पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html
मूळ कविता
http://www.misalpav.com/node/३३१७६
लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर
मुलगी मागताच मुलीचा बाप विचारतो घर
जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग
मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर
यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा
गोरी किवा काळी ,पटव आणि पळवून कर
चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर
मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य
लग्न करूनच मर पण जिवंत पाणी मर
किती झगडणार बायकोशी ,बस इतके ठराव
रोज वाढणाऱ्या दादागिरीस , ’अभय’ असेल तर
अमित पाटील ( aaj ka kishan )
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3504
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाण तिच्या मायला रे वाघा!!!
खि खि खि....जब्रा....अस्ल
त्यांस मिपाचे वारे लागलेले
In reply to खि खि खि....जब्रा....अस्ल by टवाळ कार्टा
धन्यवाद
In reply to त्यांस मिपाचे वारे लागलेले by अस्वस्थामा
समाजातल्या एका गंभीर समस्येवर
हा हा हा अगदी मार्मीक
आज का किशन=)))