Skip to main content

एनआरआयची भारतभेट..

लेखक गवि यांनी बुधवार, 18/03/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं.. अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते. वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्‍या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं. माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं. प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील. भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अ‍ॅटिट्यूड असतात. परदेशात राहणार्‍या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का? काही प्रश्न, टु बिगिन विथः -ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का? -मत्सर हेवा दिसतो का? -भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का? -इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का? -तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का? -तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का? -भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात? -नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का? -चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का? -परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का? अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच. परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.

वाचने 66346
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

In reply to by विकास

भलामोठ्ठा अमेरिकन क्याटफिश की कायसासां म्हणतात तो!!! :)

@विकास +१०० एन आर आय पेक्षा आर एन आय ( रेसिडेंट नॉन इंडियन्स) जास्त डोक्यात जातात. माझे बरेचसे एन आर आय मित्र आजही जमिनीवर पाय ठेवून आहेत. घरी आल्यावर सरळ आमटी भात खायला सुद्धा अनमान करीत नाहीत. किंवा उगाच I am doing well ची शेखी हि मिरवत नाहीत. अर्थात सगळेच तसे नाहीत. एका मित्राच्या बायकोने मुलाचा पार्श्वभाग धुण्यासाठी बिस्लेरीचा वापर केला वर इन्फेक्शन कसे परवडत नाही हेही सांगितले ते डोक्यात गेले. हा मित्र माझ्याकडे बघून हताशपणे हसला.

In reply to by सुबोध खरे

एका मित्राच्या बायकोने मुलाचा पार्श्वभाग धुण्यासाठी बिस्लेरीचा वापर केला =)) कठीण आहे! जवळपास २००५/०६ पर्यंत मी बिसलेरी वगैरे कधी वापरले नाही. आता बाहेर असताना वापरावे लागते. घरी असलो की फिल्टर्ड पाणी जे सगळेच घेतात तेच... विमानतळावरून पुण्याला जाताना फुडमॉल मधे न चुकता इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो. ;)

In reply to by विकास

जवळपास २००५/०६ पर्यंत मी बिसलेरी वगैरे कधी वापरले नाही. आता बाहेर असताना वापरावे लागते. घरी असलो की फिल्टर्ड पाणी जे सगळेच घेतात तेच...
पिण्यासाठी की...

In reply to by विकास

इम्युनायझेशनचा डोस म्हणून एक वडापाव खातो. हॅ.. हॅ... हॅ... आम्ही जीवाणू-विषाणूंना घाबरणारे नाही ! :) ;) विमानतळावरच नाही तर मुंबईची फेरी मारतानाही आमच्या गाडीला श्रीदत्त वडापाव, इ खायला ऑटोमॅटीक ब्रेक लागतो ! इतकेच काय, विमानातही कॉफीबरोबर "थ्री क्रीम्स अँड थ्री शुगर्स, प्लीज" अशी मागणी हवाईसुंदरीकडे करून ती त्या धक्क्याने पडतापडता कशी सावरून घेते हे पण नेहमीच बघतो ! ;) अर्थात, ते उगाचच नाही, हां ! साखरेला घाबरणारा नसल्याने ते सर्व विमानातल्या कडू कॉफीत घालून तिला गोड करून पितो ! :)

@ विकास मस्त पूर्वग्रहविरहित समतोल प्रतिसाद ! अजून थोडे काही... दोन दशकांपेक्षा जास्त वेळ एनाराय असलो तरी एक पाय सतत (दर दोनचार महिन्यांनी) भारतात असल्याने नातेवाईक, मित्र अथवा जवळच्या ओळखीच्या मंडळींचे सुरुवातीची तीन-चार वर्षांतले परदेशाबद्दलचे कुतुहल सोडले तर तसा काही खास फरक वाटला नाही. इलेक्ट्रॉनिक्स, सिंथेटिक कापड आणि चॉकलेटे याबाबतीत १९९० पर्यंत भारत आणि परदेशांत फार मोठा फरक होता त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतात आकर्षण होते आणि त्या गोष्टी भेट म्हणून आणायला आनंद वाटत असे. त्यानंतर येथे येताना काय भेट आणावी असा यक्षप्रश्न सतावू लागला. किंबहुना मोठ्या आवडीने एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणावी तर "हे मी गेल्या महिन्यातच नेटवरून मागवून घेतले आहे." असे ऐकून भ्रमनिरास होऊ लागल्यावर मुलाला "अकाउंटमध्ये दर वाढदिवसाला पैसे जमा करतो, त्याचे तुला काय घ्यायचे ते घे नाहीतर कुठेतरी गुंतव, नाहीतर इतर तुला आवडेल असे काही कर." असे सांगून दोन्ही बाजूंना पटणारी समजूतदार पळवाट काढली आणि सुखी झालो ! :) १९९० नंतर भारतात खाजगी क्षेत्रात लक्षणीय बदल झाले. लोकांच्या, विषेशतः तरुणाईच्या, हाती पैसा खुळखुळू लागला. आयटी कंपन्यांच्या झकपक इमारती, त्या बघून इतर खाजगी इमारतीत झालेली सुधारणा, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, इ आले. काही सन्माननिय अपवाद सोडता यापैकी बरेच हे परदेशातल्या नामवंत काऊंटरपार्टस् पेक्षा आकाराने आणि झगमगाटीत कमी पडत असले तरीसुद्धा १९९० पुर्वीचा भारत नजिकच्या आठवणीत असल्याने आनंद वाटू लागला. परदेशात बोलताना याचा सहजपणे अभिमानाने उल्लेख केला जाऊ लागला. त्यात भारताची वेगाने सुधारणारी अर्थव्यवस्था आणि संगणकव्यवसायातले वाढणारे वजन यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी दखल भर घालत होती. एक शल्याची सल मात्र परदेशात गेल्याने निर्माण झाली, सतत वाढत राहीली आणि आजही वाढत आहे. ती म्हणजे भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली दुरावस्था... मुळात खडबडीत व खड्ड्यांनी भरलेले आणि पावसाच्या दोन थेंबांतही विरघळणारे रस्ते; सरकारी इमारत म्हणजे अनेक वर्षे दुरुस्ती न केलेली, मळखाऊ, पिचकार्‍यांनी भरलेले जिने असलेली आणि अस्वच्छ व विस्कळीत आवार असलेली असणारच; या गोष्टी आजही तशाच आहेत. विकसित देशांतच नव्हे तर भारतापेक्षा बरेच कमी सधन असलेल्या अनेक देशांमध्ये असलेली सरकारी/खाजगी ठिकाणची स्वच्छता आणि टापटीप पाहिली की अजून विषण्ण वाटते. आपल्या येथे यात जवळच्या भविष्यात फार मोठा फरक पडेल अशी काही लक्षणे दिसत नाहीत. :( तसे व्हावे असे मात्र नेहमीच तीव्रतेने वाटत आले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"एक शल्याची सल मात्र परदेशात गेल्याने निर्माण झाली, सतत वाढत राहीली आणि आजही वाढत आहे. ती म्हणजे भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली दुरावस्था... मुळात खडबडीत व खड्ड्यांनी भरलेले आणि पावसाच्या दोन थेंबांतही विरघळणारे रस्ते; सरकारी इमारत म्हणजे अनेक वर्षे दुरुस्ती न केलेली, मळखाऊ, पिचकार्‍यांनी भरलेले जिने असलेली आणि अस्वच्छ व विस्कळीत आवार असलेली असणारच; या गोष्टी आजही तशाच आहेत. विकसित देशांतच नव्हे तर भारतापेक्षा बरेच कमी सधन असलेल्या अनेक देशांमध्ये असलेली सरकारी/खाजगी ठिकाणची स्वच्छता आणि टापटीप पाहिली की अजून विषण्ण वाटते. आपल्या येथे यात जवळच्या भविष्यात फार मोठा फरक पडेल अशी काही लक्षणे दिसत नाहीत. Sad तसे व्हावे असे मात्र नेहमीच तीव्रतेने वाटत आले आहे."
मधुनच ३-४ तास गायब होणारी विज (ट्रान्सफॉर्मर उडाला...) आणि १-२ दिवस जाणारे पाणी (पंप बिघडला..) हे पण अजूनही जसेच्या तसे आहे...निदान डोंबिवलीत तरी. पण ह्याबद्दल बोललात तर मात्र तुम्ही चढेल आणि उद्धट एनाराय ठरता, याचा अनुभव घेतलाय, ते पण एमायडीसीच्या बाहेरही ना गेलेल्यांकडून. त्यामुळे वरील गोष्ट खूप सलत असुनही हे बोलण्याची मात्र माझी हिम्मत नव्हती...अर्थातच तुमच्या हिम्मतीची दाद देते!! तसेच जरा गर्दीच्या ठिकाणी आवर्जून दिले जाणारे धक्केही ...माफ करा मला...पण बदललेले नाहियेत. अर्थात आधी मी ह्या गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार असायचे , पण पोस्ट एनाराय , असा धक्का बसला की अक्षरशः हेलपाटून जाते. गवी तुमच्या विषयावर हे काही फार मोलाचे मत नाहीये पण ई. एक्कांच्या प्रतिसाद वाचून हे चटकन मनात आले. बाकी, वरील एका प्रतिसादात 'बाहेरचे पाणी बिनदीक्कत पितो' असे वाचले , पण हल्ली तर तिकडचे लोकही घराबाहेर पडले तर फिल्टर्ड किंवा बाटलीतले पाणीच पितात बहुधा. तसेच ते एनाराय ने बाटलीतल्या पाण्याने पोराचे पार्श्वभाग धूणे, हे 'हल्ली मुली बघायला गेल्यावर त्या, घरात डस्टबीन किती असे विचारतात, अश्या टाईपचे अर्बन लिजण्ड वाटतय.

In reply to by स्वप्नांची राणी

हे 'हल्ली मुली बघायला गेल्यावर त्या, घरात डस्टबीन किती असे विचारतात, अश्या टाईपचे अर्बन लिजण्ड वाटतय. (सुदैवाने नात्यातील अथवा अगदी जवळच्या नाही पण) माहीतीतील मुलींबद्दल आणि अगदी अधिकृत स्त्रोतांकडून ऐकलेले असल्याने, असे म्हणावेसे वाटते की दुर्दैवाने हे अर्बन लिजंड नाही... :( अर्थात त्याच बरोबर प्रत्येक मुलगी असे विचारेल असेही नाही.

>>>>परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे. गविंच्या वरील विधानामुळे 'एन. आर. आय' म्हणून गल्फात ३४ वर्षे काढलेला मी प्रतिसाद देण्यास, मतं व्यक्त करण्यास, अनुभव वाटून घेण्यास 'नालायक' (disqualified ह्या अर्थाने) आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती लक्षात घेऊन सर्वप्रकारचे अनुभव सर्वांना येतात आणि ते त्या त्या व्यक्तीसाठी वास्तव असतं. पण सार्वत्रीकरण, सामान्यीकरण करणं टाळावं. माझ्या पाहण्यात एकच असा मित्र आला जो अमेरिकेच्या प्रेमात भारतात असल्यापासून होता आणि त्याचे अंतिम ध्येय अमेरिकेत स्थायिक होणे हे होते. त्याचे कारण देताना तो, अमेरिकेत मुलांचे शिक्षण चांगल्याप्रकारे होउ शकते असा त्याचा युक्तीवाद होता. ज्या शिक्षणाच्या बळावर तो अमेरिकेसारख्या जगातील बलाढ्य आणि समृद्ध देशात पाय ठेवणार होता ते त्याचे शिक्षण भारतातच आणि बडोद्यात झाले होते. पुढे तो अमेरिकेत गेला, स्थायिक झाला वगैरे वगैरे वगैरे. मी वरील देशांमध्ये राहिलेलो नाही तरी पर्यटननिमित्ताने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, इजिप्त, बँग्कॉक वगरे देशांमध्ये फिरलो आहे. तिथल्या भारतियांमध्ये, ज्यांच्या घरी राहण्याचा प्रसंग आला, मला प्रेमाचाच अनुभव आला. कुठे कडवटपणा, दिखावा, भपका वगैरे वगैरे जाणवले नाही. एन आर आय बद्दल भारतियांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून किंवा ऐकीव माहितीतून किंवा न्यूनगंडातून बरीच नकारात्मक भूमिका आढळून येते. ह्यावर आपले नाट्यसृष्टीतील ख्यातनाम नटसम्राट मोहन जोशी ह्यांच्या बरोबर जबरदस्त वादविवाद झाला होता. त्यांच्या मते अमेरीकेतील भारतिय, आपल्या आई-वडिलांना अमेरिकावारी घडवितात, ते त्यांचा तिथला भपका दाखविण्यासाठीच. मी सांगितलं असं नसतं. आई-वडीलांनी जे शिक्षण दिलं, संस्कार दिले त्याचे आपण केलेले चीज त्यांच्या नजरेखाली घालून, त्यांच्याकडून शाबासकी मिळवावी, आपली कृतज्ञता व्यक्त करावी, एव्हढा शुद्ध हेतू असतो. शिवाय आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांना, ज्यांनी स्वतः खस्ता खाऊन आपल्याला मोठं केलं त्यांना, आपल्याकडून जमेल तसे सुख आणि आराम मिळवून द्यावा हा सदहेतू असतो. अमेरिकेचे जाऊ द्या. गावाकडून मुंबईत येऊन गिरणीत नोकरी करणारा आणि चाळीच्या एका खोलीत संसार करणाराही, मुंबईत स्थिरस्थावर झाल्यावर, आपल्या आई-वडिलांना मुंबईत आणून मुंबईचा फेर फटका घडवितो. चाळीच्या एका खोलीतील संसारात तो काय भपका दाखवत असतो? तर असो. व्यक्तीतितक्या प्रकृती हेच खरे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गल्फात ३४ वर्षे काढलेला मी प्रतिसाद देण्यास, मतं व्यक्त करण्यास, अनुभव वाटून घेण्यास 'नालायक' (disqualified ह्या अर्थाने) आहे.
खरं आहे. ती म्हणच आहे ना, 'गल्फात सोन्याच्या चिपा' शिंचा उपयोग काय? :) (ह. घ्या पेठकरकाका!!)

In reply to by पिवळा डांबिस

आसं कसं, आसं कसं ??? गल्फातले रस्ते सोन्याच्या चिपानी कवर केलेले हाय्त आनि घराच्या आवारात झुडूप लावाय्ला खणलं की लगेच तेल वर उडायला लागतंय. हात कुटं ?

In reply to by पिवळा डांबिस

गल्फातून येताना आणलेल्या 'ग्रँड'ला जागून मी असं सर्टिफिकेट देतो की गल्फातले यनाराय फार भले असतात. भारतभेटीला आल्यावर झक्क चिकन-मासे खिलवतात, एकदम 'ग्रँड' कट्टा वगैरे करुन सगळ्यांना भेटतात. त्यामानानं अमेरिकेतले येनाराय मात्र 'या आमच्या क्यालीफोर्नियाला..' अशी अशक्य कोटीतली आमंत्रणं देतात. :P (पळाऽऽ तेज्यायला! नायतर डांबिसकाका तिथं बसून कानफाडून काढतील. :D )

In reply to by धमाल मुलगा

१००% खरे आहे .

In reply to by धमाल मुलगा

गल्फातले लोकं ग्रॅन्ड आहेतच, त्यात संशय नाही.
नायतर डांबिसकाका तिथं बसून कानफाडून काढतील.
नाय बॉ. पण तुला कानफडायचा विषय निघायचा अवकाश की लगेच इथे, "काका तुम्ही कशाला उगाच? त्या धम्यालाच कानफाटवायचं ना? मी करतो!!" असं म्हणून उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियावासी मिपाकर व्हॉलेंटियरांची वेटिंग लिश्ट लागलीये. ये इकडे, मग दाखवतो मज्जा!! :)

In reply to by पिवळा डांबिस

काय क्यालीफॉर्निया है का टेक्सास? जो उठतो तो हाणायचीच बात करतोय! अरे हम का मंदीर का घंटा है का? जो भी आयेगा, बजा के चला जायेगा? =))

In reply to by धमाल मुलगा

मंदीर का घंटा
यावरून मराठ्यांनी पोर्तुगीज़ चर्चमधून लुटलेल्या अन नंतर देवळांत बसवलेल्या काही घंटांची आठवण झाली. ते गझनीचा मेहमूद वगैरे लोक सोनेनाणे लुटायचे, आमच्या लोकांनी लुटून लुटून लुटलं काय तर घंटा =))

अल्पावधित पन्नाशी पार केल्याबद्द्ल. सर्व एनाराय, येनारनाय संघटनेतर्फे आणि मिपा पडीक संघटने तर्फे फारीनची चाकलेटा द्येवन सत्कार....

In reply to by खटपट्या

@ फारीनची चाकलेटा द्येवन सत्कार.... >>> चालेल..(त्यांना ;) ) आनी .. आमच्या कडून ह्यो गरमा गरम भजींचा घाना, https://lh6.googleusercontent.com/VmOEGr3Mr-kiaGh16Oy46pCFwmPxxfKClS_T4tSL-Nk=w466-h829 कॉलिश्ट्रॉलचा इचार न करता ,कना कना हाना! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नेमका जेवायच्या टायमाला भजीचा फोटो टाकून जठराग्नी चाळवल्याबद्द्ल त्रिवार णीषेढ..

In reply to by अत्रुप्त आत्मा

तांब्यापिठाधिपती महंतांनी मठाचे अत्युच्च सन्मानचिन्ह असलेल्या जिल्बीचा हक्क डावलून भ़जींच्या घाण्याचा फोटो दाखवल्याबद्दल त्येंचा मणापासूण टीव्र णीषेढ +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तांब्यापिठाधिपती महंतांनी मठाचे अत्युच्च सन्मानचिन्ह असलेल्या जिल्बीचा हक्क डावलून भ़जींच्या घाण्याचा फोटो दाखवल्याबद्दल त्येंचा मणापासूण टीव्र णीषेढ
तांब्यापिठाधिपतींच्या णिषेढास तीव्र अणुमोदण.. :))

मस्त विषय काढलात हो गवि...!! थोड्याफार प्रमाणात माझे अनुभव सांगतो. माझे बरेचसे मित्र पल्याड सेटल आहेत. चार / पाच वर्ष मी सुद्धा पल्याड होतो आणि आयटी क्षेत्रात असल्याने हे अनुभव रोजचेच आहेत. मित्रांकडून विचित्र अनुभव कधीच नाही आला. पण आयटीतल्या अर्धहळकुंड्पिवळ्या कॅटेगिरी लोकांकडून मात्र बरेचसे अनुभव आले. असाच एकजण डेन्मार्कला २-३ महिन्यांसाठी जाऊन आला आणि आल्यावर बोलताना लगेच अ‍ॅक्सेंट मारत होता. त्याला एवढेच म्हंटले की बाबारे तिकडे इंग्रजी जास्त कोण बोलत नाहीत मग हा अ‍ॅक्सेंट कोठून घेतलास? आणि काही महिन्यांपुर्वी तू चार महिने चेन्नाईला होतास. त्यावेळी बरे दक्षिण भारतीय अ‍ॅक्सेंट नाही उचललास ... असे भरपुर नग भेटतात. काही प्रश्नांची माझ्यापरीने उत्तरे.. -ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का? मी तिकडे असताना माझ्याशी बोलताना काही दुरच्या नातेवाईकांचा तसा अ‍ॅटिट्यूड भासला. पण ओवरऑल तितकासा अनुभव नाही. मी इकडे असताना मला एक-दोन वेळा खरोखर वाटले की माझे मित्र/नातेवाईक तिकडे खूप enjoy करत आहेत आणि मी मात्र पुर्ण आठवडाभर कामं करत आहे. मूळ असे वाटण्यामागे कारण माझा तिकडचा चार वर्षातला काळ. भारतात माझा दिवस ६ ला सुरू होतो आणि रात्री ११ ला संपतो. रोज ऑफिसला जा-ये करताना लागणारा वेळ, ऑफिसमध्ये आपले client ने सांगितलेले काम + कंपनी पॉलिसी प्रमाणे करावे लागणारे इतर काम यामुळे बराचसा वेळ कामात जातो. पण परदेशात असताना मला फक्त ८ तासात होईल एवढेच काम असायचे (आणि भारतीय मुळ कंपनीतले काम फारच कमी असायचे) + ऑफिसला जा-ये करायला फक्त १५ मि. लागायचे. यामुळे भरपुर असा वेळ स्वतःसाठी + कुटुंबासाठी असायचा. यामुळे तिकडचे life style इथल्यापेक्षा खूपच छान असे नेहमीच वाटते. पण याची जाणीव मला तिकडून इकडे आल्यावर झाली. तिकडे असताना संध्याकाळचा वेळ याच्याशी (skype किंवा google+ वर) गप्पा मार किंवा फोन कर यात जायचा. प्रत्येक विकांताला कोठेतरी ट्रिप व्ह्यायची नाहीतर सोशल गॅदरींग्ज व्हायचे यामुळे खूप मजेत वेळ जायचा. पण हीच गोष्ट भारतात आल्यावर मुळीच शक्य झाली नाही. एकतर skype वर काम असेल तरच मी login करतो आणि त्यात कोणी उगाच पिंग केले तर सरळ सरळ त्याला ignore करतो असेच झाले आहे. (पण मी तिकडे असताना मात्र स्वतः दुसर्‍याला गप्पांसाठी बोलवायचो आणि mostly माझ्यासारखेच onsite असणारे माझ्याशी बोलण्यास तयार व्हायचे.). भारतात आल्यावर विकांत ट्रिप खुपच कमी झाल्यात. याचे मूळ कारण म्हणजे ज्या गोष्टी मी इतर दिवशी करू शकत नाही त्यासर्व शनीवार/रवीवारी कराव्या लागतात. तसेच कोठेही गेले तरी गर्दी या कारणामुळे बर्‍याच वेळा जाण्याची इच्छाच होत नाही. सोशल गॅदरींग्ज जवळ जवळ नाहीतच कारण माझ्यासारखीच परीस्थिती इतरांची असल्याने प्रत्येक विकांताला कोणाला तरी कोठली तरी personal commitment असायचीच. त्यामुळे तिकडे life-style चांगले आहे यावर मी ठाम आहे. अर्थात माझ्या कोठल्याही तिकडच्या नातेवाईकाच्या /मित्राच्या घरची जबाबदारी मला नसल्याने मी तसा अ‍ॅटीटयुड कोणालाच दिला नाही. पण समजा एखाद्याच्या घरची जबाबदारी वारंवार आली आणि मला थोडेफार भोगावे लागले तर माझ्याकडून तसा अ‍ॅटीटयुड दिला जाऊ शकतो. -मत्सर हेवा दिसतो का? थोडाफार मत्सर हेवा दिसतोच. ह्याला आपण काही करू शकत नाही. afterall we all are human beings. मी सुद्धा बर्‍याच वेळा तिकड्याच्या लोकांचे फेसबूक फोटो (barbeque, trips, cruise) वगैरे पाहून जळतोच. -भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का? विकास यांनी म्हणल्याप्रमाणे नक्कीच कमी झाले आहे. -इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का? गिफ्ट मिळणे हा उद्देश बहूतेक नसावा. पण परदेशी सेटल होता येईल का असा उद्देश मात्र मला बर्‍याच वेळा दिसला. -तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का? -तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का? तितका अनुभव नाही. पण नव-नवीन गॅझेट्स मात्र आवर्जून दाखवली जातात. यात काही श्रीमंतीचे प्रदर्शन होत असावे असे वाटत नाही. -भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात? कधी नाराजी जाणवली नाही कारण कधी परदेशातून आल्यावर विदाऊट गिफ्ट कोणाकडे गेलो नाही तसेच कोणी माझ्याकडे विदाऊट गिफ्ट पण आले नाही. त्यामुळे हा प्रश्न पास... -नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का? उत्तर विकास यांच्याप्रमाणे : कधी कधी होते. त्यात गैर काहीच नसते. योग्य माहिती असल्यास मदत करतोच. -चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का? अजिबात नाही. भारतभेट नको असे वाटत नाही पण काहीजणांकडे उगाचच गेलो असे वाटते. -परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का? पास - कारण असे कधी कोणाच्या बाबतीत अनुभवले नाही. बाकी एक गोष्ट मात्र मला वारंवार जाणवली. तिकडच्या NRI लोकांचे देश (भारत) प्रेम. तिकडे भारतात काय होतंय आणि काय नाही यावरच लोकांचा डोळा असतो. बराचसा वेळ भारत कधीच सुधारणार नाही किंवा त्यासाठी काय केले पाहिजे अशा (फक्त) चर्चा करण्यात जातो. उगाच कोणीतरी कोठल्यातरी भारतीय NGO शी संबंध ठेवून असतो तो वर्षातून हक्काने Donation वसूल करतोच. पण तोच माणूस इकडे सुट्टीवर किंवा कायमचा आला की NGO कडे पहात सुद्धा नाही. तिकडेच घर शोधत असताना भेटलेल्या एका NRI ने भारत किती छान आणि उगाच कशाला येथे येता यावर माझे बौधीक घेतले होते. अर्थात मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत असल्याने "एवढे आहे तर भारतात का बरे जात नाही परत तुम्ही?" असा प्रश्न विचारण्यास धजावलो नाही.

छान प्रतिसाद रे योग्या. हल्लीची पिढी भारतावर जरा काही टिका झाली की लालबुंद होते.कारण- १)दुधासाठी रांगेत उभे राहणे ह्यांनी पाहिलेले नाही. २)टेलिफोनसाठी ४/५ वर्षे प्रति़क्षायादीत असणे अनुभवलेले नाही. ३)जुन्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या फियाट्,अ‍ॅम्बेसेडोर घेण्यासाठी ह्यांनी डीलरच्या पायर्या झिजवलेल्या नाहीत. ४)लांबच्या प्रवासासाठी ४/४ तास रांगेत उभे राहणे,आयत्यावेळी रेल्वे प्रवासासाठी टी.सी.ची मनधरणी केलेली नाही. हे अनुभवलेल्या पिढीला अमेरिका,युरोप स्वर्ग न वाटतो तर नवल!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आभारी आहे ... मला योग्या म्हणून माझी आजी हाक मारायची. आज तिची आठवण तुमच्यामुळे झाली. तुमचे आभार... पण एक शंका आहे...हल्लीच्या पिढीलाही अमेरिका/युरोप स्वर्गच वाटतो..जरी त्यांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनुभवले नसते तरी..याचे कारण काय असावे माईआजी?

In reply to by योगी९००

लोक परदेशात जायचे कारण म्हणजे शॉपिंग मॉल्स्,गाड्या व आधुनिक राहणी हे वरवरचे आहे.पुण्याहून कलकत्त्याला जायचे नोकरीसाठी तर १० वेळा विचार करावा लागेल पण न्युयॉर्कहून तुझ्या त्या लॉस एंजेलिसला जाताना जास्त विचार नाही करावा लागणार.विचार म्हणजे-पाणी,शिक्षण्,रस्ते,ईतर कामे,भाषेच्या समस्या,राहणीमान ईत्यादी .काही वेगळ्या समस्या तेथे जरूर असतील पण त्या तुमच्या करियर किंवा नोकरी-धंद्याच्या आड येणार नाहीत. अमेरिकेत,युरोपात नोकरीसाठी होणार्या मुलाखती भारताच्या तुलनेत खूपच सरळ-सोप्या असतात असे ऐकले आहे. येथील वाढती लोकसंख्या व ढासळते राहणीमान ह्यामुळे नविन पिढीला अजूनही अमेरिका,युरोप स्वर्ग वाटत असेल तर नवल नाही.

इस्पीकचा एक्का,पेठकर काका ह्यान्च्याशी सहमत. माझे बरेच मित्र लवकर आयटी च्या क्रुपेने परदेशात गेले. तेव्हा मला सुद्धा खुप वाटयचे आपन सुद्धा जावे असे. सध्या मी सुद्धा यु.के. मधे आहे (पुन्हा आयटीची क्रुपा)(ह्यात स्वताचे कौतुक म्हनुन सान्गत नाहिये). परदेश कितीही सुन्दर असला तरी आपला देश तो आपला देश असतो. इथे कितीही सर्व छान छान असले तरी इथे कायम रहावे असे वाटत नाहिये मला. आता काही लोकाना परदेशात जाउन आल्यावर आपल्या देशाला नावे ठेवायची खुप घानेरडी सवय असते. पण त्याला आपण काही करु शकत नाही. मी जेव्हा जुलै मधे परत जाइन तेव्हा मी मात्र असे काही करनार नाही आणी परदेशात गेल्याचा भपका सुद्धा मारनार नाही. राहता राहीली गोश्त चॉकलेट्स ची. आतापर्यन्त मी इथे जी चॉकलेट्स खाल्ली त्यान्च्यापेक्शा मला आपले डेरी मिल्क चान्गले वाटले. त्यामुले एक समस्या माझ्या समोर निर्मान झालिय. इथुन जाताना नक्की कोनते चॉकलेट घेउन जावे हे मिपा वरच्या जानकारानी सान्गितले तर बरे होइल.

In reply to by अभिजीत अवलिया

किस, टॉबलरॉन, किट्कॅट वगैरे वगैरे ऑल टाईम फेवरीट चॉकलेट्स आहेत. त्यात चॉकलेट्सच्या चवीपेक्षा ह्या विश्वविख्यात नांवांचेच महात्म्य अधिक आहे. मी अजून माझ्या लहानपणीच्या रावळगाव टॉफीची चव विसरलेलो नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

अल्पेन्लिबे नावाने आता जी गोळी मिळते , तिच्यात आणि रावळगावमध्ये (चव, टेक्स्चर, ए.) कमालीचे साम्य आहे. रावळगाव नाय मिळत आता पण अल्पेन्लिबेचे मात्र काय कौतुक!

In reply to by अभिजीत अवलिया

राहता राहीली गोश्त चॉकलेट्स ची
गोश्त चॉकलेट्स आणायची असल्यास ती पोर्क किंवा ल्याम्बची आणा. बीफची चॉकोलेटे मुंबईतले कस्टमवाले पकडण्याची शक्यता आहे.

In reply to by आजानुकर्ण

बीफची चॉकोलेटे मुंबईतले कस्टमवाले पकडण्याची शक्यता आहे.
नै हो कर्ण काका.. बीफ खायला बंदी नै कै.. फक्त गोवंशहत्याबंदी आहे. (तसेही तो गोवंश अभारतीय असल्याने त्यास मारणे/खाणे इथे चालून जावे असे वाटतेय.. :) )

एनआरआय पब्लिक आपल्या नेटिव्ह कंट्रीला रिटर्न आल्यावर त्यांना मराठी वर्डस् रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं असं ऐकलंय.

In reply to by श्रीगुरुजी

मी भारतात सुटी घेऊन येतो तेव्हा माझं मराठी ऐकून लोकांना कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतं अन परदेशात न गेलेल्यांचं आंग्लाळलेलं मराठी ऐकून मला आश्चर्य वाटतं अन वाईटही वाटतं. कदाचित मी भारतात राहत असतो तर माझीही तशीच अवस्था असती.

In reply to by अनुप ढेरे

हा हा हा.... अहो अनुपराव एनाराय हे नाईलाजाने एनाराय झालेत. ते भारतात राहून परदेशाची आशा धरत नव्हते कै. ;) त्यामुळे ते जिथे कुठे आता आहेत तिथे राहून भारतीयपण जपतात! (अणुपरावांचा फ्याण) आजानुकर्ण

गवि, तुमच्या धाग्याचं आता शतक झालंय, अभिनंदन! तुम्ही उपस्थित केलेले इतर प्रश्न मला एका विशिष्ट चश्म्यातून विचारलेले वाटले म्हणून त्यांना उत्तरं देणार नाही. परंतु तुमचा शेवटचा प्रश्न जेन्युईन वाटला. आणि इथे अनेक तरूण एनाराय मिपाकर आहेत त्यांनाही पुढे हा प्रश्न फेस करायला लागेल म्हणून उत्तर देतो आहे...
परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
नाही, असं नसतं. प्रथम फक्त नवरा-बायको आणि नंतर मुलं लहान असतांना कधीही भारतात येणं शक्य असतं. रजा काढली, मुलं काखोटीला मारली आणि आलं भारतात असं करता येतं. पण मग मुलं शाळेत जाऊ लागली की त्यांची शाळा बुडवून येणं उचित नसतं. ख्रिसमसची सुट्टी शाळांना जेमतेम दोन आठवडे असते. त्यात प्रवासाला लागणारा वेळ, जातांना आणि परत आल्यावर येणारा जेटलॅग (मुलांना जेटलॅगमधून रिकव्हर व्हायला मोठ्यांपेक्षा सहाजिकच जास्त दिवस लागतात) इत्यादि गृहीत धरून त्या सुट्टीत येणं प्रॅक्टिकल नसतं. मग राहता राहिली त्यांची समर व्हेकेशन, ती दीड दोन महिन्यांची असते. पण गंमत अशी आहे की अमेरिकेत समर व्हेकेशन जून अखेरीला सुरू होते. त्यानंतर यायचं तर भारतात धो धो मान्सून कोसळत असतो. मुलांची कुठे जायची-यायची पंचाईत होते. पुन्हा तोपर्यंत तिथल्या भाचे-पुतण्यांची शाळा-क्लास वगैरे सुरू होतात त्यामुळे ती मुलं बराचसा वेळ घराबाहेरच असतात. मग इथली मुलं तिथे नुसती घरी बसून कंटाळतात. पुन्हा इथली मुलं प्रायमरी स्कूल संपवून सेकंडरी-हायस्कूलला गेली की इथे समरमध्ये त्यांचेही खेळांचे वगैरे कॅम्प्स असतात. त्यांच्या त्या गरजेकडेही लक्ष देणं पालक म्हणून कर्तव्य असतं. मग नवरा-बायको दोघांपैकी एकाने येणं आणि दुसर्‍याने इथे राहून मुलांकडे लक्ष ठेवणं हे प्रॅक्टिकल सोल्यूशन म्हणून स्वीकारलं जातं. ते फार खुशीने स्वीकारलेलं नसतं. आणि इतकं करून वर जर त्याला तिथली लोकं झेंडावंदन वा फॉर्मॅलिटीज वगैरे समजली तर मग चीड येऊ शकते. मग जर असं कुणाला वाटलं की,'अरे मी माझी रजा वापरणार, माझा खर्च करून भेटीसाठी तिथे येणार आणि वर हे झेंडावंदन केलं असं म्हणणार, मग काय गरज आहे मला?' तर ते कटू असलं तरी फार अक्षम्य म्हणता येईल का? (मला तरी असं झेंडावंदन वा फॉर्मॅलिटी असं माझे मित्र वा नातेवाईक कधीच म्हणालेले नाहीयेत, यापुढे जर माझ्यासमोर म्हणाले तर कानाखाली जाळ काढीन!!) :) बाकी एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते की मला इतक्या वर्षांत माझ्या नातेवाईक वा मित्रमंडळींकडून कधीच वाईट अनुभव आलेले नाहियेत. सर्व मंडळी अगदी अगत्याने वागवत आली आहेत. अतिशय समर्थपणे माझं आदरातिथ्य करत आली आहेत. अगदी मिपाकट्ट्यांनासुद्धा मुंबईकर आणि पुणेकर मिपाकरांनी मला साधं माझं कट्ट्याचं कॉन्टॄब्युशन दे़खील देऊ दिलेलं नाहिये आणि त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे...

In reply to by पिवळा डांबिस

पूर्णपणे सहमत. आमच्याकडे सलग दोन आठवड्यापेक्षा शाळा बुडल्यास वर्ष रिपिट करावे लागू शकते अथवा शाळेतून नाव काढले जाते आणि परत अ‍ॅडमिशन प्रोसेस मधून जावे लागू शकते! त्यामुळे ख्रिसमस ऑलमोस्ट बादच. कारण शाळेला सुट्टी फक्त आठवडाभर (२४ ते १). अगदीच लग्नकार्य असले तर तारेवरची कसरत करून आणि भरपूर परमिशन्स काढण्याची डोकेदुखी करून जावे लागते. मला तरी असं झेंडावंदन वा फॉर्मॅलिटी असं माझे मित्र वा नातेवाईक कधीच म्हणालेले नाहीयेत, यापुढे जर माझ्यासमोर म्हणाले तर कानाखाली जाळ काढीन!! मला देखील असला अनुभव आलेला नाही, त्यामुळे पुढे पिडांनी म्हणलेल्या प्रतिक्रिया अनुभवण्याचा अनुभव माझ्या मित्र - नातेवाईकांना आलेला नाही! :) अगदी मिपाकट्ट्यांनासुद्धा मुंबईकर आणि पुणेकर मिपाकरांनी मला साधं माझं कट्ट्याचं कॉन्टॄब्युशन दे़खील देऊ दिलेलं नाहिये आणि त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे... च्यायला हे आधी नाही सांगायच होय? ;)

In reply to by पिवळा डांबिस

..पिडाकाका..प्रश्न चष्म्यातून आहेत हे उघड आहे. आपण कोणीच चष्म्याशिवाय शुद्ध प्रश्न उत्तरं करु शकत नाही. ..मी इथे थेट मित्रांच्या तोंडून ऐकलंय की मुलं भारतात यायला स्पष्ट नाही म्हणतात..काही पत्नींनी स्वतः भारतात यायचंच नाहीये असं सांगितलं. झेंडावंदन हाही माझा शब्द नव्हे. ..तरीही लार्जर ऑडियन्सचं मत मागितलं..अनेकांनी दिलं. ..तुमच्या मात्र कानाखालच्या जाळातून बरीच उत्तरं मिळाली. चष्माविरहीत प्रतिसादाचं उत्तम उदाहरण. आभारी आहे.

In reply to by गवि

..पिडाकाका..प्रश्न चष्म्यातून आहेत हे उघड आहे.
तुम्हालाही हे मान्य आहे हे उत्तम. म्हणूनच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या भानगडीत पडलो नाही.
..मी इथे थेट मित्रांच्या तोंडून ऐकलंय की मुलं भारतात यायला स्पष्ट नाही म्हणतात..काही पत्नींनी स्वतः भारतात यायचंच नाहीये असं सांगितलं. झेंडावंदन हाही माझा शब्द नव्हे. ..तरीही लार्जर ऑडियन्सचं मत मागितलं..अनेकांनी दिलं.
तुम्ही ऐकलं असेलही. कुणी काय ऐकलंय याला दुसरी व्यक्ती फारशी चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मित्रांकडून जे काही ऐकलंय त्याचा अर्थ इतकाच की ते त्या तुमच्या मित्रांच्या बाबतीत खरं असावं... पण इथल्याइथेच मी, विकास आणि नाटक्या ह्या तीन इथे दीर्घकाळ राहिलेल्या मिपाकरांनी तुम्हांला आमचं परस्परांशी जुळणारं मत दिलंय की. आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या मित्रांकडून फक्त 'ऐकलंय'. इथे आम्ही तिघांनी स्वतः फर्स्ट-हॅन्ड 'अनुभवलंय'. थोडा तरी फरक आहे की नाही? आता कुठल्या ऑडियन्सचं मत मानायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. शिवाय सगळे आम्हां तिघांसारखे असतील असं नाही किंवा सगळे तुम्हाला भेटलेल्या ऑडियन्ससारखे असतील असंही नाही. व्यक्ति तितक्या प्रकृती. मी फक्त आमच्या बायका-मुलांवर सरसकटीकरणामुळे होऊ पाहणारे संभाव्य आरोप खोडून काढण्यासाठी सत्य परिस्थीती काय असते ते सांगितलं. मी आणि विकासने इथे सांगितलेल्या ह्या सगळ्या फॅक्टस आहेत (सुट्या, पावसाळा, इकडच्या आणि तिकडच्या शाळांची वेळापत्रकं वगैरे) कुणीही व्हेरिफाय करून बघू शकतो. तुमच्या मित्रांनी सांगितलेलं व्हेरिफाय करायला तुम्हाला त्यांच्या भारतात न येणार्‍या बायका-मुलांची साक्ष काढावी लागेल, नाहीतर व्हेरिफाय कसं करणार?
..तुमच्या मात्र कानाखालच्या जाळातून बरीच उत्तरं मिळाली. चष्माविरहीत प्रतिसादाचं उत्तम उदाहरण. आभारी आहे.
त्यात बरीच उत्तरं काही नाहीत, एकच सरळ उत्तर आहे. अगत्य हे दोन्ही बाजूंनी असावं लागतं. मी दुसर्‍यांना त्यांनी काय करावं हे सांगितलेलं नाहिये. दुसरा एखादा कुणी असला झेंडावंदन वगैरे अपमान मुकाट्याने सहन करून घेणारा असेलही. मी फक्त जर मी अगत्याने केलेल्या कृतीची कुणी अशी संभावना माझ्या पुढ्यात (माझ्या पाठी कोण काय बोलेल यावर माझा कंट्रोल नसतो आणि मला त्याची फिकीरही नसते) केली तर माझी प्रतिक्रिया काय असेल ते मी सांगितलं. ही जर-तरची गोष्ट आहे. मी माझ्या शेवटच्या परिच्छेदात मला स्वतःला भारतात भरभरून प्रेम आणि अगत्यच मिळालंय हे ही अभिमानाने सांगितलंय. यापुढे काय मानायचं आणि न मानायचं ही सर्वस्वी तुमची मर्जी. पण त्यामुळे वास्तव बदलत नाही...

In reply to by पिवळा डांबिस

पिडा साहेब एक अवांतर प्रश्न , असं ऐकण्यात आलाय की अमेरिकेतील शाळेचा अभ्यासक्रम आणि आपल्याइथला अभ्यासक्रम ह्यात जमीन - आसमानाचा फरक आहे. मुलगा/ मुलगी २ दुसरी- तिसरीत असेपर्यन्त्त त्यांना अमेरिकेच्या शाळेतून भारताच्या शाळेत आल्यावर फारसा फरक पडत नाही . पण थोडा वरच्या इयत्तेत गेल्यावर इथल्या शाळेत ते Adjust होऊ शकत नाही. आणि vice versa ! हे खरे आहे का ?

In reply to by पिवळा डांबिस

हेच सांगायचे होते, पण एवढा नोठा प्रतिसाद काही लिहीता आला नाही. तसे आता LA County च्या सगळ्या शाळा संपुर्ण शैक्षणीक वर्ष दर वर्षी थोडे थोडे सरकऊन एप्रिल मध्ये संपवणार आहे. आधी ते जुन मध्ये संपत असे, आता मे मध्ये संपते आहे.

In reply to by पिवळा डांबिस

+१ बाकी एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते की मला इतक्या वर्षांत माझ्या नातेवाईक वा मित्रमंडळींकडून कधीच वाईट अनुभव आलेले नाहियेत. सर्व मंडळी अगदी अगत्याने वागवत आली आहेत. अतिशय समर्थपणे माझं आदरातिथ्य करत आली आहेत. याला तर +१००

In reply to by पिवळा डांबिस

खरं सांगायचे तर ही एनाराय मुले भारतात येत नाहीत हेच बराय. बाप्या बाया आपले मन रमवतात, पण मुलांना गुंतवून ठेवणे फार कठीण जाते. त्यात ही मुले येतात त्यावेळी भारतातील मुलांचे शाळा क्लास जोरात चालू असतात. ते सांभाळून ह्या मुलांबरोबर भारतीय मुलांना वेळ घालवावा लागतो. शिवाय भाषेचा एक मोठा प्रश्न उभा राहतो. बरीच एनाराय मुले मराठी बोलू शकत असली तरी मराठीत गप्पा मारू शकत नाहीत. त्यांचे हिंदी कच्चे (आजच्या पिढीची संपर्क भाषा) आणि इंग्रजी उच्चार आमच्या मुलांना अगम्य वाटतात. त्यामुळे भारतीय पोरे आई वडिलांच्या (खरे तर आजी आजोबांच्या) धाकाखातर जुळवून घेत राहतात पण एकूणच आपल्या फोरेन कझिन्सना वैतागली असतात. एनाराय पोरांचेही तसेच होत असावे.

पि डां साहेब तुम्ही म्हणता आहात ते पटते. मी साधे विशाखापटणम ला असताना बायकोच्या चुलत बहिणीचे लग्न औरंगाबादला असताना मला असा प्रश्न पडला होता. लग्न रविवारी असले तरीही शुक्रवारी सायंकाळी रेल्वेने निघायचे शनिवारी अपरात्री (०२. ००) पुण्यात पोहोचायचे तिथून बात taxi पकडून औरंगाबादला पोहोचायचे परत रविवारी रात्री निघून सोमवारी रात्री पोहोचायचे. यात परत मुलांच्या परीक्षा शाळा बुडवणे रजा काढणे इ सव्य अपसव्य करत राहायचे.परत आई वडील म्हणतात अरे एवढा पुण्यापर्यंत आलास तर मुंबईला तरी यायचे. दगदग सोडून काहीही मिळत नाही. (त्या काळात मुबई विशाखापतनम असे विमानही नव्हते). या ऐवजी माझा भाऊ म्हणाला तुला प्रवासाला १५ हजार खर्च येईल त्यापेक्षा ५ हजार रुपयाचे घसघशीत भेटवस्तू तिला दे. ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. बर येणारे लोक काय म्हणतात "वा वा एवढ्या लांबून तुम्ही आलात छान". पण त्यासाठी एवढा व्याप करून मुलांना त्रास देऊन येणे हे अव्यवहारी होते असा निष्कर्ष काढला आणि यानंतर जर आपल्या सुटीच्या आसपास असलेले समारंभला हजर राहत असे आणि लोकांना सांगत असे काय करणार लष्करात सुटीच मिळत नाही.मग पार विदेशातून एवढे कष्ट काढून येण्याचा तर प्रश्नच उरत नाही. राहिली गोष्ट लोकांची सगळ्या रस्त्यांना भरपूर फाटे कशाला आहेत? लोकांनी चांगले म्हणावे म्हणून काही कष्ट करण्याची माझी मुळातच तयारी नाही.

In reply to by सुबोध खरे

मुद्दलातली बात ! ...राहिली गोष्ट लोकांची सगळ्या रस्त्यांना भरपूर फाटे कशाला आहेत? लोकांनी चांगले म्हणावे म्हणून काही कष्ट करण्याची माझी मुळातच तयारी नाही. जर माझ्या येण्याने कोणाला आनंद असेल आणि माझ्या जाण्याने मला आनंद असेल तरच त्या भेटीत मजा आहे. नाहीतर घरी मजेत लोळत रहावे किंवा दुसरीकडे कुठे फिरायला जावे. दोघांपैकी कोणा एकाला किंवा दोघानाही मनस्ताप हवा कशाला ?!

अमेरिका/प.युरोप मध्ये राहणारे एनाराय आणि गल्फ-बिल्फ किंवा आफ्रिकेमध्ये राहणारे एनाराय यांच्या श्रेष्ठ कनिष्ठ असं काही असतं का?

In reply to by अनुप ढेरे

असतो की! अमेरिकेतले ते श्रेष्ठ, युरोपातले ते मध्यम आणि इतरत्रचे कनिष्ठ असा एनाराय आणि आराय लोकांमध्येही सुप्त समज जाणवला आहे.

In reply to by नगरीनिरंजन

सहमत आहे. उमेरिकन एनाराय आणि अफ्रिकन/अरबी एनाराय यांना एका क्याटेगरीत टाकायला नको खरतर. याबाबत मोहिम सुरु करीन म्हणतो.

परदेशस्थ नातेवाईक असलेल्या एका भारतीयाचे मत:
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
परदेशी गिफ्ट्सचे अप्रूप आजकाल अजिबातच राहिलेले नाही. अर्थातच कुणाकडूनही गिफ्ट मिळाले कि आनंद हा होतोच. मग ते गिफ्ट देशी असो कि विदेशी.
-मत्सर हेवा दिसतो का?
परदेशस्थ मंडळी आली कि त्यांना आजी आजोबांकडून दिले जाणारे महत्व भारतीय मुलांना तरी खटकतेच. अर्थात ह्यात परदेशापेक्षा बऱ्याच काळाने झालेली भेट हेच कारण आहे असे समजून सांगितले तरी मनात कुठेतरी रहातेच आणि क्वचित ते बाहेरही पडते.

पिडां, विकास, नाटक्या सौ टक्के की बात बोली है. १४-१५ वर्ष भारताबाहेर राहुन अनेक जाणीवा, सीमारेषा पुसट होत गेल्यात. आता मुलांच्या शाळा, आमची ऑफिसची सुट्टी ह्या सर्वांचं व्यस्त प्रमाण आहे, पण ही परिस्थीती सगळीकडेच दिसते की. थोडे फार अपवाद असतीलही पण बहुतांश हेच दृष्य आहे. त्यासाठी देशाच्या सीमा पार केल्याच पाहीजेत असं काही नाही. मदतीचा हात, मायेचा ओलावा,फुल नं फुलाची पाकळी दिल्यावर होणारा अतिशय आनंद ह्या टु वे ट्रॅफिक सारख्या गोष्टी आहेत. मुलं, पत्नी भारतात यायला तयार नसतात ह्या मागे अजुन काही वेगळी कौटुंबिक कारणं असावीत का हा ही एक विचार मनात येउन गेला. कारण नुसतं देश आवडत नाही हे कारण बरचं वरवरचं असावं. असो. चालायचचं. -मयुरा.