Skip to main content

"जेनेरिक" औषध एक कूट प्रश्न

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 17/04/2016 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
अधुनिक युगात अनेक बाबतीत संशोधन झाल्याने माणसाचे आयुष्य एका बाजूने सुखावह आणि तरीही त्याच बरोबर दीर्घकाळ टिकणार्‍या विकारांनी ग्रस्त झालेले दिसते. मधुमेह,रक्तदाब, संधिवात, थायऱोईडविकार ई नी मुळे आयुष्यभर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यासाठी जवळ जवळ एका व्यक्तीला दर महिन्यास १२०० ते २००० रूपये इतका खर्च येतो. इतका खर्च माणूस जेवणावरही करीत नाही. सबब आता जेनेरिक औषधे लोकानी घ्यावी अशी जागृती काही संस्था करीत आहेत. जेनेरिक औषध म्हणजे बायो इक्वीव्हलंट औषध( घ्यायची पद्धत, डोस, मुख्य पदार्थ तोच व उद्देश ही तोच हा निकष )- ज्यात मूळ संशीधकाचे घ्यावयाच्या ऱोयल्टीचे हक्काची मुदत संपल्याने इतर उत्पादक त्याची कॉपी कायदेशीर रित्या करू शकतात.साहजिकच ही औषधे स्वस्त असतात. शिवलेली कोरी करकरीत पॅन्ट जर फूटपाथवर १२० रूपयाना मिळाली तर आपल्याला तीत काहीतरी " न्युन" आहे असे वाटू लागते. तोच नियम जेनेरिक ना लागू आहे. ही औषधे विश्वास बसू नये इतक्या कमी किमतीला मिळत असल्याने त्याच्या उपयुक्तेते बद्द्ल संभम निर्माण झालेला दिसतो. त्यात ब्रॅन्डेड औषधांचे निर्माते व वैद्यकीय व्यावसायिक यांचे साटेलोटे असल्याने ते खुशीने जेनेरिक औषधांचे नाव पर्याय म्हणून लिहून देत नाहीत. व असे नाव प्रिस्क्रिप्शन मधे नसल्याने जेनेरिक औषधांचे व्यापारी ते विकत देत नाहीत असे समजते. आत सामान्य लोकानी करावे काय? रस्त्यावरची १२० रूपयाची पॅन्ट घेण्यात एक तर धोका काही नाही व त्यास काही कायदेशीर बंधने ही नाहीत. सबब तिथे सब ठीक असते पण जेनेरिक चा विषय तसा नाही. एकूण या विषयावर आपला वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काय अनुभव आहे ? तसेच एक रोगी म्हणून कोणी याची काही चाचणी घेऊन अनुभव ग्रथित केला आहे काय ? मिपकारानी या विषयावर प्रकाश टाकावा. आता महाराष्ट्रात जेनेरिक औषध विक्रीचे जाळे निर्माण होणार आहे म्हणे .

वाचने 22451
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by साधा मुलगा

हा आमच्या डेंटिस्ट्रीमधला नेहमीचा तापदायक अनुभव आहे.लोक दुखणे थांबले की गोळ्या बंद करतात. Antibiotics दिली असताना ती पेशंटचा इंफेक्शनचा प्रकार, त्याच्या इंफेक्शनची तीव्रता, त्याचे वजन,वय यानुसार त्याला त्यातला किती डोस उपलब्ध होईल त्याप्रमाणे गोळ्या लिहुन दिलेल्या असतात.दोन गोळ्यांनी इंफेक्शन सूज कमी झाली की लोक त्या बंद करुन पुढच्या वापरासाठी ठेवतात! असे सांगतातही! तुमच्या मागच्या दोन गोळ्यात 'बरा' झालो त्यातल्या उरलेल्या आहेत.याचा अर्थ तुम्ही प्रमाणात औषधाचा डोस घेतलेला नाहीये.परत इंफेक्शन होईल तेव्हा चतुर बॅक्टेरियाची पुढची पिढी त्या गोळ्यांना दाद देणार नाही.म्हणजेच रेझिस्टन्स येणार! पुढच्या वेळी आपण त्या गोळीने बरे होणार नाही आहात! म्हणूनच प्रमाणित डोसचे महत्त्व असते.त्याप्रमाणे घ्यावेच. याच विषयाशी समांतर गोष्ट जाणवते.ती म्हणजे साध्या साध्या इंफेक्शनला मोठी प्रतिजैविके वापरणे.यात आमचे व्यवसाय बांधवही मागे नाहीत ही शरमेची गोष्ट आहे.जे साध्या माॅक्सच्या गोळीने काम होणार त्यासाठी पुढच्या पायरीचे प्रतिजैविक निष्कारण वापरल्याने अॅटिबायाॅटिक रेझिस्टंट आजाराला आमचा हातभार लागू शकतो.यावर अनेकदा व्याख्याने घेऊन तज्ञ कळवळून धोका सांगत आहेत.पण उगाचच ofloxacine इ antibiotics जी ड्रग रेझिस्टंट टिबीच्या ट्रीटमेंट ला उपयोगी पडू शकतील ती देऊन रेझिस्टंसला खतपाणी घातले जाते आहे :(

In reply to by अजया

माझे तरी असे निरिक्षण आहे की बरेचसे डॉ पायरी पायरीनेच अ‍ॅन्टी बायोटिक देतात. आता बर्याच लोकाना "कोर्स" पूर्ण करायला घरातील इतर नातेवाईक लक्ष ठेवून भाग पाडतात.

In reply to by चौकटराजा

तुम्ही नशीबवान आहात... कारण तुम्ही स्वतः चौकस आहात आणि तुमच्या वरच्या विधानावरून तुमचे डॉक्टर्सही शास्त्रिय विचाराने वागणारे आहेत असे दिसते. मात्र, वाढत्या जाणकारीमुळे, अँटिबायोटिक्स गरजेपेक्षा कमी प्रमाणात आणि / किंवा कमी दिवसांसाठी घेण्याचे प्रमाण घटत असले तरीही अजूनही त्याचे जगभरातले प्रमाण ल़क्षणियरित्या जास्त आहे. याची मुख्य कारणे अशी... अ) रुग्णांमधले आणि नॉन-मॉडर्न वैद्यकीय व्यावसायीकांमधले अश्या अँटिबायोटिक्सच्या गैरव्यवहाराने होणार्‍या दुष्परिणामांबद्दलचे (रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होणे, इ) अज्ञान आ) "काहीही करून झटकन उतार पडला पाहिजे, तरच डॉक्टर चांगला", अशी रुग्णांमधे असलेली अज्ञानमूलक समज आणि तिला बळी पडून सुरुवातीपासूनच उच्च दर्जाची अँटिबायोटिक्स (जी केवळ जुनाट / रेझिस्टंट / प्रखर इन्फेक्शन्ससाठी राखीव ठेवावी अशी पद्धत आहे) वापरणारे डॉक्टर्स, इ) औषधांवर होणारा खर्च परवडत नाही म्हणून रुग्णाने औषधे कमी प्रमाणात घेणे अथवा पूर्णपणे बंद करणे, हे केवळ विकसनशील देशांतच नव्हे तर युएसए सारख्या अग्रगण्य समजल्या जाणार्‍या देशांमधीलही एक मोठी समस्या आहे. जर या समस्येमधे खोलवर अंतर्ज्ञान (इन्साईट) हवे असेल तर एका मनस्वी व्यावसायीकाने चालवलेल्या डोळे उघडणार्‍या प्रकल्पावर सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत आलेला खालील दुव्यावरचा लेख वाचावा... http://www.newyorker.com/magazine/2011/01/24/the-hot-spotters महत्वाचे मुद्दे : १. सद्या अशी अवस्था आली आहे की नवीन अँटिबायोटिक्सच्या शोधांचा वेग, नवीन रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होण्याच्या वेगापेक्षा धोकादायकरित्या कमी आहे. हे असेच चालू राहीले तर "या इन्फेक्शनला उपयोगी अँटिबायोटिक आस्तित्वात नाही, केवळ देवाची प्रार्थना करा" असा सल्ला देण्याची वेळ दशक-दीडदशकात येऊ शकेल ! २. प्रमाणापेक्षा कमी वेळ / मात्रेने औषध घेण्याने, वाचलेल्या खर्चापेक्षा कित्त्येक पट्टींनी अधिक खर्च भविष्यात होतो... आणि न भरून येणारी शारिरीक हानी होऊ शकते तेही अलाहिदा. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नवीन अँटीबायोटिक तयार होत नाहीत कारण त्यात फार्मा कंपन्याना रस राहिलेला नाही... एका पेशंटला किती दिवस अँटिबायोटिक देणार ? आअठ - पंधरा दिवस. त्यापेक्षा बीपी , डायबेटिस , ओबेसिटी , इ वर औshhadh दिले की जन्मभर गिर्‍हाइक ते घेणारच. त्यामुळे सगळे रिसर्च अशा आजारांवरच सुरु आहेत.

मिपा डॉक्टर्सचे माहितीबद्द्ल मनापासून आभार.

अतिशय उत्तम धागा. वा. खू. साठविली आहे. मिपावरील सर्व वैद्यकांचे मनापासून आभार. मनातील अनेक शंकांचे आपोआप निरसन होत आहे.