शंकर अभ्यंकर यांचे ओवीबद्ध रामायण
शंकर अभ्यंकर हे सध्या वाल्मीकि रामायणावर 'शंकर रामायण' या नावाचा एक टीकाग्रंथ लिहित आहेत आणि त्याच्या जवळ जवळ १५,००० ओव्या लिहून झाल्या आहेत. मंगलाचरणच एक हजार ओव्यांचे आहे आणि त्यात हे 'शंकर रामायण' कशासाठी आणि आधीची रामायणे कोणती याचा सविस्तर उहापोह आहे. मिपाकरांच्या सोयीसाठी त्यातील काही ओव्या खाली उधृत करीत आहे. अधिक माहितीसाठी अभ्यंकरांच्या आदित्य प्रतिष्ठान चा २०१४ चा आदित्य दीप हा दिवाळी अंक पहावा (4/15 वेदांतनगरी सोसायटी कर्वेनगर पुणे ४११०५२). माझी खात्री आहे कि गदिमांच्या गीत रामायणाप्रमाणेच हे 'ओवी रामायण' सुद्धा मराठी मनाचा आणि ह्रदयाचा ठाव घेईल.
वाल्मीकींची जी रामकथा । ती पराक्रमाची गाथा । अनुसरली नाही प्रथा । हे शल्य माझे मनी । २।
श्रीरामायण हा इतिहास । युगांचा दिव्य प्रवास । दावावया सर्व लोकांस । 'शंकर रामायण' । ६।
इतिहासासी प्रमाण । रामकथा परम पावन । त्याचेच झाले विस्मरण म्हणोनी 'शंकर रामायण' । ७।
हे 'शंकर रामायण'। इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन । दावाया संस्कृति दर्पण । धर्म नीतीचा । ८।
'शंकर रामायणा'चा हेतू । बांधावा इतिहास सेतू । युवा पिढीचाच क्रतु । सत्पथी चालविण्या । २१०।
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान.
आनंददायक माहिती
शंकर अभ्यंकर यांचे ओवीबद्ध रामायण
"माझी खात्री आहे कि
शंकर अभ्यंकर
स्पष्टच विचारतो, राग नसावा..
-१
छानच ! वाचायला आवडेल!