मताचा मी आहे... अहो जरासं धुक्यात विमान भरकटले आहे तथा लॅन्ड होण्यसाठी अर्धा एक तास लागेल हे जेव्हा वैमानिकाने आम्हाला सांगितले होते तेव्हा आमचा जीव पार पायाच्या आगठ्याला पोहचला होता मागच्या बर्षी !
मुंबई विमानतळाला लागून भली मोठी झोपडपट्टी आहे. तिथे बरेच उकिरडे आहेत तसेच अनेक खाटीकखानेही आहेत. त्यामुळेच मुंबई विमान तळाला पक्षांचा मोठा धोका आहे. धावपट्ट्यांच्या सुरक्षिततेबाबत जागतिक वर्गवारीत मुंबई विमानतळाचा क्रमांक बराच खाली आहे.
माझ्या स्वतःच्या अनुभवात, एकदा मुंबई विमानतळाच्या धावपट्टी पट्टीवरून आकाशात झेपावतानाच्या प्रसंगी, जमीन सोडायच्या आधीच एक पक्षी इंजीनात ओढला गेला. वैमानिकाने ऐनवेळी उडण्याचा निर्णय रद्द करून विमानाला ब्रेक्स लावले. ५-६ गचके खाऊन शेवटी विमान काबूत आले. विमान पुन्हा टर्मिनलला नेण्यात आले असता इंजीनाच्या १२ ब्लेड्स मोडल्याचे निष्पन्न झाले. उड्डाण रद्द झाले. दुसर्या विमानाची व्यवस्था होऊन पुन्हा उड्डाण करे पर्यंत २ तास उशीर झाला पण अनर्थ टळला.
विमानतळाशेजारची झोपडपट्टी हटविता येत नाही. सर्व राजकिय पक्षांची ती व्होट बँक आहे. तसा प्रयत्न केला तर पेपरला लगेच बातमी येईल, 'सरकारने, श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी, गरीबांच्या घरादारावर बुलडोझर फिरवला.'
प्रत्येक विमान उतरण्या आणि उडण्याआधी प्रशिक्षित गरूड पक्षी आसमंतात सोडावेत म्हणजे ते इतर पक्षांना पळवून लावतील असा एक पर्याय समोर आला होता पण त्याचे पुढे काय झाले देव जाणे.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
प्रत्येक विमान उतरण्या आणि उडण्याआधी प्रशिक्षित गरूड पक्षी आसमंतात सोडावेत म्हणजे ते इतर पक्षांना पळवून लावतील असा एक पर्याय समोर आला होता
माणसाला आकाशात उडता यावे यासाठी पक्षांना असे वेठीस धरणे योग्य आहे का? :)
-- लिखाळ गांधी.
भास्करराव,
लेख आणि टिप्पणी छानच. वैमानिकाचे प्रसंगावधान, धैर्य आणि कौशल्य वाखाणण्याजोगे. तसेच शहरातील अपत्कालीन सेवा इतकी तत्पर आणि वेगवान आहे हे पाहून आश्चर्य आणि कौतूक वाटले.
-- लिखाळ.
उत्कर्ष म्हणजे साडेसाती संपल्याचे लक्षण :)
तसेच शहरातील अपत्कालीन सेवा इतकी तत्पर आणि वेगवान आहे हे पाहून आश्चर्य आणि कौतूक वाटले.
आमच्या राजधानी मध्ये पाहीले तर त्यांना फिट येईल व कांदा नाकाला लावावा लागेल.... !!
**
लेख आणि टिप्पणी छानच. वैमानिकाचे प्रसंगावधान, धैर्य आणि कौशल्य वाखाणण्याजोगे.
१०१ % सहमत.
अगदी हेच म्हणतो !
मनातील वाक्य गाधी महाराजच ओळखु शकत... नेहरुच्या.... !
तसेच तुम्हि माझ्या मनातील विचार लिहले.... !
तुमचाच,
राज नेहरु !
प्रतिक्रिया