खरंच भावंडांच महत्व खूप आहे माझा भाऊच मला आमच्या कुटुंबात जास्त आवडतो जरी आम्ही कितीही भांडलो तरी.
शितल ताई लेख छान आहे. तुमच्या लहानपणीचा प्रसंगही आवडला
असण्याचे फायदे सांगताच येत नाहीत. धन्स शितल.. आपण ज्या काही गोष्टी 'गृहित' धरतो त्यातच आपल्या भावंडाचे 'असणं' ही एक आहे... म्हणजे सुख-दु:खात बाकी कोण असेल्/नसेल पण आपलं भावंड नक्की साथ देईल असं !!
शितल ताई... मस्त लेख.. खुप आवडला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हा तिघात मी सगळ्यात लहान... त्याचे फायदेच जास्तं झाले. लहान असताना दादापेक्षा ताईच जवळची वाटायची. शेंडेफळ असल्याने मी मला बरोबर न्या म्हणून मागे लागायचो आणि दादा कुठेच नेत नसे... तु तुझ्या मित्रांबरोबर खेळ असं म्हणून सटकायचा. त्याउलट ताई मला नेहमी बरोबर न्यायची... (तिचा खुप जीव आहे माझ्यावर). खुप काळजी घ्यायची. सहाजीकच मला ति अधिक जवळची वाटू लागली. पण जसजसे मोठे होऊ लागलो तसे त्या दोघांचही माझ्यावर किती प्रेम आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून कळायला लागलं. आज तिघं तिन ठिकाणी आहोत, पण एकमेकांना बोलल्याशिवाय रहावत नाही... खरंच, मेरे भावंडोको मेरी भी उमर लग जाये!!
सुंदर लेखासठी शितल तै चं अभिनंदन!
अनामिक
वाचताना डोळ्यात पाणी आले.
आमच्याकडेही रोज भावंडासाठी हट्ट असतो माझ्या मुलाचा.
दुसर्यांच्या घरी बाळ येणार असे समजले की आमच्या घरी बरीच
वादावादी असते (मुलाची व माझी).
माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी.
त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच.
रेवती
माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी.
त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच.
मग तुम्ही त्याला भाऊच आणा, कसे?
:))))))))))
शितल, छान आठवण, छान लिहिलेली. माझी धाकटी पोट्टी अशीच आलेली आहे आमच्याकडे. :) कालच एका मित्राबरोबर हाच विषय निघाला होता. स्वतःच्याच घरात एकाला दोन असलेले खरंच चांगलं आणि मुलांसाठी खूप हेल्दी असतं.
फक्त एकच सुधारणा सांगतो. कधी कधी नकळत्या वयात, वाढत्या वयात भावंडात (विशेषतः भावाबहिणीत) खूप भांडणं होतात, प्रसंगी मारामार्या होतात, पण हे सगळं नंतर पाऽऽर विरघळतं. हा माझा स्वानुभव आहे. लहानपणी लग्नांतून वगैरे जेव्हा नवरी मुलगी सासरी जायला निघते तेव्हा होणारी रडारड बघून आम्ही खूप हसायचो. ताईचं लग्न ठरलं तेव्हा मला पूर्ण खात्री होती की मी काही रडणार नाही. पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. पार पचका झाला माझा. :(
बिपिन कार्यकर्ते
असा पचका सगळ्याच भावांचा होत असेल नाही?
एक किस्सा आठवला. माझ्या मामेबहिणीचं लग्न झालं तेव्हा मामेभाऊ जरा जास्तच रडत होता. तेव्हा ते भाऊजी म्हणाले 'अरे रडतोस कशाला, आपण एकाच गावात तर आहोत. कधीही भेटू शकतो.' मामेभाऊ रडता-रडताच म्हणाला 'म्हणूनच तर रडतोय!'
अनामिक
पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले.
माझा सुद्धा माझ्या तायांच्या लग्नांत झालेला पोपट आठवला. :(
भावंडं, विषेशतः बहिनी हा प्रकारच फारच स्पेशल आहे. आईचं वात्सल्य, बापाचा आधार, भावाची सोबत अन बहिनींची माया... जीवनाला आकार देणारी रसायनं.
आपला,
(श्रीमंत) भास्कर
डोळ्यात पाणी आले. मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच, भरपूर आठवणी आहेत, आता वरचेवर भेटी होत नाहीत अंतरामुळे पण फोनवर बोलणे व्हायलाच हवे.
आमच्या मुलाचा दिवसा-दोनदिवसाआड धोशा असतो 'मला ब्रदर किंवा सिस्टर का नाहीये म्हणून?' त्याच्या इतर सर्व आत्ते, मामे, मावस भावंडांची त्याला आठवण करुन द्यावी लागते पण त्याचे समाधान होत नाही. समजूत काढता नाकी नऊ येतात!
एकाला दोघे असलेले कधीही चांगलेच असते पण दरवेळी ते शक्य होतेच असे नाही त्यामुळे ती कमी मग मित्र आणि इतर भावंडांशी संपर्क ठेवून पूर्ण करुन द्यावी लागते. आपल्याला जिवाभावाचे भावंड आहे ही भावना मात्र वेगळीच असते हे नक्की!
चतुरंग
भावंडे खासच असतात.
आम्ही दोघे भाऊ भाऊ च आहोत. त्यामुले मारामारी हा आमचा सर्वात आवडता खेळ. अजूनही घरी गेलो की एकदा तरी एकमेकांच्या उरावर बसतोच. सख्खी बहिण नसल्याने चुलत / मामे बहिणींवर जास्तच प्रेम आहे. बहिणी वीक पॉइंट आहे असं म्हटलं तरी चलेल. नी त्या सुद्धा हे जाणून मला यथेच्छ इमोशनल ब्लॅकमेल करत असतात. आणि मी पण आनंदाने बळी पडतो :)
एकाला एक भावंड हवंच ह्या मताचा मी आहे. लहानपणी कधीच मित्राची उणीव भावामुळे भासली नाही. त्यात माझे सगळे काका आमच्या लहानपणी जवळ जवळच रहात असल्याने अजुनच धमाल.
झक्कास विषय काढलात. भावंडांच्या सगळ्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या.
चिरंजीव एकदा शाळेतुन आले. वय वर्ष ५.सिनीयर के.जी. चेहेरा जरा तांबडा झाला होता. काय झाले रे तर काही सांगेना.
नंतर थोड्या वेळाने आईला विचारता झाला. " तु हॉस्पिटल मधुन दुसरे बाळ आणणार आहेस का"? महेश ची(मीत्राची) आई आणणार आहे. तु आणु नकोस. मला नको.
हम दो हमारा एक चा निर्णय पक्का झाला.
आता हल्ली हल्ली एक मानस कन्या मिळाली.
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं.
आम्हीही म्हटले मनात, चला हे एक बरं झालं.
आता मात्र अवघड परीस्थिती आहे.
रोज एकाच प्रश्नावरून त्याच्याशी चर्चा करावी लागते.
रेवती
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं.
या वाक्यामधील तो हा माझा मुलगा आहे. माझ्या मुलानेच ठरवले की आपल्याकडे दुसरे बाळ नको.
आणि सध्या माझ्या मुलाचा विचार बदलला आहे. बाळही दोन मिनिटात हजर व्हायला हवे आहे.
रेवती
लेख मस्त.
शेवटचा भावा-बहिणीचा प्रसंग सुद्धा एकदम छान.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! :)
तुम्हा सर्वाच्या स्वतःच्या लहाणपणीच्या भावंडा बरोबरच्या आठवणी जागा झाल्या हे वाचुन खुप छान वाटले. :)
शितल, लेख फार आवडला. आम्ही तिघे भाऊ. मावस भावंडात ६ भाऊ आणि ३ बहिणी. नाते सख्ख्या भावंडांसारखे.खूप भांडायचो,खोड्या काढायचो.
तू पार नॉस्टालजिक करून टाकलेस बघ!
वा! फर्मास लेख!
मला एक भाऊ आहे.. त्यामुळे एकमेकांचय भन्नाट खोड्या काढणे, मारामार्या, वस्तु ढापणे/लपवणे हे आवडते प्रकार.. विडीयो गेम्स, कंप्युटरवर कोणी बसायचे, कोणाच्या हातात रिमोट ही दैनंदिन भांडणे. :)
आता दोघेहि मोठे झाल्याने खोड्या कमी झाल्या आहेत पण अजूनहि एकमेकांना नावांने हाक क्वचितच मारली जाते. हाका मारायला प्राणीसृष्टी मदतीला धाऊन येते. ;)
बाकी एकास एक तरी भावंड हवे ह्यास अनुमोदन!
(दादा)ऋषिकेश
लेख छान आहे. मला एक मोठी बहिण जी सध्या अमेरिकेत असते. आम्ही पण खूप भान्डायचो आणि एकत्र यायचो (पुन्हा भाण्डायला) तिच्या लग्नात तर मी खूप रडलो होतो आणि नन्तरचे २-३ दिवस सारखे या खोलीतून त्या खोलीत, मधेच कधीतरी गच्चीत...मधे तिच्याकडे जाण्याचा योग आला. १५-२० दिवस धमाल केली आणि मग इकडे परत येण्याचा दिवस उजाडला. आता पुन्हा एक वर्श तरी भेट नाही या विचारनेच कसे तरी होत होते. विमानात बसल्यावर तर तिची सारखी आठवण येत होती. मग शेवटी तिथले पान्घरूण डोक्यावरून ओढून घेतले आणि पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेतले (हळू आवाजात!!).
>>खुप छान लिहील आहेस
हेच म्हणतो !
सुंदर !
कालच वाचला होता... प्रतिसाद देणे विसरलो होतो ;) ह्यामुळेच माझी तायडी मला बावळट म्हणते... काही ही विसरु शकतो मी !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
शितल.. खूप छान लिहिले आहेस.
मी व माझा भाऊ आम्ही आजी कडे रहायचो... भाऊ बॅन्केत लागला होता व मी शिकत होते... एखाद्या दिवशी मन उदास असतान्ना त्याचा जो मायेने डोक्यावरुन मायेचा हात फिरायचा तो हात आता कधीच नाही फिरणार......मन उदास झाले आहे...... तुमच्या लेखाने परत काहि प्रसन्गाना उजाळा मिळाला.......
मला एकच मुलगी आहे आणि तिला स्वतःला भाऊ-बहीण नाही हे तिला खूपच सुखदायक वाटते. आता ती वयानेही मोठी आहे पण तिचे लहानपणापसूनचे ते मत अजूनही कायम आहे. कारण...सगळ्याच गोष्टींवर तिचा अनिर्बंध अधिकार आहे. तिला कोणाचीही स्पर्धा नाही. इतर भावा-बहिणींची भांडणे-वाद पाहून तर ती नेहमीच आपल्याला भावंडं नाही ह्याबद्दल खूश असते. आता बोला!
शीतल लेख मस्त आहे. तुम्हा भावा-बहिणीचे प्रेम पाहून अंमळ हळवा झालो.
मोठी बहिण असणे हे एक वेगळेच सुख. माझी बहिण माझ्या पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे.
शाळेतुन तक्रार आली आणि ''पालकांना' घेऊन ये' अशी तंबी मिळाली की मी ताईला (आधीच दम भरुन) घेउन जायचो. शिक्षकांसमोर मला खोटं खोटं रागवायचं आणि घरी प्रकार कळू द्यायचा नाही. हे कर्तव्य ती बंधूप्रेमापोटी करायची . मला तो माझा हक्कच वाटायचा.
एकुलती एक बहिण. सासरी निघाली, धो धो रडलो.
आजही तिच्याशी तात्विक वादविवाद होतो. पण मी जास्त ताणून धरत नाही. ती मोठी आहे. माघार घेतो.
हे सुख माझ्या मुलाला नाही देऊ शकलो. (आता वेळ निघून गेली) असो.
प्रतिक्रिया
वा मस्त
मस्त..
छान गं..
छान लेख
@)छान खरच
एकाला दुसरा/री
शितल ताई...
ह्रदयस्पर्शी लेख
हा, हा, हा!!!!!
एकदा
मुली नं १च.....
अरेच्च्या!
मग काय!!!
1011+
आवडले
वा!!!
असा पचका
...
सेंटी
छान लेख शीतल.
मग होऊन जाऊ द्या
खुपच छान
छान
मी
:)
छान
मस्त
भारीच
थोडे वायले
आमच्याकडेही
हम्म्म!!!
असेच म्हणतो !!
जरा गैरसमज झालाय आपला.
दोन मिनिट
लेख
छान
धन्यवाद !
लेख खुप आवडला
सुंदर
खूपच छान लेख!
फर्मास लेख!
छान
भावंडे
छान
>>खुप छान
शितल.. खूप
दुसरे भावंडं!
मोठी बहिण...