पावसाळा आणि पोट बिघडणे
पावसाळा आणि पोट बिघडणे
अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे या लेखातील काही शंका आणि त्याबद्दलचे चर्वित चर्वण याबद्दल हा लेख.
पोट पावसाळ्यातच जास्त का बिघडते. याचे कारण आपल्या पिण्याच्या पाण्यात आहे.
पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचे तीन मापदंड आहेत.
१)भौतिक (PHYSICAL).-- यात पाण्याचे दृश्य स्वरूप म्हणजे पाणी स्वच्छ आणी पारदर्शक आहे कि त्यात काही दृश्य पदार्थांचे मिश्रण आहे ( गढूळ पणा) म्हणजे आपण माती मिश्रित पाणी उकळले तर ते पोटास चालेल पण दिसण्यात चालणार नाही.
२)रासायनिक ( CHEMICAL). -- यात पाण्यात वेगवेगळी रसायने मिश्रित असतील परंतु बाहेरून पाणी स्वच्छच दिसेल. जसे मचूळ पाणी असते ज्यात वेगवेगळे क्षार मिसळलेले असतात पण पाणी स्वच्छ दिसते. पाण्यात किटकनाशके मिश्रित असतील तरीही पाणी दिसायला स्वच्छच दिसेल.
३) जैविक ( MICROBIOLOGICAL) -- स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यात जर बाह्य घाण (शेण, विष्ठा इ) मिसळली असेल तर त्यात जीवाणू असू शकतात.आणि या जंतूंमुळे आपल्याला रोग होतो. याचे सूक्ष्म पृथक्करण केलें असता जर यात कोलीफॉर्म जीवाणू सापडले तर त्यात जैविक प्रदूषण झालेले आहे असे समजले जाते याचे कारण हे कोलीफॉर्म जीवाणू फक्त प्राण्यांच्या मोठ्या आतड्यात आढळतात.
या पाण्याचे शुद्धीकरण कसे केले जाते-- मोठ्या शहरात जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. उदा मुंबईत भांडूप संकुल किंवा पुण्यात पर्वती किंवा पुलगेट येथे हि जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. मूळ धरणातून पाणी येथे आणले जाते आणि ते २४ तास तुरटीचे द्रावण टाकून ठेवले जाते यामुळे या पाण्यातील गढूळ पणा त्यातील जीवाणू सोबत खाली बसतो.या मुले पाण्यातील ९० -९५% जीवाणू बाहेर टाकले जातात. मग खालचे १० टक्के पाणी सोडून वरचे ९० टक्के पाणी दुसर्या गाळणी( slow किंवा fast SAND FILTER)तून गाळले जाते. यात उरलेले ५-१०% जीवाणू गळले जातात आणी जवळ जवळ शुद्ध पाणी पुढे पाठवले जाते आता याच्या पुढे त्यात क्लोरीन वायू मिसळला जातो. पाण्यातील संपूर्ण जीवाणू नष्ट होईपर्यंत हा वायू मिसळतात आणी त्यानंतर पुढे पाईपात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी १ PPM (एक दशलक्षांश) एवढा उर्वरित क्लोरीन वायू राहील अशा तर्हेने मिसळला जाईल.
पावसाळ्यात काय होते?
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात माती धुतली जाऊन धरणात येते. त्यामुळे धरणातील पाणी गढूळ असते. या मातीबारोबारच शेण, मानवी विष्ठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्यात येते. आता हे पाणी भौतिक तर्हेने शुद्ध करण्यासाठी २४ च्या ऐवजी ४८ किंवा ७२ तास निवळण्यासाठी ठेवणे आवश्यक असते. परंतु लोकसंख्येच्या रेट्यामुळे आपल्या महापालिकांना हे शक्य होत नाही. एक दिवस जरी पाणी आले नाही तरी लोक, वृत्तपत्रे आणी लोकनेते काव काव सुरु करतात. मग याला उपाय म्हणून पाणी पूर्ण न निवळताच पुढे पाठवले जाते( म्हणून बाटलीत घेतले तर पाणी गढूळ दिसते) . आणी त्यातील जीवाणू मारण्यासाठी क्लोरीन जास्त मात्रेत मिसळला जातो. आणी बर्याच वेळेस त्यात होणारे प्रदूषण लक्षात घेता महापालिकेचे अभियंते २ PPM (दोन दशलक्षांश) इतका उर्वरित(RESIDUAL) क्लोरीन ठेवतात. यामुळे पावसाळ्यात आपल्या घरात जोरात नळाने पाणी सोडले तर क्लोरिनचा वास येतो. हे पाणी भौतिकदृष्ट्या स्वीकारार्ह नसले तरीही जैविक दृष्ट्या शुद्ध असते आणी यामुळे पावसाळी आजार होत नाहीत.
जोरदार पाउस पडला कि जेथे तेथे पाणी साचते. हे पाणी विहिरीत मिसळले जाते ज्यात शेण, विष्ठा इ सुद्धा मिसळली जाते. पाण्याच्या ट्य़ान्कर मध्ये हे पाणी तसेच भरले जाते आणी ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरवले जाते. बर्याच चांगल्या हॉटेलात पाणी शुद्ध करण्यासाठी AQUAGUARD सारखे उपकरण लावलेले असते त्याने हे पाणी शुद्ध होते परंतु स्वयंपाक घरात भांडी धुण्यासाठी किंवा स्वयंपाका साठी, चटणी साठी काही AQUAGUARD चे पाणी वापरले जात नाही.बर्याच हॉटेलात भरपूर ग्राहक असतील तर ग्रेव्ही असणारी भाजी किंवा सामिष पदार्थ कमी पाण्यात अगोदर शिजवून घेतात आणी शेवटच्या क्षणी पाणी टाकून उकळून तो पदार्थ ग्राहकाला दिला जातो. अशा वेळेस ते पाणी पूर्ण उकळी येईपर्यंत न थांबल्याने शुद्ध होत नाही आणी त्याच त्रास आपल्याला होऊ शकतो.
मग ज्या लोकांचे पोट संवेदनशील असते त्यांना पटकन पोट बिघडण्याचा त्रास होतो. इतर काही लोक दगड सुद्धा पचवू शकतात त्यांना काहीही होत नाही.
बरेच लोक मला हे सांगतात कि आम्ही बिसलेरी( पक्षी -- बाटलीबंद पाणी) वापरतो. उगाच चान्स घेत नाही. दुर्दैवाने बाटलीबंद पाण्याची परिस्थिती पावसाळ्यातच नव्हे तर इतर ऋतू मध्ये हि गंभीर आहे.
पहा http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Lives-at-risk-with-10000-illegal-bottled-water-units-in-Delhi/articleshow/41946231.cms
"We did a survey this year and over 2,000 people were caught running unlicensed water bottling plants in parts of North Delhi alone.
"The point to be noted is that while licensed water bottling plants sell around 10,000 of water bottles every day, the unlicensed bottling plants manage to sell 30,000-40,000 bottles every day."
म्हणजे दिल्लीत मिळणारे ८० % बाटलीबंद पाणी हे डूप्लिकेट आहे.
गुगलून पाहिल्यास आपल्याला असे असंख्य दुवे मिळतील. २५ लिटर च्या बाटल्या सुद्धा सहज डूप्लिकेट मिळतात.
जरी हि दिल्लीतील परिस्थिती असली तरी मुंबईतहि परीस्थिती फार उत्तम आहे असे म्हणता येणार नाही. ८० % नाही तरी ३०-ते ४० % बाटली बंद पाणी हे शंकास्पद आहे. जर आपण लांब पल्ल्याच्या गाडीने सी एस टी स्थानका पर्यंत गेलात तर हमालांच्या बरोबर बारकी पोरे आत शिरून "बिसलेरी" च्या बाटल्या चढा ओढीने गोळा करताना दिसतात. कारण एका बाटलीचे त्यांना २ रुपये मिळतात. याच बाटल्या अर्थात धारावीत परत भरल्या जाऊन १५ रुपयाला आपल्याला नळाचे पाणी "बिसलेरी" म्हणून विकले जाते.
मी स्वतः हॉटेलात साधे पाणी घेणे पसंत करतो. जर शंका असेल तर हॉटेलात जाऊन तेथील AQUAGUARD चालू आहे का हे पाहतो.
याला एक सोपा उपाय मी माझ्या असंख्य रुग्णांना सांगतो ज्यांची फिरतीची नोकरी आहे. CLORIWAT हि बाटली आपल्या ब्यागेत ठेवा. पूर्वी १० रुपयाला मिळणारी बाटली ५७ रुपये झाली आहे. http://www.cloriwat.com/ पण हि बाटली १०,००० लिटर पाणी शुद्ध करते.
बाटलीबंद पाणी विकत घेतले तरी ती बाटली उघडून त्यात याचा एक थेंब टाका पाच मिनिटे थांबा आणी मग ते पाणी प्या. निदान पाणी जंतुरहित मिळेल.
यात सोडियम हायपो क्लोराईट आहे जे पाण्यात क्लोरीन सारखे जंतुनाशक म्हणून काम करते. पाण्याला क्लोरिनचा किंचित वास येतो परंतु पाणी शुद्ध तरी असते.
हा विषय गहन, गंभीर आणी फार खोल आहे. ( हॉटेलात बिसलेरी घेत नाही म्हणून मी कंजूष आहे किंवा मागासलेला आहे अशा तर्हेच्या नजरांना मी कित्येक वेळा सामोरा गेलेला आहे.) पण बाटलीबंद पाण्यावर माझा विश्वासच नाही. बाटलीबंद पाणी बघितले तर स्वातंत्र्याला ७० वर्षे होत आली तरीही जनतेची शुद्ध पिण्याचे पाणी हि मुलभूत गरज पुरवण्यात वेगवेगळ्या सरकारांना अपयश आले हीच भावना माझ्या डोक्यात येते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्थिती
छान माहिती डॉक्टरसाहेब,
डॉक्टर् साहेब, एवढया
MEDICLOR M मध्येही सोडियम
फार उपयुक्त माहिती!
उत्तम माहिती ! :)
अगदी उपयुक्त माहिती वेळेवर.
ते चिन्ह ग्रीक धन्वन्तरी
चिन्हाची माहिती असलेला
डॉक्टर साहेब, माहिती बद्दल
का प साहेब
उपयुक्त माहितीबद्दल अनेक
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
अत्यंत उपयुक्त अन नेमकी
उपयुक्त माहिती
उपयुक्त महिती दिल्याबद्दल
पाण्यबद्दल स्पष्ट भाष्य केलंत
धन्यवाद डॉक्टर
उत्तम माहिती!!
सुरेख माहिती
अतिशय उपयोगी माहिती. आणि
डॉ युके व जर्मनीत नळाचे
तुमच्या नळाला पाणी आल्प्स
थोडक्यात आणि उपयुक्त माहिती.
टाटा स्वच्छ, अॅक्वागार्ड
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
फारच उपयुक्त माहिती
माथेरान स्टेशनला (२) आपण
दुरुस्ती - माथेरानला
अत्यंत उपयुक्त माहीतीबद्दल
योग्य वेळी योग्य माहिती
धन्यवाद
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
अतिशय उपयुक्त
दोन वर्षांपूर्वीचा धागा परत
फारच उपयुक्त माहीती ! खरं तर
अप्रतिम लेख. डॉक्टरसाहेब,
वाह, अतिशय उपयुक्त व योग्य