Skip to main content

थोडक्यात, न विचारलेली गम्मत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/06/2008 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे” यालाच, ”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात. जीवनात, ”कधी खुषी कधी गम” असतं, बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं. वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार. “नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “ असं म्हणता,म्हणता “कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते” असं म्हणे पर्यंत, ”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार” असं म्हणताना “जीवनात ही घडी अशीच राहूदे” असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही. आणि,नंतर “थकले रे नंदलाला” असं म्हणायला काहिही वाटत नाही. ”जन पळभर म्हणतील हाय,हाय “ म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपली हे ही कळे पर्यंत “आम्ही जातो अमुच्या गांवा” म्हणावं लागतं, थोडक्यांत काय ”फिरून जन्मेन मी” असं धडधडीत म्हणावं असं शेवटी शेवटी वाटतं. असं जाणकार म्हणतात. श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2092
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चांगले आहे पण थोडेसे विस्कळीत वाटले. -- ध्रुव