Skip to main content

दमामिने माझी कविता पळवली

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 28/11/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
दमामिने माझी कविता पळवली तेव्हा आत्मा जिलबीच्या घाण्यावर झाऱ्या काढून ऊभा होता मी बॅट्याला म्हटलं प्याऱ्या कुठाय? त्यावर ढगात नजर लावून तो म्हणाला सगळंच हुकलंय अगदी 'पातेल्या'चीही राख झालीय आता परा बिका मुविच्या भाऊगर्दीत टाऱ्याला शोधतोय. घावलीच एखादी जिलबी तर त्यावर मीठ टाकुन खातोय. मात्रं टेंपोत बसलेला राकु म्हणाला फुसकीच्या, कधीपासून 'कळ' बडवतोय? घे की आवरतं. एवढ्याचसाठी लाल करुन ठेवलेली कधीची, चकमक करुन गारगोट्या कपाळात घातल्यास की. अभ्या कानात कुजबुजला फुटायचं बघतोस का? अगरबत्त्या देईन तुला, फुकटात लागतील तेवढ्या. फक्त एकदा पेटल्यावर, आवाज मात्रं डेसीबली काढायचा. मांत्रिक मध्ये पडला सांगायलाच पाहिजे का? ___________________________________ (धाग्यात उल्लेखलेल्या सर्व दिग्गजांची माफी _/\_ आणि हो मुळ प्रेरणा www.misalpav.com/node/31979 )
लेखनविषय:

वाचने 5046
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मस्त जमलय माझ्याकडून टाळ्या घ्या

निरवतापाच्या जत्रेत वन्समोर घेणार हा कटाव! बादवे, दमामि सध्या कविताबरोबर असतो का?

:)

;););)

सुमडीत कोंबडीचा साक्षात्कार... मस्त आणि मस्तच..