मार्क्सवाद व गांधीवाद हे दोन्ही काळाच्या चक्रात अडकून मागे पडलेले दिसतात.
सहमत.
मुख्यत: एक विशिष्ट सामाजिक व राजकिय परिस्थिती अश्या एखाद्या "वादाला" किंवा विचाराला जन्म देताना दिसते.
परंतु त्या वादाचे अनुयायी पिढ्या न पिढ्या तोच विचार नवीन परिस्थितीत पुढे दामटताना दिसतात.
खरे आहे.
वरिल दोन्हि "वाद" पाहिल्यावर हे "वाद" किंवा "ism" हे कालातीत असु शकतात काय?
मला तरी तसे वाटत नाही.
का त्या विचारांमधे कालानुरुप सुधारणा अपेक्षित आहे?
होय.
जे काळानुरुप बदलत नाही ते कालौघात नष्ट होते.
हिंदू संस्क्रुती ही कालानुरुप बदलत गेली. एखाद्या नदी सारखी वाहती राहीली त्यामुळेच हजारो वर्ष टिकून राहीली.
यापुढेही इतर धर्मांप्रमाणे डबक्याचे स्वरूप धारण न करता अशीच कालानुरुप बदलत गेली तरच इथून पुढेही हजारो वर्ष टिकेल.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
या विषयावर अजून खोलात आणि मुळातच जाऊन विचार करावयाला हवा.
अनेकवेळेस आपली माहिती या मूळ विचाराच्या आपण इकडून अथवा तिकडुन कानावर आलेल्या वाक्यावर आधारीत असते.
दुसरा भाग म्हणजे कोणताही विचार हा कालातीतच असतो. उदा. मार्क्सवाद यात शासनाची मालकी आणि सर्वांची बांधिलकी अपेक्षित आहे. सध्या मुक्त अर्थव्यवस्थेत अनेक व्यापाराला / संस्थांना सरकारी मदत म्हणजे का? त्या संस्था डुबल्यातर अनेक लोकांचे नुक्सान होणार असते, ते होऊ नये म्हणजे त्यांनाही मार्क्सचा सहारा घ्यावा लागला. ( सध्याचे अमेरिकेलेतील अनेक पॅकेजस).
त्यामूळे कोणताही विचार कालबाह्य नाही असे मला वाटते.
माझा प्रश्न असा आहे कि,
मार्क्सवाद वा गांधीवाद हा जसाच्या तसा आजच्या परिस्थितीत लागु पडेल काय?
अभिज्ञ.
अवांतरः
नेहरुंना अभिप्रेत असलेला "समाजवाद" हा नक्की काय होता?
"समाजवाद" हा "साम्यवादाचाच एक प्रकार आहे काय?
वा वा!
तापल्या तव्यावर आजुन एक पोळी.... छान.
गांधीवादी,त्यांचे अनुमोदक व बहिणीला अर्वाच्य बोलणार्या गुंडाला धोपटावे तसे याना धोपटणारे, काय प्रतिक्रीया देतात या प्रतिक्षेत.....
आंबोळी
हो आपल्या सर्वान्शी मी सहमत आहे पण मला येथे अजुन एक मुद्दा मान्डावासा वाटतो.भारतात अजुन एक वाद आहे .जो गेले १०००० वर्श अस्तित्वात आहे .त्या वादाचे नाव इश्वरवाद्.आपण सर्व भारतिय इश्वराच्या नावाने का होइना पण आततायीपणा करत नाही .आप्ले वागणे निस्र्गावर आधारीत आहे त्यामुळेच आपण तग धरुन आहोत .
मित्रानो यावर मला खुप काथ्याकुट अपेक्शित आहे .
जेव्हा मन्दी आली तेव्हा मला वरचाच प्रश्न पडला होता .
त्यासम्बन्धी माहीती मी मिळवत आहे.पुरेशी माहिती मिळली की या तिन्हि वादावर आणि नवीन गान्धीवादावर (माझ्या द्रुश्तीने तो नवीनच आहे .त्या पिक्चरामुळे समजला नाहितर धुळ खात पडला होता)सविस्तर लिहिन
>>सद्य परिस्थितीत ह्या मार्क्सवादाचा चीन सोडला तर इतरत्र कुठे हि प्रभाव आढळत नाहि ..
नाही बरका .. अजून एक देश ह्या मार्क्सवादाच्या प्रभावात आहे .. तो म्हणजे भारत. ;)
- अभिजीत
प्रतिक्रिया
मार्क्सवा
उहापोह
अजून मूलात जाऊन विचार करावयाला हवा.
माझा
वा
हो
>>सद्य