Skip to main content

राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 16/11/2014 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता . दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती . राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो . बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ? भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात . राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?) अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा . (लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )

वाचने 31061
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

एक मजा बघा. इतिहासातल्या नेत्यांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय कर्तृत्वाची गल्लत करू नका म्हणणार्‍या लोकांची वर्तमानातल्या नेत्यांबद्दल मात्र अशी गल्लत का होते? जो लिबरल दृष्टिकोन इतिहासातल्या नेत्यांबद्दल बाळगला जातो तो वर्तमानात का चालत नाही? ढोंगी कुठले.

In reply to by बॅटमॅन

सोपे आहे - नेता इतिहासात गेला हे तो पूज्य होतो. (समर्थकांच्या दृष्टीने इन्फिनिटी आणि विरोधकांच्या दृष्टीने शून्य :) )

इतिहासातल्या नेत्यांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय कर्तृत्वाची गल्लत करू नका म्हणणार्‍या लोकांची वर्तमानातल्या नेत्यांबद्दल मात्र अशी गल्लत का होते? इतिहासात गेलेल्या नेत्याचा फोटोव्यतिरीक्त तसा फारसा उपयोग नसतो. आपण आपल्या इथल्या कोणत्याच नेत्याच्या इतर सवयी उदा तंबाखू ,दारू याबद्दल कधीच जाहीर चर्चा करत नाही. व्यसने हा वैयक्तीक चारित्र्याचा भाग नसतो का?

सर्वसाधारण समाजमानस हे १० वर्षवयोगटाचेच असते. त्यांना व्यसने, स्त्री-पुरुषातील गुंतांगुत, त्यांच्या आवडीनिवडी, मनोव्यापार समजावुन घ्येण्याचा आवाका तसा कमीच असतो. भारतासारख्या देशात हे पूर्वीपासूनच घडत आलेले आहे. उदा. रामाने सीतेचा अकारणच लोकनिंदेच्या साठी त्याग करणे, संभाजीबद्दल तत्कालीन अनेक प्रवाद उठविले गेले.

विजय मल्ल्या हे मात्र या बाबतीत राजकारणी असूनही (राज्यसभेवर आहेत म्हणून राजकारणी) त्या बाबतीत फारच लक्की आहेत. कोणीच त्यांच्या कसल्याही वागणूकीवर कसलीच टीकाटिप्पणी करत नाही

In reply to by विजुभाऊ

किंगफिशरच्या विमानातील सर्व हवाई सुंद्र्यांचे इंटरव्ह्यू ते स्वतःच घेत अशी एक बाजारगप्प सोडल्यास दुसरे काहीच नाही.

एफडीआर,जेएफके,क्लिंटन आणि नेहरूंसारखे राष्ट्रप्रमुख पाहिल्यावर त्यांची व्यसने,बदफैलीपणा यांचा त्यांच्या कर्तुत्वाशी घंटा संबंध नसतो हे नक्कीच समजले…बाकी स्वच्च्छ चारित्र्याचे अतिशय निष्क्रिय राष्ट्रप्रमुख आहेतच कि ;)

In reply to by मालोजीराव

हो.. आणि भारतापुरते बोलायचे झाले तर लोक शिवाजी महरांजाबरोबर थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की.

In reply to by आनन्दा

शिवाजी महरांजाबरोबर थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की
नक्कीच…सेनासरकार बाजीराव _/\_

In reply to by बॅटमॅन

मी कुठे म्हणतोय बदफैली म्हणून? मला एव्हढेच म्हणायचे आहे की कर्तृत्वापुढे चारित्र्य आपण नेहमीच गौण मानले आहे, अर्थात रुचीपालट म्हणून असेल तरच. जनानखाना नव्हे.

In reply to by आनन्दा

तुमच्या आधीच्या सर्व प्रतिसादाशी सहमत फक्त येथे एकच नमूद करू शकतो , बाजीराव ह्यांनी मोगलांच्या सारखा जंगी जनानखाना बाळगला नव्हता , मस्तानी त्यांची पत्नी आता आंतरधर्मीय विवाह हि हिंदू समाजात त्याकाळी व आजही बंडखोर कृती मानली जाते त्यामुळे संबंधित लेखास हे उदाहरण बाद ठरते , तत्कालीन कालखंडात राजांचा जनानखाना हि आम बात होती. अनेक हिंदू , मुस्लिम राजांचे होते. त्यामुळे कर्तुत्व व चारित्र्य हा प्रश्नच त्याकाळात निर्माण झाला नाही ,पेशवाईत नाना ह्यांची चलती कर्तृत्वामुळे होती. हे विसरून चालणार नाही बाकी नेहरू ह्यांचे अनेक मैत्रिणी होत्या , मात्र माउंटबेटन संबंधी प्रकरण वेगळे होते. ह्या दोघांची जवळीक व राजकीय घडामोडी ह्यामुळे ते विवादास्पद बनते. इंग्रजांनी माउंटबेटन वर एक सिनेमा बनवला त्यात माउंटबेटन च्या भारतीय राजांना आव्हान केल्याने त्यातील बहुतांशी भारतात सामील झाले मात्र पुढे आपल्या पत्नीशी असलेल्या नेहरूंच्या संबंधांची आपल्या मित्रात टिंगल टवाळी करणारे माउंटबेटन तसेस चर्चिल ला , नेहरूंना भारताने राष्ट्रकुल मध्ये सामील होण्यास राजी करून अजूनही ब्रिटीश साम्राज्याशी नाते टिकवून धरण्यास फशी पाडल्याची फुशारकी मारतांना दाखवले आहे. त्या काळात हेरगिरी , हनी ट्रेप दुसर्या महायुद्धात युरोपात सर्रास होत होते , नेहरू व एडविना ह्यांची तशीच काहीशी केस होती. सदर सिनेमात जिना हे खलनायक व नेहरू हे सोबर व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व दाखवले आहे मात्र मुस्लिम लीग ने हिंसा सुरु केले तेव्हा गांधी ती थांबविण्यासाठी गावोगावी फिरत असतांना नेहरू ह्यांनी आपल्या घरी मेजवानी दिली असते तेव्हा माउंटबेटन आपल्या परिवारासह तेथे येतो , आणि मग काय घडते ते पहा २.०२ मिनिटानंतर पहा , फाळणी ला विरोध करणारे नेहरू पुढे कसे विरघळले हे ह्या दृश्यांतून दिसते. १,२८ मिनिटात ह्या दृश्यात ७. ४६ पसून पहा. हि संपूर्ण क्लिप पहा गांधीजी ह्यांचे व्यक्तिमत्त्व तसे बरेच संतुलित दाखवले आहे मात्र पुढे त्यांनी स्वातंत्र्यानंतर दंगलीच्या बाबतीत जे वादग्रस्त निर्णय घेतले विशेषतः क्रूरकार्म्यास पाठीशी घातले तो चांगला चित्रित केला आहे. ३.०८ मिनिटात गांधी वधाचा प्रसंग येथे दाखवला आह , नाना पाटेकर ने नथुराम ची भूमिका केली आहे. १.३८ मिनिटात हे असेच घडले असेल अशी १०० खात्री देता येणार नाही पण इंग्रजांचा ह्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसतो , थरूर व पाकिस्तानी पत्रकार ह्यात शिकार व शिकारी कोण होते हे एक गौडबंगाल आहे , हा इसम संयुक्त राष्ट्रसंघात कार्यरत होता , ललना व हेरगिरी ह्या गोष्टी त्याला नवीन नव्हत्या.

In reply to by निनाद मुक्काम …

वा वा ! नाटकं आणि षिनिमा बघुन इतिहास समजुन द्यायच्या लबाड कलेला सलाम !

In reply to by hitesh

हितेश भाऊ इतिहास कसा समजून घेतात इतिहासावर लिहिलेले पुस्तक , लेख हे प्रत्येकवेळी तटस्थ होऊन लिहिले जातात का किंवा ते अचूक असल्याची खात्री कोणी देऊ शकतो का , इंग्रजांनी १९८६ साली माउंटबेटन ह्या राजघराण्याच्या संबंधित टीव्ही वर मिनी सिरीज काढली , त्यात त्यांनी नेहरू ह्यांना एडविना च्या प्रेमात बुडालेले दाखवले आहे तर पटेल हे आपल्या मुद्द्यांच्या ठाम असलेले दाखवले आहे. इंग्रज म्हणजे काही मोदी नव्हे की आता त्यांच्यावर पटेल प्रेमाचा आळ घेता येईल. ह्यात त्यांनी जीना ह्यांची भूमिका अत्यंत अहंकारी दाखवली आहे. बाकी दंगली पेटल्यावर गांधी हे गावागावात ती थांबविण्यासाठी प्रयत्न करत असतांना नेहरू मेजवान्या व आपल्या दैनंदिन कामकाजात मग्न दाखवले आहेत. एडविना व नेहरू ह्यांच्या प्रेम्प्रकार्नांचे अनेक दाखले आंजा वर सापडतील, आता एडविना ह्यांच्या विचारांचा नेहरूंवर पगडा असल्याचे इंग्रजांनी दाखवले ,इंग्रजांच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य संग्राम पाहून किंवा वाचून त्यांच्याशी भारतीयांच्या दृष्टिकोनातून आजतागायत वाचलेल्या इतिहासाची तुलना केली तर त्यातील सामाईक मुद्दे व विरोधाभासी मुद्दे पाहून तार्किक दृष्ट्या काय झाले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो , बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास लिहितांना यवनांचे सुद्धा दस्तावेज तपासले आहेत , उद्द लाल शाहिस्तेखानाचे ३ बोट कापल्या गेल्याची घटना लिहितांना त्यांनी शाहिस्तेखानची लिहिलेली डायरी अभ्यासली होती. पाकिस्तान व भारताच्या हद्दी व शहरांचे वाटप झालेले नसतांना स्वतंत्र राष्ट्र होऊन पंतप्रधान मधून मिरवण्यात नेहरू ह्यांनी घोडचूक केली , पुढे लाहोर हातचे गेले व काश्मीर प्रश्नास सुरुवात झाली. त्यापेक्षा शिवसेना परवडली ,खातेवाटपावर सहमती झाल्याशिवाय पाठिंबा न देण्याचे धोरण ठेवले , आधी पाठिंबा देऊन मग चर्चा केली असती तर हाती काहीही लागले नसते.

In reply to by निनाद मुक्काम …

गांधी सरहद्दीवर काम करत होते तेंव्हा नेहरु दैनंदिन काम करत होते . हे तुम्हीच लिहिले आहे. राहिला प्रश्न पार्टीचा.. तोही त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच भाग होता. का देशावर संकट आले किंवा घरात सुतक आले तर नेहरुनी हातावर कांदा भाकर खाणे तुम्हाला अपेक्षित होते का ? कोणतीही परिस्थिती असली तरी जो तो त्याचे दैनंदिन जेवण घेत असतो.

In reply to by hitesh

नेहरू ह्यांचे दैनंदिन कामकाज..... त्याकाळात हजारो लोक दोन्ही बाजूने मरत असतांना इंग्रजांनी हस्तक्षेप करावयास नकार दिला तेव्हा जीना ह्यांना एक्शनपेक कृती ला उत्तर देणे गांधी व नेहरू ह्यांना शक्य झाले नाही म्हणूनच नाईलाजाने पाकिस्तान झाला किंबहुना बहुसंख्य हिंदूचे प्रतिनिधित्व करणारे ही लोक अहिंसेच्या बेडीत बांधल्या गेल्याने आपले अल्पसंख्याक हिंसेला सुरुवात करतील त्याला प्रत्युत्तर देणे गांधी व नेहरू ह्यांना जमणार नाही ह्याची जीना ह्यांना खात्री होती .म्हणूनच त्यांनी हिंसेचा जुगार खेळले व त्यात यशस्वी झाले. त्यातल्या त्यात गांधी आपल्या मार्गाने प्रामाणिक प्रयत्न करत होते व त्यांच्या जीवावर ही बांडगुळे मजा मरत होती , काही दिवसांपूर्वी केरळात वृत्तपत्रात जे लिहिल्या गेले त्या धर्तीवर एल लेख मी आधीच मिपावर लिहिला होता , गांधीजीपेक्ष्या खरे तर ... पुढे निदान एकच घराणे भारताच्या बोकांडी बसले नसते.

In reply to by hitesh

करेंगे ह्या मरेंगे अशी स्थिती निर्माण झाली होती , देशात सांप्रदायिक दंगे पेटले हप्ते अश्यावेळी ह्यांच्या प्रणय चेष्टा ऐन भरात होत्या. त्यावरून १९४२ एव स्टोरी हा शिनेमा बनला असावा

In reply to by निनाद मुक्काम …

आँ.. ! गांधीजी जेंव्हा समाजकार्य करत होते तेंव्हा उर्वरीत भारताचे लोक प्रणयचेष्टा करत होतेच की ! आमचे तुमचे पणजोबा / पणजी यांनी प्रणयचेष्टा थांबवली असती तर तुम्ही आम्ही इथे आलो असतो का ?

In reply to by hitesh

आमचे तुमचे पणजोबा / पणजी यांनी प्रणयचेष्टा थांबवली असती तर तुम्ही आम्ही इथे आलो असतो का ?
बास. माझी तर बाबा सपशेल शरणागती.. यावर काय बोलणार? दंडवत स्वीकारा हितेशभौ. LogaMgaN

In reply to by hitesh

@हितेश आमच्या पणजोबांनी जनतेचे नेतेपद स्वीकारले नव्हते. जनसेवेचा मक्ता घेतला नव्हता व त्यांना सत्तेचा लोभ सुद्धा नव्हता. व विवाहबाह्य संबंधातून आमची पुढली जन्मली नाही , आपण नेहरूंच्या विवाहबाह्य संबंधाचे उदात्तीकरण अश्या प्रकारे करतात जणू काही तुमची पिढी ... असो राजकारणातील लष्करातील किंवा कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हनी ट्रेप वापरून फितूर केल्याची शेकड्याने उदाहरणे मिळतील. भारत पाकिस्तान प्रश्न सुटला नसतांना स्वातंत्र्याची घाई करायला नको होती. फाळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ,दोन्ही भागातून शांततेत स्थलांतर झाल्यावर स्वातंत्र्य घोषित केले असते. तर अनेकांचे प्राण वाचले असते.

In reply to by निनाद मुक्काम …

जनतेचे नेतृत्व स्वीकारले म्हणजे आहार निद्रा मिथुन या नैसर्गिक गरजा शून्य होतात का ?़की नेता व प्रजा यांची अ‍ॅनोटोमी फिजिओलॉजी वेगळी असते ? विवाहबाह्य संबंधातुन जन्मले म्हणजे ते बाळ गुन्हेगार असते का ? त्याचे आई आणि बाप कायदेशीरच असतात जरी ते नवरा बायको नसतील तरीही. तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्‍या आई बापांनी जन्माला घातली होती का ?

In reply to by hitesh

याच्यापुढे मी पामर काय बोलणार? महात्मा गांधी काय म्हणतात ते पाहुया -
तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्‍या आई बापांनी जन्माला घातली होती का ?
यावर मी कमेंट करू इच्छित नाही कारण मग या धाग्याचे काश्मीर होईल, आणि इतरांना पण संयम पाळावा अशी विनंती करतो. जाता जाता एव्हढेच सांगेन की त्यांचा जन्म समाजसंमत मार्गाने झाला होता. नेहरूंचे १९४७च्या वेळचे तथाकथित विवाहबाह्य संबंध समाजसंमत होते असे आपल्याला म्हणयाचे असेल तर मग बोलणेच खुंटले.
जनतेचे नेतृत्व स्वीकारले म्हणजे आहार निद्रा मिथुन या नैसर्गिक गरजा शून्य होतात का ?़की नेता व प्रजा यांची अ‍ॅनोटोमी फिजिओलॉजी वेगळी असते ?
नैसर्गिक गरजा या नैसर्गिक मार्गांनी पूर्ण व्हाव्यात नाही का? भारतीय समाजात अजून तरी विवाहबाह्य संबंध नैसर्गिक मानले जात नाहीत. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा नेहरू त्यांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्यात मग्न होते, तेव्हा गांधीजी दंगली शांत करत फिरत होते, एव्हढी एकच गोष्ट तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी. पण असो, तेव्हढे सगळे तुम्हाला कळायची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आणि तुम्ही गुद्द्याच्या पातळीवर उतरल्यामुळे आता चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट करतो.

In reply to by आनन्दा

गांधीजींबद्दल इतकं चांगलं मिसळपावावर वाचुन ड्वाळे पाणावले. मोदीनी गांधीजींना नमन केल्यानंतर मिसळपावावर गांधीजींबद्दल चांगल्ही लिहिलं जाऊ लागलय. मोदींचे अभिनंदन

In reply to by hitesh

नाही हो, गांधी एक व्यक्ती म्हणून, एक तत्वनिष्ठ म्हणून आम्हाला नेहमीच आवडतात. आम्हाला आवडत नाहीत ती त्यांची काही धोरणे, जी त्यांनी एक राजकारणी म्हणून राबवली, पण ती नंतर त्यागायची वेळ आली तेव्हा देखील त्यांच्च त्याग केला नाही. त्यामुळे एक राजकारणी म्हणून गांधी मला अनुकरणीय नाहीत. तुम्हाला शंका असेल तर माझे इतरत्रचे प्रतिसाद वाचा, आणि मिपावर यापूर्वीही गांधींवर बरच चांगले लिहिले गेले आहे, किंबहुना माझ्या या मताला मिपावरील चर्चांचाच आधार आहे. तुम्हीच अभ्यास वाढवा. नेहरूंबद्दल देखील आदर आहेच, पण स्वतःच्या वैयक्तिक (तुमच्या भाषेत नैसर्गिक)गरजा आणि राष्ट्राच्या गरजा यांमध्ये नेहरूंनी स्वतःच्या गरजांना प्राधान्यक्रम दिला, आणि ते देखील राष्ट्र संकटात असताना असा आक्षेप आहे. असो, तुम्ही खाली आणि इथे पण जी मुक्ताफळे उधळली आहेत ते पाहता तुमच्याकडचपण्मुद्दे संपले आहेत असे समजून येत आहे. तेव्हा इत्यलम|

In reply to by आनन्दा

जेव्हा नेहरू त्यांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्यात मग्न होते, तेव्हा गांधीजी दंगली शांत करत फिरत होते, एव्हढी एकच गोष्ट तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी.. .......... नै हो म्हाराजा ! या वाक्यातुन काहीही निष्कर्ष निघत नाही. मी दोन हॉस्पिटलात मिळुन रोज सोळा तास काम करतो. उरलेल्या वेळेत घरी माझ्या गरजाही पूर्ण करतो.. ( याशिवाय अजुन दोन विवाहबाह्य संबंध उपभोगण्याचीही समजा माझी इच्छा आहे.. एक स्त्री व एक पुरुष ). हॉस्पिटलात पेशंट तळमळत असताना मी नैसर्गिक गरजा भागवत फिरतो. असे तुम्ही माझ्याबद्दल लिहिलेत तर ते वरकरणी खरे वाटेल , पण ते पूर्ण सत्य असेल का ? ,.........

In reply to by आनन्दा

आणि काय अहे . की तुम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचा होता. तो आता झाला ना ? मग आनंदाने कारभार करा ना ? आता ते गांधी न्हेरु कशाला चघळत बसलाय ? हॅ म्हणजे खाष्ट सासु मेल्यावरही सुनेने सुखाचा संसार करण्याऐवजी दिवसरात्र तिच्या नावाने बोटं मोडत टाइमपास करण्यासारखे आहे.

In reply to by आनन्दा

यावर मी कमेंट करू इच्छित नाही कारण मग या धाग्याचे काश्मीर होईल
आम्ही करू इच्छितो पण सध्या तरी करणार नाही. ज्याला तुम्ही उत्तर देताय त्याचा धर्म/जात हिंदूंच्या विरूद्ध आहे. तो असंच बोलणार. शेवटी रक्तच घाणेरडं त्याला तो तरी काय करणार.

In reply to by hitesh

विवाहबाह्य संबंधातुन जन्मले म्हणजे ते बाळ गुन्हेगार असते का ? त्याचे आई आणि बाप कायदेशीरच असतात जरी ते नवरा बायको नसतील तरीही.
जरा हे अधिक स्पष्ट करशील का ?? कायद्याच्या कुठल्या कलमाने ते 'कायदेशीर आई बाप' असतात ??
तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्‍या आई बापांनी जन्माला घातली होती का ?
'आमचा लाडका भगवंत' म्हणजे तुझा तो कोणी लागत नाही म्हणजेच ' तु कापुन आलेला बाटगा' काय ?? तुझे खरे स्वरूप उघड झाले याचे भान आहे का तुला. ज्या एका विशिष्ट हिरीरीने व त्वेषाने असे तुझे प्रतिसाद येतायत त्यावरुन तरी असेच दिसते. 'आमचा लाडका भगवंत' तुझा जर कोणीच लागत नसेल तुला त्याची एव्हढी विवंचना का ??

In reply to by निनाद मुक्काम …

छत्तीसगड येथे चुकिचे सरकारी उपचार झाल्याने मरण पावलेल्या भारतीयांकडे दुर्लक्ष करुन मोदी विदेश दौरे करत आहेत हे प्रकरण देखील चेष्टा प्रणय वगैरे मधे येतात का ? , देशात सांप्रदायिक दंगे पेटले हप्ते अश्यावेळी ह्यांच्या प्रणय चेष्टा ऐन भरात होत्या. त्यावरून १९४२ एव स्टोरी हा शिनेमा बनला असावा >>. तुम्ही स्वत: तिथे उपस्थित होतात का? कि ऐकिव भगव्यांच्या माहीतीवरुन बोंबलत फिरत आहेत ?

In reply to by निनाद मुक्काम …

चित्रपट असो वा कादंबर्या . हि मनोरंजनाची साधन आहेतच पण ती प्रपोगंडा साधन पण आहेत (काही तुरळक अपवाद वगळता ). निपक्ष विश्लेषणात त्याना आधार मानले जात नाही .

In reply to by पिंपातला उंदीर

ह्म्म.. ही गोष्ट तर खरीच आहे, पण बर्‍याच वेळेस हे चित्रपटवाले खूप रीसर्च पण करतात बर का. केवळ विश्वासार्हतेसाठी

In reply to by पिंपातला उंदीर

सदर टीव्ही मालिका हि इंग्रजी प्रेक्षकासाठी होती भारतीयांसाठी नाही. साल १९८६ आता नेहरूंना वाईट व पटेलांना चांगले दाखवण्यामागे त्यांचा काय बरे हेतू असावा , गांधींचे व्यक्तिमत्त्व संतुलित दाखवले आहे. मुळात मुसलमान हे जीना ह्यांचे ऐकत होते , ते हिंसा करत होते व हिंसेपासून संरक्षण इंग्लिश आर्मी करणार नसेल तर स्वतःचे रक्षण करण्यास गांधी हिंदूंना अहिंसा ,शांती संयमाचा पाठ देत होते , गांधीनी १५ ऑगस्ट दिल्लीत वाजतगाजत म्हणूनच साजरा केला नाही कारण सर्वस्व गेलेली अनेक शीख , हिंदू , मुसलमान कुटुंबे त्यांच्या सभोवताली होती व हि हिंसा रोखण्यास आपले तकलादू तत्त्वे अपयशी ठरल्याची बोचरी जाणीव त्यांना होती.

In reply to by निनाद मुक्काम …

देशासमोर गांधीजी हे एकच गुरु होते का हो ? रणावीण स्वातंत्र्य कुणाला मिळाले का ? वगैरे वीर गप्पा मारणारे इतर गुरुजी गप्प का बसले होते? हिंदुंना हिंसेचा धडा गिरवायला शिकवण्यासाठी ते का नाही पुढे झाले ?

In reply to by hitesh

ह्म्म.. आता कसे आलात लेव्हलवर. थोडक्यात तुम्हाला गांधींशी काही देणेघेणे नाहीये. तुमचा अजेंडा वेगळाच आहे. आता तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर - भारत स्वतंत्र झाला तेव्हा सत्ता उघड उघड काँग्रेसच्या हातात आली, त्यामुळे त्या सार्‍या लोकांना तुमच्या भाषेत हिंसावादी ठरवले गेले. अर्थात जिथे शिवाजी महारजांना देखील लुटारू म्हटले जाते, तिथे हे असे म्हणणे म्हणजे किस पेड की पत्ती. नाहीतर लोकसंख्या हस्तांतरण वगैरे उपाय मांडलेले होतेच की. फक्त तेव्हा ते कोणी मनावर घेतले नाहीत, आणि आधी स्वतंत्र्य की आधी स्थैर्य यामध्ये आधी स्वातंत्र्य चा जय झाला.

In reply to by आनन्दा

लोकाना हिंसा शिकवणार्‍याना सत्ताच कशाला हवी होती ? दंगली सुरु असताना स्वतःचे हिंसक मित्र वas हस्त्रे घेउन ते का नाही जनतेला मदत करायला गेले ? का यांचा जहाल मार्ग फक्त कवनं आणि नाटकं लिहिण्यापुरताच होता ? समाजाला हिंसेची गरज होती तर ती गरज जहाल लोकान्नी पुरी करायला हवी होती . स्वतः लपुन बसले आणि नंतर मग गांधींच्या अहिंसेवर सगळे बिल फाडायला कशाला यायचे ?

In reply to by hitesh

ओक.. म्हणजे हिंदूंनी शस्त्रे हातात घ्यायला हवी होती असे तुमचे म्हणने आहे तर. आता दुटप्पी कोण बोलतेय ते तुम्हीच ठरवा. सगळ्या हिंदूंना नव्हे, तर केवळ पोलिसांना जरी शस्त्रांचा वापर करायला परवानगी दिली असती तरी दंगली आटोक्यात राहिल्या असत्या. आणि बाय द वे, त्यावेळेसही हिंदू/शीख संघटनांनी बरेच मदतकार्य केले होते, जालावर शोध घ्या, मिळेल सर्वसामान्य हिंदु समाज कधीच हिंसक नव्हता आणि नाही (बघा, तुम्ही एव्हढी हाणामारी करून देखील मी संयम सोडला आहे का ते? कारण मी सामान्य आहे). (अवांतर) तत्कालीन राज्यकर्ते हिंदूंचे/ निर्वासितांच्या हिताचे रक्षण करण्यात कमी पडले म्हणून हिंदूंनी शस्त्रे हातात घेतली. तरी देखील आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहास लक्षात घेतलात तर हिंदूंपेक्षा मुस्लिम समाज दंगली>च्या वेळेस अधिक शस्त्रसज्ज होता असे ध्यानात येईल. हिंदू संरक्षणासाठी सरकारवर अवलंबून होते, आणि जिथे हिंदू संरक्षणासाठी शस्त्रे हातात घेतात तिथे त्यांचे पोलिसी बळाद्वारे दमन केले जाते. अर्थात त्यात पोलीसांचादेखील दोष नाही, कारण बहुतांशवेळा हिंदू प्रतिक्रिया म्हणूनच शस्त्रे हातात घेतात, त्यामुळे त्यांना शस्त्रे मिळेपर्यंत पोलीस खाते सावरलेले आणि सज्ज असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करयचा तर सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय (केवळ शस्त्रसज्ज हिंदूंच्या भरवश्यावर) हिंदूंचे रक्षण होणे शक्य नव्हते. बाय द वे, गांधींच्या अहिंसेला आलेली ही फळे पहा, थोडेसे अवांतर होतेय, पण समजून घ्या. Gandhi started for Noakhali on 6 November and reached Chaumuhani the next day. After spending two nights at the residence of Jogendra Majumdar, he embarked on his tour of Noakhali, barefoot on 9 November. For the next seven weeks he covered 116 miles and visited 47 villages. He set up his base in a half burnt house in the village of Srirampur where he stayed put till 1 January. He organised prayer meetings, met local Muslim leaders and tried to win their confidence. Mistrust between Hindus and Muslims continued to exist, and stray incidents of violence occurred even during his stay in Noakhali. On the evening of 10 November, Sunday, two persons were reported to be murdered on the way while returning home after attending Mohandas Gandhi’s evening prayer at Duttapara relief camp.[60] Gandhi's stay in Noakhali was resented by the Muslim leadership. On 12 February 1947, while addressing a rally at Comilla, A. K. Fazlul Huq stated that Gandhi's presence in Noakhali had harmed Islam enormously.[61] His presence had created a bitterness between the Hindus and the Muslims.[61] The resentment against Gandhi's stay in Noakhali grew day by day. Towards the end of February 1947 it became vulgar. Gandhi's route was deliberately dirtied everyday and the Muslims began to boycott his meetings.[61] Gandhi took a goat from India. He kept that goat with him in noakhali. local Muslims stole that goat and ate it.[35] Mohandas Gandhi discontinued his mission halfway and started for Bihar on 2 March 1947 at the request of the Muslim League leaders of Bengal. On 7 April, more than a month after leaving Noakhali, Gandhi received telegrams from Congress party workers in Noakhali, describing attempts to burn Hindus alive. He stated that the situation in Noakhali demands that the Hindus should either quit or perish.[62] संदर्भ पण मी हे सगळे तुमच्याशी का बोलतोय? सॉरी.

In reply to by आनन्दा

खुद्द महाराजांच्या ७ राण्या होत्या ना? बाकी आजही गावांमध्ये २-३ लग्नं केलेले (त्यातले २ शिक्षक आहेत.) आणि इतर 'असेच' लोक ठाऊक आहेत. :)

In reply to by hitesh

जनानखाना बाळ्गला की राज्यकारभार बुडतो, हे तत्व पटत नाही ! आउरंगजेबाच्या जनानखान्यात ८०० बायका होत्या म्हणे !

In reply to by hitesh

आमच्या बेगमेला आम्ही नेहमी सांगतो...मुअलमान ८०० संभाळण्याप्वेक्षा हिंदुंच्या आठ नै तीनदेखील सांभाळणं मुश्किल असतं !

In reply to by hitesh

'बेगमी करणे' ह्या मराठी शब्दप्रयोगाचा उगम मुघल काळातील काय? ;)

In reply to by hitesh

आ हितेसभाई तो आपलु जागो मोहन प्यारे छे !

In reply to by hitesh

सहमत. पण औरंगजेबाच्या जनानखान्याबद्दलचं मत पटत नाही. त्याला ३-४ च बायका होत्या, नाटकशाळांचे तितकेसे व्यसन असल्याचेही कुठे दिसत नाही.

In reply to by आनन्दा

थोरल्या बाजीरावाला मानतात कारण त्याने प्रचंड पराक्रम गाजवला. त्याची उभी हयात त्याने स्वराज्य वाढवण्यात आणि जपण्यात घालवले. महाराजांनी जे उभे केले ते रयतेचे राज्य होते आणि ते राजे होते. तेच राज्य शाहू महाराजांसाठी बाजीरावाने जपले आणि जोपासले. राजांनी आणी सरदार उमरावांनी उपस्त्रिया आणि नाटकशाळा बाळगणे त्या काळात सर्वमान्य होते. बरोबरीच्या घराण्यांमध्ये लग्ने होत असत तर निम्न कुळातील स्त्रिया उपस्त्रिया म्हणून बाळगल्या जात पण बर्‍याचदा त्यांना पत्नीचा दर्जा मिळत असे. जो मस्तानीला मिळाला. चिमाजीअप्प्पा आणि नानासाहेब मस्तानीच्या विरोधात होते पण त्यांनी समशेर बहाद्दराला मात्र योग्य ते शिक्षण दिले आणि सरदारकीही. सांगण्याचा उद्देश हाच की मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावाने तिच्याशी लग्न केले नाही परंतु तिचा दर्जा पत्नीचाच होता. महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीत आठ लग्ने केली म्हणून त्यांच्या चारित्र्यात खोट येत नाही. संभाजी महाराजांबद्दलही बर्‍याच कथा अस्तित्व्तात आहेत. खरेखोटे देव जाणे. पण इतिहास त्यांना त्याबद्दल लक्षात ठेवत नाही तर त्यांच्या नऊ वर्षांच्या लाढ्यासाठी लक्षात ठेवतो. महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.

In reply to by मृत्युन्जय

महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.
सॉरी.. तुच्छ लेखणे हा हेतू मुळीच नव्हता, उलट बाजीरावाच्या कर्तृत्वापुढे अश्या गोष्टींची दखल देखील घेतली जात नाही असे मला म्हणायचे होते. अर्थात तुम्ही वर दिलेली बरीच माहिती माझ्यासाठी नवीनच आहे. त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.
सहमत, त्यातूनही अंडरलैनशी विशेष सहमत.

देशहितापुढे त्यांनी वैयक्तीक वासनांचा कायम त्याग करुन दाखविलेला आहे. त्यांच्या संयमी जीवनाच्या तेजापुढे पोळुन व नंतर जळुन काहिंनी त्यांच्या वैयक्तीक त्यागावर विनाकारण च शिंतोडे उडविले आणि उडविणारे तरी कोण स्खलनशील दिग्वीजय आणि अति स्खलनशील शशी थरुर खरा अस्सल भारतीय पठडितला संयम दाखवला तो मोदिंनींच श्रीमान योगी संसार काय चिमण्या कावळे हि करतात अस काहिस कुठल्याशा पोलादि का काय ते वीर नेत्याने म्हटलेल च आहे. परित्यक्ता या शब्दाच मुळ मात्र शोधावस वाटत. काय वाटल असेल मिसेस मोदिंना कोण ते जोडप आल होत चायनीज का कुठल ताजवर तेव्हा सिंगल मोदि त्यांना होस्ट होते. शाळेत किती ७ गाड्या आल्या होत्या निवडणुकीपुर्वी : समजवायला " मिसेस मोदींनी एक मार्मिक प्रश्न विचारला होता मी मिसेस मोदि नसते तर तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आला असतात का ? त्याग कळत च नाहि हो हल्लीच्या सुखलोलुप पिढिला सदभावना ? त्याचा तर पत्ताच नाही पण ते परित्यक्ता म्हणजे टाकलेली बाई अस असत का हो ?

In reply to by मारवा

मोदीना घरसंसार नाही.. त्यामुळे मोदी निरिच्छ भावनेने काम करतात म्हणे ! असे मोदीभक्त अभिमानाने सांगत होते. पण मोदींच्या सरकारातील बाकीचे लोक घरपरिवारवालेच आहेत ना ? हे म्हणजे भीष्माचार्यासरखे झाले.. मला स्वतःला नको हो , पण आमच्या दोन राजकुमाराना बायका हव्या आहेत , म्हणुन मी अंबा अंबालिका वगैरे पळवतोय ! मला नको हो ! आमच्या पक्षाच्या बाकी लोकांसाठी मी सगळे व्यवसाय पळवतोय हो

In reply to by hitesh

अरे, एक तर तु डु.आय.डी. तुझे पितळ तर केव्हाच उघडे पडलेय, तुला येथे कोणी हिंग लावुन विचारीत नाही. मग कशासाठी हे चाळे चालविले आहेस तु ?? जरा खुडुक बस आता. ( वैकुंठ्वासी नान्या नेफळाप्रेमी )

ठराविक नेत्यांबद्दल चर्चा केली आहे आणि काही नेत्यांना साळसूदपणे वगळले आहे. बहुतेक, नंतर होणार्‍या परिणामांच्या भीतिने असावे.

नेहरूंच्या व्यक्तीगत संबंधांच्या संदर्भात बोलणे आणि त्यावरून योग्यता ठरवणे योग्य नाही. तसले ब्लॉग्ज कडे दुर्लक्ष.. पण असे बोलणारे का बोलू शकले हे पाहीले तर काय दिसते? ह्यात कुजबुज ब्रिगेड पेक्षा इतिहास संशोधक ब्रिगेड्स आणि पत्रकारीता अधिक आहे. त्यातही ह्यांना नेहरूंच्या १९४७-४८ च्या काळातील प्रेमसंबंधाबद्दल जास्त पडलेले दिसते. त्याचे कारण देश फाळणीतून होरपळत असताना पहीले पंतप्रधान काय करत होते, हे आहे का केवळ एक गोरी व्यक्ती त्यात असल्याने नकळत असलेले गुलामीवृत्तीतले आकर्षण या संशोधनात आहे, ते त्यांचे त्यांनाच माहीत. पण एडविना प्रमाणेच नेहरू हे पद्मजा नायडू (सरोजिनी नायडूंची कन्या) आणि मृणालीनी साराभाई (विक्रम साराभाई यांच्या "troubled" विवाहातील पत्नी) यांच्या देखील जवळ होते. पण त्याबद्दल विशेष लिहीले गेलेले नाही. वरील चर्चा/लेखात नेहरूंचा संदर्भ देत जणूकाही चार ब्रिगेडी टाळकीच हा विषय चघळतात असे म्हणले गेल्याने जरा पाहीले तर कुठले ब्रिगेड दिसले? खाली काही उदाहरणादाखल... यात नेहरूंचे कुणाशी संबंध होते/नव्हते हा मुद्दा नसून त्यावर लिहीणारे कोण आहेत हे दाखवण्याचा मुद्दा आहे. यांना (आणि अशा अनेकांना) नेहरूंबद्दल का लिहावेसे वाटले असावे? त्याबद्दल आपले काय मत आहे? 'Nehru Was Generally Happy To Be Among Either Mountains Or Interesting Women' - Priyadarshini Sen Interviews Alex von Tunzelmann (आउट्लूक मॅगझिन) अजून एक आउट्लूक मधील लेख... करण थापर, मला नाही वाटत ब्रिगेडी आहेत. ;) ते काय म्हणतात, हे येथे पहा. Edwina Mountbatten: a life of her own - Janet P. Morgan - 1991 - ‎More editions A biography of Edwina Mountbatten describes her childhood of luxury, her marriage to Lord Mountbatten, her extramarital affairs, and her association with Nehru, Churchill, and others Edwina and Nehru: A Novel - लेखिका Catherine Clement Jawaharlal Nehru, a Biography - ब्य Sankar Ghose - 1993 - ‎After coming to know of Nehru's imprisonment she wrote on 16 January 1941, 'Since then I have thought of you constantly. . . . As you ... Of all the notable ladies he came across, Nehru's closest friendship was with Lady Edwina Mountbatten. वगैरे वगैरे...

नेहरुना शेवटच्या दिवशी चेस्त पेन झाले होत. तंव्हा त्याना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलात अ‍ॅडम्ट केले होते. तेंव्हा त्याम्च्या बरोबर एक प्रख्यात नटी होती. खरे आहे का हे ?

In reply to by hitesh

अर्थात तिने मदत करुनही नेहरुना मृत्युवर वैजय मिळवणे शक्य झाले नाही व त्यांची आयुष्य - माला तुटली.

"तेंव्हा त्याम्च्या बरोबर एक प्रख्यात नटी होती. खरे आहे का हे" होय. दिल्लीत तेव्हा असणार्या ह्यांच्या मित्रानेही हे सांगितले.नर्गिसची आई जद्दनबाई ही एक मोठी अभिनेत्री व नर्तकी.हिची तीन लग्ने झाली होती त्याशिवाय ती मोतीलाल की जवाहरलाल नेहरूंबरोबर असायची असे म्हंटले जायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हायला माईसाहेब तुमचा टेम्पो आवडला.. आणि ज्या प्रकारे तुम्ही तो कॅरी करत आहात ते आहून तर आपण तुमचे तुमच्या "ह्या"ंच्यापेक्षा फॅन!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरुना चेस्ट पेन मध्यरात्री झाली.. त्यावेळी त्या नटीने त्याना एम्सला अ‍ॅडमिट केले. पण नेहरू गेले. ........ त्यावेळी एका भाजपाच्या नेत्याने टीका केलेअ‍ॅ ... रात्री बारा वाजता ती त्यांच्या घरॅअ‍ॅ काय करात होतेअ‍ॅ ? ........ हे ' अटल ' नेते तेच ज्यानी नंतर अविवाहीत आहोत पण ब्रमचारी नाहेअ‍ॅ याची कबुलेअ‍ॅ दिली .

या धाग्यावर एकही स्त्री आयडी फिरकली नाही. त्यामुळे ताम्चा जाहिर. णिषेध

In reply to by hitesh

"माईसाहेब..." हा स्त्री (लिंगी) आयडी नाही असे म्हणायचे आहे का? ;)

In reply to by विकास

त तॉ एकच स्त्री आयडी इथे आहे. धन्यवाद