Skip to main content

आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी गुरुवार, 04/06/2015 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही . मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते . आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु, मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात. उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे. जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल. आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात. 1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. 2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. 4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल. आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद http://www.bionews.org.uk/page_51579.asp http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

वाचने 58127
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

तुमच आधीच वाक्य: " जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे." आंतरदेशीय विवाह :- जगातल्या भिन्न देशाच्या लोकांनी आपापसात केलेला विवाह मग इथे आता तुम्ही जे म्हणताय "की भारतीय लोकांचे परदेशी लोकांबरोबर फार कमी विवाह होतात." त्याचा संबंध येतोच कुठे? मुळात तुमच्या प्रतिक्रियेमध्ये आंतरदेशीय विवाह हि कल्पना "फक्त" भारतीय लोकांसाठी मांडलीच नव्हती. म्हणून मी म्हणालो ज्यांना फायदा होणार आहे(जर काही असला तर) त्यांना होईल. आधी आपल्या देशात तरी मोकळेपणा येऊ दे लोकांच्या विचारात! आता लेखाच म्हणाल तर, "आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे" या वाक्याने सुरुवात झाली आहे आणि आपल्या इथे जनुकीय विकास कसा साध्य करता येऊ शकतो याविषयी लेखकाने स्वतःची मते मान्डली आहेत. अर्थात आपण पूर्ण जग बदलू इच्छित असाल तर माझा काहीही आक्षेप नाहीच आहे. पण तुमच्या प्रतिक्रियेत उपहासच जास्त दिसल्यामुळे मी माझे मत मांडले होते. बाकी वानगी दाखल उदाहरण देण्याची गरज समजली नाही, मी हि चांगली उदाहरणे देऊ शकतो पण जाऊ दे, आपल्यात तेवढा फरक राहून देतो!

In reply to by शब्दबम्बाळ

१. मी जगातल्या भिन्न लोकांनी एकत्र येउन विवाह करण्ञाबाबत बोलतो तेव्हा त्यात भारतही येतो. भारत जगात येते असे मला इयत्ता पहिलीत शिकवले आहे. त्यामुळे इथे योग्य संबंध आहे. २. मी व्यापक भूमिका घेतली आहे ज्याचे आपण खरे म्हणजे कौतुक करायला हवे, ३. लेखाची सुरुवात ज्या अनुषंगाने झाली आहे त्याच अनुषंगाने मी मत मांडले आहे आणि उदाहरणे दिली आहेत. ४. मी पुर्ण जग बदलु इच्छित आहे असे काही नाही. नाही असेही काही नाही. मी एक मत मांडले फक्त. ५. माझ्या प्रतिक्रियेत आपल्याला उपहास दिसला असेल तर त्याला मी काय करु शकतो? ६. उदाहरणे दिल्यामुळे मुद्दा नीट कळतो. ७. आपण माझ्यापेक्षा चांगली उदाहरणे देउ शकत असाल तर जरुर द्यावीत म्हणजे सगळ्यांनाच मुद्दे नीट कळतील. ८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतो

In reply to by मृत्युन्जय

८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतो
जनुकीय फरक? (काडी टाकण्याचे वगैरे आयकन्स कसे टाकायचे हो?)

In reply to by मृत्युन्जय

>>>>>मी व्यापक भूमिका घेतली आहे ज्याचे आपण खरे म्हणजे कौतुक करायला हवे, मला वाटतं व्यापक भुमिकेपेक्षा प्रतिसाद उपरोधाने भरलेला होता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे तुम्हाला वाटते. त्यातली व्यापक भूमिका तुम्ही लक्षात का घेत नाही?

In reply to by ग्रेटथिंकर

मी एकदम सेन्सिबल विचार मांडला आहे. काय चुकीचे आहे त्यात? मी तुमचाच प्रतिवाद अजुन थोडा पुढे नेला आहे इतकेच. भारतातले आंतरजातीय / धर्मीय विवाहाल प्रोत्साहन मिळाले पाहिजे तसे इतर गोष्टींना का नको? आणी त्याहीपुढे जाउन माणसाने फक्त माणसाचाच विचार का करावा मग? तुम्हीच जरा सेन्सिबल विचार करा. प्लीजच्च्च.

In reply to by मृत्युन्जय

१००% सहमत… धाग्यावर जसा आंतर उपजातीय किंवा आंतर पोटजातीय विवाहाच्या (जे अजून नीटसे होत नाहीत ) पुढे जाउन आंतरजातीय / धर्मीय विचार मांडला असेल तर त्याही पुढे जाउन आंतरदेशीय / आंतर खंडीय (प्रचंड जनुकिय विविधता ) विवाहाच्या विचारला काहीच हरकत नसावी र च्या क ने … समजा सहा फुटीय मी तुमच्या धागाकर्त्याच्या उदाहरणाप्रमाणे तीन फुटीय मुलीशी आंतर उंचीय विवाह केला तर होणाऱ्या साडे चार फुटीय अपत्याशी विवाह करण्यासाठी माझ्यासारख्या आंतर विचारांची साडेसहा फुटीय व्यक्ती मिळेल का ? (आणि तीन फुटीय व्यक्तीशी विवाहाचे दूरगामी परिणाम नंतर होतील पण नजीकगामी रोज रातीय (दूष:) परिणाम श्री अमिताभ बच्चन साहेबांना विचारावेत का ? कारण पित्याशी याच चर्चेनंतर श्री अभिषेक बच्चन साहेबांनी राणी मुखर्जी बाईसाहेबांशी विवाह तहकूब केल्याचे ऐकिवात आहे. )

@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. तुमच्या वैतागामागे लेखकाच्या एकांगी प्रतिसादाचा इतिहास आहे हे माहिती आहे. तरीही मूळ लेखामध्ये तसा काही सूर नसताना विनाकारण हा विषय आणून चर्चा भरकटवणे खटकले. तुमच्या मिपावरच्या एकंदर लिखाणाबद्दल आदर आणि संयत प्रतिवाद करण्याच्या क्षमतेबद्दल विश्वास असल्यामुळे हे सुचवण्याचे धाडस केले. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.

In reply to by गुलाम

सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

In reply to by गुलाम

@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही.
हे बरोबर, आता मुळ धाग्याला सोडुन थोडेसे विषयांतर होइल असे वाटते. माझ्या समजुतीप्रमाणे या 'तथाकथीत पुरोगामांच्या' इतिहासाकडे जर पाहिले तर अगदी असेच दिसून येइल. माझ्या मते, पुरोगामी होण्याची पहिली पायरी ही नेहमीच फक्त आणि फक्त हिंदुद्वेश्टेपणा अंगात मुरविल्याशिवाय ओलांडता येत नाही. येथे हिंदुद्वेश्टेपणा म्हणजेच ब्राह्मणद्वेष्टेपणा असा घ्यावा. म्हणुनच कदाचित असे तुम्ही समजता तसे प्रतिसाद येत असावेत.

In reply to by गुलाम

बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब
साहेब ?? असो.. तुमचा प्रतिसाद मान्यच. बॅट्याने तसाही बेनिफिट ऑफ डौट्ट दिलाच आहे नंतर. तेव्हा सर्वांनीच कोणताही विशिष्ठ जाति-उल्लेख मग तो तथाकथित उच्चवर्णीय अथवा इतर कोणत्याही जातीचा असेल तो टाळावा.
लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.
त्या दोघांनाही ओळखत नाही मी. तरी देखील इतक्या विनम्रतेची काहीही गरज नव्हती असे नमूद करतो. उगी ते नाटकी वाटतं. आणि तुम्ही इतकेही काही कोणास दुखावणारे बोललेले नाही आहात. बॉटम लाईन म्हणजे, जालावर कोणी लहान मोठा नै. बॅट्या कालिजात जाणारा पोरगा असेल आणि मी साठीतला प्रकांड पंडित असेन तरी माझ्या न पटलेल्या प्रतिसादाची तो पिसे काढू शकला पाहिजे आणि vice versa.. (जालावर मान-अपमान घेऊन येऊ नयेत असे मानणारा )

In reply to by हाडक्या

आदर हा वयाचा नाही ज्ञानाचा आहे. मिपावर असे काही आयडी आहेत ज्यांना काही सुचवताना किंवा प्रतिवाद करताना अशी विनम्र होण्याची ईच्छा होते. शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव वगैरे...

In reply to by गुलाम

आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आनंद अहे. परंतु या प्रतिसादात माझे नाव का आले ते कळाले नाही. मी तर माझ्या प्रतिसादात कुठेही ग्रेटथुंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत असे म्हटलेले नाही (ते तसे नाहितच असे काही मला म्हणायचे नाही पण ते तसे आहेत असे मी तरी कुठेही म्हटलेले नाही).

In reply to by मृत्युन्जय

असेलही पण माणूस ताक सुद्धा फुंकून पितो म्हणून बॅटमण ने प्रतीपादले असावे असा कयास आहे. आणि ही गोष्ट जालावरही लप्प्न राहिली नाहीच अगदी आजच्या ताज्या घडामोडीत याचा उल्लेख आहे. नक्की काय खरे कारण आणि सुरवातीसच संशयाचा फायदा असा स्पष्ट उल्लेख असताना पुढील प्रतीसादाची गरज नसावी. हाडक्या साहेब आपण दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल अभिनंदन पण असे शेरे ऐकायची सवय झाल्याने मी सुद्धा बॅटोबाच्या प्रतिसादाला अनुमोदन दिले. आप्ल्या सर्वंकश भूमीकेचे स्वागतच आहे. नेमस्त नाखु

In reply to by नाखु

हाडक्या साहेब
ऑ ..? कय चुकलं माकलं कय हो काका ? नका हो साहेब वगैरे म्हणू असे.. :)

In reply to by मृत्युन्जय

तुमचे नाव या प्रतिसादामुळे आले. तुमच्या नेहमीच्या तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ लेखनाच्या प्रतिमेला छेद देणारा युक्तिवाद वाटला तो. कारण मुळात कुणी सरसकट ७ किंवा ५ असणार नाही. प्रत्येकामध्ये काही गोष्टी ५ रँकींगच्या तर काही ७ रँकींगच्या असतात. मुळ लेखनात असे दोन वेगवेगळ्या जेनेटीक पूल मधून आलेल्या पालकांच्या मुलांना दोघांच्यापण चांगल्या (७ रँकींगच्या) जीन्सचा फायदा होऊ शकेल असे सांगितले आहे.

In reply to by गुलाम

भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. मी माझ्या प्रतिसादात (ज्याचा तुम्ही उल्लेख केला आहे) ब्राह्मण शब्द कुठे वापरला आहे. तसेच ग्रेटथु़ंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत असे कुठे म्हटलेले आहे (ते तसे नाहितच असे काही माझे म्हणणे नाही पण ते तसे आहेत असे मी कुठेही म्हटलेले नाही) हे कृपया दाखवुन द्या अन्यथा माझा उल्लेख गैरसमजातुन आला आहे असे मान्य करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करु इच्छितो. मी कुठल्याही पुरोगाम्याला माझ्या सदर प्रतिसादार ब्राह्मण द्वेष्टा म्हटलेले नाही (हॅविंग सेड दॅट, ग्रेटथु़ंकर पुरोगामी आहेत की नाहित याबद्दलही मी काही मतप्रदर्शित केलेले नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी).

In reply to by मृत्युन्जय

लेखक ब्राह्मण्द्वेष्टा असल्याचा आरोप आपण केला नाही हे मान्य. परंतु आपला प्रतिसाद अकारण पुर्वग्रहदुषित व अतार्किक वाटला. दोघांना वेगवेगळा प्रतिसाद देण्यापे़क्षा एकच प्रतिसाद देण्याचा आळस केला कारण मला दोघांनाही एकच विनंती करायची होती की लेख कोणी लिहिला आहे यापेक्षा काय लिहिला आहे हे बघुन उत्तर द्या आणि पुर्वग्रह ठेवु नका. तार्किक प्रतिसादाचे सुंदर उदाहरण खाली इस्पिकच्या एक्का यांच्या 'या लेखातले अनुमान सरळधोपट आहे' प्रतिसादामध्ये दिसते..

In reply to by गुलाम

ते खाली एकाने ऐसीअक्षरे.कॉम वरच्या प्रतिसादाची लिंक उद्धृत केलीये. तो प्रतिसाद पहा आणि ठरवा की ग्रेटथुंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत किंवा नाहीत ते.

In reply to by बॅटमॅन

अहो पण जरी आपण मान्य केल कि ते ब्राह्मणद्वेष्टे आहेत तरी त्यांच्या या लेखात त्यांनी कोणत्याही जातीवर टिप्पणी केलेली नाहीये. ज्या संकेतस्थळावर त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती, ती योग्य नव्हती आणि तिथे त्यावर टीका - टिप्पणी झालीच असेलच! पण हा धागा मिपावर आहे, आणि धाग्यातील "मुद्द्यांवर" चर्चा होणे अपेक्षित आहे, जे काही लोक करत आहेत…

In reply to by गुलाम

वैज्ञानिक दृष्टीकोनातुन माझा प्रतिसाद कसा अतार्किक आहे हे कोणी समजावुन सांगितल्यास मी तद्नुषंगाने दुरुस्ती करायला तयार आहे. अन्यथा माझा प्रतिसाद ही ग्रेटथु़ंकरांच्या धाग्याच्या आशयाला अनुसरुनच आहे. त्यांनी जो युक्तिवाद केला आहे त्याचा मी विस्तार केला आहे एवढेच. त्यांच्या लोककल्याणकारी योजनेचा मी विस्तार केला आहे. एका विधानाने भौगोलिक सीमा मोडुन तो विस्तार घडवुन आणल आहे तर दुसर्‍या विधानाने मानववंशाने अप्पलपोटा विचार सोडुन देउन समस्त प्राणीवर्गाचा आणि जीवसृषटीचा विचार केला आहे. त्यात योग्य तिथे "शक्य असेल तर" वगैरे शब्दांचा उपयोग करुन विचारांना केवळ एक दिशा दिली आहे. धाग्यावरचा प्रतिसाद केवळ मूळ युक्तिवादाचा विस्तार आहे. धाग्यातील युक्तिवादाच्या अनुषंगाने मी लिहिलेले कसे आणि किती चुकीचे आहे हे कळाले तर त्यात नक्की बदल करता येतील असे मी आपल्याला आश्वासन देतो.

मुद्दा पटणारा. भविष्यकाळात जनुकीय गरज म्हणुन असे विवाह होतील की नै माहिती नाही. परंतु भविष्य काळात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह होतील कारण सामाजिक चौकटी आणि परंपरा यांच्या पायर्‍या खचू लागल्या आहेत. धर्माच्या बाबतीत अतिशय कट्टर असलेले तो कोणताही समाज असू देत, परंतु आता त्यांनी असला कट्टरपणा सोडून दिलेला दिसतो आणि लवचिक धोरण स्वीकारलेले दिसते. प्रेमविवाह करणार्‍यांची संख्या आता वाढत चालली आहे. मुला-मुलींचे लग्न आता पालकांच्या काळजीचे विषय झालेले आहेत. धार्मिकता आणि परंपरेच्या जोखडात बांधुन घेतलेल्यांनी आपल्या मुलीने चांगला कर्ता धर्ता मुलगा निवडला ना, याचा आनंद पालकांच्या मनात दडलेला दिसतो. लोक काय म्हणतील याचं दडपण असतं पण आता त्या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करायला लागले आहेत, मला वाटते, जनुकीय बदलांसाठी नाही, पण भविष्यात आपण म्हणता तसे जनुकीय बदल नक्की दिसून येतील असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

या लेखातले अनुमान सरळधोपट आहे, पण वस्तूस्थिती इतकी सोपी नाही. जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही... माता आणि पित्याकडून येणारी (सरमिसळ होणारी) जनुके कोणत्या प्रकारची आहेत त्यावर मुलांची जनुके कशी असतील हे अवलंबून असते. ही सरमिसळ स्वैर (random) असल्याने, मातापित्यात लग्नापूर्वीचे जवळचे कौटुंबिक-जातीय-धार्मीक संबध नसल्यास त्यातून नेहमी अथवा बहुतेक वेळेस उत्तम जनुकीय संच तयार होईल हे म्हणणे तार्किक नाही. कारण प्रत्येकी अंदाजे २४,००० जनुके असलेल्या मातृ आणि पितृ या दोन संचांची व्यवहारात अगणित परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स होतात ! त्यातला केवळ एकच संच एका मुला/मुलीत असेल. तो उत्तमच असेल याची खात्री कशी काय असेल ? मात्र, मातापित्याच्या जनुकीय संचांत वेगळेपणा जेवढा जास्त तेवढे रिसेसिव जनुकीय आजारांचे तोटे टळण्याची शक्यता नक्कीच वाढते... रिसेसिव जनुकिय आजारांमध्ये मानवाच्या जनुकाच्या जोडीतले एक रोगकारक व दुसरे आरोग्यपूर्ण जनुक असल्यास, त्या एका रोगकारक जनुकामुळे रोग पुढच्या पिढीत संक्रमित होउ शकतो, पण तो रोग सद्यपिढीत प्रकट होत नाही (डॉर्मंट राहतो). प्रयोगशाळेतील परिक्षणांत अश्या रोगांची चाहूल (trait) लागू शकते पण तो रोग आस्तित्वात (manifestation) येत नाही. असे रोग आस्तित्वात येण्यासाठी जनुकाच्या जोडीतील दोन्हीही जनुके रोगकारक असणे आवश्यक असते. जवळच्या नातेवाईकांमध्ये बरीच जनुकिय समानता असणे ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांत लग्ने झाल्यास त्यापासून होणार्‍या संतत्तीला मातेकडून एक आणि पित्याकडून एक अशी एकाच प्रकारच्या रोगकारक रिसेसिव जनुकांची जोडी मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थातच, जवळच्या (पहिल्या, दुसर्‍या अथवा तिसर्‍या स्तरांच्या) नातेवाईकात लग्न करण्याची प्रथा असलेल्या समाजांत काही रिसेसिव जनुकिय आजारांचे प्रमाण सर्वसामान्य जनतेच्या मानाने जास्त दिसते. त्याविरुद्ध, खूप दूरचे नातेवाईक असलेल्या अथवा कौटूंबिक संबंध नसलेल्या स्त्री-पुरुषांच्या (जनुकिय वैविध्य असण्याची शक्यता असणार्‍या) संबंधाने रोगट जनुकांची जोडी बनण्याची शक्यता कमी होऊन मूल निरोगी असण्याची शक्यता वाढते. आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहांत रिसेसिव रोगकारक जनुकिय जोडी बनणे अधिकच कठीण असते त्यामुळे मुलांत रिसेसिव जनुकिय रोगांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता खूपच वाढते... परंतु, अश्या विवाहातील संतत्ती नेहमीच आणि सर्वप्रकारे/बहुप्रकारे शारीरीकदृष्ट्या जास्त सबळ, जास्त निरोगी अथवा जास्त बुद्धिमान होईलच असा त्याचा अर्थ नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून एक... आंतरजातीय, आंतरधर्मिय किंवा आंतरराष्ट्रीय विवाहांमुळे बदलणार्‍या आर्थिक-सामाजिक-भौतीक परिस्थितीच्या नविन पिढीवर होणार्‍या परिणामाची आणि त्या पिढीला मिळणार्‍या नविन संधीचाही नविन पिढी कशी विकसित होईल यावर परिणाम होत असतो. जनुकिय आजार सोडले तर व्यक्तीचा विकास त्याच्या जनुकिय संचाइतकाच त्याच्या भोवतालच्या परिस्थितीने दिलेल्या संधी आणि/अथवा उभी केलेली आव्हाने यावर अवलंबून असतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+१ .. एक नंबर हो एक्का काका.( हेच लिहिणार होतो पण इत़कं नीट जमलं नसतं. ;) ) हे उत्तर धाग्याचे सार आहे. सगळे मुद्दे नीट मांडलेले आहेत. पुढची चर्चा यावर व्हावी अन्यथा नाही झाली तरी चालू शकेल असं वाटतंय..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रा डॉ आणि आपला अतिशय उत्तम आणि समतोल प्रतिसाद! कंपूबाज लोकांनी हल्ली सेन्सीबल चर्चा करण्याची काही सोय ठेवली नाहीये… त्यामुळे अशा प्रतिक्रिया ओअसिससारख्या वाटतात!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

समतोल प्रतिसाद ! सहमत ! असाच काहीतरी माझा मत होतं पण ते शास्त्रीय भाषा जमेना ..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लेखात लिहिलेली परिस्थिती एक शक्यता आहे. पण हे असे मुद्दामहून ठरवून केले जाईल याबद्दल शंका आहेच. आणि
जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही..
. यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि इसाडोर डंकन यांच्यातल्या "his beauty and her brains" या कथित चकमकीची आठवण झाली.

भारतातील जात व्यवस्था बदला.. दाखले वगिअरे ठिकाने जात लिहने बंद करा.सर्व लोकाना सामान वागणूक, आरक्षण बंद करा.सर्वाना माफक दरात शिक्षण वैद्यकीय सेवा दिले गेले पाहिजे. तेव्हाच भारत धर्मं निरपेक्ष होइल.

जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय विवाह करा असं सुचवायचं असेल तर हा तर्क फक्त पाच दहा वर्ष चालेल. कारण एकदा CRISPR Cas9 साराखी जनुकामध्ये हवे तसे बदल करणारी यंत्रना प्रचलित झाली की तुमचे रेसेसिव्ह दोष काढूण टाकता येतील, आणि जेनेटिक्सवाले डिझायनर बेबीज तुम्हाला देण्याची स्वप्न दाखवयला लागली आहेत. एकदा ते झालं कि मग आंतरजातीय विवाहाची गरज राहाणार नाही असा निष्कर्ष काढायचा का? जातीभेद अमानविय आहेत इतकं सरळ सांगता येत असताना, उगाच विज्ञानाची अर्धी अधुरी ढाल वापरायचा प्रयत्न काही समजला नाही. बाकी जेनेटिक्समधल्या संकल्पना शास्त्रोक्त म्हणून फार विश्वासानं वापरू नका. कारण बहुतांश गोष्टी असोसियेशन लेव्हलला अडकल्या आहेत. त्याची कारण मिमांसा अजून व्हायला वेळ आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार??? डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाही,ती जेव्हा येईल तेव्हा तुमचे म्हणणे ग्राह्य मानता येईल ,तोपर्यंत आंतरजातिय/ धर्मिय विवाहांना पर्याय नाही.

In reply to by ग्रेटथिंकर

रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार???
जिन एडिटिंग वापरून.
डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाही
डिझायनर बेबीसाठी जनुकांची साखळी कशाला निर्माण करायला लागते? आहे तो जनुक एडिट करून काम नाही का चालणार? तुमची काही तरी गफलत होते आहे. खालील माहिती वाचा डिझायनर बेबी

In reply to by पॉइंट ब्लँक

ग्रेटथुंकरांपुढे लॉजिक म्हणजे नेपाळच्या नेव्ही मिनिस्टरपदासारखे आहे. वट्ट उपयोग नाही.

In reply to by पॉइंट ब्लँक

आपल्या लिंकमध्ये डीझायनर बेबी कन्सेप्टमुळे human gene pool वर विपरीत परिणाम होतील असे लिहले आहे .नीट वाचा.

In reply to by पॉइंट ब्लँक

अतार्कीक कशी .जीन एडीट करता येऊ शकतो ,पण मी लेखात दिल्याप्रमाणे एक गुणधर्म ठरवणारे शेकडो जनुकं असतात, पैकी डीझायर्ड जनुक कसे बनवणार? अजुनही प्रयोगशाळेत जनुकं बनवता येत नाहीत.

In reply to by ग्रेटथिंकर

जीन डिनएवर असतो आणि डिनए एडिट करता येतो. नवीन निर्माण करायचा अट्टाहास कशापायी? नवीन प्राणी निर्माण करायचा आहे का? गर्भामध्ये डिनए असतो की राव. त्याला बदलायचं. नवीन कशाला पाहिजे.

आंतरजातीय असो किंवा स्वजातीय विवाह असो प्रत्येकाला आपला जोड़ीदार निवडन्याचे स्वातंत्र्य हवे. चार दिवस जगलो तरी आनंदाने जगता आले

माझ्या मते लग्न हि केवळ अपत्य जन्माला घालण्यासाठी केलेली गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जोडीदाराबद्दल काहीतरी अपेक्षा असणार आणि जर त्या बर्यापैकी पूर्ण होत असतील तर लग्न होण्याची शक्यता! अर्थात हि गोष्ट झाली शहरातली आणि त्यातही सुधारलेल्या म्हणजे तथाकथित उच्च अथवा उच्चेतर (नीच कसे काय म्हणावस वाटत…) असूनही शिक्षित समाजाची… गरिबी आणि अज्ञानात राहणाऱ्या लोकांना कसली आलीये निवड! मुळात जात आणि लग्न या दोन्ही व्यक्तीच्या अत्यंत खासगी गोष्टी असल्या पाहिजेत. मुद्दामहून आंतरजातीय/धर्मिय विवाह करणेसुद्धा चुकीचेच होईल, हा पण ते करण्याची दोघांची तयारी असेल तर त्याला होणारा विरोध मात्र कमी व्हायला हवा… मला जातीवाचक उल्लेख नको वाटतो पण हल्ली मिपा वर ब्राह्मण या विषयावर बरीच चर्चा सुरु असते, त्याचा इतिहास वगैरे जाणून घ्यायची इच्छा नाही पण एकदाच जे कोणी ब्राह्मण विरोधी(असले तर) आणि समर्थक असतील त्यांनी एखादा धागा उघडून चर्चा करून विषय संपवावा!

जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो आंतरजातिय/ धर्मिय विवाहांना पर्याय नाही. हे म्हणण्यासाठी आपल्या जवळ कोणता पुरावा किंवा विदा आहे. जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न झाल्याने अनुवांशिक रोग जास्त होतात हे मान्य आहे. परंतु एकाच जातीत असलेले जनुकीय सारखेपण अजून तरी सिद्ध झालेले नाही (माझ्या माहितीप्रमाणे मी चूक असू शकतो) वर म्हटल्याप्रमाणे ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)अशा तर्हेचे संशोधन सर्व जातीत होणे आवश्यक आहे( झाले आहे कि नाही ते मला माहित नाही). एका अनुसूचित जातीचे पुढारी मला पुण्यात एका सभेत म्हणाले होते कि आमच्या मुलांनी ब्राम्हण मुलींशी लग्न करायला पाहिजे. मी विचारले साहेब तुमच्या मुलीनी मग ब्राम्हण मुलाशी लग्न करायला पाहिजे.त्यावर ते म्हणाले अहो तिने ब्राम्हणाशी लग्न केले तर तिच्या मुलाला आरक्षण मिळणार नाही पण मुलाने ब्राम्हण मुलींशी लग्न केले तरी आमच्या नातवंडाना आरक्षण मिळेल. (शेवटी राजकारणी हे डोम कावळे असतात)परन्तु ते जे म्हणाले त्यातून स्वार्थी असे विदारक सत्य मात्र उघड झाले असो. आंतरजातीय/ धर्मीय विवाह व्हायला पाहिजेत( खरं तर एक पुरुष अन स्त्री या दोनच जाती असाव्यात आणि लग्न त्यांनी स्वखुशीने करावे) या बाबत मी सहमत आहे पण त्यासाठी जनुकीय आवश्यकतेच्या शिखंडीच्या आड राहून लढायची गरज नाही किंवा जीन पूल वगैरेच्या कुबड्याची गरज नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)
डॉक्टर साहेब, हे वाक्य थोडंसं विचित्र वाटतंय, कारण चिंपांझी आणि मानव यांच्यात फक्त ४% जनुकीय फरक आहे. http://genome.cshlp.org/content/15/12/1746.full

In reply to by काळा पहाड

फरक हा शब्द variation चे भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. माझे म्हणण्याचा उद्देश दोन भावांमध्ये असलेला फरक किंवा दोन माणसांच्या गुणसूत्रात, जीन्स मध्ये असलेला फरक असा असुन दोन जैविक प्रजातीन्मधील नाही. gene, allele, trait इ चे भाषांतर कसे करावे ते समजत नाही. यात जरा गोंधळ झाला आहे. तो दूर झाला कि तुम्हाला मी सांगेन. तोवर भावना समजून घ्या

In reply to by सुबोध खरे

ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)अशा तर्हेचे संशोधन सर्व जातीत होणे आवश्यक आहे( झाले आहे कि नाही ते मला माहित नाही). डॉक, कर्‍हाडे मंडळींच काय बुवा ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

In reply to by काळा पहाड

हा... हा... हा... हे मिपावरच पहिल्यांदा वाचलं होत मी ! मला वाटत झाशीची राणी, सरसंघचालक श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी हे "कर्‍डाडे" ब्राम्हण होते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

म्हणजे IT मधल्या मुला मुलींनी एकमेकात लग्न केल्याने ते IT जनुक त्यांच्यापुरतेच मर्यादित रहाते. याउलट IT किंवा तत्सम उच्च शिक्षित व्यावसायिकाने BA / BCom अशा बँक किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकाशी लग्न केल्यास जनुक (आणि पगारही ) योग्य रीतीने वाटला जाउन समाज समजनुकीय आणि समआर्थिक अशा समान पातळीवर येण्यास मदत होणार नाही का ? (IT / BA / BCom /बँक / शिक्षक हे शब्द केवळ नमुना दाखल आहेत. विचार करताना उच्च शिक्षित /उच्च व्यावसायिक आणि नीच शिक्षित / नीच व्यावसायिक ((नीच : तुलनात्मक शब्द) असा करावा ) ता क: या आधीही कोणत्यातरी धाग्यावर अशीच काहीशी चर्चा झाल्याचे स्मरते (IT व्यावसायिक नसलेल्या अल्पसंख्यान्कातील एक ) कहर

In reply to by कहर

याला फोडणी देउ का? आयटी मधली मुलगी बीए अथवा बीकॉम झालेल्या मुलाबरोबर लग्न करेल? (मुलाचा पगार मुलीपेक्षा कमी असेल तर)

In reply to by टवाळ कार्टा

इतकी चर्चा सुरु आहे पण मी विचारलेल्या बेसिक प्रश्नाला (सोयिस्कर??) बगल??? नै म्हणजे माझ्या समजूतीनुसार इतक्या जाती आहेत त्या सर्व लोकांच्या कामाच्या/व्यवसायाच्या सातत्यामुळे तयार झालेल्या पण सोनार, न्हावी, ब्राम्हण, मराठा, शिंपी, चांभार, आणि बर्याच अठरापगड जाती, ईत्यादी ईत्यादी जातींमध्ये जात स्पेसिफिक जनुक असते???? असे असेल तर मग त्या जनुकांमुळे आपण भारतीय बाकी जगातल्या सर्व माणसांपेक्षा या सर्व व्यवसायांत कुशल असायला हवे कारण बाकी जगात या जातीच अस्तित्वात नैत

ग्रेट थिंकर साहेबांनी विचार करण्यासारखा धागा सुरु केला आहे. जनुकशास्त्रातला मला काहीही कळत नाही पण हा धागा वाचून काही प्रश्न पडले आहेत. जनुकावर भौगोलिक परिस्थिती आणी वातावरणाचा काही प्रभाव असतो का ? दक्षिण भारतीय लोक (आंध्र आणि तामिळनाडू ) हे प्रामुख्याने कृष्णवर्णीय असतात (वर्णभेद करण्याचा उद्देश नाही ). मग तो मुस्लीम असो /हिंदू ब्राह्मण /मराठा असो / ख्रिस्चन असो. याचा अर्थ वर्णाशी संबंधीत जनुक त्या सगळ्यांमध्ये आहे असा होतो का ?. हीच गोष्ट उत्तर भारतीय मुलींची ज्या गोऱ्या आणि सुंदर असतात मग त्या कोणत्याही धर्माच्या असो. ज्यावेळी जातीव्यवस्था अस्तिवात नव्हती (म्हणजे अगदी सुरवातीच्या काळात) त्यावेळी तर जनुके सारखीच विभागल्या गेली असतील. त्यामुळे जनुकांच्या सगळ्याच जोड्या किंवा प्रकार प्रत्येकच जाती /धर्मात असतील का ?

@मृत्युंजय महाराज, जरा सेन्सीबल चर्चा करा प्लीजच.
ग्रेटथिंकर साहेब, हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? http://www.aisiakshare.com/node/2449#comment-43122

In reply to by काळा पहाड

ग्रेटथुंकर साहेबांचा नक्की प्रॉब्लेम कळाला आता. याला ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणावे काय? प्राडाँचे याबद्दला काय मत आहे?

In reply to by काळा पहाड

>>> ग्रेटथिंकर साहेब, हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना? ब्रिगेडी पुरूषोत्तम खेडेकरच्या एका ब्राह्मणद्वेषी पुस्तकातले विखारी लेखन आणि या कॉमेंटमधील विचार यात कमालीचे साम्य आहे. खेडेकरने त्या पुस्तकात ब्राह्मण स्त्रिया व पुरूष यांविषयी अत्यंत किळसवाणे लेखन केले आहे. नानासाहेब नेफळेने कितीही वेगवेगळे आयडी घेतले, माईसाहेबांचा आयडी वापरून सभ्य लेखनाचे बेअरिंग जपले आणि पुरोगामित्वाचा कितीही जाड बुरखा वापरला तरी त्याच्यात लपलेला ब्रिगेडी अचानक बाहेर येतो तो असा.

In reply to by ग्रेटथिंकर

लेखक आणि लेखाच्या मागची मूळ प्रेरणा ब्रिगेड आहे. त्यामुळे ब्रिगेड चर्चेत येणारच.

प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय चाळणीतून गाळू नका ! अरे उद्या लग्न करायचं ठरवलं तर मुलामुलीचा रक्तगट, मलमुत्राचे, वीर्याचे सँपल्सच तपासत बसणार काय ? आपल्याला जी व्यक्ती आवडली तिच्याशी लग्न केले इतकी सोप्पी गोष्ट असू शकत नाही काय ?

'देशस्थ म्हणजे बेशिस्त' असा समज कोणी निर्माण केला . तो खरा आहे का ? तसेच बरयाच दक्षिणी सिनेमांमधल्या हिरोची नायिका मात्र नॉर्थ ( युपी , महाराष्ट्र ) प्रदेशांतुन आयात केलेली असते असे का ?

In reply to by सिरुसेरि

देशस्थ = बेशिस्त आणि कोकणस्थ = कंजूस, माणूसघाणे हे दोन्ही स्टिरिओटैप एकमेकांनी बनवलेले असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by बॅटमॅन

नुकताच वॉट्सअ‍ॅपवर आलेला विनोद - कोकणस्थ आणि देशस्थ ह्या दोघांकडील जेवणाचे निमंत्रण स्वीकारू नका! कारण कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल, हे सांगता येणार नाही!!

In reply to by सिरुसेरि

अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळुनी देशस्थ निर्मियला. स्वस्तात स्वस्त समस्त वस्तू मिळुनी कोकणस्थ निर्मियला.

वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे. आणि जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे. जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य यांनि एखदि धर्मसंसद बोलाऊन धर्मातिल जातिव्यवस्था नष्ट करायचे मनावर घेतले तर काय अवघड आहे. जातिव्यवस्था नष्ट होने हे हिंदु धर्माच्या बळकटिसाठि आवश्यक आहे. आणी ति नष्ट झालि तरच हिंदु धर्म टिकेल. यासाठि हिंदु धर्मातिलच लोकांचा दबाव होने आवश्यक आहे. जातिव्यवस्था नष्ट झाली तर आपोआपच आरक्षण रद्द होइल व्होट बँकेचे राजकारण बंद होइल आणी ग्रेटथिंकर म्हणतात तसे जनुकिय द्रुष्ट्या आपला समाज सम्रुध्द होइल.

In reply to by यमगर्निकर

मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे.
जशी की?
जातिव्यवस्था बळकट झालि
म्हणजे नक्की काय झालं?
जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे.
म्हणजे जातिव्यवस्था आधीपासूनच होती आणि ती फक्त बळकट झाली? समाज जातिव्यवस्था (जी आधीपासूनच होती) ती बळकट होण्यापूर्वी विभागला गेला नव्हता म्हणजे काय? मग जातिव्यवस्था होती म्हणजे तो आधीपासूनच विभागला होता ना?
जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य
१. आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य आहेत हे नक्की का? कारण तसं असतं तर बरेच हिंदू साईबाबांना कसं मानत असते? २. सर्वोच्च नेत्याला फतवा (धर्माधिकार?) काढायचा अधिकार असतो. असा धर्माधिकार शंकराचार्यांनी कधी काढलाय?

In reply to by यमगर्निकर

तुमचा ह्या धाग्याशी काय संबंध? तुम्ही लिइरी वाली ना =))