या रविवारी अलिबागच्या फणसाड अभयारण्यात जायचं प्लान केला होता पण तो प्लान काही कारणाने रद्द करावा लागला. म म्हटलं आता निघायचं फिक्स केल आहे तर कुठेतरी फिरून येऊ म्हणून मग काशिद बिच ला जायचं फिक्स केल. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे घरातून बाहेर जाण्यासाठी तसा विरोधच होता पण रविवारी सकाळी वातावरण नीट असल्यामुळे मग ग्रीन सिग्नल मिळाला आणि सकाळी ७ वाजताच बाइकला किक मारून काशिद कडे प्रस्थान केलं. घरून निघताना काहीच खाल्ल नसल्यामुळे मग वडखळ नाक्याला थांबून वडा मिसळ हाणली, आणि त्या दुकानातली चहा इतकी आवडली कि दोन कप चहा घशाखाली कधी उतरली ते कळाल पण नाही.
एका ठिकाणी छोटया डबक्यात कमळ फुललेली बघितल्यावर सौ नी गाडी थांबवायला लावली. मग थोडासा क्लिकक्लिकाट केला.
जस जस अलिबाग जवळ येऊ लागल तस नारळांच्या झाडांची दाटी वाढू लागली आणि सोबत गारवा पण वाढू लागला. रणरणत्या उन्हात त्या थंडगार सावलीत गाडी चालवायला मजा येत होती. अखेर ज्यासाठी इतके दूरवर प्रवास करून आलो होतो त्याच पहिल दर्शन झाल
बिच वर पोहोचल्यावर मात्र थोडी निराशा झाली कारण गिरगाव चौपाटी प्रमाणे तिथे गर्दी झाली होती.
तिथे फिरताना या महाशयांची स्वारी करण्यासाठी लोकांची गर्दी होती
आणि ह्या गाड्या एकदम दिमाखात रांगेत आपल्या पाळीची वाट बघत उभ्या होत्या
एका दुकानात कपडे बदलण्यासाठी विचारणा केल्यावर कळल कि वीज नसल्यामुळे पाणी नव्हत आणि त्यामुळे समुद्रात खेळून आल्यावर अंघोळीसाठी पाणी नसणार म्हणून पाण्यात न जाता फक्त बीच वर फिरत होतो.
एक चिमुरडा तिथे स्वतःचा किल्ला बांधण्यात मग्न होता
तिथे पर्यटकांसाठी झोपाळे बांधून ठेवले आहेत, कोनीही यावे कुठल्यापण झोपाळ्यावर झोप काढावी कोणीच त्रास द्यायला येत नव्हत. मग भटकून थकल्यावर तिथल्याच एका झोपाळ्यावर अंग टाकून दिले. वरती माडांच्या झावळ्यांची गार सावली, मस्त हवा म काय लगेच ब्रह्मानंदी टाळी लागली ती सौ च्या आवाजाने मोडली. मग तिथून जवळच असलेले बिर्ला मंदिर बघायला निघालो. इथून जवळ असणारे कोरलई किल्ला, रेवदंडा किल्ला बघितलेले असल्यामुळे परत गेलो नाही.
वाटेत एक मंदिर लागल, त्यात राधा कृष्णाची छान मूर्ती पाहून स्वतःच्याही नकळत हात जोडले गेले. मंदिरातल्या घंटेवर कलाकुसर केली होती.
बिर्ला मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे, तिथे कॅमेरा, मोबाईल, बैग न्यायला बंदी असल्यामुळे तिथले फोटो काढता आले नाहीत. त्या मंदिरातल्या मुर्त्या अप्रतिम आहेत, बघतच राहाव्यात अशा. गणपती, महालक्ष्मी, शंकर पार्वती आणि माझी आवडती राधाकृष्णाची मूर्ती. मन एकदम प्रसन्न होऊन जात. आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे या मंदिराची देखभाल केली जाते, एकदम साफ स्वछ अस हे मंदिर आहे. इथली शांतता एकदम हवीहवीशी वाटणारी, मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.
आभाळ भरून यायला लागल होत, म्हणून मग कॅमेरा, मोबाईल, पाकीट तत्सम वस्तू प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवल्या आणि पहिल्या पावसात भिजायला तयार झालो.
असेच काही फोटो
फिरते राहा,
आपला जगप्रवासी
एका ठिकाणी छोटया डबक्यात कमळ फुललेली बघितल्यावर सौ नी गाडी थांबवायला लावली. मग थोडासा क्लिकक्लिकाट केला.
जस जस अलिबाग जवळ येऊ लागल तस नारळांच्या झाडांची दाटी वाढू लागली आणि सोबत गारवा पण वाढू लागला. रणरणत्या उन्हात त्या थंडगार सावलीत गाडी चालवायला मजा येत होती. अखेर ज्यासाठी इतके दूरवर प्रवास करून आलो होतो त्याच पहिल दर्शन झाल
बिच वर पोहोचल्यावर मात्र थोडी निराशा झाली कारण गिरगाव चौपाटी प्रमाणे तिथे गर्दी झाली होती.
तिथे फिरताना या महाशयांची स्वारी करण्यासाठी लोकांची गर्दी होती
आणि ह्या गाड्या एकदम दिमाखात रांगेत आपल्या पाळीची वाट बघत उभ्या होत्या
एका दुकानात कपडे बदलण्यासाठी विचारणा केल्यावर कळल कि वीज नसल्यामुळे पाणी नव्हत आणि त्यामुळे समुद्रात खेळून आल्यावर अंघोळीसाठी पाणी नसणार म्हणून पाण्यात न जाता फक्त बीच वर फिरत होतो.
एक चिमुरडा तिथे स्वतःचा किल्ला बांधण्यात मग्न होता
तिथे पर्यटकांसाठी झोपाळे बांधून ठेवले आहेत, कोनीही यावे कुठल्यापण झोपाळ्यावर झोप काढावी कोणीच त्रास द्यायला येत नव्हत. मग भटकून थकल्यावर तिथल्याच एका झोपाळ्यावर अंग टाकून दिले. वरती माडांच्या झावळ्यांची गार सावली, मस्त हवा म काय लगेच ब्रह्मानंदी टाळी लागली ती सौ च्या आवाजाने मोडली. मग तिथून जवळच असलेले बिर्ला मंदिर बघायला निघालो. इथून जवळ असणारे कोरलई किल्ला, रेवदंडा किल्ला बघितलेले असल्यामुळे परत गेलो नाही.
वाटेत एक मंदिर लागल, त्यात राधा कृष्णाची छान मूर्ती पाहून स्वतःच्याही नकळत हात जोडले गेले. मंदिरातल्या घंटेवर कलाकुसर केली होती.
बिर्ला मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे, तिथे कॅमेरा, मोबाईल, बैग न्यायला बंदी असल्यामुळे तिथले फोटो काढता आले नाहीत. त्या मंदिरातल्या मुर्त्या अप्रतिम आहेत, बघतच राहाव्यात अशा. गणपती, महालक्ष्मी, शंकर पार्वती आणि माझी आवडती राधाकृष्णाची मूर्ती. मन एकदम प्रसन्न होऊन जात. आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे या मंदिराची देखभाल केली जाते, एकदम साफ स्वछ अस हे मंदिर आहे. इथली शांतता एकदम हवीहवीशी वाटणारी, मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.
आभाळ भरून यायला लागल होत, म्हणून मग कॅमेरा, मोबाईल, पाकीट तत्सम वस्तू प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवल्या आणि पहिल्या पावसात भिजायला तयार झालो.
असेच काही फोटो
फिरते राहा,
आपला जगप्रवासी
वाचने
7368
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून बिर्लाच?
धागा छान पण ...........
आम्ही रायगडकर बोलतो. :)
In reply to धागा छान पण ........... by मृत्युन्जय
सहमत
In reply to धागा छान पण ........... by मृत्युन्जय
पु ल देशपांडे
In reply to धागा छान पण ........... by मृत्युन्जय
मसालानी चाय पिली
कटवड्याचा फोटो बेक्कार कातिल
+++१११
In reply to कटवड्याचा फोटो बेक्कार कातिल by आदूबाळ
फणसाडचीच हद्द या काशिद
कमळाच्या फुलांनी भरलेलं 'डबकं
चांगली महिती!
आवडले
कटवड्याचा फोटो आवडल्या गेलेला
मस्त ! कलाकुसर केलेली घंटा
छोट डबकं?...
मस्त ... आवडली ट्रीप...
वीज नसल्याने पाणी नाही
कमळाच्या फुलांनी भरलेलं 'डबकं'?
मस्त लेख आणि फोटो
मोबाईल