आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.
जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही.
मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल.
हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का?
अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65)
महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला.
ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः.
ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत.
(यजुर्वेद: ३१/११)
या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे.
ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे.
अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्.
विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्.
(तैत्तिरीय उपनिषद ३/४)
त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच.
क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात.
वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे.
शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे.
आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.
हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
वाचने
27390
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्धवटराव. मी पौरोहित्य
In reply to आळंदी, तिरुपती, इस्कॉन.. by अर्धवटराव
गोंधळ झालाय सगळा.
In reply to अर्धवटराव. मी पौरोहित्य by तर्राट जोकर
आज हा बदल सोपा आहे.. पण जर
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by तर्राट जोकर
अर्धवटराव व आनन्दा,
In reply to आज हा बदल सोपा आहे.. पण जर by आनन्दा
वर साहना यांनी उदाहरण दिलेले
In reply to अर्धवटराव व आनन्दा, by तर्राट जोकर
असे ठोकून दिले तरी दिसण्या
In reply to वर साहना यांनी उदाहरण दिलेले by आनन्दा
असं नसतं दादा. तुम्हाला
In reply to वर साहना यांनी उदाहरण दिलेले by आनन्दा
अमूक एका विधीने कोण्या
In reply to असं नसतं दादा. तुम्हाला by तर्राट जोकर
असं कोणाला कोणीही आपल्या
In reply to असं नसतं दादा. तुम्हाला by तर्राट जोकर
बाकी अवांतर - तुम्ही माणसात
In reply to असं कोणाला कोणीही आपल्या by आनन्दा
माणसांमधे माणसांसारखेच वागावे
In reply to बाकी अवांतर - तुम्ही माणसात by आनन्दा
लाभ-हेतुविषयक विशीष्ट मर्यादा सोडल्यास स्वातंत्र्य असावे
In reply to अर्धवटराव व आनन्दा, by तर्राट जोकर
राज्यघटनेनुसार दिलेले आपले
In reply to लाभ-हेतुविषयक विशीष्ट मर्यादा सोडल्यास स्वातंत्र्य असावे by माहितगार
ओके धार्मीक बाजूने म्हणताय ना
In reply to राज्यघटनेनुसार दिलेले आपले by तर्राट जोकर
दुसरी बाजू अशी की जसे खाली
In reply to राज्यघटनेनुसार दिलेले आपले by तर्राट जोकर
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by तर्राट जोकर
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by श्रीगुरुजी
प्रतिसादा बाबत धन्यवाद.
आँ
In reply to प्रतिसादा बाबत धन्यवाद. by विवेकपटाईत
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो...... :D
In reply to आँ by hmangeshrao
हेहेहेहेहेहेहे खतरनाक. महालोल
In reply to ठ्ठो ठ्ठो ठ्ठो...... :D by नाना स्कॉच
@ hmangeshrao पटाईतांनी
In reply to आँ by hmangeshrao
काय म्हणताय ?
In reply to प्रतिसादा बाबत धन्यवाद. by विवेकपटाईत
क्षत्रियाचा जन्म बाहूतून.
आजही मनुस्म्रूती चे गोडवे
मनुस्मृती खरच कालबाह्य आहे का?
संदर्भ हवा
In reply to मनुस्मृती खरच कालबाह्य आहे का? by सत्याचे प्रयोग
मनुस्मृती वर बंदी
In reply to संदर्भ हवा by माहितगार
हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टी
हजारो वर्षांपूर्वीची जात आजही
In reply to हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टी by हेमंत लाटकर
कोण करत आहे विरोध ?
In reply to हजारो वर्षांपूर्वीची जात आजही by तर्राट जोकर
लाटकर साहेब.
In reply to कोण करत आहे विरोध ? by उगा काहितरीच
मेरे सवाल का कोई जवाब नही आया
पाळेमुळे खणून काढणे म्हणजे
In reply to मेरे सवाल का कोई जवाब नही आया by तर्राट जोकर
तो प्रश्न नव्हता. शास्त्रोक्त
In reply to पाळेमुळे खणून काढणे म्हणजे by काळा पहाड
एक आधार कार्ड वाटायचं तर हजार
In reply to तो प्रश्न नव्हता. शास्त्रोक्त by तर्राट जोकर
ते गाड्यांवर नावं लावणे तर
In reply to एक आधार कार्ड वाटायचं तर हजार by काळा पहाड
जगाच्या अंतापर्यंत जातीचे व
सध्या देशाच्या कुठल्या भागात
सध्या न्हवे तर कधीकाळी ते होतं म्हणे
In reply to सध्या देशाच्या कुठल्या भागात by हकु
बरं. मग त्याचे प्रेरक
In reply to सध्या न्हवे तर कधीकाळी ते होतं म्हणे by भाऊंचे भाऊ
हिटलरशाही संपली केंव्हाच
In reply to बरं. मग त्याचे प्रेरक by हकु
वर बॅटमॅनयांचा प्रतिसाद पहा.
In reply to सध्या देशाच्या कुठल्या भागात by हकु
"१. मनुस्मृती, मिताक्षरा, इ.
In reply to वर बॅटमॅनयांचा प्रतिसाद पहा. by अनुप ढेरे
Indian law म्हणजे British law