Skip to main content

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 06/02/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25918
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

'कोसला' जवळपास ३० वर्षांपूर्वी वाचली होती. वाचून फारसा इंप्रेस झालो नव्हतो. हीच कादंबरी ६-७ वर्षांपूर्वी परत वाचली. दुसर्‍यांदा वाचल्यावरही कादंबरी साधारणच वाटली. 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ' अजून वाचलेली नाही. त्यामुळे पास. नेमाड्यांना नक्की का ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले याची कल्पना नाही. असो. मराठी लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन!

कोसला आवडली होती कॉलेज मधे असताना वाचली होती तेव्हा. नंतर अनेक वर्षांनी बिढार वाचू लागलो, पण कंटाळा आल्याने सोडून दिली. आता हिंदू वाचायची उत्सुकता आहे. नेमाडेंचे अभिनंदन!

In reply to by अर्धवटराव

जे पेराल तेच उगवणार ना ! नेमाड्यांनी इतर लेखकांबद्द्ल जे उद्गार काढले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असे लिहिले तर आश्चर्य वाटायला नको..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

:( आणि म्हटलं तरी तो मराठी बाणाच आहे ( असं म्हणायची पद्धत आहे). रश्दि कुटल्या बाण्याचे ?

In reply to by अर्धवटराव

रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि अनुचित भाषा वापरली. त्याबद्दल त्यांचा नक्कीच निषेध. पण नेमाड्यांन उगाच नसत्या वादाला तोंड फोडायला सांगितले कोणी होते?

ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे अभिनंदन. पण ज्ञानपीठ मिळालं म्हणून वाट्टेल ती विधानं त्यांनी करावीत आणि ती लोकांनी डोक्यावर घ्यावीत हा प्रकार घडू नये. असो. मराठी अस्मितेच्या अभिमान्यांना बर्‍याच छान छान गोष्टी पहायला मिळत आहेत/ मिळतील अशी हवा आहे एकूण.. हरकत नाही, पण ते 'माज आहे मराठी असण्याचा' वगैरे गोष्टी टाळून खरोखर मराठीचं संवर्धन व्हावं असं मनापासून वाटतं..

In reply to by पिशी अबोली

नेमकं काय घडलं माहित नाही, पण परवा अचानक मराठी अभिजात भाषा म्हणून स्वीकारली गेली, शिवाय हे ज्ञानपीठ पारितोषिक. निदान काही लोकांना तरी अच्छे दिन आलेले दिसतात!

तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे लघवी केली आणि आपली उर्वरित वर्ष त्यामुळे दर्याची उंची किती वाढली, ते मोजण्यात खर्ची घातली' नम्र नेमाडेला नागवनारा नरम नुस्का ... ख़ास विन्दांचा