प्रस्तावना :
आमचे परम मित्र गडप्रेमी वल्ली यांचा कवितेस आग्रह आहे, पण काय करणार कविता करणे २-३ वर्षे झाले सोडले आहे, आणि आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये..
तरीही गेल्या महिन्यात ७ वर्षांनंतर मुंबई सोडली.. आणि जिवनाची एक खरीखुरी मज्जा.. एक अप्रतिम लज्जत.. याला आपण यापुढे मुकनार असे वाटत आहे.
लोकांची माणुसकी .. मदत करण्याची तत्परता.. एक आपुलकी. असे बरेच काही मुंबई देवुन गेली.
मुबई .. आय मीस यु. म्हणुन माझी ही जूनी कविता येथे देत आहे. जी की मी मंबईत गेल्या गेल्या केली होती.
तो काळ वेगळा होता. आज काल दुसर्यांच्या कविता आणि लेख वाचण्यातच जास्त मजा येते. तरीही पाहु पुढे मन काय म्हणते ते.
स्वप्नांचे पान मुंबई
------------------------------------------
स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई
तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई
वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई
मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई
प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई
लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई
नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई
लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई
क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई
भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई
व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई
ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई
कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई
जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई
मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई
महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई.........
- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3434
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह सुरेखच
सुंदर काव्य
खुपच म्स्त रे
कविता
.
हितेसभाई, जरा दमानं!
In reply to . by hitesh
आवडली
गणेशा, छान लिहिली आहेस कविता
क्या बात है गणेशा.
@व्यवहारातली कुशलता येथे
मुंबईकर व्यवहार कुशल आहे,
अतिशय चुकीचा प्रतिसाद
In reply to मुंबईकर व्यवहार कुशल आहे, by विवेकपटाईत