✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अतिरेक्यांचे दफन भारतात करण्यास विरोध

अ
अमोल केळकर यांनी
Tue, 12/02/2008 - 11:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3190 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

त
तांबडा पांढरा Tue, 12/02/2008 - 12:19 नवीन

एक चांगला

एक चांगला निर्णय आहे
  • Log in or register to post comments
ऊ
ऊचापत्या Tue, 12/02/2008 - 12:26 नवीन

व्वा व्वा

इब्राहीम तायी झिन्दाबाद.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/02/2008 - 12:38 नवीन

हा शुद्ध

हा शुद्ध मूर्खपणा आहे. मृतदेह कोणताही असो त्याला मूठमाती मिळालीच पाहिजे. मरणान्तान्ती वैराणं हे आपण भारतीयच म्हणतो. ती प्रेते दफन केली नाहीत तर मग त्यांचे करायचेकाय? असेच एक पोरकट वाक्य मुंडे म्हणाले होते. "आय एस आय च्या प्रमुखाना मुम्बैत पाउल ठेवु देणार नाही" एक राजनैतीक अधिकारी म्हणून भारताने त्याना बोलावले आहे. मुंडेना आंतर्रष्ट्रीय प्रोटोकॉल कळत नाहीत असेच म्हणावे लागेल. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 12/02/2008 - 13:31 नवीन

सहमत

आपला विरोध हा मृत शरीराशी कधीच नको. त्यांचे दफन व्हायलाच हवे. मुस्लीम संघटना असे सरळपणे म्हणू शकणार नाहीत. नाहीतर त्यांच्यावर आणिकच गंडांतर यायचे. अन् हे जे काही ते बोललेत तो सारा स्टंट आहे असे मला वाटते. खरे सांगायचे तर ते काहीही बोललेत तरी त्यांची गोची आहे. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 12/02/2008 - 12:57 नवीन

उत्स्फुर्त प्रतिक्रिया

असे होनार नाही कारण ही एक उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे त्यामुळे माझा विश्वास नाही इब्राहीम तायी याना त्याच्य जातभाई कडुन त्रास होईल मग ते म्हनतील मी असे म्हटले नव्हते आणी मग हेच त्याच्या मयताला हजर होतिल फुलांची चादर घेउन मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 12/02/2008 - 13:15 नवीन

नक्राश्रू

नक्राश्रू नक्राश्रू नक्राश्रू नक्राश्रू आणि फक्त नक्राश्रु विजुभाऊंशी १००% सहमत्.. पण पण पण त्यांचेच नंतर दर्गे बनतात... अफजलखानाचा दर्गा ज्वलंत उदाहरण
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/02/2008 - 14:36 नवीन

उपाय

अतिरेक्यांचे नागरीकत्व तपासावे. पुरेशी खात्री झाली की, त्या त्या सरकारला मृतदेह घेऊन जाण्याविषयी विनंती करावी. जर अमान्य झालीच तर, अन्य बेवारशी मृतदेहांचे जे करतात (बहुधा मेडिकलच्या विद्यांर्थ्यांना शवविच्छेदनासाठी देतात), ते करावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 12/02/2008 - 15:15 नवीन

अहो सुनिल

अहो सुनिल साहेब, हे अतिरेकी पाकिस्तानी आहेत हे नक्की. अशा परिस्थितीत पाकिस्तान ते मृतदेह नक्किच घेणार नाही. त्यामुळे मेडिकलच्या विद्यांर्थ्यांना शवविच्छेदनासाठी उपयोग करता येऊ शकेल हे मान्य . त्यातील सडक्या मेंदू वर अधिक संशोधन करता आले तर बरं होईल. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सागरलहरी Tue, 12/02/2008 - 22:51 नवीन

असला दिखाउ पणा उपयोगी नाही

मुस्लीम संघटनांनी यापेक्षा त्यांच्या वस्त्यात लपणारे बांग्लादेशी पकडून द्यावेत. व कुराणातला हिंसक भाग वगळावा .. जमेल हे?
  • Log in or register to post comments
ए
एक Wed, 12/03/2008 - 00:44 नवीन

हे अपेक्षीतच होतं.. दफन केलं असतं तर त्यांच्या

मुस्लीम असण्यावर शिक्कामोर्तबच झालं असतं (सध्या अतिरेक्यांच नाव आणि त्यांच शरीर याव्यतिरीक्त काय पुरावा आहे?) आणि याचा फार मोठा तोटा पुढच्या राजकारणात सोसावा लागला असता. त्यामुळे ही लोकं म्हणणारच की हे सच्चे मुसलमान नव्हते आणि म्हणून त्यांना इथे पुरू नका. यात कौतूक कसलं? नुसतेच फतवे काढ्णार्‍यांकडून कसली अपेक्षा ठेवायची? ते मनापासून असं म्हणत असतील तर नक्कीच कौतुकास्पद आहेत पण सद्य स्थितीत असा विश्वास त्यांच्यावर ठेवता येत नाही. त्यांना त्यांच्या देशभक्त असण्याचा सुद्धा पुरावा द्यावा लागेल. असा पुरावा कलामांसारखे शास्त्रज्ञ त्यांच्या कृतीतून देत असतात. असा प्रस्ताव त्यांच्या सारख्यांकडून आला असता तर अभिमानास्पद ठरला असता.
  • Log in or register to post comments
_
_समीर_ Wed, 12/03/2008 - 01:56 नवीन

द्वेषपूर्ण विचार

बजरंग्यांनी जेव्हा गर्भवती स्त्रियांचे पोट चिरले तेव्हा एक हिंदू म्हणून तुम्ही देशभक्तिचा कुठला पुरावा दिलात ते कळवा तोच पुरावा आता मुसलमानांकडे मागू. समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ए
एक Wed, 12/03/2008 - 02:39 नवीन

तूलना चुकीची करत आहात.

बजरंग्याने जे केलं ते माणूसकीला, हिंदूत्त्वाला काळीमा फासणारं आहे. त्याला आणि मला तुम्ही "हिंदू" असं संबोधलं तर तो माझा अपमान आहे. असं होवू नये पण दुर्दैवाने अश्या बजरंग्याची संख्या वाढली तर मला माझ्या हिंदूत्वाचे नक्कीच पुरावे द्यावे लागणार. इथे मुद्दा "देशभक्ति"चा आहे. देशविरोधी अतिरेकी हे कुठल्या समाजातून जास्त संख्येने आले आहेत? समजा, जर "क्ष" देशविरोधी अतिरेकी "समाज १" मधून आले आणि "य" अतिरेकी "समाज२" मधून आले. जर क्ष > य आणि समाज१ < समाज२ , तर कुठ्ल्या समाजाची विश्वसनीयता संशयास्पद आहे? मुद्दा नीट समजावून घ्या. उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _समीर_
प
प्रभाकर पेठकर Wed, 12/03/2008 - 01:15 नवीन

अवयव दान..

तशीच समस्या असेल तर त्या अतिरेक्यांचे अवयव दान करावेत. एका मानवी मृतदेहाच्या महत्त्वाच्या अवयवांचा उपयोग अनेक गरजू रुग्णांना होऊ शकतो. त्यांनी १९४ निष्पापांना ठार मारले आहे. त्यांच्याच (अतिरेक्यांच्या) देहांनी १००-१२५ रुग्णांना तरी जीवनदान मिळू शकेल. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 12/03/2008 - 01:20 नवीन

काय बोलायचं तेच कळत नाही..

.............. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा