मॅंगलोरला जायचा प्ल्यान आहे. माहितेय तुला काही? -- माझी प्रियसखी
ऐश्वर्या राय मँगलोरची आहे, पण ती आता बच्चन झाल्यामुळे डान्या उर्फ जुन्या मॉनिटरनी तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. डान्याचं खरं नाव डान्या नाही, पण मला त्याचं खरं नाव माहित नाही. मलाही खरं नाव आहे, पण मी खोटं नावच जास्त वापरते. पण कोणीतरी म्हटलंच आहे, "नावात काय आहे?". तसं कशातच काहीही नसतं आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. फसवणूक हा भारतीय दंडसंविधानानुसार गुन्हा आहे. आणि गुन्ह्याला शिक्षा होतेच. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण आणि मी खूप शिकलेली आहे असं लोक म्हणतात. पण लोक तर काहीही म्हणतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं माझे "तिसरी ड" चे पळशीकर मास्तर आम्हाला सांगायचे असं देशमुख आता म्हणतो. पण तो तेव्हा काय म्हणायचा ते तो आता म्हणत नाही. तसं तेव्हा काय म्हणायचे ते कोणीच आता पुन्हा म्हणत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना माझ्या, माझ्या प्रियसखीच्या, आणि शनि-मंगळ युतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
(आता बास)
-- अदितीताई अवखळकर पाटील.
आपल्या 'स्पेशल' प्रतिक्रियेबद्दल आभार...
हा लेख आपल्याला इतका आवडला की आपल्याला प्रतिक्रियेसाठी बाराखडीही कमी पडली.. :)
आपण म्हशींचे एजंट्/विक्रेते आहात का?
-झेल्या
तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि लेख वाचुन आलेला राग सोडून द्या......
किंवा १ ते १० आकडे मनात मोजा...बरं वाटेल...
(१ ते १०० आकडे मोजावे लागलेली) स्मिता श्रीपाद
'झेल्या' हे नामाभिधान धारण करून हा लेख प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच येथे अवतीर्ण केलेला दिसतो.
जेहत्ते कालाचे ठायी हा लेख म्हणजे प्रत्यक्ष भगवानांच्या वचनांची मौक्तिकमालाच (की वैजयंती माला?) आहे. या वचनांचे अर्थ समजावून घेतल्यास अनन्यशरण भक्ताची नैय्या पार होईल असा विश्वास वाटतो. -
१.ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल.
२.पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे.
३.जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा.
४.समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे.
(टीप : कृष्ण भगवानही कालौघात समज, समजूत, समजदारी असे फारसी- उर्दु शब्द वापरू लागले आहेत हे समजून घ्या. शिवाय रेसेशनसारखे यावनी शब्दही त्यांना सहज वापरता येतात. पृथ्वीचा पालनकर्ताच तो. त्याला काय अशक्य आहे?)
५.प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...!
डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन भगवंतांचं नामस्मरण करू या ... श्री हरी... श्री हरी...
कसं जमतं बुवा तुम्हाला असं लिहायला.......
अगदी डोकं बाजुला ठेवुन वाचलं हो.....
If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
प्रतिक्रिया
****
एक नंबर
सहमत
हे (तुमचं)
सहमत
किती वाटायचे..
रे तूझ्या
आपल्या
--
काहीहीहीही....
तुम्हाला
खफ
गणित
काम, काळ,
वा!
धन्यवाद.
खरं सांग
काय
पोचलेला लेख
कसं जमतं
वरील लिखाण
हा हा