Skip to main content

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/03/2016 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

वाचने 65946
प्रतिक्रिया 339

प्रतिक्रिया

देशामध्ये तीन-चार टक्के कम्युनिस्ट आहेत,तसेच मिपावरही एक-दोन आयडी कम्युनिस्ट असतील असे समजूया,आणि फाट्यावर मारूया. . . वंदे मातरम्।

माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे आताच्या सरकारने देशाच एवढ काय नुकसान केलय कि सगळे विचारवंत एवढे काळजीत पडलेत आणि एवढा विरोध करतायत मला तरी एक सामान्य माणूस म्हणून काय धोकादायक वाटत नाय(कदाचित मी सामान्य असल्यामुळे मला कळत नसेल)

In reply to by धनावडे

हे जे विचारवंत, पुरोगामी इ. इ. समजले जात होते/आहेत, त्यांचा मोदी आल्यापासून रमणा बंद झाला आहे. त्यामुळे ही सगळी चिडचिड.

In reply to by धनावडे

चर्चा करायला मुद्दाच सापडत नाहीये न यांना.. त्यात हे कन्हैया प्रकरण सापडले आणि बस तुटूनच पडले सगळे.. रच्याकने, काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते कि बेंगलोरच्या एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारा अंतर्गत नरेंद्र मोदींवर होणाऱ्या शासकीय खर्चाची चौकशी केली. पंतप्रधान कार्यालयातून अशी माहिती देण्यात आली होती कि मोदींच्या कपड्यावर, जेवणावर व वयक्तिक मोबाईलच्या बिलावर शासनाकडून कुठलाही खर्च केला जात नाहीत, तो सर्व खर्च मोदी स्वतः करतात. त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या आचाऱ्याचा पगारही नरेंद्र मोदी स्वतःच देतात. एका व्यक्तीने तर मोदींच्या किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाले व भाजीपाल्याची खरेदी पावती मागितली होती पण खर्च मोदींचा वयक्तिक स्वरूपाचा असल्याने ते जमले नाही. करत असल्याने ते देणे शक्य नव्हते. अश्याच एका दुसऱ्या उत्तरात असे सांगण्यात आले होते की मोदींनी कार्यभार स्विकारल्यापासून एकही रजा घेतलेली नाही व ते स्वतःच्या मानधनातील पंचेवीस हजार रुपये दरमहा 'पंतप्रधान आपत्कालीन मदत निधी' साठी दान करतात. लवकरच 'देशात लाखो लोक उपाशी असून सुद्धा मोदी दोन वेळा जेवण करतात हे निंदनीय आहे' असाही ऐकायला मिळायची शक्यता आहे.. दुवा: http://www.newindianexpress.com/thesundaystandard/Food-for-Thought-PM-F…

विवेक ठाकूर, आपला इथला प्रतिसाद वाचला. १. >> माझा आक्षेप अफजल आणि कन्हैयाला एकाच लाईनीत बसवण्याला आहे. असं बघा की जनेवित भारतद्रोही घोषणांचा जो प्रकार झाला तसाच अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत तीनेक वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा अफझल गुरूला फासावर लटकवलं होतं. त्यावेळेस तर मोदीसरकारही नव्हतं. जर तेव्हाच अशा घटनांना चाप लावला असता तर आज जनेवित अशा भारतद्रोही घोषणा दिल्या गेल्या नसत्या. तर मग उद्या इतरत्र हाच प्रकार होऊ नये म्हणून आज कन्हैय्याला दमात घेतलं तर काय बिघडलं? २. >> .... सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे. काही अपेक्षा मनात ठेवून जनतेने मोदींना सत्तेत बसवलं आहे. त्या अपेक्षा अमुविच्या प्रसंगी पुऱ्या झाल्या नव्हत्या. अगदी अफझलला फासावर लटकावला तरीही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आहो, एखाद्याला देशद्रोही ठरवणं म्हणजे त्याला बरबाद करणं आहे. काही अपेक्षा मनात ठेवून जनतेने मोदींना सत्तेत बसवलं आहे काय अपेक्षापूर्ती झालीये वाटतं तुम्हाला दोन वर्षात ?

In reply to by विवेक ठाकूर

विठा, पुरी पाच वर्षं द्यायला हवीत ना? तरी माझ्या ज्या अपेक्षा पुऱ्या होताहेत असं वाटतंय त्या सांगतो. २६/११ सारखे घातपात तर बंद झाले ना? देशभर फटाक्यासारखे बॉम्बस्फोट व्हायचे ते बंद झाले ना? आ.न., -गा.पै.

मोदी सरकारची तुलना हिटलर, मुसोलिनी ई ई बरोबर होत आहे तर RAW, CBI सरकारच्या हातातले बाहुले आहे असे म्हणले जाते. असे असेल तर ज्या प्रमाणे गेस्टापोने विरोधी लोकांचा कोणाला सुगावा लागू न देत काटा काढला तसं जरासुद्धा विरोधात बोलणाऱ्या या विद्यार्थ्यांना परस्पर वाटेला लावणे असे कितीसे अवघड असावे या फ़ासिस्ट सरकारला? एवढे सरळ सरळ देशविरोधी, धर्मविरोधी बोलणारे तर सगळेच गेले कित्येक महिने सुखेनैव बरळत आहेत. नाहीतर वद्रा परिवार (रोबर्ट सोडून) जसे सगळे ठराविक काळात यमसदनास गेले तसे या विद्यार्थ्यांना नाहीसे करणे अवघड नसावे. मग का सगळे एवढे बोंबलत आहेत? मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात?

In reply to by ट्रेड मार्क

मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात? 1. मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला 2. काँग्रेस वाईट आहेच पण बीजेपी सुद्धा काही धुतल्या तांदळाची नाही अन वाईस वर्सा बोलल्याची जबर शिक्षा झाली 3. डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे 4. सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!! तुर्तास इतके आठवले

In reply to by नाना स्कॉच

नाना साहेब मूळ विषय काय ? आणी आपण तो कुठे नेताय? काहीही झाले कि "मोदी साहेबांवर आणी अच्छे दिन" वर टीका केल्याशिवाय तुमच्या घरात "डाळ" शिजत नाही का? डाळ महाग झाली म्हणून तुम्ही बोंब मारली कि कांदे स्वस्त झाले म्हणून इतर लोक तुम्हाला खिजवणार. विषय काय आणी आपण तो कुठे नेतो आहे? सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!! बोंब मारायची ठरवलीच आहे म्हणून असे? अजून सेवा कर "वाढलेला" नाही. ०१ एप्रिल पासून वाढणार आहे. अगोदरच आपल्या भांड्यांना पोचे आले? आणी बायकोबरोबर भांडणे वाढली ?

In reply to by सुबोध खरे

तुम्ही अजूनही साडेबारा टक्के सेवाकर देताय का? शिंचे आमच्याच बिलात साडेचौदा टक्के का येतंय काय माहित.

In reply to by सुबोध खरे

आम्ही आदर करतो हो तुमचा, (आता तुम्ही तो मागत नाही आम्ही तो स्वतः उस्फुर्त देतो) कारण तुम्ही वय हुद्दा समज वगैरे ने वरिष्ठ अन ज्येष्ठ आहात, तुम्हीच जर काय बोलला पेक्षा कोण बोलला वर लक्ष द्यायला लागले तर आम्ही काय करु शकतो सरजी?? तुम्हाला माझा विरोध दिसला पण ट्रेडमार्क ह्यांनी विचारलेला प्रश्न नाही दिसला का? (मी हाईलाइट केलाय तरी तो). मला मुद्दा भरकटवायची हौस नाही साहेब, जो प्रश्न विचारला गेलाय त्याला प्रश्न प्रमाणिक राहून उत्तर दिले आहे, अन मुख्य म्हणजे मी स्वतःपुरते बोललो आहे, मला लाल पांढरे झेंडे खांद्यावर घेण्यात रस नाही तर लोकल सुटेल ह्या भीती ने फाटका टॉवल अन गंजीफ्रॉक खांद्यावर घेऊन बाथरूम कड़े धावण्यात रस आहे, मला एका प्रतिसादातून एक प्रश्न सापडला ज्याला मी "मॅटर ऑफ़ फॅक्ट" का काय म्हणतात तसा राहून माझ्या स्वल्प वैयक्तिक अनुभवानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, तो तुम्हाला इतका खुपावा?? ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना खड़सावा की साहेब ज़रा ! का फ़क्त आम्हीच दिसतो! अन सेलेक्टिव खड़सावणे करायचे असेल तर सरळ सांगा की ते अन त्यांच्यासरखे तुमचे लाडके अन आम्ही तुमचे दोड़के ते!. आम्ही तरी तुम्हाला पुर्ण मिपाचा एसेट समजतो बुआ, अन आमचे वैयक्तिक श्रद्धास्थान, तसे नसता नेवी मधे जायचे म्हणाणाऱ्या धाकट्या भावाला तुमचे लेख पोथी सारखे पाठ करायला लावले नसते!. विद्यमान सरकारच्या काही गोष्टी पटतात काही नाही ज्या पटत नाहीत त्या मांडल्या तर आपण माझ्यावर शिक्के मारायची गरज नाही, मारू नयेत, अर्थात ही एक विनंती आहे! उणे अधिक माफ़ी असावी ____/\____ -नाना जाता जाता, दिल्लीत श्री श्री रविशंकर ह्यांच्या कार्यक्रमासाठी (खासगी संस्था खासगी कार्यक्रम) भारतीय भुदलाकडून पांटून ब्रिज बांधून घेत आहेत म्हणे? ह्यावर आपले मत एक अधिकारी म्हणून जाणून घ्यायला आवडेल

In reply to by नाना स्कॉच

1. मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. बाकी डाळी किंवा कांद्याच्या भावाबद्दल आरडा ओरड मूळ मुद्द्याच्या व्यस्त प्रमाणात झाली आहे त्याबद्दल वाईट वाटते. मुद्दा बरोबर कि चूक याबद्दल मी काहीही बोलत नाहीये. मुद्दा महागाई का झाली आहे आणि किती झाली आहे? याला मोदी सरकार किती जबाबदार आहे? अवर्षण किती आणि आन्तर राष्ट्रीय परिस्थिती किती जबादार आहे याचा नीट उहापोह न करता सवंग विधाने करणारे लोक. आन्तर राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आमच्या किमती कमी का होत नाहीत याबद्दल ओरडणार्या लोकांना समजावणे कठीण आहे. सवंग लोकप्रियते साठी (सीताराम येचुरी म्हणतात तसे) लोकांना स्वस्त पेट्रोल/ डीझेल देण्यापेक्षा दूरगामी आपला राखीव तेलसाठा निर्माण करण्यासाठी हा पैसा वापरला गेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून उपयोग होत नाही http://www.isprlindia.com/aboutus.asp http://www.isprlindia.com/aboutus-2.asp http://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/sought-rs-1… http://www.livemint.com/Politics/zLaLDxE5ZbpiKcQXcW20AP/UAEs-Adnoc-to-s… हा पैसा तुम्हाला स्वस्तात पेट्रोल आणि डीझेल दिले तर सरकार कुठून आणेल? आणि डीझेल स्वस्त केले नाही तर महागाई होणार कारण दुष्काळ आणि जागतिक मंदी आहेच जी काही मोदी सरकारने केलेली नाही. इंग्रजीत म्हण आहे कि शांततेच्या काळात तुम्ही जितका घाम गाळाल तितके युद्धात तुम्हाला कमी रक्त सांडावे लागेल. एक गोष्ट नक्की आहे कि गेल्या पाच वर्षात कोणताही निर्णय न घेतल्याने जे नुकसान झाले आहे त्या प्रमाणात हे सरकार जसे देशा बद्दल निर्णय घेत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक यांचा रमणा बंद झाला आहे म्हणून त्यांची कोल्हे कुई चालू आहे हीही वस्तुस्थिती आहे. असो

In reply to by सुबोध खरे

बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक यांचा रमणा बंद झाला आहे म्हणून त्यांची कोल्हे कुई चालू आहे हीही वस्तुस्थिती >> बाकीचं नंतर, पण हे वाक्य फार वाचायला मिळतंय. ह्याबद्दल काही पुरावा आहे काय? म्हणजे आधी होता ह्याचा आणि आता बंद झालाय ह्याचाही.

In reply to by तर्राट जोकर

तुम्हाला पुरावा देण्यासाठी कष्ट घ्यावे असे मला अजिबात वाटत नाही. याचा तुम्हाला पाहिजे तो अर्थ तुम्ही काढू शकता. वरच्या विधानातील फक्त संदिग्ध वाक्य निवडून बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं किंवा बळी गेलेल्या निरपराध लोकांवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे किंवा रवींद्र म्हात्रे यांचे कष्ट सोडून टूण्डाचे किंवा सलमान खानचेच कष्ट तुम्हाला दिसतात तेंव्हा आपल्याशी अधिक बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

मी काहीही दुर्लक्ष केले नाही. 'बाकीचे नंतर' बोललो. तुम्ही वस्तुस्थिती आहे असे म्हणून वाक्य लिहिता, विचारले तर संदिग्ध आहे म्हणता याचा काय अर्थ घ्यावा? बाकी बळी गेलेले, म्हात्रे, कष्ट इत्यादी असंबंधित मुद्दे इथे मांडून भावनिक संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. बरं जिथे टुंडाचा विषय मांडला तो न्यायालयाचा निकाल मान्य आहे की नाही हाच प्रश्न विचारण्यासाठी होता. माझे टूंडाबद्दल भारी प्रेम उतू चाललंय म्हणुन नाही. तुम्ही त्याला अजून उत्तर दिले नाही पण टुंडाचा इतिहास बघा चे उपदेश मला दिले. टुंडा, अफझल, कन्हया, साध्वी, संजय दत्त, भटकल, जुन्दाल, समीर यांबद्दल न्यायालय जो निर्णय दिला/देईल तो मला मान्य असेल असे मी म्हटले, तुम्ही तसे म्हटलेले नाही. हा दांभिकपणा आहे. मुद्दा टूंडा किंवा सलमान खानचा नाही हे शेंबड्या पोरालाही कळेल. जेव्हा नावडते आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटतात तेव्हा न्यायालयात न्याय होत नाही असे म्हणता, तेच नावडते निरपराध अडकले की न्यायालयाने कसे फटकारले ह्याचे गुणगान गाता. हा दुटप्पीपणा आहे. हा प्रश्न तुम्ही टाळत आहात. तुम्ही वस्तुस्थिती आहे असे म्हणुन बेधडक विधानं करता, त्याबद्दल विचारले तर उत्तर देता येत नाही म्हणून पलायन करता. तुमची बाजू सांभाळायला मग दुसरे सदस्य येतात. चर्चेत टिकत नाही बघून भावनिक कोलांट्या मारणे आपल्यासारख्या सदस्यांना मुळीच शोभत नाही. असो.

In reply to by सुबोध खरे

तेलाच्या भावा बद्दल मी काही तरी म्हणले आहे का? हे एक, तेलाच्या भावाबद्दल किंवा कच्चे तेल बाजाराबद्दल मला शुन्य माहीती आहे म्हणून मी त्यावर बोलतच नाहीये, शिवाय आधीच्या सरकार पेक्षा कमी भावात पेट्रोल मिळते आहे म्हणून मी आनंदी सुद्धा आहे, डाळी बद्दल मला झळ पोचते आहे म्हणून मी तितके मात्र बोलतोय बाकी डाळ उद्योगाबद्दल मिपावरचे दूसरे एक सदस्य श्री सोन्याबापु ह्यांनी विस्तृत माहीती देऊन डाळ तुटवडा हा नैसर्गिक नसुन मानवनिर्मित आहे अन त्याच्यामागे जमाखोर व्यापारी आहेत हे विवेचन "एका वर्षा नंतर" ह्या धाग्यात केल्याचे स्मरते, माफ़ करा पण मला खोदकामात गती नाही म्हणून लिंक देऊ शकत नाहीये मी, तरीही वरती उल्लेख केलेल्या धाग्यात ते सापडु शकेल असे सुचवतो. एक व्यनि सोन्याबापु ह्यांना टाकून जमल्यास ती माहीती तुमच्यासाठी मागवु शकतो, (जर त्यांना द्यावी वाटली तर) बहुत काय बोलणे, मी पत्रकार पण नाही अन सरकारी मलाई खाणारा डावा विचारवंत सुद्धा नाही त्यामुळे ते उल्लेख का केले आपण हे काही मला कळले नाही बघा साहेब. सरकार माझ्यासारख्याना जे रिलीफ देत आहे त्याचे कौतुक आहेच पण ज्याच्यात मला त्रास आहे ते मात्र मी मांडतो आहे अन मांडत राहीन इतके सांगतो अन आपली रजा घेतो आता

In reply to by नाना स्कॉच

The government budgeted a contribution of Rs.20,000 crore for the fund in fiscal year 2015-16 while another Rs.20,000 crore is expected to be raised from sovereign wealth funds हे शेवटच्या दुव्यातील वाक्य आहे नाना साहेब २०,००० कोटी रुपये या वर्षात आणी तितकेच पुढच्या वर्षात सरकारला जनतेकडूनच घ्यावे लागतील ना? मग २० कोटी लोक जे कर भरतात/ भरू शकतात (उच्च आणी मध्यम वर्गीय) त्यांच्या कडून हा पैसा जर घ्यायचा तर माणशी १००० रुपये वर्षाला होतात. हि महागाई तुम्हाला आहे तशी मला हि आहे पण दूरदृष्टीचा विचार केल्यास हा पैसा देणे श्रेयस्कर आहे. वरील तिन्ही दुवे एकदा वाचून घ्या अशी तुम्हाला विनंती आहे. आणी हेही आपल्याला पटत नसेल तर सोडून द्या अधिक उणे काही अनवधानाने बोललो असेल क्षमा करा.

In reply to by सुबोध खरे

२०,००० कोटी रुपये या वर्षात आणी तितकेच पुढच्या वर्षात सरकारला जनतेकडूनच घ्यावे लागतील ना? मग २० कोटी लोक जे कर भरतात/ भरू शकतात (उच्च आणी मध्यम वर्गीय) त्यांच्या कडून हा पैसा जर घ्यायचा तर माणशी १००० रुपये वर्षाला होतात. >> माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले. त्याबद्दल अजिबात विचारु नका आणि हे माणशी हजार रुपये म्हणजे कैच नै, देशासाठी एवढा त्याग करा असल्या बाता ऐकायला लागतायत. मोदींच्या सरकार चालवण्याच्या पद्धती, निर्णय ह्याबद्दल अजिबात चीड, राग, द्वेष नाही. पण भक्तांच्या असल्या तर्कांनी प्रचंड राग येतो. उद्या मोदी म्हणतील श्वास घेणे देशासाठी योग्य नाही तर हे भक्त काय करतील देव जाणे.

In reply to by तर्राट जोकर

माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले.
(१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?

In reply to by विवेक ठाकूर

तुम्हाला फार घाई बुवा. मागे मिपावर एक उंदीरमामा होते. ते मिपावर दिवसरात्र पडीक असायचे. ते काहीतरी प्रतिसाद द्यायचे आणि त्याला १-२ मिनिटात उत्तर नाही आले तर लगेच "गुरूजी धाग्यावरून पळून गेले", "गुरूजींनी या धाग्यावरून काढता पाय घेतला" अशी स्वत:चीच सोयिस्कर समजूत करून घेऊन मनोमन खूष व्हायचे. तुमचंही तसंच दिसतंय. मी काही इथे २४ तास पडीक नसतो. दुपारी जेवणानंतर थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ मी इथे येतो. इतरवेळी पोटापाण्यासाठी उद्योग करावा लागतो. तुमचं बरं आहे. तुम्ही सदासर्वकाळ इथे राहू शकता. माझ्या अनुपस्थितीत वरील प्रतिसाद आल्यावर मी इथे नसल्याने त्यावर माझ्याकडून लगेच उत्तर आले नाही तर लगेच "गुरूजींची वाचा बसली" अशी तुम्ही सोयिस्कर समजूत करून घेऊन खूष झालेले दिसताय. काही हरकत नाही. माझ्या अनुपस्थितीमुळे एखादा आनंदी होत असेल तर चांगलंच आहे.

In reply to by विवेक ठाकूर

ही फीत सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मीसुद्धा ती पूर्वी पाहिली आहे. परंतु काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?

In reply to by विवेक ठाकूर

काहीही हं विठा! मोदींनी विदेशी पैशाचा आकडा लक्षात यावा म्हणून फक्त उदाहरण दिलंय की प्रत्येक भारतीयास पंधरावीस लाख रुपये असेच मिळून जातील. याचा अर्थ अस नव्हे की मोदी तो पैसा आणून वाटणार आहेत. (तसा तो आणून वाटला तर चलनफुगवटा भयानक वाढेल त्याचं काय करायचं?) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

असे कसे म्हणता गापै?? रघुराम राजन सही करून म्हणतात "मै धारक को अमुक अमुक रूपये अदा करने का वचन देता हूं" ते म्हणजे रघुराम राजन साहेब त्यांच्या खिशातून अदा करतात - तुमा झंटलमेन लोकांना इत्के शिंपल कळत नै का?

In reply to by गामा पैलवान

गुरुजींचे दोन प्रश्न होते. पैकी पहिला प्रश्न हा होता : (१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे .... ही फीत सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मीसुद्धा ती पूर्वी पाहिली आहे. परंतु काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!

In reply to by विवेक ठाकूर

आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे ....
मुळात त्यांनी दोन मुद्दे एकत्र केले होते (माणशी १५ लाख व काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या). मी ते मुद्दाम वेगळे करून विचारले. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत दिल्याने त्या मुद्द्यावर वाद नाही. दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशीच संबंधित आहे व त्यात त्यांची तपशिलाची चूक झाली आहे. म्हणून तर मी त्यांना दुसर्‍या मुद्द्याचाही संदर्भ विचारला. तो अजून त्यांनी दिलेला नाही.
मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!
असले सब्जेक्टिव्ह व स्वतःचा मनचे लिहू नका. याच न्यायाने केजरीवालांची आश्वासने ही दिल्लीतल्या भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण दिल्लीत अशा मतदारांची संख्या अमाप आहे किंवा नितीशकुमार/लालूची आश्वासने ही बिहारमधील भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण बिहारमध्ये अशा मतदारांची संख्या अमाप आहे असे म्हणता येईल. काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी कोठे व कधी म्हणाले त्याचा संदर्भ हवा आहे. तो असल्यास द्या.

In reply to by श्रीगुरुजी

सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस? आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर. माणशी १५ लाख होतील एवढी रक्कम आहे म्हणे परदेशात. आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरनार्‍यांच्याच खिशात हात घातला. वरुन हजार रुपये फार नाही हो देशकार्यासाठी असे भक्त निर्लज्जपणे म्हणायला. लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय. त्याचे उत्तर द्यायचे सोडून फुटकळ डिटेल्समधे चर्चा फिरवू नका. भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो. भाजपाच्या राजकिय विरोधकांच्या नानाची टांग, हा प्रश्न तुम्हालाच मत देणारी जनता विचारते तेव्हा काय?

In reply to by तर्राट जोकर

आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांच्याच खिशात हात घातला.
आधी स्वच्छ भारत अभियान आणि आता शेतकरी कल्याण ! हे भिकार सरकार फक्त नवे भावनिक शब्द काढून लोकांना लुटण्याचा धंदा करते आहे. अर्थात, मोदींचं कोणतंही भाषण पाहा निव्वळ भावनिक आव्हानं आणि पवारांचे गुरु शोभावे अशी निसरडी गुळगुळीत विधानं. त्यामुळे `काम काय झालं?' असा प्रश्न आला की कुठूनही आणि कशीही कोलांटी मारायला मोकळे!

In reply to by तर्राट जोकर

सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस?
तुमच्या मूळ प्रतिसादात (१) माणशी १५ लाख रूपये इतका काळा पैसा आणि (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी म्हणाले , असे दोन मुद्दे एकत्र जोडले होते. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्‍याखोट्याचा मुद्दाच नव्हता. दुसरा मुद्दा मात्र निखालस खोटा होता. हे मला माहित होते. म्हणूनच मी दोन्ही मुद्दे वेगळे करून त्याबाबतीतला पुरावा मागितला. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत आहेच आणि ती तुम्ही विजयी आविर्भावात देणार याची खात्रीच होती. दुसरा मुद्दा निखालस खोटा होता आणि त्याबाबतीत तुम्ही मौन पाळणार हेही मला माहित होते. तुम्ही दोन मुद्दे पुढे आणले. एका मुद्द्याचे पुरावे आहेत आणि दुसरा खोटा आहे. म्हणूनच मी त्याबद्दल विचारतोय.
आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर.
http://www.ndtv.com/india-news/3-770-crore-surfaces-in-governments-blac… http://zeenews.india.com/business/news/finance/sebi-bars-22-brokers-for… http://zeenews.india.com/business/taxes/tax-news/black-money-modi-govt-… http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-over-rs-1600… सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा परत आणण्यासाठी एका एसआयटीची स्थापना केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-sit-asks-dri… स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी भारत व स्वित्झर्लँड सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-significant-… अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही.
भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो.
कधी देताय संदर्भ?

In reply to by श्रीगुरुजी

अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर?

In reply to by तर्राट जोकर

अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात.
मी दिलेल्या लिंक्स वेगवेगळ्या माध्यमांच्या आहेत. या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर? अगदी अपेक्षित उत्तर. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? एनीवे, एका धाग्यात तुम्ही मला "बिनपुराव्यांची आगगाडी" असे म्हणाला होता त्याची आठवण झाली.

In reply to by श्रीगुरुजी

या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. >> महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. >> पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? >> काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ... माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.

In reply to by तर्राट जोकर

महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही.
धूळफेक! धन्य आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे.
नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ...
पुडी? कमाल आहे. तुमची माहिती कमी आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.
नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.

In reply to by श्रीगुरुजी

पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्‍याखोट्याचा मुद्दाच नव्हता
म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?

In reply to by बाळ सप्रे

म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?
काळा पैसा (त्यांच्या अंदाजानुसार १५ लाख माणशी) परत आणण्याबद्दल मोदी बोलले होते. १०० दिवसात आणीन, नाही आणला तर मला फासावर चढवा, परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करीन असे ते काहीही बोलले नव्हते. काळा पैसा परत आणण्या संदर्भात त्यांनी गेल्या २१ महिन्यात काय केले आहे त्याचे अनेक संदर्भ मी वर दिले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या प्रश्नात फासावर चढवण्याचा उल्लेख नाही.. काय काय चालू आहे ते मी वाचलय पण १०० दिवसात प्रत्येकी १५ लाख झाले नाहीत तेव्हा ते विधान चुकल हे मान्य का? (पुन्हा एकदा प्रश्न स्पष्ट केलाय) दुसर्‍या प्रतिसादातील वाक्य इथे घुसवून गोलगोल करणे टाळा. एवढच बघायचय की मान्य होतेय का चूक ..

In reply to by बाळ सप्रे

परत तेच! किती वेळा सांगायचं? काळा पैसा परत आणणार (जो मोदींच्या अंदाजानुसार प्रतिमाणशी १५ लाख रु. असावा) असे ते बोलले होते. हा काळा पैसा १०० दिवसात परत आणणार असे ते कोठेही बोलले नव्हते. तसे ते बोलले होते असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची लिंक द्या.

In reply to by श्रीगुरुजी

बातमि वाचलि का ? नव-युगपुरुषावर गाझियाबाद च्या एका तरुणाने हल्ला केलाय जेएनयु त, हल्ला करण्याचे कारण नव-युगपुरुषांचे आर्मि-काश्मिर वरिल मुक्ताफळे. दया कुछ तो गडबड है...कहि ये फिर से वोहि स्याहि फेक - तमाशा देख वालि स्ट्रॅटेजि तो नहि ?

In reply to by होबासराव

त्यापेक्षा इथे जास्त महत्त्वाची बातमी आहे. http://www.thehindu.com/news/cities/Delhi/jnu-student-found-dead-in-del… जेएनयुतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी आहे. त्याची जात कोणती हे अजून बातमीत आले नाही. जातीने दलित असला तर राहुल, केजरीवाल इ. मंडळी तातडीने धावत जातील.

In reply to by श्रीगुरुजी

२५ वर्षाचा होता फक्त तो विद्यार्थि, अस काय ह्यांच्या मनात वादळ चाललियत / चालवलियत का हे पुढचा मागचा विचार न करता आत्महत्या करताहेत. वाईट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी १५ लाख बोलले. राजनाथ १०० दिवसात आणण्याचं बोलले होते.. https://www.youtube.com/watch?v=UZ8FfN0E4lQ म्हणजे बीजेपीचे प्रॉमिस १५लाख माणशी १०० दिवसात असा माझा अंदाज..

In reply to by तर्राट जोकर

लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय.
मी स्वतः ह्या मुद्द्यावर सरकारच्या विजयाला हातभार लावला होता. आता शंभरावर किती शून्य वाढवतात ते फक्त बघत रहायचे.

In reply to by मार्मिक गोडसे

ते शंभर तरी राहतात का ते पाहा ;-) इथे सरकार देशकार्यासाठी हजार रुपये मागतंय. तुमचं अकाउंट मायनस नउशे दाखवेल.

In reply to by सुबोध खरे

अन बायको सोबत भांडण होते हे सिंबॉलिक आहे, हे ही आता स्पष्ट करावे लागणार का?

In reply to by नाना स्कॉच

मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला
आपण आपल्याला साजेशी मते असलेल्या लोकांबरोबर चर्चा करावी. सोसल मेडियावर आपल्याला आणि इतरांना सोसंल तेवढच बोलावं. सोसल मेडिया वर कुठे कसं बोलावं आणि वागावं हे कळले म्हणजे तारतम्य बाळगले की हे असले virtual त्रास होत नाहीत. चेपुवर तुम्हाला लोकांनी शिव्या घातल्या म्हणून सरकार जबाबदार धरताय तुम्ही? कमाल आहे.
डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!!
नशीब आधी एकदा अंघोळ करायला लागायची आता २ वेळा करायला लागते वगैरे नाही सांगितलंत. या धाग्याच्या विषयाला अनुसरून दैनंदिन जीवनातला फरक म्हणजे सरकारने असं काय काय केलं की तुमचं जीवन त्रासाचं व्हावं उदा. तुमच्या चेपूवरील विचारांना गंभीरपणे घेऊन तुमच्यावर पाळत ठेवणे, विनाकारण कुठल्यातरी प्रकरणात अडकवणे असे कुठले त्रास सरकार किंवा कुठल्या सरकारी विभागाकडून झालेत का? तथाकथित कट्टर हिंदू तुमच्या घरी येऊन तुम्ही रोज पूजापाठ करता आहात की नाही हे बघतात का? किंवा तुम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे कसे वागावे हे जबरदस्तीने सांगितले जातेय? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रोज संघाच्या शाखेत जायची जबरदस्ती केली जाते आहे का? जर हे काही होत नसेल तर का एवढा आरडाओरडा होतोय? बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये.

In reply to by ट्रेड मार्क

बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये. चालूच असतं म्हणल्यावर विषयच कट ण भाऊ! मला "दैनंदिन आयुष्य" मधुन जे समजले उमगले मी त्याला अनुसरुन लिहिले, उरता उरला सरकार फासिस्ट असल्याचा प्रश्न तर तसे अजिबात नाहीये . त्याची कारणे माझ्यामते वेगळी आहेत पण ते नंतर विषयानुरूप बोलु (बघा सोसंल तितके (तुम्हाला अन आम्हाला) बोललो! :D जाता जाता, हा सोसंल वाला सल्ला फ़क्त आम्हालाच की पक्ष निरपेक्ष सगळ्यांना हो??

In reply to by नाना स्कॉच

सोसंल चाल सल्ला खरंतर माझ्यासकट जे जालावर आहेत/ असतात त्या सर्वांनाच. मिपावर जरी वेगळे आयडी घेवून वावरत असलो आपण सगळे तरी संदेशाचा उगम कुठून झालाय हे शोधणे सहज शक्य आहे. त्यामुळे एखाद्या फ़ासिस्टानॆ शोध घेऊन धडा शिकवायचा म्हणलं तर करू शकतो (ही धमकी नसून काळजी आहे). चेपू तर काय खुले पुस्तक आहे त्यामुळे तिथे तर अजूनच सांभाळून (निदान मी तरी).

ज्यांना महागाई वाढलेली दिसत आहे त्यांची एक तर कमाई कमी झालेली आहे नाहीतर चंगळवाद वाढलेला आहे असे गृहीत धरावे। शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही,भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या कि सरकार ला दोष देऊन मोकळे होतात आणि भाव वाढवले कि तरी ओरडतात ,महागाई वाढली म्हणून ओरडणारे त्या सडवलेल्या दुधाचे पनीर 200 रुपये किलो आणि 10 20 रुपये निर्मिती मूल्य असलेला पिझा 200 ते 1000 रुपये पर्यंत खातात तेव्हा महागाई दिसत नाही ह्यांना।आता सरकारने डाळ आयात केल्याने डाळीचे भाव खाली येताहेत त्यामुळे विदर्भातल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल ते डाळ आयात करा म्हणून ओरडणारे भरून देतील काय।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सरकारच्या धोरणांचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही सामान्यांच्या विरोधात तर बोलत नाही ना याची खात्री करुन घ्या.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ज्यांना महागाई वाढलेली दिसत आहे त्यांची एक तर कमाई कमी झालेली आहे नाहीतर चंगळवाद वाढलेला आहे असे गृहीत धरावे। सरसकट गृहितकात बंदिस्त केलेत तुम्ही सगळ्या निम्न मध्यमवर्गाला. बरे नाही ते. डाळ 200 ?रोज किती डाळ खातात भाऊ महान राष्ट्रकार्य म्हणून तुम्ही सोडा डाळ आम्ही गरीब शाकाहारी माणसे आहोत 6 जणांची फॅमिली त्यात बालके वृद्ध अश्यात डाळ लागतेच आमच्या प्रथिनांच तोच एक स्त्रोत आहे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही. हा संदर्भ कळला नाही, मी मीडिया ला जबाबदार नाही मी मीडिया कर्मी नाही मी फ़क्त मी जे बोलतो त्याला जबाबदार आहे (अगदी तुम्हाला काय अन कितपत समजते आहे त्याचा ही मी जबाबदार नाही), एक निम्न मध्यवर्गीय डिस्पैच क्लर्क म्हणून मला महागाई विषयी जे काही वाटले ते मी बोलतोय, ह्यात मीडिया मधे कुठे आला ते काही झेपले नाही , उगाच काहीही? आता सरकारने डाळ आयात केल्याने डाळीचे भाव खाली येताहेत त्यामुळे विदर्भातल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल ते डाळ आयात करा म्हणून ओरडणारे भरून देतील काय। किती तो निरागस भाव!! फायदा शेतकऱ्यांचा कधीच होत नव्हता/नाहीये, डाळ आयातीमुळे सुद्धा नुकसान शेतकऱ्यांचे नाही तर दामदुप्पट भाव झाले की मुनाफा कमाई होईल ह्या आशेने चढ्याभावाने वेयरहाउसेस घेऊन त्यात डाळी दाबून ठेवणाऱ्या जमाखोर हलकट व्यापाऱ्यांचे होईल, ह्याच्याकडे सोइस्कर दुर्लक्ष काय?? अवांतर :- जाऊ दे!

In reply to by बोका-ए-आझम

खोदकाम कार्याबद्दल कौतुक अन शुभेच्छा, तरीही बोका ए आझम साहेब, स्वतःच्या आयडी ची केलेली चेष्टा होती ती. :)

In reply to by नाना स्कॉच

ओ गरीब शाकाहारी माणूस ते नेटचे बिल भरायला पैसे आहेत आणि मांसाहारी प्रतिसाद टाकायला भरपूर वेळ आहे.

In reply to by भंकस बाबा

भंकस बाबा त्यांच्या नेटचा विषय काढू नका हो,नेट हे महिन्यातून एकदा 500 रुपयाचं लागते आणि जीवनावश्यक वस्तू ह्या रोजच लागतात है कि नाही स्कॉच बाबा।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही
ओ गाववाले, साखरेची निर्यात 15% पर्यंत केल्याने शेतकर्‍यांचा कसा फायदा होईल ते जरा सांगाल का?

In reply to by मार्मिक गोडसे

निर्यात केल्या शिवाय साखरेला भाव कसा मिळणार,आता देशांतर्गत जो भाव आहे त्याने शेतकऱ्याला त्याच्या उसाचा 1600 1700 चा भाव मिळू शकतो ,म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।
१)आंतरराष्ट्रिय बाजारात सध्या असलेले साखरेचे भाव भारतातील साखर निर्यात करण्यास अनुकूल आहेत का? २)सरकारला साखर निर्यातीसाठी सबसीडी द्यावी लागली का? ३)प्रत्यक्षात किती टन साखर निर्यात झाली? नसेल झाली तर का नाही झाली? ४)२०१५ मध्ये साखरेचे मागील वर्षापेक्षा ३३% अधिक उत्पादन झाले. २०१६ मध्ये ते २८% ने कमी असेल म्हणजेच ते जवळजवळ २०१४ च्या उत्पादनाइतकेच असेल. देशात साखरेचा शिल्लक साठा असल्यामुळे यंदा साखरेची देशांतर्गत मागणी पुर्ण होऊ शकते. गेल्या ५-६ महीन्यात साखरेचे भाव जवळजवळ ४०% ने वाढले. मग हा नफा नक्की कोणाला झाला? ५)देशात उसाचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील शेतकर्‍याला साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे FRP प्रमाणे मिळतात की साखरेच्या बाजारभावाने?

In reply to by मार्मिक गोडसे

भारतात साखरेचं सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होतं. महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर येतो.