मिपा संपादकीय - उद्याचे आकाश.
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
उद्याचे आकाश.
आपसातील नातेसंबधांनी त्रस्त झालेले पालक आणि मी यांची बैठक बर्याच वेळा एकाच कारणासाठी होत असते. ती किंवा तो हाताबाहेर चालला आहे.अशा वेळी मी पालकांना विचारतो तुम्ही किती स्वत:च्या हातात आहात ?
पालक झालात म्हणजे सर्वज्ञ झालात असंही नाही.किंवा पालक झालात म्हणजे सर्वस्व झालात असेही नाही.
मुलाकडून शिस्तीची अपेक्षा आहे.
म्हणजे काय लहान मुलानी प्रौढासारखं वागावं काय?
तुमचं मन प्रौढ झालं असेल पण प्रगल्भ झालं असं नाही.
म्हणून न चुकता पहीला प्रश्न मी पालकांना विचारतो ?
तुम्ही स्वतःचं तुमच्या स्व शी नातं किती चांगलं आहे?
जैवीक वय वाढलेलं एक लहान मूल अजूनही तुम्ही असाल तर माफ करा तुमचं मूल तर मूलच आहे.
जर तुमचं तुमच्याशी जमत नसेल तर तुमच्या सहचराशी कितपत जमेल हे नातं?
या जैवीक मिलनातून जन्माला आलेल्या अपत्याबरोबर हे सहजीवनाचं नातं कसं जमणार आहे याचा विचार तुम्ही केला आहे का?
तुमच्या अपूर्ण स्व ला पूर्ण करण्यासाठीचा अट्टाहास आणि त्यातून निर्माण झालेला ताण तणाव ही तुमची खरी समस्या आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
पालक बुचकळ्यात पडतात.
कारण सोपं आहे. लहानपणापासून त्यांचा लॉजीकशी सबंध येऊ दिला जात नाही किंवा फक्त मान्यताप्राप्त सोल्युशनशी जमवून घेणं किंबहुना हे असच असतं या बरोबर राहण्याची तुमच्या मनाची घडी घालून दिली जाते.आता तुम्ही सुद्धा परंपरेनी मुलाला हेच देणार असालं तर संघर्ष अटळ आहे.
विचारा स्वत;ला काही प्रश्नः
१ तुमच्या पालकांनी तुम्हाला त्यांच्या कौटुंबीक कायदा आणि सुव्यस्था धोरणात उमलू देण्याची संधी दिली होती का?
२ लहानपणापासून किती हास्यास्पद नियमांचा आणि कायद्याचा राग आला होता आणि मन किती रडलं होतं ते आता आठवतं का?
३ खासकरून मुलींनी "मुलीच्या जातीला इतका तोरा चांगला नाही" असं किती वेळा ऐकलं होतं किंवा मुलांनी "फार शेफारला आहे आजकाल "हे किती वेळा ऐकलं होतं?
४ आज्ञाधारक मूल म्हणजेच आदर्श मूल हे किती वेळा बिंबवलं गेलं होतं?
५ कायम देवत्वाचा आव आणणारे असे तुमचे पालक होते का?
(म्हणजे घटकेत नरसिंह तर घटकेत श्रीकृष्ण तर मध्येच टेन कमांडमेंट वाला मोझेस बाबा अशी विविधरुपी दर्शन देणारे पालक)
त्यावेळी तुम्हाला खरं म्हणजे साधेसुधे आई बाबा हवे होते .
६ घरात झांथस किंवा झांटीपी यांच्या कातरीत तुम्ही सापडला होतात का ?
हे दोघं भांडायचे आणि उपाशी रहायचा इसाप.
हे असंच थोड्याफार फरकानी घराघरात होतं आणि प्रत्येकाच्या वाट्याला येतं.
तो विशुद्ध आणि सात्त्वीक जीव या गदारोळात जे शिकला तेच आता पालक झाल्यावर आपल्या मुलांना देतो आहे.यात गंमत अशी आहे की हे सगळे नकळ्त मनात घर करून बसलं होतं आणि ते आता सत्ता गाजवतं आहे.याची कल्पना कुणालाही नसते.
हे सगळं जन्माला आल्यावर झालेले बदल आहेत आणि त्यानंतरच्या अनुभवसिद्ध बैठकीवर अवलंबून आहेत असं नाही.गर्भावस्थेतल्या सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा हे आपोआप कळत असतं हे शास्त्रज्ञानी आता कबूल केलं आहे.
From sixth month on, the foetus lives an active emotional life. The current data on the Life of fetus:
1. The foetus an hear, experience, taste and on a primitive level,even earn and feel in utero.
2, What the fetal child feels and perceives begins shaping his attitudes and expectations about himself. These atitudes result from the messages he receives from his mother.
3.What matters is the mothers attitude. Chronic anxiety or wrenching ambivalence about motherhood can leave a deep scar on an unborn childs personality. as also joy, elation and anticipation can contribute significantly to emotionalevelopment of healty child..
the fathers feelings are also significant. HoW a man feels about his wife and unborn child is one of the most important factor in determining the success of pregnancy.
मला वाटतं की आजच्या पालकांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल तर ते म्हणजे आजच्या मुलाबरोबर आजचंमूल होऊन यशस्वी पालक होणं.
मुलांना आपल्या अंगातल्या दैवी अवतारापासून (अभ्यास नाही केला तर हिरण्य कश्यपू) वाचवणं.
त्यांच्या मनाला होणार्या इजांपासून त्यांना जपणं आणि बाहेरच्या जगातल्या हिंसाचारापासून (शारीरीक वा मानसीक) स्वतःचा बचाव करायला शिकवणं.
रोज नव्या लढ्याला सामोरे जाणारे,स्वतःला निराशेच्या गर्तेपासून कसोशीनी दूर ठेवणारे किंवा त्याला बळी पडणारे पालक हे शिवधनुष्य उचलू शकतील का?
आतापर्यंतचं हे निरुपण कदाचीत अविश्वसनीय किंवा अमान्य आणि तर्कविसंगत समजण्याचे सगळ्यांना पूर्ण अधीकार आहेत. पण आहे त्या परीस्थीतीबद्दल दुमत असण्यची शक्यता त्या मानानी कमी आहे. फारच क्वचीत एखादा जागरुक पालक हे नाकारू शकेल पण ते सगळं व्यक्तीसापेक्ष असेल.चला आपण घटकाभर समजू या की पूर्वायुष्याचा आणि आताच्या पालकत्वाचा काहीच संबंध नाही.आणि विचार करू या पालकत्वाच जसे आहे जेथे आहे या धर्तीवर .
उद्याचा सक्षम माणूस तयार करण्याची जबाबदारी पालकांवर आहे.पाल्याच्या शारीरीक आणि मानसीक विकासाची जबाबदारी पण पालकाची आहे.
ही दोन गृहीतके येथे सगळांना मान्य आहेत असे धरून पुढे चलू या.
आव्हानांची यादी अनलिमेटेड आहे. थोडी यादी बनवू या.
१ धावपळीच्या आणि अस्थीरतेच्या आयुष्यात मुलांना देण्याचा वेळ आणि बाहेरच्या आकर्षणापासून वाचवण्याकरता पालकांच्या प्रेमाचा चुंबक ताकदीचा असावा.
२ एका पालकाचा जबाबदारी घेण्याचा नकार.किंवा फक्त विशिष्ट जबाबदारी घेण्याचाच हट्ट.
उदा: मी प्रोव्हायडर आहे तेव्हढे मी करीन बाकीचे तू बघ.
अशी भूमीका आता चालणार नाही.आई तर हवीच आहे पण बाबा पण हवे आहेत.
थोडक्यात आईबाबांच्या इक्वल अनलिमिटेड पार्टीसीपेशन चा हा मनोव्यापार आहे.
३ पालकांच्या आणि पाल्यांच्या जीवन शैलीमधला फरक.वारंवार हा फरक जाणवून देण्याचा हट्ट
उदा: आमच्या वेळेस ....आम्ही लहान असताना...वगैरेनी सुरुवात होणारी सगळी घरगुती समुपदेशने.व्यावसायीक समुपदेशक सुद्धा याला अपवाद नाहीत.जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्स आता बाजूला ठेवू या.तुमच्या मुंजीतली लंगोटी आता तुमच्या मुलाच्या कामाला येणार नाही.हा फरक समजून मनाला आवश्यक तेव्हढे लवचीक पालकांनी बनवले तर मुलांबरोबरचे सहजीवन नक्कीच सुफल होईल.
४ बाहेरच्या निर्दय आणि रुक्ष व्यवहाराला आता पाल्याला फार कोवळ्या वयात सामोरे जावे लागते.तुमच्या पाल्याचा दिनक्रम पाहीला तरच हे लक्षात येईल की तुम्हाआम्हाला ऑफीस किंवा इतरत्र ज्या ताण तणावाला सामोरे जावे लागते त्याच ताणतणावाला ही मुलं कोवळ्या वयात सामोरी जातात.त्यांचा सामोरे जाण्याचा रीफ्लेक्स वेगळा असेल त्यामुळे त्याला तुमच्या पारड्यात तोलू नका.
मला म्हणायचे आहे ते एव्हढेच की पालक पोटेंशीअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटीक एनर्जीचे बाण होतात.
आयुष्याचे युद्ध जिंकायला एव्हढी तयारी पुरेशी आहे.
पाहुणा संपादक : विनायक प्रभू.
आपसातील नातेसंबधांनी त्रस्त झालेले पालक आणि मी यांची बैठक बर्याच वेळा एकाच कारणासाठी होत असते. ती किंवा तो हाताबाहेर चालला आहे.अशा वेळी मी पालकांना विचारतो तुम्ही किती स्वत:च्या हातात आहात ?
पालक झालात म्हणजे सर्वज्ञ झालात असंही नाही.किंवा पालक झालात म्हणजे सर्वस्व झालात असेही नाही.
मुलाकडून शिस्तीची अपेक्षा आहे.
म्हणजे काय लहान मुलानी प्रौढासारखं वागावं काय?
तुमचं मन प्रौढ झालं असेल पण प्रगल्भ झालं असं नाही.
म्हणून न चुकता पहीला प्रश्न मी पालकांना विचारतो ?
तुम्ही स्वतःचं तुमच्या स्व शी नातं किती चांगलं आहे?
जैवीक वय वाढलेलं एक लहान मूल अजूनही तुम्ही असाल तर माफ करा तुमचं मूल तर मूलच आहे.
जर तुमचं तुमच्याशी जमत नसेल तर तुमच्या सहचराशी कितपत जमेल हे नातं?
या जैवीक मिलनातून जन्माला आलेल्या अपत्याबरोबर हे सहजीवनाचं नातं कसं जमणार आहे याचा विचार तुम्ही केला आहे का?
तुमच्या अपूर्ण स्व ला पूर्ण करण्यासाठीचा अट्टाहास आणि त्यातून निर्माण झालेला ताण तणाव ही तुमची खरी समस्या आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
पालक बुचकळ्यात पडतात.
कारण सोपं आहे. लहानपणापासून त्यांचा लॉजीकशी सबंध येऊ दिला जात नाही किंवा फक्त मान्यताप्राप्त सोल्युशनशी जमवून घेणं किंबहुना हे असच असतं या बरोबर राहण्याची तुमच्या मनाची घडी घालून दिली जाते.आता तुम्ही सुद्धा परंपरेनी मुलाला हेच देणार असालं तर संघर्ष अटळ आहे.
विचारा स्वत;ला काही प्रश्नः
१ तुमच्या पालकांनी तुम्हाला त्यांच्या कौटुंबीक कायदा आणि सुव्यस्था धोरणात उमलू देण्याची संधी दिली होती का?
२ लहानपणापासून किती हास्यास्पद नियमांचा आणि कायद्याचा राग आला होता आणि मन किती रडलं होतं ते आता आठवतं का?
३ खासकरून मुलींनी "मुलीच्या जातीला इतका तोरा चांगला नाही" असं किती वेळा ऐकलं होतं किंवा मुलांनी "फार शेफारला आहे आजकाल "हे किती वेळा ऐकलं होतं?
४ आज्ञाधारक मूल म्हणजेच आदर्श मूल हे किती वेळा बिंबवलं गेलं होतं?
५ कायम देवत्वाचा आव आणणारे असे तुमचे पालक होते का?
(म्हणजे घटकेत नरसिंह तर घटकेत श्रीकृष्ण तर मध्येच टेन कमांडमेंट वाला मोझेस बाबा अशी विविधरुपी दर्शन देणारे पालक)
त्यावेळी तुम्हाला खरं म्हणजे साधेसुधे आई बाबा हवे होते .
६ घरात झांथस किंवा झांटीपी यांच्या कातरीत तुम्ही सापडला होतात का ?
हे दोघं भांडायचे आणि उपाशी रहायचा इसाप.
हे असंच थोड्याफार फरकानी घराघरात होतं आणि प्रत्येकाच्या वाट्याला येतं.
तो विशुद्ध आणि सात्त्वीक जीव या गदारोळात जे शिकला तेच आता पालक झाल्यावर आपल्या मुलांना देतो आहे.यात गंमत अशी आहे की हे सगळे नकळ्त मनात घर करून बसलं होतं आणि ते आता सत्ता गाजवतं आहे.याची कल्पना कुणालाही नसते.
हे सगळं जन्माला आल्यावर झालेले बदल आहेत आणि त्यानंतरच्या अनुभवसिद्ध बैठकीवर अवलंबून आहेत असं नाही.गर्भावस्थेतल्या सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा हे आपोआप कळत असतं हे शास्त्रज्ञानी आता कबूल केलं आहे.
From sixth month on, the foetus lives an active emotional life. The current data on the Life of fetus:
1. The foetus an hear, experience, taste and on a primitive level,even earn and feel in utero.
2, What the fetal child feels and perceives begins shaping his attitudes and expectations about himself. These atitudes result from the messages he receives from his mother.
3.What matters is the mothers attitude. Chronic anxiety or wrenching ambivalence about motherhood can leave a deep scar on an unborn childs personality. as also joy, elation and anticipation can contribute significantly to emotionalevelopment of healty child..
the fathers feelings are also significant. HoW a man feels about his wife and unborn child is one of the most important factor in determining the success of pregnancy.
मला वाटतं की आजच्या पालकांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल तर ते म्हणजे आजच्या मुलाबरोबर आजचंमूल होऊन यशस्वी पालक होणं.
मुलांना आपल्या अंगातल्या दैवी अवतारापासून (अभ्यास नाही केला तर हिरण्य कश्यपू) वाचवणं.
त्यांच्या मनाला होणार्या इजांपासून त्यांना जपणं आणि बाहेरच्या जगातल्या हिंसाचारापासून (शारीरीक वा मानसीक) स्वतःचा बचाव करायला शिकवणं.
रोज नव्या लढ्याला सामोरे जाणारे,स्वतःला निराशेच्या गर्तेपासून कसोशीनी दूर ठेवणारे किंवा त्याला बळी पडणारे पालक हे शिवधनुष्य उचलू शकतील का?
आतापर्यंतचं हे निरुपण कदाचीत अविश्वसनीय किंवा अमान्य आणि तर्कविसंगत समजण्याचे सगळ्यांना पूर्ण अधीकार आहेत. पण आहे त्या परीस्थीतीबद्दल दुमत असण्यची शक्यता त्या मानानी कमी आहे. फारच क्वचीत एखादा जागरुक पालक हे नाकारू शकेल पण ते सगळं व्यक्तीसापेक्ष असेल.चला आपण घटकाभर समजू या की पूर्वायुष्याचा आणि आताच्या पालकत्वाचा काहीच संबंध नाही.आणि विचार करू या पालकत्वाच जसे आहे जेथे आहे या धर्तीवर .
उद्याचा सक्षम माणूस तयार करण्याची जबाबदारी पालकांवर आहे.पाल्याच्या शारीरीक आणि मानसीक विकासाची जबाबदारी पण पालकाची आहे.
ही दोन गृहीतके येथे सगळांना मान्य आहेत असे धरून पुढे चलू या.
आव्हानांची यादी अनलिमेटेड आहे. थोडी यादी बनवू या.
१ धावपळीच्या आणि अस्थीरतेच्या आयुष्यात मुलांना देण्याचा वेळ आणि बाहेरच्या आकर्षणापासून वाचवण्याकरता पालकांच्या प्रेमाचा चुंबक ताकदीचा असावा.
२ एका पालकाचा जबाबदारी घेण्याचा नकार.किंवा फक्त विशिष्ट जबाबदारी घेण्याचाच हट्ट.
उदा: मी प्रोव्हायडर आहे तेव्हढे मी करीन बाकीचे तू बघ.
अशी भूमीका आता चालणार नाही.आई तर हवीच आहे पण बाबा पण हवे आहेत.
थोडक्यात आईबाबांच्या इक्वल अनलिमिटेड पार्टीसीपेशन चा हा मनोव्यापार आहे.
३ पालकांच्या आणि पाल्यांच्या जीवन शैलीमधला फरक.वारंवार हा फरक जाणवून देण्याचा हट्ट
उदा: आमच्या वेळेस ....आम्ही लहान असताना...वगैरेनी सुरुवात होणारी सगळी घरगुती समुपदेशने.व्यावसायीक समुपदेशक सुद्धा याला अपवाद नाहीत.जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्स आता बाजूला ठेवू या.तुमच्या मुंजीतली लंगोटी आता तुमच्या मुलाच्या कामाला येणार नाही.हा फरक समजून मनाला आवश्यक तेव्हढे लवचीक पालकांनी बनवले तर मुलांबरोबरचे सहजीवन नक्कीच सुफल होईल.
४ बाहेरच्या निर्दय आणि रुक्ष व्यवहाराला आता पाल्याला फार कोवळ्या वयात सामोरे जावे लागते.तुमच्या पाल्याचा दिनक्रम पाहीला तरच हे लक्षात येईल की तुम्हाआम्हाला ऑफीस किंवा इतरत्र ज्या ताण तणावाला सामोरे जावे लागते त्याच ताणतणावाला ही मुलं कोवळ्या वयात सामोरी जातात.त्यांचा सामोरे जाण्याचा रीफ्लेक्स वेगळा असेल त्यामुळे त्याला तुमच्या पारड्यात तोलू नका.
मला म्हणायचे आहे ते एव्हढेच की पालक पोटेंशीअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटीक एनर्जीचे बाण होतात.
आयुष्याचे युद्ध जिंकायला एव्हढी तयारी पुरेशी आहे.
पाहुणा संपादक : विनायक प्रभू.
वाचने
6558
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
प्रभुजी तुम चंदन हम पानी!
In reply to प्रभुजी तुम चंदन हम पानी! by चतुरंग
संपादकीय भावले...
आधीच्या पिढीचा आधार
तुम्ही दोघे
झ ब र द स्त
प्रभू साहेब आभार!
संपादकीय आवडले
एक चांगला अग्रलेख!
वा! दिवाळीनिमीत्त सचित्र अग्रलेख.
सचित्र
सुंदर लेख..
छान
वा!!
In reply to वा!! by नारायणी
असेच वाटते
In reply to असेच वाटते by बेसनलाडू
हेच म्हणतो..
शुभचिंतन
आजचा पालक
मध्ये
In reply to मध्ये by विनायक प्रभू
होय.
आजकालची मुलं.
संगोपन
लाखातले
उद्याचे आकाश
संपादकीय आवडले