दहशतवादी अथवा तत्सम टोळी युद्धातील पकडलेले गंभिर गुन्हेगार जेंव्हा काही जाहीरपणे बोलतात तेंव्हा त्यातून ते काही गुप्त संदेश ("कोडेड मेसेज") ते बाहेर त्यांच्या समर्थकांना आणि म्होरक्यांना पाठवत असतात. अर्थात हे तपासणी करणार्या पोलीसांना माहीत असते. ते दुधखुळे नसतात....
त्याच बरोबर जे काही कसाब बोलतोय म्हणून बाहेर येत आहे, ते स्वत: कसाब काही पत्रकार परीषद घेऊन सांगत नाही आहे. त्यामुळे त्याच्या नावाने काय सांगीतले जावे हे ठरवून पोलीस पण काही बातम्या उठवत असतील तर आश्चर्य वाटायला नको.
थोडक्यात या असल्या बातम्यांमधे सत्याचा अंश किती हे कळायला किमान नजीकच्या भविष्यात तरी काही मार्ग नाही...
+१
हेच म्हणतो.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे.
हे ऐकून ते भिकर** मनवतावादी त्याला वाचवायला आले तर त्यांना बांबू ठोकला पाहिजे.
कसाबचे वकीलपत्र घ्यायचे नाही असा ठराव मुंबईच्या वकीलांनी केला असल्याचे वाचले. असे असल्यास, कोर्ट एखाद्या सरकारी वकीलावर तशी सक्ती करू शकते का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कसाबचे वकीलपत्र घ्यायचे नाही असा ठराव मुंबईच्या वकीलांनी केला असल्याचे वाचले. असे असल्यास, कोर्ट एखाद्या सरकारी वकीलावर तशी सक्ती करू शकते का?
माझ्या माहीतीप्रमाणे सर्वप्रथम कोर्टाला (म्हणजे न्यायाधिशाला), या प्रसंगासंदर्भात कसाबला विचारावे लागेल की त्याला वकील हवा आहे का नको. तो जर नको म्हणाला तर प्रश्न सुटला (न्यायाधिशाला कोणवकील सक्ती करावी लागणार नाही). पण तो जर वकील हवा असे म्हणाला, तर त्याला सरकारी वकील मिळेल. त्यातही मग त्याने स्वतःला दोषी असे जाहीर केले पण त्यातील कारणांसाठी खटला चालू केला तर एक संभवते आणि उद्या तो म्हणू लागला की "तो मी नव्हेच" तर अजुन तमाशा चालू राहील...
मला वाटते, कोर्ट अशी सक्ती अपवादात्मक परिस्थितीत करू शकत असेल. समान संधी हे न्यायदानाचे एक प्राथमिक सूत्र आहे. आणि जगाला दाखवायला का होईना असा वकिल देणं आवश्यक ठरेल.
मला खरी काळजी हीच आहे की आता तपास, खटला वगैरे किती लांबणार. आणि त्या नराधमाला काय शिक्षा होणार. काहीच भरवसा नाही. :(
बिपिन कार्यकर्ते
आपली कल्पनाही स्तुत्यच आहे. अशा जिवंत अतिरेक्यांना मृत निष्पाप लोकांचे कुटुंबिय, त्याच्यावर आधारित असलेले लहान मुले, म्हातारे आईबाप इत्यादी दाखवावेत. शक्य असल्यास अशा लोकांबरोबर राहण्याची सक्ती करावी.
"दुष्मन" ( राजेश खन्ना) चित्रपटाची कथाही अशाच प्रकारची आहे.
अतिरेक्याच्या मृत्यूची जैय्यत तयारी करावी .. टेलेकास्टची सोय करावी ... त्याला गांधीवादा चे डोस पाजावेत. आणि सत्कार करून सोडून द्यावे. ह्यामुळे त्याच्यातला आतंकवादी मरेल त्याचे हृदयपरिवर्तन तर होईलच, पण बाकी तिकडचे अतिरेकी अश्रू ढाळून शस्त्र टाकून देतील .आणि अशा प्रकारे गांधीवादाचा विजय होईल.
सुचना: हे दृष्य पाहून ,आतंकवाद ट्राय करायला अजुन काही लोक्स पुढे आले तर तो केवळ अपवाद समजावा.
- टारात्मा गांधी
(आम्हाला हलकेच घ्या, नाही तर जड जाईल)
टारानंद महाराज फुल फॉर्मात आहेत :)
- टारात्मा गांधी
(आम्हाला हलकेच घ्या, नाही तर जड जाईल) =)) =)) :)) :))
हे लै आवडलं ....
टैत्र ... ( ह्यां काय जमला नाय बॉ) 8}
आपल्या कल्पनांचा मी आदर करतो. परंतु आपल्या हातातून नेमके काय घडले आहे हे जेंव्हा माणसाला दिसते तेंव्हा त्याचे सर्व मुखवटे गळुन पडतात.
अतिरेकाकडे वळणारे लोक भावनेच्या भरात एखादी कृती करतात. त्यामुळे मृत्यु ही त्यांना खरी शिक्षा नाही. पश्चाताप, पतितभावना हीच खरी शिक्षा आहे.
अर्थात आपला कायदा आणि न्यायालये ही सक्षम आहेतच.
दुष्मन चित्रपट खरोखरच पहावा.
अशा लोकांना फाशी ही शिक्षा सौम्य वाटते.याला व्हॅक्क्यूम केलेली एक पिशवी घेवून त्यात गळ्यापर्यंत बंद करावा , छत्रपती शिवाजी टर्मिनस वर ऐन मोक्याच्या ठिकाणी ठेवावा , जाता येता सगळ्यांनी त्याच्या तोंडावर थुंकण्यापासून ते थोबाडीत देण्यापर्यंत काहीही करावे , आणि ज्यादिवशी तो आपोआप अन्नपाण्यावाचून तडफडून मरेल , त्यादिवशी ही पिशवी पाकिस्तान्च्या सीमा रेषेवर नेवून ठेवावी (दुर्गंधी यायला लागल्यानंतर).
किंवा अरब देशातील कायद्याप्रमाणे याची भर चौकात मान तोडावी आणि याचे लाईव्ह टेलिकास्ट पाकिस्तानला करावे !
पाकिस्तानला वठणीवर आणायचे असेल तर एक नामी उपाय आहे - सिंधू नदीचे पाणी बंद करावे , भडव्यांचा माज ताबडतोब उतरेल , पण या आपल्या हिंदू देशात आपणच अल्पसंख्यांक झालो आहोत !
एक विनंती - जमल्यास सर्वांनी यावेळी १९६९ च्या कायद्याप्रमाणे "४९-०" पध्दतीने मतदान करावे - म्हणजे मतदानाला जायचे - एक फॉर्म भरायचा आणि त्यात लिहायचे "मी कुणालाही मत देवू इछ्हित नाही !" , म्हणजे मग जर एखादा उमेदवार १०० मतांनी जिंकत असेल आणि अशी "४९-०" मते १०० पेक्षा जास्त असतील तर त्या उमेदवाराची आणि त्याबरोबरच सगळ्या इतर उमेदवारांची उमेदवारी जप्त होते.
सगळीकडे नाहि तर किमान जिकडे नालायक आणि अंगुठाछाप उमेदवार असतील तिथे तरी हे आपण नक्किच करू शकतो ! म्हणजे परिक्षेला जायचे पण पेपर कोरा देवून यायचे !
प्रतिक्रिया
पश्चाताप
कोण खरे आणि कोण खोटे...
+१ हेच
च्यायला
बांबू नको
वकीलपत्र
सरकारी वकील
हो...
एक प्रस्ताव...
एक शंका
मराठी
कसाई
मला वाटते
काही चॆनल
जेआयला
बास बास बास...
अतिरेकी
दुष्मन चित्रपट.
प्रतिसाद काहीसा असा वाचला
फुल्टू फॉर्मात
अतिरेकी हे भ्याड असतात.
सगळ्यात सोपा उपाय
शिक्षा