१. दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.
माझ्या शाळेतल्या बय्राचश्या शिक्षकांनाही हे सांगा ना, प्लीज!
All events turn into nonevents once the event is over so do not worry about evetuallity of events turning into non events look for further events and enjoy.
आवडलं. :-)
(दहावीचे मार्कही न आठवणारी) अदिती
१. दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.
९.मी माझ्या पाल्याला घडवणार च्या गमजा मारु नयेत. तुम्ही फक्त प्रेम करु शकता त्याच्यावर.
१०.बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तुमच्या वेळी काय झाले चे संदर्भ टाळा. आणि ते लवकर विसरा.
सहमत!
आमची आत्ता कुठे सुरूवात आहे. आपण जे सांगितले आहे तसे वागताना स्वतःमध्ये (माझ्या वागण्यात) खूप बदल करावे लागणार आहेत. काही खांब सोडताना भीती वाटते. काहीतरी माहीत नसलेलं करताना वाटते तशी. सध्या आखोंका तारा असला तरी अभ्यासाला मारून बसवत नाही, पण एका जागी निदान २० मिनिटे बसावे यासाठी तो जे म्हणेल तो खेळ (बैठा) आम्ही खेळतो. कधी चित्र तर कधी गोष्टी, कधी चेस तर कधी साधे गणित. त्याला अजून हे सांगितलेले नाही कि गणित हा विषय अभ्यासाचा आहे. पण तो म्हणेल तेंव्हाच अभ्यास म्हणजे वाचन करतो.
रेवती
>>९.मी माझ्या पाल्याला घडवणार च्या गमजा मारु नयेत. तुम्ही फक्त प्रेम करु शकता त्याच्यावर.
लोक ह्येच ईसरतान. लै भारी
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
आणि यशाची सांगड घालू नये हे 'थियरी' म्हणून बरोबरच पण
- दहावीत कमी मार्क मिळाले की 'नावडत्या' महाविद्यालयात घ्यावा लागणा प्रवेश
- त्याच बरोबर आलेला (थोडा तरी) न्यूनगंड आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे
- महाविद्यालयातही 'कमी मार्कांचेच' बरोबरीचे विद्यार्थी त्यामुळे 'संगत चुकीची लागण्याची शक्यता'
- दर्जेदार स्पर्धा, शिक्षण, सोयी त्या महविद्यालयात नसण्याची शक्यता
- 'कॉलेजचे म्हणून दिले जाणारे' मार्क (प्रॅक्टिकल मधले)
- अपयशाचे 'बॅगेज'
ह्या सगळ्याचा १२ वी च्या मार्कांवर परिणाम होणारच - अपवाद कमीच
आणि मग त्या अपयशामुळे 'आत्मविश्वास / पालकांचा विश्वास' हरविणे हे सगळे दुष्ट्चक्र आहे असे नाही का वाटत ?
- दहावीत कमी मार्क मिळाले की 'नावडत्या' महाविद्यालयात घ्यावा लागणारा प्रवेश
-महाविद्यालयातही 'कमी मार्कांचेच' बरोबरीचे विद्यार्थी त्यामुळे 'संगत चुकीची लागण्याची शक्यता'
- दर्जेदार स्पर्धा, शिक्षण, सोयी त्या महविद्यालयात नसण्याची शक्यता
प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही, पण तरीही बर्याच वेळी असं होतं खरं.
(स्वतःचा अनुभव! अर्थात आता मी त्या दुष्टचक्रातून - सुदैवाने - बाहेर पडलोय - वयानुरूप!)
बर्याच अंशी सहमत.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
आपले म्हणने अगदी पटले. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी शैक्षणीक नियमावलीमध्ये अमुलाग्र बदल घडणे आवश्यक आहे. वेळोवेळी शैक्षणिक समित्यांनी अभ्यास करून केलेल्या शिफारसी पडताळून आंमलात आणायला आपल्या शासनास वर्षानुवर्षे लागतात. त्या विद्यार्थी तसेच पालकांपर्यंत पोचण्यासाठी आणखी वेळ जातो. व पर्यायाने हवे ते बदल हवे त्या गतीने होताना दिसत नाहीत.
पण हे दुष्टचक्र अस्तित्वात आहे म्हणून प्रभूसाहेबांनी सांगितलेले "मार्कांची यशाशी सांगड नसावी" हे मुद्दे चूक ठरत नाहीत असे वाटते.
आपला,
(गोंधळलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
'मार्कांची सांगड यशाशी घालू नये' हे बरोबर.
आता प्रश्न असे येतात की मग मार्क कमी असले तरी 'यशस्वी' होण्यासाठी काय करावे?(यशस्वी ह्या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असणार - तरीही व्यवहारिक दृष्ट्या लौकिकार्थाने यश मिळवणे, पुरेसा पैसा देऊ शकेल अशी नोकरी/व्यवसाय/धंदा करता येणे अशी मर्यादित व्याख्या तात्पुरती धरु).
तुमच्या अंगच्या नाना कळा, तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या अंगचे गुण मोजण्याचे आणि त्याप्रमाणे तुम्हाला योग्य वाट दाखवण्याची मार्क आणि परीक्षांखेरीज इतर काही सोय आहे का?
डॉक्टर, इंजिनियर होणे म्हणजेच सर्व काही असे नसेल तर - इतर कोणते करियरचे मार्ग आहेत ह्याची पूर्ण माहिती होणे गरजेचे आहे.
समुपदेशनात 'असे करु नका' हे सांगतानाच 'त्याऐवजी कसे/काय करा' हेही सांगणे महत्त्वाचे आहे. समर्थ, सक्षम पर्यायी व्यवस्था असल्याखेरीज सरधोपट मार्ग लोक सोडणार नाहीत.
चतुरंग
प्रभू साहेब,
खूप महत्वाच विषय ऐरणीवर घेतलात. चर्चेची सुरुवात सुद्धा मुद्देसूद आहे. तुम्ही म्हणता तसे खांब सोडायला हवेत पण ते सहजासहजी जमत नाही हे ही नक्की.
आम्ही आजून आठ मार्कांच्या गटात (म्हणजे सुपात) आहोत. जात्यात जायच्या आत तुमच्या सारख्या दळून निघालेल्यांची मते समजून घेणे फायद्याचे ठरेल हे वादातीत. कारण अत्ताच मला मी "आऊट डेटेड" झाल्यासारखे वाटत आहे... विषेशतः भाचे मंडळी आजकालच्या नियम बदलांचा विषय काढून मत विचारतात तेव्हा. मला न समजनारे नवीन मुद्दे...
१. दहावी नंतर जिल्हा बदल करण्याचे नियम - आमच्या वेळी कोणीही कोणत्याही जिल्यातून महाराष्ट्रात कोठेही जाऊन ११वीत प्रवेश घेऊ शकत असे. त्यावर आता मर्यादा येत आहेत. कारण लातूर सारख्या शिक्षणासाठी प्रसिद्ध शहरात बाहेरील मुलांच्या स्पर्धेमुळे स्थानिक मुलांना ११वीत प्रवेश मिळत नाहीत.
२. सेमी इंग्रजीचा परिणाम - या विषयावरील प्रश्न हे मला नवीनच आहेत. मुलांना ११वीत विज्ञान घेतल्यावर एकदम इंग्रजीचा सामना होतो व खूप आवघड जाते. पण म्हणून ५वी-६वी पासून घेणे योग्य आहे का? कारण पुढे विज्ञान शाखेत जायचे किंवा नाही हे या वयात मुलांनी ठरवलेले नसते.
३. वेगवेगळ्या एन्ट्रन्स परिक्षा - या आजकाल येवढा गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत की कोणत्या परिक्षेसाठी केव्हा वेळ द्यावा वा कोणती टाळली तरी चालेल याची कल्पना ना पालकांना असते ना विद्यार्थांना.
या विषयांवर सुद्धा येथील जाणकार काही माहिती देतील का?
आपला,
(आउट डेटेड) भास्कर
आम्ही येथे वसतो.
All events turn into nonevents once the event is over so do not worry about evetuallity of events turning into non events look for further events and enjoy.
लक्षात ठेवले पाहिजे.पोरगं गेलं बारावीत बघता बघता!
खांब मात्र केव्हाच सोडले आहेत!
प्रतिक्रिया
मस्त! बरेचसे पटले
१. दहावी
१. दहावी
भयंकर उपयोगी!
>>९.मी
छानच
दहावीच्या मार्कांची
बर्याच अंशी सहमत!
सहमत
बरोबर आहे!
जनरेशन गॅप
टू गुड
All events turn into
आमचं पोरगं पहिलीत जाईल
हे वाचायचं राहून गेलं होतं