Skip to main content

डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

लेखक संजय पाटिल यांनी रविवार, 30/08/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=r… डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?

वाचने 41862
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

माझा एक प्रतिसाद संपूर्ण उडवण्यात आला असून दुसरा संपादित केला गेला (केवळ शीर्षक बाकी) आहे. मी या दोन्ही प्रतिसादांमध्ये, एक प्रयोग म्हणून, जाणूनबुजूनच प्रक्षोभक आणि आव्हानात्मक (पण असभ्य वा अश्लील नव्हे) भाषेचा उपयोग केला होता. प्रतिसाद संपादित केला जाईल याची मला पूर्ण कल्पना होती. यावरून मला हे दिसून आले, की अन्य कुठेही, कुणीही, काहीही बोलो अथवा लिहो, मिपा व्यासपीठाची सोज्वळता आणि निरागसपणा शाबूत राहणे महत्वाचे! यातून उपस्थित होणारा पुढचा प्रश्न: अशा विषयांची मिपावर चर्चाच का होऊ द्यावी? हा प्रतिसाद उडवला जाणार नाही अशी अपेक्षा :-)

सगळी करमणुक. पुरोगामी, प्रतिगामी, अजुन कुठले कुठले गामी, मग गांधीहत्या वगैरे. फक्त आम्हाला का आरसा दाखवताय, 'त्यांना' का नाहि असे प्रश्न. विचारांची लढाई, पत्रकारांच्या बाता, मोर्चे, सर्व कसं एकदम हातात मशाल घेऊन अंधार जाळायची फॅशन आल्यागत चार दिवसांचा दशावतार. कुणा अडगळीत पडलेल्या विचारवंताची लेखणी पारजणार. कुणी तर एकदम बंदुकींनी प्रतिवाद करायल सरसावणार. तरी बरं... अजुन 'पटेल' असं कारण पुढे आणलं नाहि कुणी. सर्वात मजेदार म्हणजे निषेध व्यक्त करणे. हवेत तीर मारायचं समाधान तरी का घालवायचं. सत्य फक्त दोनच. एक निश्प्राण कलेवर. दुसरा तो पाताळयंत्री मेंदु.

In reply to by अर्धवटराव

या प्रतिसादामधून नेमकं काय म्हणायचंय मालक??? भाकडचर्चा नकोच असं म्हणणं मान्य. पण मग ती कुठेच् नाही व्हायची. मिपा चालायचं कसं अशानं? आमच्यासारख्या मिपानिष्ठ लोकांचं फावायचं आपलं चालायचं कसं?

हा ब्लॉग वाचनात आला. दाभोळकरांबद्दल काही थोड्या फार प्रमाणात समतोल लिहिले आहे असे वाटले. नुसताच उदो उदो न करता लिहिलेले आहे, असे वाटले. http://harinarke.blogspot.in/2013/08/blog-post_20.html

कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध. या हत्येने नक्की काय साधले हे खूनीच सांगु शकेल पण कुठल्याही व्यक्तीचा जीवनाचा हक्क हिरावुन घेणे हा सर्वोच्च पातळीवरचा गुन्हा आहे हे देखील मारेकर्‍यांना समजु नये काय? अश्या निर्घृण कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच. हे डॉ कुलबुर्गी कोण ते काही माहिती नाही. या आधी त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते. गोविंद पानसर्‍यांबाबतही तेच. नरेंद्र दाभोळकर नक्कीच माहिती होते त्यांच्या अंनिसच्या कार्यावोषयी मात्र इतर दोन नावे ऐकण्यात नव्हती. त्यांचे कार्यही काही खूप व्यापक प्रमाणावर नव्हते. या हत्यांमागे त्यांच्या सार्वजनिक कार्याचीचा पार्श्वभूमी आहे काय? कारण लोक नुसतेच आरडाओरडा करताहेत की या मागे सनातनी संस्था आणि व्यक्ती आहेत. पण म्हणजे नक्की कोण कुणीच बोलत नाही. नक्की काय प्रकार आहे?

In reply to by मृत्युन्जय

कलबुर्गी प्रसिद्ध विचारवंत, संशोधक आणि शिलालेखांत रुची असणारे होते. त्यांचे 'महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख' हे पुस्तक मजकडे आहे. रा. चिं. ढेरे ह्यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. उपरोक्त पुस्तकातील ऋणनिर्देशांत ढेऱ्यांचे नाव त्यांनी आदराने घेतले आहे. त्यांच्या इतर कार्याविषयी किंवा वादग्रस्त उल्लेखांविषयी मला कसलीही माहिती नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक अजून वाचायचे आहे. सध्या नुसतेच संग्रही आहे. पण अधिक माहिती (अनुक्रमणिका, ऋणनिर्देश, प्रस्तावना ) इकडे वाचायला मिळू शकेल.

हत्येचा निषेध.आता काही विशिष्ट विचारसरणीचे लोक कलबुर्गी ह्यांचा सगळा पूर्वेतिहास खणून काढतील. ३०-४० वर्षापूर्वी त्यांचे एखादे वादग्रस्त विधान तुमच्या त्या फेसबूक वा अशा साईटींवर सारखे अधोरेखीत करतील व मग 'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.
माईसाहेब, या वाक्यातले "हे" म्हणजे तुमचे "हे" का? तुमचे "हे" असे का बिंबवायचा प्रयत्न करतील?

मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ?
मूर्तीपूजा करणं आहे ? तुम्हाला मूर्तीपूजा करायची नसेल तर नका करू . पण इतरांनी करू नये म्हणून सक्ती का ? मग इस्लामी मुलतत्ववाद्यांत आणि तुमच्यात फरक काय ? हिंदू धर्मामध्ये सगुण आणि निर्गुण अश्या दोन्ही उपासना आहेत . सगुण उपासना करता करता निर्गुण उपासना करायची ताकद येते . हल्ली हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याची , हिंदू धर्माच्या नावाने बोटे मोडण्याची फ्याशनच आलीये . आणि हिंदूच जर विनाकारण आपल्याच धर्माला बदनाम करत असतील , नको त्या गोष्टी हिंदू धर्मात घुसडत असतील तर माझा त्याला विरोध आहे . दाभोलकरांनी सुधा अंधश्रद्धे करताना भान सोडलं. मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही .पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ? इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ?

In reply to by तुडतुडी

>>>>> मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही. ठीक आहे. >>>>पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ? पुरोगामी म्हणजे सुधारणावादी, परिवर्तन वादी, आधुनिक विचार करणारे असे >>>>इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ? त्यावर कोणी भाष्य करत नसेल तर आपण बोला की ? -दिलीप बिरुटे

In reply to by तुडतुडी

"सक्ती"?! कलबुर्गींना गोळ्या घातल्या आहेत, कलबुर्गींनी देव मूर्तीपूजकांना गोळ्या घातलेल्या नाहीत

कलबुर्गी ह्यांचा आत्म्याला शांतता लाभो. चुकिची घटना. हत्येचे समर्थन नकोच. परमेश्वरा सर्वाना सद्बुध्दी दे. :(

वरच्या प्रतिसादातील 'मूर्तीपूजा करणं आहे ?' हे वाक्य 'मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ?' असं वाचावं . टाईप करताना गडबड झाली

हत्येचं समर्थन नाहीच. ते कुणी करूही नये. त्याचा जितका निषेध करावा तितका कमीच. पण "जर" या हत्या तथाकथितरित्या हिंदुत्व वाद्यांनी केल्या असतील तर ही दुर्दैवी आणि त्यापेक्षा जास्त करूण घटना आहे. जर ती मूर्तीवर लघुशंका करण्याबद्दल गोष्ट खरी असेल तर या लोकांनी (म्हणजे तथाकथितरित्या हिंदुत्व विरोधी लेखक/कार्यकर्त्यांनी) अशा भडकावू गोष्टी का केल्या/बोलल्या असाव्यात याबद्दल माझं पृथक्करण असं: त्यांचा अंदाज चुकला. जगातलया सगळ्यात सहिष्णू धर्मावर टीका करून मोठं होता आलं पण जसे माथेफिरू इतर धर्मात असतात तसेच ते हिंदू धर्मात सुद्धा असतील/पुढे असू शकतील असं त्यांना वाटलंच नाही. मुस्लीम धर्मातल्या प्रथांवर टीका करून हुतात्मा होण्याची शक्यता बरीच जास्त. मग अशा धर्मावर टीका करा ज्याच्यामध्ये अशा प्रवृत्ती नसतील किंवा फारच कमी प्रमाणात असतील, फार फार तर हे लोक निषेध करतील आणि गप्प बसतील; तेव्हा करा टीका आणि नाव कमवा असा सरळ हिशेब असावा. तो गेली बरीच वर्षं खराही असावा. ही बहुधा एक कॅलक्युलेटेड रिस्क असावी जी जिवावर बेतली असावी.

कलबुर्गी यांच्या हत्त्येचा निषेध.केवळ विचारसरणी विरोधातून खून होणे हे समाजाच्या अवनितीचं लक्षण नाही का? कोणीही आपल्या धारणा ठेवु शकत नाही का?

मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ? ~ इति दा. द. चा प्रतिसाद
मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ? ~ इति तुडतुडी यांचे प्रतिसाद
एकमेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे हे किमान नैतीक दृष्ट्या निंदनीय आहेच आहे. एकमेकांकडे, इकडे तिकडे बोटे दाखवून कुणाच्याही कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीचे कोणत्याही बाजूच्या निगेटीव्ह अ‍ॅटीट्यूडचे समर्थन होत नाही. दुसर्‍याने ताळतंत्र सोडले म्हणुन राग येऊ शकतो हे खरे तरीपण एकाने ताळतंत्र सोडले म्हणून मी ताळतंत्र सोडतो हे फलदायी उत्तर नव्हे. रामकृष्ण परमहंसांनी मुर्तीपुजेच्या विरोधक विवेकानंदांवर गोळी घातली असती तर मुर्तीपुजेचे हिंदू धर्माचे समर्थक विवेकानंदांचा हिंदू धर्मीयांना लाभ झाला असता का ? विचारांचा लढा विचारांनीच लढला जाऊ शकतो लघुशंका करून अथवा लघुशंका करणार्‍यास गोळी घालून नव्हे. मुर्तीपुजा करणार्‍या अथवा मुर्तीवर लघुशंका करणे आणि मुलतत्ववाद्यांनी मुर्तीभंजन करणे यात खरेच फरक नाही, तसेच आपल्या अबकड प्रतिमांचा अपमान झाला म्हणून हिंसक कृत्ये करणार्‍या मुलतत्ववाद्यात मग ते या समुहाचे असोत का त्या समुहाचे असोत त्यात फरक नाही. त्याने केले म्हणून माझे बरोबर हे सुयोग्य उत्तर नव्हे. हिंदूधर्मातील वैचारीक परंपरांचे वैविध्य विचारांचा विचारांनी सामना करणार्‍यामुंळे तग धरून असावे आदि शंकराचार्य विवेकानंद हि त्याची उदाहरणे आहेत, इतरांच्या संकुचीतततेमुळे अपरिपक्वपणामुळे मी मला संकुचीत करून घेणे मी मला स्वतःला अपरिपक्व ठेवणे यामुळे शत्रुपक्षाचे काय होईल माहित नाही तुमच्या स्वतःच्या वैविध्यास तडे जाणार नाहीत, तुमच्या स्वतःच्या वैचारीक स्वातंत्र्याला, तुमच्या स्वतंच्या आदर्शाला तडे जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणेही तेवढेच महत्वाचे असावे. दुसर्‍याने कोळसा हातात घेऊन उगाळला म्हणून तोच आपणही आपल्या हातात घेऊन उगाळला तर दुसर्‍याचा चेहरा काळा करायच्या नादात आपले हातही काळे होण्याचा धोका असतो. असो.

In reply to by माहितगार

टिका/स्तुती करायचा मुलभुत अधिकार घटनेने दिला आहेच परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(

In reply to by द-बाहुबली

परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(
तथाकथीत विचारवंताने विवेक सोडावा हे त्याच्या स्वतःसाठी लाजीरवाणे आहेच यात संशय नाही. पण विचारवंताच्या विचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दुसर्‍या विचारवंतातच असते. विचारांचा मुकाबला शस्त्राने होऊ शकत नाही. नि:शस्त्र विचारवंत मारलातर विचार शिल्लक राहतोच त्या शिवाय त्याचा हुतात्मा होऊन त्याच्या विचारांना शब्द प्रामाण्य मिळण्याची शक्यता नंतरच्या असंख्य पिढ्यांना भोगावी लागू शकते हा धोका अजून मोठा असतो.

In reply to by माहितगार

विचारांचा विचारांनीच प्रतिवाद केला जातोय म्हणता भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना... आपल्या मताशी सहमत आहेच पण कृतीचा विचार करता उदाहरण म्हणून शिवपिंडावर दुध, मध, उसाचा रस, पाणि वगैरे वगैरेनी अभिषेक केला तर अनुभव चांगलेच येतात ही श्रध्दा आहे. याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?

In reply to by द-बाहुबली

भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना...
इथे खरे काम चुकीची कृती होताना थांबवणे शक्य असेल तर थांबवावे. घडून गेलेल्या कोणत्याही प्रसंगाबद्दल केवळ क्लेश करून घेत राहणे एक अनुत्पादक आणि फार काही झालेच तर स्वनुकसान घडवणारी कृती ठरू शकते. होऊन गेलल्या गोष्टीवरून द्वेष आणि शत्रुबुद्धी टाळाव्यात हे सांगणे सोपे प्रत्यक्षात कठीण आहे पण तो सर्वात उत्तम मार्ग असतो. (खर म्हणजे हे सांगतोय पण प्रामाणिकपणे मलाही जमत अस नाही पण कालच महाभारतात वसिष्ठांबद्दलच अत्यंत क्लेशदायी परिस्थितीतील उदाहरण वाचत होतो त्यावरून आठवलं आणि लिहिलं)
याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?
१) इतरांशी प्रतिवाद करण्यापुर्वी पहिल युद्ध स्वत:च्या मनाशी जिंकाव लागत ते हे की जी गोष्ट माझ्यासाठी पवित्र आहे ती पवित्र आहे त्याची विटंबना केल्यासारखे कुणास वाटत असेल तरी माझ्या मनातली पावित्र्याची भावना अक्षुण्ण आहे माझ्या मनातल्या प्रतिक पावित्र्याची विटंबना होऊच शकत नाही. २) तुमच्या विटंबना प्रयत्नांनी आमच्या मनातील भावनेस ठेच पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. न ही माझे विचार बदलले आहे. काही झालेच असेल तर त्यामुळे इतर सश्रद्ध लोकांची मने दुखावली आहेत. आणि मने दुखावून विचार परिवर्तन होत नाही ह्या कडे निर्देश करणे. आणि निषेध व्यक्त करणे या सर्वसामान्य व्यक्तीसाठी साध्या सोप्या गोष्टी आहेत. ३) विचारांचा प्रतिवाद करणार्‍या दुसर्‍या बाजुच्या खर्‍या विचारवंतांना वैचारीक जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागतच असतो. दुसरे तर त्यांच्या प्रतिक्रीया संयत असण्याचिच शक्यता अधिक असते. संयत प्रतिक्रीया वस्तुतः अधीक प्रभावी असू शकतात हे भावनीक उद्रेकाच्या प्रभावा खालील लोकांना बर्‍याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे भावनांच्या उद्रेकात समतोल संयत पण प्रभावी प्रतिक्रीया मागे पडण्याचा संभव असतो. ज्यांचा भावनिक उद्रेक झाला आहे त्यांचा भावनांचा उद्रेक प्रतिपक्षास फारतर जबरदस्तीने शांत राहण्यास लावू शकतो प्रतिपक्षाचे विचार मूळातून बदलू शकत नाही. प्रतिपक्षाच्या विचारांना मुळातून आव्हान देण्याचे सामर्थ्य संयत प्रतिवादातच असते. ४) खरेतर कर्मठ लोक आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या व्यक्तीला आपल्या बाजूचे समर्थन करण्यास मन वळवू शकत नाहीत असे नाही. दोन मोठी उदाहरणे म्हणजे जीना आणि सावरकर दोघेही मूलतः कर्मठ नव्हते पण कर्मठ पक्षांची बाजू दोघांनीही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून मूळ कर्मठ लोकांपेक्षा अधिक सशक्तपणे उचलून दाखवली. (ते बरोबर होते का चूक हा येथे मुद्दा नाही) मुद्दा हा आहे की जी डिप्लोमसी एकटे विवेकानंद करू शकतात तेवढा प्रभाव तुम्ही हजार अण्वस्त्रांनीही तयार करू शकाल का नाही हे माहित नसते. तुम्ही तुमच्या पक्षा बद्दल कितीही कर्मठ असा तेवढे सर्व करावे ज्यामुळे तुमचे जेवढे विरोधक तुमच्याकडे वळवता येतील तेवढे वळवावेत व किमान पक्षी असे काहीही करू नये की ज्याने निष्पक्ष लोकांनी बाजू घेतली नाही तरी आपल्यापासून दूर जातील असेही वर्तन होऊ नये. कुठल्यातरी बालमित्राच्या वडलांनी एक एपीजे अब्दुल कलाम घडवला. अशी माणसे घडवण्या आणि जोडण्यासाठी आपला एक किमान स्तर जपावा लागतो. तो कोणत्याही परिस्थितीत जपला गेला पाहीजे. ५) भावनेच्या उद्रेकातून प्रत्येकाला जबरदस्तीने चूप करण्यातला अजून एक मोठा धोका, संयत संभाषण करणारा कदाचित तुमची बाजू घेणारा असला तरी विरोधक वाटेल आणि तुम्ही एका समर्थ समर्थकाला पाहता पाहता गमवून बसाल. ६) ब्राह्मण हत्याकरू नये याचा अर्थ जातीयवादी घेतला नाही विचारवंताची हत्या करू नये असा घेतला तर त्यात तथ्य आहे. विटंबना केलीतर हत्येच समर्थन करणार्‍यातले काही खिल्ली उडवणार्‍याच्या हत्येच समर्थन करतात त्यातीलच काही साध्या सुध्या टिकेलाही दडपण्याच समर्थन करतात. विटंबना, खिल्ली, साधी टिका, उपरोध या गोष्टी खूपशा प्रासंगिक आणि सब्जेक्टीव्ह असू शकतात. आपण गंगेच्या पाण्याने अभिषेकाचे म्हणालात तेव्हा तुमची भावना गंगेच्या पाण्याबाबत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असू शकते. लघूशंकेचेच उदाहरण घ्यायचे झालेतर गाईची लघूशंका पवित्र मानतात बर्‍याच गोष्टी आपल्या मानण्यावर असतात त्याबद्दल लोक काहीही म्हणाले आणि तुमची भावना गंगोदकाबद्दल आणि पंचगव्यांबद्दल पावित्र्याची असेल तर लोकांच्या टिका, खिल्ली, विटंबना कशानेही डगमगण्यासारखे काय आहे. उलट तुम्ही डगमगला की समोरच्याचा उद्देश साध्य झाल्यासारखे होते. सेंसॉरींग स्लीपरी स्लोप आहे. आणि म्हणून कुणी कितीही कर्णकटू बोलले तरीही सेंसॉरींगचा मोह होता होईतो टाळला पाहीजे. असे वाटते असो.

In reply to by माहितगार

असेच म्हणतो. शब्दा-शब्दाशी सहमत.

हत्येचा तीव्र निषेध. एखाद्याच्या चितेवर पोळी भाजणे म्हणजे काय हे बघायला मिळते आहे. मात्र निव्वळ विचाराला विरोध म्हणून हत्या आताच्या काळात भारतात होईल हे खरे वाटत नाही. सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांति देवो.

In reply to by पैसा

सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.
गेल्या तीनचार वर्षातील विचारवंतांच्या हत्यांचा अभ्यास केला तर वयाने साधारणतः सत्तरी किंवा अगदी ऐंशीच्या पलिकडची मंडळी आहेत. मिडीयाने किती आवाज केला तरीही चार सहा लोकांच्या पलिकडे त्यांना समर्थन प्राप्त नसावे. अगदी महात्मा गांधीसारखी आहेत की त्यांच्या शब्दावर भारत हलावा, असेही नाही. गाडगे बाबा आहेत म्हणून शेगावला जाणारे नाहीत असे नाही, वस्तुतः बहुसंख्य समाज दोन्हीकडे डोके टेकतो :) सॉफ्ट टार्गॅट्स हेरून उडवायची आणि भारतीयात आपापसातील कलह माजवायचा शत्रुदेशांचा उद्देश असेल तर तो आपण आपली डोकी गरम करुन घेतल्याने शत्रुदेशांचा उद्देश सफल व्हावा असे देव करो होऊ नये.

In reply to by माहितगार

या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.
कशावरून काढलेला निष्कर्ष ? की प्रकरण अंगावर शेकणार असे दिसले की मुद्दा भलतीकडेच वळवायचा? कलबुर्गी कुणी गुप्तहेर नव्हते की आंतराष्ट्रीय गुन्हेगारही नव्हते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पै तैंच्या वाक्याचा मतितार्थ त्याच नेमक्या सांगू शकतील. या ८० वर्षाच्या म्हातार्‍यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही. (आपल्याकडे काय कुठेही) राजकारण कोणत्याही स्तरास जाऊ शकते त्यामुळे शंकांना नेहमी वाव असतोच, जो पर्यंत पुरावे नाही तो पर्यंत एकमेकांच्या वैचारीक विरोधकांकडे खवचट अंगूली निर्देशांचे अधिकतम मुल्य केवळ खवचट अंगूली निर्देश एवढेच शिल्लक राहते, व्यक्तीशः मी तरी तसे करणे टाळतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, तोंड सांभाळा. मी खून केलाय असा तुमच्या प्रतिक्रियेचा अर्थ होतोय. तुम्हाला खुन्याची नीट ओळख आहे वाटते. कृपया पोलिसांशी सहकार्य करा.

In reply to by पैसा

बाई ग पैसे, 'विशिष्ट विचारसरंणीच्या लोकांबद्दल तसे म्हंटले आहे'. वेड पांघरायचा स्वभाव कमी करावास.
या ८० वर्षाच्या म्हातार्‍यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही.
बरोब्बर बोललास रे माहितगारा.एम.एफ.हुसेन ह्यांना धमक्या देणारे बजरंगी दलवाले सुज्ञ नव्हतेच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ज्याना सांगायचय त्यांना थेट सांगा. डॉ नरेंद्र दाभोलकर, सुनंदा पुष्कर, सरबजीत सिंग, कॅ सौरभ कालिया अशा अनेकांच्या खुन्याना फाशीवर लटकलेले बघायची तीव्र इच्छा आहे. ते कधीच होणार नाही कारण त्या हत्यांचा तपास पुरा होणार नाही. तुमच्यासारखे चष्मे घातलेले सगळेच लोक, मग तो चष्मा कोणत्याही रंगाचा असो, एकसारखेच. तुम्हाला कोणालाच हत्यारे समोर यायला नको आहेत. मग तुमची दुकाने बंद होतील ना सगळी!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नसावेत असं म्हणालात तर बरोबर आहे. डायरेक्ट 'नव्हते?' काल अजितभाऊ डोवल अाले होते वाटतं ' ह्यांना ' भेटायला ?

|| क्षात्रधर्म || जयास जीवाचे वाटे भये | तेणे क्षात्रधर्म करूं नये | कांहितरी करोनि उपाये | पोट भरावे || मारितां मारितां मरावें | तेणे गतीस पावावें | फिरोनि येता भोगावें | महद्भाग्य || जैसा भांड्याचा गलोला | निर्भय भारामध्ये पडिला | तैसा क्षत्री रिचवीला | परसैन्यामध्ये || नि:शंकपणें भारफुटती | परवीरांचे तकवे तुटती | जैसा बळिया घालून घेती | भैरी उठता || ऐसे अवघेच उठतां | परदळाची कोणी चिंता | हरणे लोळवी चित्ता | देखत जैसा || मर्दे तकवा सोंडूं नये | म्हणजे प्राप्त होतो जये | कार्य प्रसंग समये | वोळखावा || देवद्रोही तितुके कुत्ते | मारूनी घालावे परते | देवदास पावती फत्ते | यदर्थी संशयो नाही || देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवावा का बुडवावा | धर्मसंस्थापनेसाठी || - समर्थ रामदास

In reply to by प्रसाद गोडबोले

समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी कुणी याचा अर्थ सांगून, समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?

In reply to by माहितगार

बरे झाले आपण पुर्ण संदर्भ दिलात , त्या साईट वरुन काही उधृतच करता येत नाही राव ... असो , आता तुम्ही च सांगा की अर्धवट उधृत केल्याने काव्यातील अर्थ बदलत आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी कुणी याचा अर्थ सांगून, समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?

In reply to by माहितगार

कुठल्याही खुनाचे समर्थन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचे, त्यांच्या विचारधारेमुळे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. हत्येकर्‍यास पकडून फासावर चढवले पाहीजे. (अगदी तथाकथीत लिबरलांना फाशी ही मानवतेमुळे मान्य नसली तरी) समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ? मी काही समर्थक अभ्यासक नाही. पण समर्थांनी ज्या काळात आणि ज्या परीस्थितीला अनुसरून लिहीले आहे त्याचा विचार करता ते त्या काळासाठी योग्यच होते. त्या वेळेस देखील प्रत्येकाने त्याचा शब्दार्थ घेतला असावा असे वाटत नाही. नाहीतर शिवाजीला तीन तपे लढावे लागले नसते, असे मला वाटते. असो. नाहीतर समर्थांनी, "स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपूला, रणी वा मरावे..." असे देखील म्हणले आहे. मग आपल्यातले कितीजण मिपावरचे टंकणे सोडून सीमेवर सैनिकांना (साधी) मदत करायला जाणार आहेत? तेंव्हा याचा संदर्भच घेयचा असेल तर आत्ताच्या काळाला अनुसरून बुद्धीवादाने घ्यावा. समोरच्याचे पटत नसेल तर त्याला बुद्धीवादाने सामोरे जावे. नाहीतर आत्ताचा कायदा न मानता (परदेशातील गतकाळातील) माओचा कायदा प्रमाण मानत हिंसाचार करणार्‍या कम्युनिस्टांमधे, त्यांना पाठींबा देणार्‍या डाव्या (अ)विचारवंतांमधे आणि इतरांमधे काय फरक राहीला?

In reply to by विकास

सहमत विकास, समर्थ आणि तुकाराम यांनी एकमेकांना देवद्रोही जाहीर करून फतवे काढले असते तर काय झाले असते ? किंवा सावरकरांची विज्ञाननिष्ठा आणि त्यांनी अस्पृश्यांचा करवलेला मंदिर प्रवेश (त्या काळातल्या सनातन्यांच्या दृष्टीकोणातून विटंबना होती- अर्थात त्या विवाद्य कन्नड व्यक्तींच्या विटंबनेशी तुलना करण्याचा हेतु नाही- विटंबना हा शब्द सब्जेक्टीव्ह ठरू शकतो हे लक्षात आणून द्यावयाचे आहे) न स्विकारता विटंबना म्हणून त्यांना देवद्रोही जाहीर केले असते तर काय झाले असते ? शत्रुची नव्हे तर स्वतःचेच विचारवंत शत्रु ठरून एकमेकांच्या जीवावर उठले नसते का ?

In reply to by विकास

विकास यांचा प्रतिसाद आवडला. सहमत आहे. एका जिवंत व्यक्तीला तिचा विचार तुम्हाला आवडत नाही म्हणून मारण्याचे समर्थन कोणत्याही प्रकारे करणे हीच एक विकृती वाटते. कलबुर्गी कोणी अतिरेकी दहशतवादी नव्हते.विचारांशी लढाई विचारानी व्हावी.कोणाची हत्या करुन विचार मरणार आहे का?

काळ कोणता संदर्भ कोणता.एखाद्याच्या विचारसरणीमुळे झालेल्या हत्येचं समर्थन कसे होऊ शकते? ही विचारांची दडपशाही नाही का?

In reply to by माहितगार

देव कशाला कशाचा भुकेला असतोय साहेब? तो नित्यतृप्त असतो. आपणच आपलं ध्येय साध्य करून घेण्यासाठी त्याला भावाचा भुकेला ठरवून टाकतो. यात मुख्य मुद्दे नेहमीच स्किप केले जातात. आपल्या सोयीच्या गोष्टी करून केल्याचं समाधान हे कर्मफल तिथल्या तिथं मिळाल्यावर नंतर पुन्हा देवाला वाहन्यासाठी आपल्याकडं काही शिल्लक नसतं. मग देव म्हणतो बाबा रे तुला जसं हवं तसं तू केलंस मला हवं ते नाही. माझा तुझा संबंध काय? कुठला भक्त प्रिय आहे हे माहीत करून घेण्यासाठी भगवद् गीता हे अत्यंत उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे. यादी आहे. विशेषत: १२ वा अध्याय मुळापासून वाचावा.

In reply to by अजया

ही विचारांची दडपशाही नाही का?
हा हा हा ... हे पहा असे आहे की "त्यांन्नी" जगाची विभागणी दोनच गटात केलेली आहे .... बुतशिकन आणि बुतपरस्त ! मुर्तीपुजक आणि मुर्तीभंजक ! आता तुम्हीच सांगा : हे कुलबर्गी का कोण ते कोणत्या गृप मधले होते ? ह्या दोन गटातील खरे दडपशहा कोण ? खरे स्वमतांध कोण ? मग पुढील काथ्या कुटु . _____

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि हो , महत्वाचा डिस्क्लेमर राहिलाच - आमच्या धर्मातही मुर्तीपुजा मानत नाहीत , रादर , देव बिव असली काही सुपर नॅचरल पावर शक्ती बिक्तीही मानत नाही ... मी फक्त तर्काच्या मुद्द्यावर विचारत आहे की: एखाद्याला सतत हिडीस फिडीस करत रहायची , सतत तु कसा वाईट , तु कसा हीन , तु कसा फडतुस असे दाखवत रहायचं , सतत त्याची टिंगल करत रहायची , अन एके दिवशी त्यानी उद्वेगाने एखादा सणसणीत दगड भिरकावला तर त्याचाच निषेध करायचा ह्या मागचे अजब लॉजिक काय ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे ... ही घटना म्हणजे सतत हिणावले गेलेल्या कोण्यातरी 'फ्यॅन्ड्री' ने " त्या सिस्टीमवर " भिरकावलेला एक दगड आहे असा विचार का बरे करुन पहात नाही कोणी ???????

In reply to by प्रसाद गोडबोले

मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले. बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अ‍ॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)

In reply to by बॅटमॅन

मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले.
ओ ब्यॅटु अण्णा तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नसेल तर नका राहु पण इतरांच्या हातातुन मुद्दे तरी हिरावुन घेवु नका =))
बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अ‍ॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)
अ‍ॅक्झिअम्स असं काही नसतं , अ‍ॅक्झिअम्स हा भास आहे !

In reply to by बॅटमॅन

खटला उभा राहच्या आधीच तपासातल्या विसंगती दाखवायची फार जुनी आणी वाईट खोड आहे. त्यामुळे खटल्याचा इस्कोट होऊन (मुद्याच भुस्काट झाल्याने) तो कुणीच चाल्वायला घेत नाही! पब्लीकचा हिरमोड होतो तो वेगळा आणि चिनार्याचे पॉप्कॉर्न खपेनात आताशा !!! व्हरांड्यातला बघ्या नाखुस.

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>> एखाद्याला सतत हिडीस फिडीस करत रहायची , सतत तु कसा वाईट , तु कसा हीन , तु कसा फडतुस असे दाखवत रहायचं , सतत त्याची टिंगल करत रहायची , अन एके दिवशी त्यानी उद्वेगाने एखादा सणसणीत दगड भिरकावला तर त्याचाच निषेध करायचा ह्या मागचे अजब लॉजिक काय ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे ... पेन त्याचं, कागद त्याचा, विचार त्याचे असं सगळं 'त्या' चं असल्यावर त्याला जे काही म्हणायचं ते म्हणू दे की. आपण वाईट, हीन, फडतूस नाही तर आपल्याला शष्प फरक पडू नये. स्वतःचा काही विचार नसला की दुसर्‍याची टिंगल केली जाते. बाकी सणसणीत दगड वगैरे शक्यता फार फार कमी वाटतात. जरी तसं होण्याची अथवा करण्याची इच्छा आपल्याला असली तरी कट्टरपणं नि आंधळेपणानं एखाद्या व्यक्तीला मारण्याचा आततायीपणा केला जाणं अवघड आहे. पैसानं म्हटल्याप्रमाणं खुनामागचे हेतू उघड होणं अवघड वाटत आहे. विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे. त्यामध्ये मूर्तीपूजा असली नसली तरी फरक पडत नाही. हिंदुत्ववादी लोकांनी हा खून केला असण्याची शक्यता कमी वाटते आहे. केला असल्यास हिन्दू धर्माला बट्टा नाही लागत अथवा नसल्यास सुद्धा छाती फुलण्याची गरज नाही.

In reply to by प्यारे१

बाकी संपुर्ण प्रतिसादाला संपुर्ण अनुमोदन फक्त एक शंका :
विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे.
मुर्तीभंजक आयसिसला( आणि तसेच विचार बाळगणार्‍या ह्या कुलबुर्गींन्ना ) आणि त्यांच्यातील मतभेदांना आपण कसे समजावुन घेणार आहोत ह्याची मला फारच क्युरोसिटी लागुन राहिलिये भाऊ !

In reply to by बॅटमॅन

आयसिस हे हिमनगाचे टोक आहे
आयसिस डेंजरस आहे की दुसर्‍याचे उपासना स्वातंत्र्यच नाकारण्याची आणि स्वतःचेच घोडे दामटण्याची (पक्षी: स्वमतांध दांभिकता) मनोवृत्ती जास्त डेंजरस आहे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

मतभेद माणसांमाणसांमध्ये होतात रे! एका बाजूला माणूस आणि दुसर्‍या बाजूला पशू / हैवान यांच्यामध्ये कसले मतभेद? येनकेनप्रकारेण ठोकणे हेच उत्तर. ते समजावण्याच्या पलिकडे असतात. आततायी असतात. साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे. फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. आपण केजरी/पटेल/दाऊद वगैरे नाही. बनू नये असं वैयक्तिकरित्या वाटतं. अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.

In reply to by प्यारे१

अगदी अनुमोदन प्यारे ... तुका म्हणे विंचु सर्प नारायण, वंदावे दुरोन शिवो नये - संत तुकाराम. !! पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की विंचु सतत डंख मारत असेल तर त्याला वारंवार जीवनदान द्यायला आपण काही नाथ नाही , आपल्याला विंचु डंख मारत असेल तर त्याला वहाणेचा प्रसाद दिलाच पाहिजे !! मी फक्त विंचवाला मारले तर दंगा करणार्‍या पीटा ( प्रीव्हेन्शन ऑफ इथिकल टीटमेन्ट ऑफ अ‍ॅनिम्ल्स) वाल्या लोकांच्या थयथयाटा मागील विचार जाणुन घेवु इच्छित आहे !
साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे.
ह्म्म .... भेद म्हणजे काय ?
फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे.
ह्म्म , मी इतरत्र म्हणल्या प्रमाणे एक सर्व सामान्य पापभीरु अर्थात क्युतिया माणुस ह्या पेक्षा दुसरे काय करु शकतो ?!
अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.
अन्य देशाचा पी . आर . मिळवण्याचे आमचे जोरदार प्रयत्न चालु आहेत हे ह्या निमित्ताने नम्य्द करु इच्छितो =))

In reply to by प्यारे१

नाझी प्रचारयंत्रणा प्रमुख जोसेफ गोबेल्सची Big Lie या नावाने प्रसिद्ध असलेली एक थिअरी आहे. कुठलीही १००% खोटी गोष्ट सतत लोकांच्या कानांवर पडेल अशी व्यवस्था केली, सतत ती हॅमर केली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो.आपण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहोत हे जे लोक छाती पिटून सांगतात, मग ते दिल्लीत असो,महाराष्ट्रात असो किंवा मिपासारख्या संस्थळावर असो - लोकांचा त्यावर विश्वास बसतो. त्याचा अर्थ ते ख-या अर्थाने पुरोगामी असतात असं मुळीच नाही पण ते ज्या कृती करतात त्यांना लोक पुरोगामीपणा समजतात.उदाहरणार्थ अल्पसंख्यांकांचा अनुनय. याचा व्यत्यासही खरा आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की ते सगळीकडे पसरतं.हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचं तेच झालेलं आहे.

In reply to by प्यारे१

नाझी प्रचारयंत्रणा प्रमुख जोसेफ गोबेल्सची Big Lie या नावाने प्रसिद्ध असलेली एक थिअरी आहे. कुठलीही १००% खोटी गोष्ट सतत लोकांच्या कानांवर पडेल अशी व्यवस्था केली, सतत ती हॅमर केली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो.आपण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहोत हे जे लोक छाती पिटून सांगतात, मग ते दिल्लीत असो,महाराष्ट्रात असो किंवा मिपासारख्या संस्थळावर असो - लोकांचा त्यावर विश्वास बसतो. त्याचा अर्थ ते ख-या अर्थाने पुरोगामी असतात असं मुळीच नाही पण ते ज्या कृती करतात त्यांना लोक पुरोगामीपणा समजतात.उदाहरणार्थ अल्पसंख्यांकांचा अनुनय. याचा व्यत्यासही खरा आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की ते सगळीकडे पसरतं.हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचं तेच झालेलं आहे.

१०० +

In reply to by सुबोध खरे

+१०१

एक लिखित ओळीच्या, दोन वाक्यं आणि एका लिंकच्या पिल्लू आकाराच्या पालीच्या शतकी डायनोसॉरी रुपांतराबद्दल संजयकाका पाटलांचा एक चायनिज प्लास्टीकचा डायनोसॉर, श्रीगुरुजी आणि तुडतुडी यांना एक नटराजाची मूर्ती, माईसाहेब यांना तोंडावर बांधण्याचा मास्क आणि डॉ. खरे, मदनबाण आणि समस्त जनतेला एक एक इक्लेअर्स देऊन सत्कार करण्यात येत आहे. धागा वाईट घटनेबद्दल असल्या ची पूर्ण कल्पना आणि जाणीव आहे. सत्कार फक्त धाग्याबाबत आहे. वसकरुन अंगावर येऊ नये. - मानाजेपीअध्यक्षतेखालीमिपासत्कारसमितीउपसचिव

चार्ली हाब्डो.प्रकरणावर तोंडसुख घेणारे मिसळपावीय लोक आज या हत्येचे मात्र अप्रत्यक्षरीत्या समर्थन करत आहेत हे वाचोन माझा माजी हिंदु व आजी अ-हिंदु आत्मा गलबलला.

In reply to by dadadarekar

हॅ हॅ हॅ. "कल्बुर्गी,दाभोळ्कर ह्यांच्या हत्येचा मी निषेधच करतो पण..." छाप प्रतिसाद सगळीकडे वाचायला मिळत आहेत असे ह्यांचे मत.