देव अन माणूस
(महत्वाची सूचना - 'देवांची घऱ' म्हणजे - मंदीर , मशिदी , चर्च अन अजून धर्मानुसार वेगवेगळे )
मानवी मन हे खूप घाबरट आहे . त्याला कशाची ना कशाची भीती असतेच . नोकरी , धंदा , घर , संसार ह्या पैकी कशाच्या ना कश्याच्या काळजीने मन कायम चिंतेत असते . - ह्या मानसिक भीतीला घालवण्यासाठी 'देवांचा' आधार आहे . देव ही संकल्पना प्रत्येक धर्मात आहे . हिंदूत ती कृष्ण / शिव , ख्रीशानामध्ये virgin मेरी / येशु , मुस्लिम मध्ये मोहम्मद , बौद्ध मध्ये बुद्ध आणी असच पुढे !
प्रश्न हा आहे की - जर हिंदू म्हणत असेल सुर्य / चंद्र 'ब्रम्हा' ने तयार केले , ख्रिशन म्हणत असेल ते 'येशू' ने तयार केले , मुस्लीम म्हणत असेल ते 'अल्ला' ने तयार केले तर आपल्या सुर्यमालेत कमीत कमी ५-६ सुर्य , ५-६ चंद्र असायला हवेत , नाही का ? प्रत्येक धर्माला समर्पित वेगळा चंद्र अन वेगळा सुर्य असायला हवेत … . . जर प्रत्येक धर्मातील देवांनी माणूस तयार केला तर सर्वाना दोन हात , दोन पाय , दोन डोळे असेच का ? सगळ्यांची operating system सारखीच का ? धर्मानुसार operating system (operating system - physically ) वेगळी का नाही ? प्रत्येक धर्मानुसार माणसाच्या रक्ताचा रंग वेगवेगळा का नाही ? म्हणजेच कुठेतरी 'main reference' च चुकीचा आहे
धार्मिक दंगलीच महत्वाच कारण म्हणजे हिंदू कुराण , बायबल वाचत नाही / मुस्लिम गीता , बायबल वाचत नाही अन ख्रिशन गीता ,कुराण वाचत नाही - एकमेकांचे धर्मग्रंथ वाचले तर दंगली घडणारच नाहीत . बरंच साम्य सापडेल एकमेकांत … अजून एक हे धर्मग्रंथ लिहिले कुणी ? खुद्द देवाने ? नाही - ते लिहिलेत माणसाने (महात्मा / देवदूत ) … मग ह्याची काय खात्री की जे देवाला सांगायचे आहे ते जसेच्या तसे धर्मग्रंथात उतरेले ? ह्या देवदुतानी 'भेसळ' केली नसेल कशावरून ?
आत्ता मुद्यावर येतो :
१. कोणताही धर्म माणुसकीच्या भल्यासाठी जन्माला आलाय . आपल्याकडील मंदिर , चर्च , मशिदी ह्याच्याकडचा सारा पैसा माणुसकीचा नाही का ?
२. आज शेतकरी एवढ्या आत्महत्या करतायेत , आर्थिक अडचणीमुळे कितीतरी लोकं आत्महत्या करतायेत त्यांची जबाबदारी 'देवांच्या घरांची' नाही का ? (माहितेय , ते त्यांच्या कर्माने मारतील वा धर्मासंस्था म्हणजे काय काय सरकार आहेत काय ? )
३. बर ज्या भागात हा पैसा जमा होतो, ज्या गावात अशी मोठमोठ्या 'देवांची घरे 'आहेत त्यांची जबाबदारी नाही का कि जमा झालेला पैसा लोककल्याणासाठी वापरावा ? त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवाव्या ? गरजूंना घरे द्यावी ? तेथील रस्ते , परीसर स्वछ ठेवावा ? अशा 'देवांच्या घराबाहेर' भिकारी असण म्हणजे देवांचा अपमान नाही का ? अन जर नसेल तर मग देवांच्या घरावरून 'धंदा' सुरु आहे का ?
४. जर देव ही 'अज्ञात शक्ती' असेल तर त्या शक्तीला दान - धर्माची गरज काय ? जर ह्या देवांनी (GOD - मग तो कोणत्याही धर्माचा असो ) ही सृष्ट्री निर्माण केली , त्याला ह्या सोन्या-चांदी ची , देणगी ची गरज काय ?i mean जर स्वतः शिवा कडे राहायला घर नव्हते , अंगावर कपडे नव्हते त्यांना दुधाची , सोन्याच्या मुकुटांची ची गरज काय ? येशू अन बुद्ध - जे स्वत रानावनात भटकत होते त्यांना पैश्याच्या देणगीची गरज काय ? विचार केल्यानंतर असे तात्पर्य निघते की - देवाला 'दान ' करण्याचा उद्देश म्हणजे पैश्याचा उपयोग लोकांसाठी ह्यावा असा असावा .i mean ज्याच्याकडे पैसा आहे , ऐपत आहे ते सोन्या - चांदीचे मुकुट किंवा लाखो ने देणगी द्यावी अन तो पैसा गरिबांच्या कामाला यावा . [पैश्यांची समान (?)वाटणी ]
५. जर 'India First 'असेल तर सगळ्या धर्मांनी एक common बँक account काढायला नको का ? पारदर्शिक …इथं भ्रष्टाचार नको … (after all हा देवांचा पैसा आहे) अन त्याचा उपयोग लोकांसाठी करावा … एवढा पैसा निघेल कि भारत जगातला एक श्रीमंत देश म्हणून उभारेल … त्याच दिवशी जेव्हा हे घडेल - (कदाचीत इथं मी जास्त आशावादी असेल - पण मोदी ला माझे १५ लाख कधी मिळतील हे विचारण्यापेक्षा हा उपाय बरा )
मी असं नाही म्हणत कि धर्म नसावा - तो असावाच , साधा क्रिकेट चा खेळही नियमांशिवाय खेळता येत नाही तर मग 'समाजाचा खेळ' धर्माच्या नियमांशिवाय कसा चालणार ? आणी मी हे ही म्हणत नाही की देव नाही - तो आहे पण सगळ्यांच्या भल्यासाठी …… अन त्याला माणसाकडून एकमेकांना मदत करण्यापेक्षा दुसरी कोणतीच अपेक्षा नसावी ….
(थोडं जड जाण्याची शक्यता आहे , सोसलं तर घ्या )
(sorry for typing error)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हमममम! पटन्याजोगं आहे साहेब.
"त्यांना पटेल का?"
आय मीन..
अॅज ए
हे सगळे बोलायला ठीक आहे.. पण
हे वेगऴ कारण
का नाही? मी तुम्हाला पुस्तक
इथं 'हेतू' चा कोण एवढा विचार करत नाय ;
नाही तसे नाही होत. जर भिकार्
लोक देवाला घाबरतात