Skip to main content

अनुभूती........................मच्छिंद्रगडावरची.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 30/09/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांपूर्वी नणंद म्हणाली,”हल्ली न् बऱ्याच वेळा मी माच्छिन्द्रगडावर जाऊन आले. खूप छान वाटतं तिथे.” “म्हणजेकुठे ग?” या माझ्या पृच्छेवर तिने सविस्तर उत्तर दिले. “अहमदनरच्या पुढे आष्टी तालुक्यात मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तिथे. अग, ठाण्यात घर घेतलं तेव्हा साबांनी दिराच्या मित्राशी बोलायला सांगितलं होतं, तो नवनाथ उपासक आहे. त्यावेळी मी खूप कठीण काळातून जात होते.त्याने मला नवनाथ कथासार वाचायला सांगितलं होतं. तो वास्तूशी संबधितही जाणकार आहे. त्याच्याबरोबर तो काही लोकांना तिथे घेऊन जातो. तशी मी आणि माझ्या काही मैत्रिणी त्या लोकांबरोबर जात असू. मग काही काळाने एका मैत्रिणीच्या सोबत मी बापूंकडे जाऊ लागले. तेव्हा त्याने मला एक दिवस सांगितलं, मी आता तुला तिथे नेऊ शत नाही. खूपवेळा त्याला माझ्या अडचणी आपोआप कळत आणि तो बायकोसोबत माझ्या मदतीला धावून येत असे. तुला कसं कळलं?असं विचारलं की, तो म्हणत असे ,”मायबांचा आदेश.”(मायबा हे त्यांचे प्रेमाचे माव. मलाही फार आवडले.) जवळजवळ तीन वर्षे मी जाऊ शकले नाही. नवनाथ कथासारातला एक अध्याय मात्र मी अजूनही नेहमी वाचते. त्याचा मला खूप छान अनुभव आहे. तर आता मला तिथे जाता येत नाही त्याचे मला फार वाईट वाटते. काल माझ्या स्वप्नात ते स्थान आले होते नि तुम्ही दोघे माझ्यासोबत होतात. तर मी ठरवलंय तुम्हा दोघांना तिथे घेऊन जायचं.” “तू ठरवून काही उपयोग नाही, त्यांनीच ठरवलं आपण जाऊ शकतो.” मी सांगितलं. त्यांनीच म्हंजे मच्छिन्द्र नाथानीच असे म्हणायचे होते. माझा मच्छिन्द्रनाथांशी संबंध आलेला तो लहानपणी. एक म्हणजे प्रभातच ‘मायामच्छिंद्र’ या चित्रपटामुळे आणि दुसरे म्हणजे श्रावणात ग्रंथवाचन असायचे मामाकडे. आम्ही राहायचो त्याच्या पुढच्या गल्लीत मामाचं घर आम्ही दररोज रात्री तिथे जायचो. दरवर्षी निराळा ग्रंथ असे. श्रीदेवीभागवत, श्रीज्ञानेश्वरी, श्रीदासबोध, श्रीगुरुचरित्र, श्रीसाईचारित्र, श्रीएकनाथीभागवत, श्रीसंतविजय श्रीसप्तशतीपुराण, श्रीपांडवप्रताप, श्रीहरीविजय, श्रीरामविजय, श्रीगणेशपुराण, श्रीशिवलीलामृत, श्रीकृष्णामृत, या साऱ्यांसोबत आणि इतरहि अनेक ग्रंथांसमवेत एका वर्षी श्रीनवनाथकथासार ऐकलेला होता. अर्थात् त्यावेळी फक्त गोष्ट ऐकायला मिळणार याचाच आनंद असे. त्यावेळेपासून गुरु शिष्य परंपरा कशी असावी, गुरूंवर विश्वास ठेवणे आणि गुरु चुकत असेल असेल तर त्यांनाही त्यांची चूक नम्रपणे सांगणे इ.गोष्टी मामाने आम्हाला समजावून सांगितलेल्या. काही वर्षांनी आमच्या घरी ग्रंथपठण सुरु झाले, तेव्हा ग्रंथ वाचन व त्याचे निरुपण मीही करीत असे. अर्थात माझे निरुपण म्हणजे पद्यातल्या ओव्या वाचून गद्यात कथारूपाने सांगणे इतकेच होते. त्यानंतर संबंध आला तो, लग्न झाल्यावर घर घेतले तेव्हा. आम्ही तेथे लगेच राहायला जाणार नव्हतो. पण ताबा घेताना आईच्या सांगण्यावरून ताबा घेऊन घरात प्रवेश करताना गणपती, कलश यासोबत नावनाथांची तसबीरही होती. एकदा गाणगापूरला असताना आलेल्या अनुभवाने तिथे काही कार्ये घडवून आणण्यासाठी दरवर्षी पैसे पाठवित असे त्यात, श्रवणात श्रीनवनाथकथासाराचे पारायण असे. या गेल्या दोन वर्षात खूपवेळा मच्छिंद्रगडावर जायचे ठरत असे, ठरून फिसकटत असे. यावर्षी ती राखीबंधनाला आली तेव्हा पुन्हा विषय निघाला. तिथल्या कथा सांगताना ती म्हणाली.,”असं मानलं जात की, रात्री बारा वाजता ते चैतन्य समाधीतून उठून बाहेर पडतं. खूप सुरेख सुवास पसरतो. एखादी सावली सरकते. जोराची वावटळ होते. पण प्रत्येकाचे अनुभव वेगळे, मलातर नुसताच सुवास आलाय.’’.आम्ही दोघे गप्पच होतो. ”तीच पुढे म्हणाली,”वहिनी, पंधरा येत्या दिवसातल्या शनिवारी-रविवारी जायचे का?” “नवनाथ म्हणजे दत्तसंप्रदाय. तेव्हा तिथे गुरुवारी जाऊन थांबून पहिले पाहिजे.” असे उत्तर मी दिले. पुन्हा ती म्हणाली,”आणि तुम्ही काही खर्च नाही करायचा. मीच सगळा खर्च करणार आहे. ”तारखा ठरल्या. ३ किंवा १० सप्टेंम्बरला जायचे ठरले. आमचा नेहमीचा ड्रायव्हर राजेश; याची गाडी घेऊन आम्ही नेहमी सहली करतो; त्याच्याशी बोलून नक्की करायचे ठरले. त्याचवेळी नवऱ्याला आठवण झाली की, यावर्षीचे पारायणाचे पैसे पाठवायचे राहिले आहेत. दुसऱ्यादिवशी गुरुजींशी बोलून तेही पाठवून दिले. राजेशला निरोप गेला. आणि दोन्ही गुरुवारी नणंदेला आणीबाणीच्या कामांमुळे रद्द करावे लागले. मागच्या सोमवारी पुन्हा तिचा फोन आला”.या गुरुवारी जाऊया का?दादाला विचारून सांग.” “दादा घरात नाही, कामासाठी बाहेर गेलाय आणि ते काम आज होण्याची शक्यता कमी आहे, तर काही अंदाज नाही. तो घरी आला की त्याला सांगते नि तुला फोन करते.” “मला अर्ध्या तासात त्या गाडीवाल्याला सांगायचे आहे.”असे तिने म्हटल्यावर मीही उत्तर दिले,” मग आत्ता तर काहीच सांगू शकत नाही.” नवराही दुपारी येणार होता तो संध्याकाळी आला. त्याला निरोप दिल्यावर तो म्हणाला, तिला सांग. ”तू नक्की कर न् आम्हाला सांग.” मी तिला संध्याकाळी फोन करुन कल्पना दिल्यावर ती म्हणाली.”अग तो आता दुसऱ्या भाड्यावर गेला. बघू कधी जमतेय ते?” मीही,’ ठीक आहे’ म्हात फोन बंद केला. बुधवारी माझ्या मनात विचार आला आता आपण मच्छिंद्रगडावर जायची तयारी करत असतो, पण अजून आपला योग दिसत नाही तिथे जायचा. इतक्यात फोन आला. नणंदच बोलत होती,”उद्या जायचं का?राजेशला विचार ना त्याची गाडी मिळेल का?” नवऱ्याने राजेशला विचारून वेळ नि दर पक्का केला ए.सी. ११ रुपये कि.मी आणि नॉन ए.सी.१० रोपये कि.मी.दराने त्याची तवेरा पक्की केली. आणि आम्ही निघायची तयारी केली. रात्री म्हटलं नवऱ्याला,” आपण माळशेज घाटातून जाऊ शकतो का उद्या?” “पुणेमार्गेच बरे पडेल.”नवऱ्याचे संक्षिप्त उत्तर. सकाळी निघताना एक मोरपीस घेऊन बाहेर पडायचे ठरले. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे समाधीस्थानी जाताना मोरपीस घेऊन जायचे, ते तिथे वाहायचे किंवा समाधीला लावून परत आणायचे. खाली येऊन गाडीत बसलो आणि गाडीत मोरपीस दिसले. मी मोरपीस न घेता खाली उतरले याची जाणीव झाली. पण आता मागे न फिरता निघालोच. मी पहिल्यांदाच नगरमार्गे जाणार असल्याने राजेशला विचारले,”अरे,पुण्याहून आपला मार्ग कसा काय?” “मॅडम, आपण माळशेज मार्गाने गेलो तर बरे पडेल. साहेब चालेल ना?” राजेश मूळचा नगरचाच असल्याने आणि गाडी भाड्याने देत असल्याने त्याला रस्ते, अंतरे याची आमच्यापेक्षा जास्त कल्पना होती. नवऱ्याने होकार दिला आणि जगद्नियंत्रण करणारे कोणीतरी माझे बोलणे ऐकत असल्याची पुन्हा एकदा झाली नि या सहलीत खूप मजा येणार असल्याची खूणही पटल्याची जाणीव झाली. वाटेत नणंद आणि तिची एक मैत्रीण यांना घेऊन आम्ही पुढे निघालो. सरळगावला चहापाणी झाले. माळशेज घाटाचे पहिले दर्शन विलोभनीय तर होतेच आणि पाऊस नसल्याने हवे तिथे थांबून फोटोही काढता येत होते. १. . २. . ३. . ४. . ५. . ६. . ७. . ८. . ९. . १०. . वाटेत एका ठिकाणी थांबून घावन-चटणी आणि फळे असा लंच उरकून आम्ही पुढे निघालो. गडावर राहायची फारशी सोय नाही तर जाता जाता नगरच्या सरकारी गेस्ट हाऊसवर जाऊन रूम मिळवली. गडावर पोचलो. नणंद याआधी बऱ्याच वेळा नियमित येत असल्याने, ओळखीच्या माणसाला शोधायला मैत्रिणीसह निघून गेली. अजूनपर्यंत पावसाने दर्शन दिले नवते. आता मात्र डोक्यावर एक मोठा ढग ओथंबून आलेला दिसत होता. सूर्य पश्शिमेकडे झुकलेला. अचानक टप्पोरे थेंब पडू लागले. तीनचार मिनिटे धुआँधार पाउस कोसळला. एका बाजूने ऊन होतेच. गाडीतून उतरून पाहते तो काय? मायबांनी आमच्या स्वागताला इंद्रधनूचे तोरण पूर्ण आभाळभर बांधले होते. ते अर्धचंद्राकृती इंद्रधनुष्य त्यांच्या समाधीमंदिराच्या शिखराला वेढून पूर्ण आभाळभर पसरले होते. भानावर येऊन फोटो काढले. ११. . १२. . खाली उतरून पुढे चालू लागलो, पुन्हा एक सर आली पण अगदी हळुवार, जणू एखादी आई बाळाला नाहू घालतेय. एक माणूस येऊन सांगू लागला, गाडी आतच लावा. त्याने गेट उघडून गाडी आत घेतली. आत शिरताच दोहो बाजूला मोकळी जागा, त्यात एका बाजूला एसटी पार्किंग व दुसऱ्याबाजूला सुरेख बाग. समोर पुढे फर्लांगभर अंतरावर बांधकाम चाललेले, त्याच्या एका बाजूला मूळ समाधी मंदिराचा कळस दिसतोय, त्याआधी दोन छोट्या छोट्या पण वेगळ्याच आकाराच्या इमारती. त्याच्यांपुढे अजून एक इमारत. असे सारे पाहत आम्ही पुढे जात होतो. स्वच्छता मात्र वाखाणण्यासारखी. इतक्यात नणंद एका मुलासोबत आली नि म्हणाली,”हा आपल्याला एक रूम देतोय. जेवणही यालाच सांगितलेय. आता आरती चालू होईल. आपण फ्रेश होऊन देवळात जाऊ.” “अहं, आम्हाला मायबांनी आंघोळ घातलीय. मी आता आधी मंदिरातच जाणार,”तसे सगळेच मंदिराकडे वळले. मग बाळूच्या दुकानातच पूजासाहित्य खरेदी झाली. मी मात्र नगरच्या सरकारी अतिथीगृहाच्या बागेत मिळालेलं हिरव्या चाफ्याचं, अप्रतिम सुवासाचं, स्वत: तोडलेलं फुल वाहायचं ठरवलं होतं. पण पोचेपर्यंत आरती चालू झाली. नवरा नि ड्रायव्हर आरतीत सामील होऊ शकले. पुरुष ना ते! आम्ही एका बाजूला उभ्या होतो. तिथे खूप बेभान लोक होते. पुरुष कमी नि स्त्रियामुली जास्त. प्रत्येकाचे काहीतरी वेगळेच चाललेय. कुणी नुसतेच घुमत होते, कुणी भेसूर आवाजात रडत होते, कुणी “आदेश, आदेश” म्हणून हात जोरजोरात जमीनीवर आपटत होते. कुणी नुसतेच जोरजोरात उचक्या देत होते, कुणी खदाखदा हसत होते. कुणी उड्या मारत होते, कुणी तारस्वरात “का? का?” असे ओरडत होते, कुणी नुसतेच “मायबा ,मायबा “असे पुटपुटत होते. कृश झालेले देह अशा काही ताकदीचे प्रदर्शन घडवू पाहत होते, की ही मनाची ताकद सत्कारणी लागली तर काय बदल घडून येईल या विचारात माझे मनही गुंतून गेले. या बदलालाच चमत्कार म्हणतात बहुधा. हा सगळा पसारा समाधी मंदिराच्या डाव्या आणि आपल्या उजव्या बाजूला असतो. इतक्यात आरती तिथून बाहेर पडून उजवीकडच्या मारुतीमंदिरात शिरली. तिथून धुनिपाशी, मागच्या बाजूच्या औदुबारापाशी, मागच्या बाजुला असलेल्या घोडेस्वार झालेल्या मायबांपाशी जाऊन मागच्या बाजूने मंदिरात शिरली. मधेच कधीतरी बाळू आम्हाला त्या पसाऱ्यातूनच मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या कार्यालयापाशी घेऊन आलेला. आम्हाला किल्ली देत तो म्हणाला. ”आता बाहेरूनच दर्शन घ्या कारण आता बायकांना आत जाता येत नाही. सकाळच्या आरती नंतर आत जाता येईल. ”असे बाळूने सांगितले. थोडी हिरमुसलेच. पण दर्शन धेतले, यावेळी समाधीमान्दिरात कोणालाही जाता येत नाही. पण मागचा दरवाजा अजून उघडा होता. त्याच्या बाहेरून दर्शन घेताना एकच प्रार्थना केली, ”तुझ्या आसऱ्याला आलेल्या या अभागी जीवांना त्यांच्या दुख:तून सोडव. त्यांना माणूस म्हणून जगू दे. आणि काय मायबा तुम्हाला भिक्षा वाढायला बायका चालायच्या ना? मी एवढी बारा तास प्रवास करून मी आले नि तुम्ही इतक्या लांबून भेटताय.?” माझ्या शेजारी उभी असलेली बाई मला दटावणीच्या पण हलक्या स्वरात म्हणाली, ”अस बोलू नये बाई. ते चैतन्य बायकांच्या कुडीला सहन होत नाही.” “पण ते मायबा ना?”मग त्यांनी थोड्या प्रेमाने भेटायला काय हरकत आहे?’ या माझ्या फुरंगटून केलेल्या तक्रारीवर तीही हसली. आम्ही दिलेल्या खोलीत गेलो. एक मोठी खोली, त्यात दोन मोठमोठ्या चटया पसरलेल्या. अटॅच्डॉयलेट, बाथरूम. पण आत पाणी नाही. पाणी बाहेरच्या नळावरून आणण्याचे. त्यामुळेच बहुधा अस्वच्छ. आधी चार बदल्या आणून ओतल्या. आवरून खोलीबाहेर पडलो. वातावरण मोठे आल्हाददायक होते. हवेत गारवा जाणवत होता. अष्टमीचा चंद्रही दिसू लागला होता. मंदिराच्या आजूबाजूला फिरता येत होते. मघाशी बेभान झालेले जीव थकून पडले होते. काहीजण अजूनही त्यातच होते, पण हालचाली मंद झालेल्या होत्या. अजूनही मागचा दरवाजा उघडाच होता. मंदिराच्या उजव्या बाजूने पायऱ्या खाली गेल्या होत्या. तिथे खालच्या बाजूला धोंडाई मंदिर, पाताळगंगा नदी, अमृतेश्वर मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिर असल्याचे दर्शविणारी पाटी होती. पण आता रात्रीच्या वेळी उतरायला नको म्हणून तिथेच आजूबाजूला फिरत होतो. आजूबाजूचे लोक कुजबुजत होते, “का दरवाजा उघडा आहे अजून, कोणीतरी मायबांचा लाडका भक्त यायचा असणार बघा.” नवऱ्याने एकदोघांना विचारल्यावर त्यांनी सांगितले,”असं बरेचदा घडतं, कोणीतरी बडे बाबांच्या जवळचा भक्त यायचा असेल. त्या पुजाऱ्याला दृष्टांत होतो, दार बंद न करण्याचा.” “पण त्याला कसं कळणार की, भक्त कोण नेमका?” माझा थोडा आगाऊपणा. “ते बी कळतंय द्रीष्टांताने. उगाच कुणीबी आत जाऊ शकत नाही.” हात जोडत कपाळाला लावत ते म्हणाले. मी म्हटलं,”चला जेवायला, आपण ते नसणार बहुतेक.” आम्ही मंदिराकडून बाळूकडे जेवायला निघालो. तर तो दुसऱ्या बाजूने धावत आला. नणंदेला म्हणाला,”ताई, तुमच्या वैनी कुठे आहेत?” “ती काय पुढे चाललीय.” तिने माझ्याकडे हात दाखवला. तो पळतच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “चला, मायबांनी बलावलाय तुमाला.” ”मला?” माझ्या डोक्यावर जणू कुणी बर्फाचे गार पाणी ओतले असावे अशी मी सुन्न झालेली. “त्या पुजाऱ्याने तुम्हाला बोलवायला सांगितलंय.” बाळू अधिरतेने बोलला. “मलाच कशावरून?’’मी तरीही बोलले. “पाच लोक, त्यात तीन बायका. दोघी देशी कपड्यात आणि एक विदेशी कपड्यात. तीच दिसतेय सारखी.” बाळूने खुलासा केला. आम्ही राजेश धरून पाचजण होतो. नणंद पंजाबी पोषाखात, तिची मैत्रीण साडीत नि मी पॅंट-टॉपमध्ये. मी हादरलेच .”तुम्हाला ताबडतोब आत जाऊन दर्शन घ्यायला सांगितलंय.” पुन्हा तो म्हणाला. “अरे,पण ...” असे म्हणेपर्यंत तिथे जमलेले लोक मला आग्रह करू लागले, ”लवकर जा ,लवकर जा.” “ए, तुम्ही पण चला माझ्याबरोबर.” असे म्हणून मी घाईने जाऊ लागले. बाकीचे लोक तिथेच थांबले, देवळाच्या डाव्या बाजूला. मी मागच्या दरवाज्यातून आत शिरणार तेवढ्यात एका बाईने, ”काय करतेस? यावेळी बायकांनी आत जायचं नसतं.” असं म्हणत माझा हात धरून ओढण्याच्या प्रयत्न केला आणि “आई ग” अशी किंकाळी मारून सोडलाही. मी तिथेच. इतक्यात पुजारी धावून आला. तिला म्हणाला,” त्यांना बडे बाबांनी बोलावलंय.” “माझा हात भाजला.” ती कळवळत म्हणाली. मला पुन्हा आश्चर्य वाटले कारण मला तर तसे काही जाणवत नव्हते. “अहो, पण माझी माणसं पण आली पाहिजेत.” मी त्यांना म्हटलं. ‘’आधी तुम्ही जा. बडे बाबांना सांगा, ते तुमचं ऐकतील.” पुजाऱ्यांनी सांगितलं. मी आत पाऊल टाकलं, मधुर सुगंधाने गाभारा भरून गेला होता. मी समाधीला स्पर्श करून नमस्कार केला आणि डोळे मिटले. मला मीच दिसत होते, ती मघाचची प्रार्थना करताना. बाकी काही नाही. बाकी काहीच नाही. बाकी काही नाहीच. कसलीच विनंती नाही मगन नाही. हळूहळू मागे झाले नि भान आलं. ’माझ्या माणसांना बोलावते हं,’ पुटपुटत मी मागे वळून इशारा केला ‘”आत या’’, असा. पुजाऱ्यानेही त्यांना आत येऊ दिलं. स्वत:आले. दोन मिनिटांनी म्हणाले. आता सकाळच्या आरतीनंतर या. काही सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. बाकी सगळे गप्प होते. नवऱ्याने हळूच हाताला धरून बाहेर आणलं. तिथल्या पायऱ्यांवर बसून मी मनसोक्त रडले. का रडतेय काही कळत नव्हतं. पण रडणं थांबवताही येत नव्हतं. थोड्यावेळाने शांत झाले. लोक लांबून माझ्याकडे पाहत होते त्याचंही भान नव्ह्तं. मग आम्ही जेवायला गेलो. बाळूने बाकड्यावर बसायला सांगितलं. ”अरे, माझे पाय जमिनीला टेकत नाहीत. मला खुर्ची दे बसायला.” बाळूने विरुद्ध बाजूला खुर्ची टाकून दिली. मी बसले नि माझ्या नजरेला बाजूच्या पूजासामानाच्या दुकानातली मोरपिसे दिसली. ”या दुकानात मघाशी इतकी खरेदी केली तेव्हा कशी नाही दिसली.?” या विचाराने मला सतावून सोडले. मग मोरपिसे खरेदी करायची ठरवली. केलीही. खोलीकडे पोचलो तर पुजारी उभे होते. म्हणाले, ”तुम्ही त्या खोलीत नका राहू. तुम्ही या खोलीत राहा. या खोलीत आतच पाणी आहे. खोली उघडून दिली न म्हणाले, मी प्यायचं पाणी आणतो, तुमच्या जेवणाचीही सोय करतो. ”ती त्यांची राहण्याची खोली होती. आम्ही जेऊन आल्याचे सांगितले. ते चार बिसलेरीच्या बाटल्या घेऊन आले. पैसे घेतले नाहीत. ”सकाळी पाच वाजता तुम्हाला गरम पाणी आणून देईल कोणीतरी.” असे सांगून निघून गेले. खोलीत आलो तर आत आशीर्वाद देणारं मच्छिन्द्रनाथांचं सुरेखसं चित्र आमच्याकडे पाहून हसत होतं. पुन्हा डोळे अश्रुनी भरून आले. कुणीतरी आपले लाड करतंय या भावनेने मन भरून गेलं. पण तरीही मघाही मंदिरात मी काही वेगळं अपेक्षित होते का? हेही समजत नव्हतं. १३. . पुन्हा आवरून जरा आराम करून साडे आकाराच्या सुमारास पायऱ्यांवर येऊन बसलो. आमच्याशिवाय कोणीही जागे नव्हते. ठिकठिकाणी लोक झोपले होते. हळू आवाजात गप्पा मारत होतो. बारा वाजले नि “टनण” असा मंदिराच्या पुढच्या घंटेचा आवाज झाला. एक वेगळाच सुवास पसरला, जो मघाशी गाभाऱ्यात होता. सगळेच पाहू लागलो. इतक्यात दोन मुलं नि एक मुलगी समोरच्या पायऱ्या उतरून खाली मंदिरात गेली. थोड्याच वेळात परत वर आली. ”चला आपण पण झोपायला जाऊया.” म्हणत आम्ही उठलो. मंदिराच्या समोर सहाजण बसले होते. तीन पुरुष नि तीन बायका, आणि ही तीन मुलं असे नऊजण आमच्या समोर होते. त्यातल्या सगळ्यात वयस्क पुरुषाने मला विचारलं, ”आता तरी खुश आहेस का?” ओळख ना देख हा माणूस मला असे का विचारतोय? त्या क्षणी अतिशय मिस्कील असलेले डोळे दुसऱ्या क्षणाला अनोळखी झाले. गोंधळून जात त्यांनीच मला विचारलं. ”आपण या आधी भेटलो आहोत का?’’ मी मागे वळून समाधीकडे पाहत नमस्कार केला. आणि म्हटलं. ”शेवटी भेटलात तर परिवारासहित.” १४. . (हा मंदिरासमोरच झेंडा. याच्या खालीच ते गृहस्थ बसले होते. हा फोटो सकाळी काढला आहे.) १५. . (हे रात्री चंद्र माथ्यावर आलेले मंदिर.) ते लोक जायला उठले. ते गृहस्थ अजूनही गोंधळलेले होते. नवरा आणि नणंद त्याची चौकशी करत होते, ते घोटीचे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते, आणि अतिशय प्रेमाने मायबांची सेवा करीत होते. अचानक त्यांना वाटलं की, आताच दर्शनाला जायला हवं म्हणून ते इतक्या रात्री घोटीहून तिथे सगळ्यांना घेऊन आले होते. आले तसे गेलेसुद्धा. आम्ही जाऊन झोपलो. सकाळी कोणीतरी भराभर पाच/सहा बदल्या पाणी आणून दिलं. आम्ही आवरून आरती संपल्यावर मंदिरात गेलो. समाधीमान्दिरात सूर्यप्रकाश भरून राहिला होता. पुजारी वगळता तिथे कोणीही नव्हतं. ते काल तोडलेलं फूल आणि मोरपिसे घेऊन मी मंदिरात गेले. पादुकांवर डोके टेकले. फूल वाहिले. मोरपिसे अर्पण करून सांगितलं, ”माझे सगले लाड पुरवल्याबद्दल धन्यवाद, माझी प्रार्थना लक्षात घ्या.” त्यातली काही मोरपिसे तिथे अर्पण करून बाकीची प्रसाद म्हणून परत आणली आहेत. १६. . १७. . १८. . १९. . २०. . थोड्या वेळाने निघालो, पुढच्या प्रवासाला. मी कधीही उपास, तापास, कर्मकांड यात गुंतलेली नाही. माणुसकी हाच माझा धर्म आहे. आलेला अनुभव माझ्या एकटीचा नाही. बाकीचेही त्याला साक्षीदार आहे. बाजार न झालेलं क्षेत्र म्हणून मला ते स्थान आवडलं. अतिशय शुद्ध हवा असल्याने प्रसन्नता लाभलीच. आज आठ दिवस झाले आहेत पण अजून या अनुभवाचे पृथक्करण मी करू शकत नाहीय. जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी विनंती करत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24551
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

"प्रत्येक माणसाची साधना वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन माणसांच्या कृती तंतोतंत एक नसतात" असं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर "खणखणीत हो" कसं बरं येईल? :)

In reply to by रामपुरी

असं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर "खणखणीत हो" कसं बरं येईल? :)
उत्तर "खणखणीत हो" असेच आहे, फक्त लागणार्‍या वेळात फरक पडू शकतो. म्हणून मार्ग वेगवेगळे आहेत. पद्धत तीच, पण प्रत्येकाच्या पातळीनुसार तपशीलात फरक पडू शकतो इतकेच.

In reply to by रामपुरी

साधना वेगळी असली तरी साध्य एक एकच असतं म्हणण्यापेक्षा त्या जागी पोचल्यावर ते लक्शात येतं असं म्हणावं लागतं. पुण्याहून गोव्याला जाताना कुठंतरी गोव्याच्या अलिकडे सगळे आंबा घाट, आंबेनळी घाट, कोल्हापूरचा घाट, अणुस्कुरा घाट संपून एकच एक मार्ग शिल्लक राहतो ना? तसंच. आधीची वाटचाल कुणाची आधी कुणाची नंतर सुरु होते. एका टप्प्यानंतर सगळ्या गोष्टी समान असतात.

सुंदर . फक्त बसायला खुर्ची दिली . पाणी उद्या ५ वाजता येईल अशी irrelative वाक्यं गाळली तर अजून छान होईल
”अस बोलू नये बाई. ते चैतन्य बायकांच्या कुडीला सहन होत नाही. ”काय करतेस? यावेळी बायकांनी आत जायचं नसतं.” असं म्हणत माझा हात धरून ओढण्याच्या प्रयत्न केला आणि “आई ग” अशी किंकाळी मारून सोडलाही.
जालिंदरनाथांनी मैनावती आणि तिची मुलगी चंपावतीला नाथपंथाची दीक्षा दिली होती . सगळे नवनाथ स्त्रीयांकडून भिक्षा स्वीकारत . नवनाथ पारायणाचे स्त्रीयान्नासुधा सुंदर अनुभव येतात . नाथपंथीयांमध्ये स्त्रिया सुधा आहेत . तेव्हा वरच्या २ हि केवळ अफवा आहेत हे सिद्ध होतं . बायकाच बायकांना मागे ओढण्यात पुढे असतात . बायकांनी असं करायचं नसतं अन बायकांनी तसं करायचं नसतं असं सांगितलं कि लगेच मान्य करतात . पण का ? हे मात्र कधी विचारात नाहीत . जावूदे . अनुभव खूप सुंदर आहे

सुरंगी, खरोखरच नशीबवान आहेस. लेख अन फोटोही खूप छान आहेत.

काय बोलायचे अद्भुत अनुभव आहे आपला. ते नाथ आहेत.... मी तर म्हणेन की या सारख्या प्रसंगांनी आपली श्रद्धा दृढ होते. लीनता वाढीस लागते. त्यांचे अस्तित्व जाणवले म्हणजे त्यांचे आपल्यावर लक्ष आहे याची प्रचीती येते. आणि आनंद आणि शांती लाभते.

_/ \_ साधारण पुण्यापासून किती कि.मी. वर आहे हे? जाणारचं!!

राम पुरी,प्रत्येकाची साधना वेगळी हेच खरे.मी जे काही करते त्याला रूढ अर्थाने साधना म्हणणे चुकीचे होईल.कारण माझा नमस्कारही नित्यनियमाने असत नाही.पण रस्त्यात पडलेल्या माणसाला मी ओलांडून जाऊ शकत नाही.मग तो माझा कट्टर वैरी असला तरी.बाकी बरेच काही मी माणूस धर्म पाळून करते,त्यात मग जिवावर बेतण्याचे प्रसंग आले तरी मी मागे हातू शकत नाही किंवा तो परमेश्वर मला मागे हटू देत नाही.आणि त्याला काय आवडेल याचा जिम्मा कोणी घ्यावा.थोडी कल्पना येण्याद्साठी हे वाचा. http://www.misalpav.com/node/31680 शिवाय आपण जे करतो त्यालाच परमेश्वर साधना समाजात असेल का?