केवळ पोटासाठी आज सर्व मुंबईकर कामावर गेले असे म्हणणे बरोबर नाही. ज्यांना एक दिवसाची भरपगारी रजा मिळणे सहज शक्य आहे असे अनेक जण आज आवर्जुन कामावर गेले होते. बहुसंख्य मुंबईकर हे शूर म्हणण्यापेक्षा आलेल्या संकटांचा बाऊ न करता वा भेदरुन न जाता वाटचाल पुढे सुरू ठेवण्याइतके कर्तव्य दक्ष आहेत. अशा घटना कुठेही म्हणजे अगदी राहत्या घरी देखिल घडु शकतात तेव्हा भितीने घरात बसून उगाच काल काय घडले यावर वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा सरळ उठा आणि कामाला चालु लागा असा मुंबईकरचा खाक्या आहे.
शिवाय काल असे काही भयंकर घडले व त्यात निरपराध नागरीक व कर्तव्यशूर अधिकारी मृत्युमुखी पडले असताना आज आपण कामावर जाणे हीच त्यांना श्रद्धांजली या भावनेने अनेक मुंबईकर आज घरच्यांचा काळजीला घरात ठेवुन कामावर गेले.
आज कामावर जाणे सोडा, काल बाँब फुटत असताना आणि गोळिबाराचे आवाज येत असतानाही अनेक नागरीक मोठ्या हिमतीने जखमींना उचलुन न्यायला सरसावलेले दिसत होते. आजपर्यंतच्या प्रत्येक आपत्तीमध्ये मला मुंबईकराचे हे रुप दिसले आहे.
मुंबईकरांच्या हिमतीला 'भूकेची मरणावर मात' असे हिणविणे बरे नाही.
मुंबईकरांच्या हिमतीला 'भूकेची मरणावर मात' असे हिणविणे बरे नाही.... पटलं...!!
केवळ भूकेची मरणावर मात आहे हे म्हणणे बरोबर नाही... ही वेळ आहे दशहतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला उत्तर देण्याची... आणि काही झालं तरी तुम्ही आमच्या मनांत दहशत निर्माण करु शकत नाही आणि आम्ही तुमच्या या भ्याड हल्यांना भीत नाही असा संदेश देणारी ही क्रूती आहे अशा द्रुष्टीकोनातुन हि घटना पाहायला हवी!!
आणि खरंच सलाम मुंबई म्हणणं बरोबर पण आहे!!!!
जय हिंद!!!
बिपिनने हा मुद्दा मांडला होता.
" सलाम मुंबै" अश्या गोंडस नावाखाली हे मिडिया वाले मुंबैच्या दु:खावर आपली पोळी भाजून घेतील.
http://kalekapil.blogspot.com/
प्रतिक्रिया
सहमत!!!!
असहमत!
हे 'कामावर
मुंबईकरां
आपल्या
कालच