आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला.
मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की.
आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते.
पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का?
आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का?
मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता.
म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.
त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम.
त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे.
लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.'
आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे.
आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे.
आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.
वाचने
37587
प्रतिक्रिया
185
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरीही घरातील आई वर अतिरिक्त
In reply to अपर्णा ताई , by विटेकर
+१११११११
In reply to विटेकर काका तुअम्च्या आई आणि by स्पंदना
मी माझ्या आईची ओढताण बघितली
In reply to घर आणि नोकरी करताना ज्याने by विटेकर
मला आज पहिल्यांदा मनापासून
In reply to आज लाखो स्त्रिया घराबाहेर by बॅटमॅन
म्हणजे ?
In reply to डोक्टर साहेब .... by विटेकर
एक्क्झ्याक्ट्ली
In reply to म्हणजे ? by सस्नेह
पण बालसंगोपन हा मातेचाच
In reply to अतिशय अविचारी प्रतिसाद ! by सस्नेह
पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ?होय, बाप पोराला दूध पाजू शकत नाही . वात्सल्य हा स्त्रीचा स्थायीभाव आहे. अपवाद असू शकतीलशिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?पडतील ना , पण पुन्हा तेच , स्त्रीयांइतके सफाईने करु शकणार नाहीत, आणि बाल संगोपन आनि होम मेकर हे खालच्या दर्जाचे काम आहे का ?लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेतआहेत ना , पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?फार बिघडले असते का?
In reply to पण बालसंगोपन हा मातेचाच by विटेकर
अहो
In reply to फार बिघडले असते का? by कपिलमुनी
हो
In reply to अहो by विटेकर
आकडेवारी
In reply to अहो by विटेकर
धन्यवाद !
In reply to आकडेवारी by कपिलमुनी
माझा मुद्दा
In reply to धन्यवाद ! by विटेकर
विटेकर हा अपर्णा बाईंचा
In reply to अतिशय विचारी by विटेकर
तुमचा काय अंदाज आहे ?
In reply to विटेकर हा अपर्णा बाईंचा by Maharani
मला भयंकर गंभीर प्रश्न
In reply to अतिशय विचारी by विटेकर
अत्यंत हिणकस प्रतिसाद देणार
In reply to मला भयंकर गंभीर प्रश्न by सामान्य वाचक
खूपच वैचारिक प्रतिसाद . माझे
In reply to अतिशय विचारी by विटेकर
तुमची समानतेची व्याख्या काय
In reply to खूपच वैचारिक प्रतिसाद . माझे by मीता
तुमची आमची व्याख्या जाऊ दे
In reply to तुमची समानतेची व्याख्या काय by विटेकर
फीलिंग ब्यालन्स्ड
इतकेच?
In reply to फीलिंग ब्यालन्स्ड by बॅटमॅन
टवाळ कार्ट्यासारखा आमचा
In reply to इतकेच? by पैसा
सासू शोधून देईन
In reply to टवाळ कार्ट्यासारखा आमचा by बॅटमॅन
थ्यान्क्स पण ते काम करणारे
In reply to सासू शोधून देईन by पैसा
ओके ओके!!
In reply to थ्यान्क्स पण ते काम करणारे by बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद.
In reply to ओके ओके!! by पैसा
"आर्य विदोत्सुक मंडळ" हे कधी
In reply to माहितीकरिता धन्यवाद. by बॅटमॅन
हायला...कोण कर्ते हे काम?
In reply to थ्यान्क्स पण ते काम करणारे by बॅटमॅन
हा हा हा
In reply to हायला...कोण कर्ते हे काम? by टवाळ कार्टा
सर्वच reply मी मनापासून वाचले
In reply to थ्यान्क्स पण ते काम करणारे by बॅटमॅन
आधी माझी सासू शोधा माझा नंबर
In reply to सासू शोधून देईन by पैसा
आणि मी असून सुध्धा काय फायदे
In reply to टवाळ कार्ट्यासारखा आमचा by बॅटमॅन
अहो पै तै, "कोणत्याही एका
In reply to इतकेच? by पैसा
हायला मी आणि "कौतुकाचा बाब्या
In reply to इतकेच? by पैसा
म्हणजे तुम्ही उभे होतात काय ?
असेच काही नाही. वर बसलेला
In reply to म्हणजे तुम्ही उभे होतात काय ? by सुबोध खरे
ते उभे नव्हते तर उलटे लटकलेले
In reply to म्हणजे तुम्ही उभे होतात काय ? by सुबोध खरे
पकडा गया !
In reply to ते उभे नव्हते तर उलटे लटकलेले by कानडाऊ योगेशु
रच्याकने-- आजकालच्या मुलांना
रच्याकने-- आजकालच्या मुलांना
In reply to रच्याकने-- आजकालच्या मुलांना by सुबोध खरे
पण
In reply to रच्याकने-- आजकालच्या मुलांना by गवि
..हॅ हॅ हॅ.. आमाला पावर नाय..
In reply to पण by सस्नेह
म्ह्ण्जे तुम्ही भौतिकी तज्ञ
In reply to ..हॅ हॅ हॅ.. आमाला पावर नाय.. by गवि
..नायतर म काय वैदिक
In reply to म्ह्ण्जे तुम्ही भौतिकी तज्ञ by विटेकर
म्हैस
In reply to ..नायतर म काय वैदिक by गवि
हुश्श...!!
In reply to म्हैस by नेत्रेश
(No subject)
In reply to हुश्श...!! by गवि
कसली?
In reply to ..हॅ हॅ हॅ.. आमाला पावर नाय.. by गवि
म्हैस
In reply to कसली? by चिगो
काय सांगतैस? टाक बंडल, वड
In reply to म्हैस by कपिलमुनी
नोकरी सुद्धा चालेल ग! पण लंच
In reply to पण by सस्नेह
खरे काका
निर्णय तुमच्या हाती
सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला
पर्फेक्ट ! फक्त पैसे कमावणे
In reply to सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला by इशा१२३
+१
In reply to सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला by इशा१२३
मस्त प्रतिसाद इशा
खरच मस्त गं
In reply to मस्त प्रतिसाद इशा by मीता
टिव्ही आणि फ्रिज च्या
लेखातील विचार खूप विस्कळित
हो, यात एक नाही अनेक विचार
In reply to लेखातील विचार खूप विस्कळित by रायनची आई
धागाकर्तीचा सदस्यकाळ ५ दिवस
का?
In reply to धागाकर्तीचा सदस्यकाळ ५ दिवस by कविता१९७८
आणि समजा डुआयडी असला म्हणून
In reply to का? by कपिलमुनी
मुनिवर या म्हणीवर पेटंट हक्क
In reply to का? by कपिलमुनी
स्वागत!
महत्वाचा मुद्दा विसरलीस पै तै
In reply to स्वागत! by पैसा
पैसा ताई
In reply to स्वागत! by पैसा
माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर!
In reply to पैसा ताई by सुबोध खरे