Skip to main content

गृह कर्ज

लेखक सुहास पाटील यांनी बुधवार, 17/09/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे. त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे. मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?

वाचने 28466
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, कमर्शियल ला सगळे हिशोब बदलतात. एकतर सगळ्या banks कर्ज देत नाहीत. व्याजाचा दर जास्त असतो, मुदत कमी. अर्थात EMI भरपूर वाढतो. त्यातून मेंटेनन्स जास्त पडतो. रेसीडेंशियल ला पटकन भाडेकरू मिलतो. जागा रिकामी रहात नाही. कमर्शियल चे तसे नाही. दुकानांचे माहित नाही, ऑफिस स्पेस मध्ये oversupply आहे. भाड़े जास्त असते हे १००% मान्य. सध्या रेट पण बरेच पडले आहेत. तरीही एकूण रीअल एस्टेट म्हणजे कटकट जास्त हे खरे. भाड्याने देताना एक महिन्याचे भाड़े ब्रोकरेज मध्ये जाते. घेता विकताना जास्त खर्च होतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमेंशी सहमत , एकूणात रियल इस्टेट मधली गुंतवणूक तितकीशी फायद्याची नाही. आपण मालक असल्याचा एक फिल येतो तेवढाच ! पण हाती एकरकमी पैसा असेल ( कर्ज न काढता) तर दुकान घेणे घर घेण्यापे़क्षा नकीच फायदेशीर आहे म्हणून पेठकर काकांशी सहमती दाखविली. दुसरा मुद्दा - खरोखरच मोदिंच्या १०० स्मार्ट सिटी अस्तित्वात आल्या तर महानगरातील रेट पडतील , किमानपक्षी वाढणार नाहीत असा माझा अंदाज आहे आणि काही महानगरात आता घरांचे दर स्थिरावलेही आहेत ! माझ्या मित्राच्या बंगलोर मधल्या घराचे भाडे वाढते आहे , हप्ता निघतो आहे.( पण कर ही भरावा लागतो , ते पकडले तर जेवढ्यास तेवढेच ! ) पण गेली जवळ जवळ ४ वर्षे किंमत स्थिर आहे. एक ट्क्क्याने पण वाढली नाही.

In reply to by विटेकर

१०० स्मार्ट सिटी अस्तित्वात
:D :D बाकी ५ वर्षांनी बोलू

पण मी हा मूर्खपणा केला आहे ! विटुकाकूला कोण समजावून सांगणार ? ( तो आद्य मूर्खपणा १७ वर्षापूर्वी केला आहे! ) जशी महागाई वाढत जाते तशी तशी घरभाडी वाढत जातात , आपले त्या घरभाड्यात निवृत्तीनंतर आपले भागेल असे तिचे अजब लॉजिक आहे. आणि त्या ह्प्त्यातून काही शिल्लक राहीलेच तर पी. एन जी चे देणे द्यावे लागते. सोने घेणे हा तर पराकोटीचा मूर्खपणा आहे ( हा माझा तिसरा ! ) म्युचल फंड हा सर्वात चांगला उपाय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत : १. आपला पैसा विकासाच्या कामसाठी वापरला जातो, पैसा व्यवहारात रहातो, पडून रहात नाही. २. शॉर्ट / लॉन्ग टर्म पेक्षा स्मार्ट गुंतवणूक करावी. १५ % पेक्षा जास्तीचा हाव धरली नाही तर कधीही तोटा होत नाही आणि इतकीच माफक अपेक्षा असेल तर सकाळ संध्याकाळ डोके घालून बसावे लागत नाही. अधिक हाव केल्यास त्याचे व्यसन लागते . ३. दर सप्ताहाला / १५ दिवसाला / महिन्याला आपल्या कुवतीप्रमाणे नियमित रक्कम दिर्घकाळाकरता फंडात गून्तवावी. यातला "नियमितपणा आणि "दिर्घकाळ" हा महत्वाच भाग आहे . किती रक्कम हे महत्वाचे नाही. ४. पोवर ऑफ कम्पाउन्डीन्ग" हे तत्व समजून घ्यावे. ५. एन्ट्री - एक्जिट लोड चे नियम कसोशीने पाळावेत. एन्ट्री लोड लागतो तेव्हा आपण अधिकाची हाव करतो आहे का हा प्रश्न विचारावा. एक्जिट लोड लागत असेल तर आपली गुंतवणूक चुकली का ? हा प्रश्न विचारावा. ६.अधिक माहीती हवी असल्यास व्य. नि करावा

In reply to by विटेकर

सोने सोडून बाकी सगळ्याशी सहमत. ... म्हणजे गुंतवणूकीबद्दल बरं का. सोन्याचे दागिने किंवा वळं न घेता, ज्यात त्याची करणावळ विनाकारण जाते, सरळ जमेल तसे १,२,५,१० ग्रॅमचे कॉइन घ्यायचे. मध्ये बॅन्केत मिळायची. पण हल्ली आरबीआयनी ते बन्द केलय. योग्य विक्रेत्याकडून पॅक्ड नानी घ्यायक्ष्ची. सोने नेहमी वाढतं आणि अडीअडचणीला त्यातून पटकन कॅश उभी करता येते.

In reply to by कवितानागेश

सांभाळायची कटकट नाही का? पटकन चोरीही होउ शकते ना? बरं ते जौद्या, तुम्ही कॉईन कुठं ठेवलेत? पतकन सांगीतलंत तर बरं होईल.

In reply to by कवितानागेश

नंबर माहीती आहे. फक्त बेंक कोणती आहे ते सांगा. स्वीस बँक असेल तर तेही सांगू नका. फक्त कालजी घ्या,,,,,,कॉईनचीहो!!!!

In reply to by कवितानागेश

सोने नेहमी वाढतं
किंचित असहमत आहे. गेल्या ५-६ महिन्यात खाली आलेलं आहे. ३० हजाराहून २७ पर्यन्त. ज्यांने ३० ला वाढेल म्हणून घेतलं असेल त्यांना अजून किती वेळ थांबावं लागेल माहित नाही.

In reply to by कवितानागेश

सोने कधीच योग्य प्रमाणात वाढत नाही , त्यात फक्त भावना वाढतात. १९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि आज २७००० आहे १९८० साली सेन्सेक्स १०० रुपये होता आणि आज २७००० आहे १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी. आता तुम्हीच सांगा ! SENSEX & NIFTY @ ALL TIME HIGH !!!! Film actor Rajesh Khanna bought a bungalow in iconic Carter Road in Mumbai for Rs.3.5 lakhs in 1970. His heirs sold it recently for Rs.85 crores. The property has multiplied by 2428 times or an annualized return of 19.38% over 44 years. Samudhra Mahal in Mumbai is another expensive property. A flat purchased in 1970 at Rs.700 per sq.ft was sold at Rs.1,18,000 per sq.ft in 2013. Money multiplied by 168 times in 43 years. This works out to an annualized return of 12.66% In 1963, Godrej paid Rs.1 lakh to buy his first house, a 2916 sq.feet apartment at Usha Kiran, Carmicheal road, in tony South Mumbai. In 2011 he sold it for Rs.25 crore. Money multiplied by 2500 times over 48 years or an annualized return of 17.70% In Dalal Street, Mumbai a sq.feet was Rs.100 in 1980. After 34 years, it sells at Rs.27,000 per sq.ft. Money multiplied by 270 times in 33 years. This works out to an annualized return of 17.90%. The first three properties can be bought and owned by cream or elite of the society who are worth at least tens of crores, mostly hundreds of crores. The last property in Dalal street; our father could have bought with whatever money available at his disposal. We can buy it even now. Our son or daughter would be able to buy it even 20 years down the line. The last property is Sensex. A sq.feet is a metaphor for one unit. If dividend yield is also included (assuming 2% CAGR), Sensex would have delivered 20% annualized returns over last 34 years, higher than the most expensive prime properties in the country. Good mutual funds and many stocks have delivered returns far superior to Sensex itself. Power of equity is least understood in our country. If we can withstand notional loss (if we don’t book) in portfolio during bear markets, not worry about daily price movements, it is possible to make much better money than what can be made out of best of real estate. Give at least the same importance to equity as we give to real estate. We don’t mind holding real estate for 20 or 30 years. Please do the same for equity ignoring bull and bear markets, notional profits and losses. Many of us have been investing for last couple of years. Stay the course for at least another 15 to 20 years completely ignoring market fluctuations. We would be amazed at the fortune created for our retirement or to pass on to our children. Happy Investing !!!!!!!

In reply to by विटेकर

पन एका वेळेस थोडी थोडी इन्वेस्ट्मेन्ट करायची असेल तर? १९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती .> पण मला दर महिन्याला २००-२०० रुपये गुन्तवायचे असतील तर ४-४ महिन्यानी १-१ स्क्वे.फू. जागा कोण देणार? जागा हा एकदम मोठा घास झाला. त्यासाठी आधीची पून्जी हवी. आणि शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.

In reply to by कवितानागेश

दुसरे घर घेतलंत, तर त्याचा वेल्थ टॅक्स पण पडेल दरवर्षी, त्याचापण विचार करा.
सोने नॉन प्रॉडक्टिव अॅसेट आहे. त्याचाही वेल्थ टॅक्स पडतो. सोन्याच्या दरातील लॉँगटर्म वाढ महागाईदरापेक्षा जास्त नाही. शिवाय सांभाळायची जोखीम असतेच.

In reply to by सुहास पाटील

राहत नसलेले - थोडक्यात दुसरे - घर, गाडी, सोने, कॅश अशा सर्व नॉन प्रॉडक्टिव अॅसेटना पकडून ३० लाखापेक्षा जास्त नेट अॅसेट असतील तर त्यावर प्रत्येक वर्षी १ टक्का या दराने कर भरणे आवश्यक आहे. एफडी, स्टॉक्स, म्युच्युअल फंड यांना प्रॉडक्टिव अॅसेट असल्याने या कॅल्क्युलेशनमधून वगळता येते. खालील दुव्यावर प्राथमिक स्वरुपाची थोडी माहिती आहे. http://www.thehindubusinessline.com/features/know-all-about-wealth-tax/…

In reply to by आजानुकर्ण

t if a property is used to conduct business or if it forms a part of stock-in-trade or has been rented out for at least 300 days in a year, wealth tax is not applicable on such property. दुसरे घर रेंट वर दिले तर हा तक्ष पडत नाही असे दिसतंय

In reply to by अनुप ढेरे

हो पण इथे मुद्दा वेल्थ TAX चा होता जो फक्त घर रिकामे राहिले तर भरावा लागतो. आणि एकदा का तुम्ही निवृत झालात तर बहुतेक तुम्ही ३०% TAX मध्ये बसलाच असे नाही

१९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी.
ओ मालक तो स्वस्ताईचा जमाना गेला. अंधेरी/जोगेश्वरीत या भावाने मिळाला तरी खूप.

अशा ठिकाणी फ्लॅट्/बन्गला/रो हाऊस (आपापल्या ऐपतीप्रमाणे) घ्या की जिथे आता किमती कमी आहेत आणि भविष्यात तो एरिआ डेव्हलप होणार आहेत उदा. पुण्याच्या जवळ पण सद्ध्या हद्दी बाहेर. बरीच गावे पुणे महापालीका आणि पिंपरी चिंचवड महापालीकेमधे येणार आहेत.अजुनही १ बीएचके २० ते २२ लाखापर्यंत मिळतो. २ बीएचके ३५ ते ४० पर्यंत.सध्या बार्गेनींगलाही चांस आहे. दुस-या घरावर लोन घेतले तरी त्यावर इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो हे वर सांगितले आहेच. मिळणा-या भाड्यावर टॅक्स द्यावा लागतो. (३० टक्के स्टॅ. डिडक्शन + मिळकत कर वजा करून). पण तुमचे कर्जावरील व्याज मिळणा-या भाड्यापेक्षा जास्त असेल तर उलट तुम्हाला रीफंड मिळेल. तुमच्याकडे कॅश असेल तर दुसरीकडे गुंतवा. त्याचे मिळणारे व्याज (टी डी. एस. जावून. पत्नीच्या, आईच्या, निव्रुत्त वडीलांच्या अथवा सज्ञान मुलांच्या नावावर गुंतवणूक केली तर टी डी. एस पण वाचेल.) अधिक इन्कम टॅक्स बेनिफीट आणि घराच्या लोनसाठी गेलेले व्याज यातला फरक बघा. तुम्हाला किरकोळ व्याजावर लोन मिळालेय असे लक्षात येइल. सहा सात वर्षांनी घराची किंमत निश्चित वाढलेली असेल. घर विकल्यानंतर कॅपिटल गेनवर टॅक्स निश्चितच भरावा लागेल. पण तो वाचविण्यासाठीही मार्ग आहेत.

ह्म्म . ह्याविषयावर अनेकवेळा वादविवाद झालेत आमच्या मित्रपरिवारात अन कुटुंबातही . स्वकर्टुत्वावर एक घर घेवुन झाले आहे , पण ते आई बाबांसाठी , गावाकडे .घर घ्यायचंच असेल तर त्यापेक्षा वाडा बांधु असे एक माझे मत आहे , आणि स्वतः रहाणार नसु तर घर घेण्यात काय अर्थ आहे ? मला स्वतःला घराची आसक्ती नाही , ऐसी गृहांची स्थिती। मिथ्या आली आत्मप्रचिती। जन्म दो दिसांची वस्ती। कोठे तरी करावी।| - समर्थ . ( मी आपला मस्त २००० रुपायाचा क्वेच्चा चा टेन्ट घेतलाय , आता कोठेही आयुष्य काढु शकतो :) ) पण तरीही एकदा कॅल्क्युलेशन्स करु समजा ५०लाखाचे गृहकर्ज काढले (त्या साठी तुम्हाला आधी तुमच्या खिष्यातुन १७-२० लाख घालावे लागतील , बॅन्क फक्त ७५-८० टक्केच लोन देते ) तर साधारण २० वर्षांच्या हिशेबाने ढोबळमानाने महिन्याला सुमारे ५०००० हप्ता पडेल . आता समजा हेच घर घ्यायच्या ऐवजी तुम्ही भाड्याच्या घरात राहिलात तर महिन्याला अंदाजे १५००० भाडे पडेल उरलेले ३५००० दर महिन्याला दाम दुप्पटीत टाकत राहिलात तर१साधारण ७ वर्षाने दाम दुप्पट ह्या हिशेबाने ७+७+७=२१ वर्षे असे सोपे अ‍ॅझमशन करुयात अर्थात तुमचे साठलेले सर्व पैसे अ‍ॅट थे एन्ड ऑफ २० बर्ष साधारण आठपट होणार . म्हणजे ३५००० * १२ = रफली चार लाख एका वर्शाचे ह्या हिशोबाने

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचणे म्हणजे निव्वळ टाइम पास म्हणुनच ठिक आहे. आपण ह्या विषयावरची टाईम्सने वेळोवेळी दिलेली माहिती वाचली तर अजुन घोंधळातच पडाल व मी का लिहिले ते ही लक्षात येईल. अशा मोठ्या प्रश्नावर एकांगी विचार करणे चुक ठरते. सर्व बाजू तपासून पाहून मगच सल्ला देणे संयुक्तिक ठरेल. व्यनि कराल तर अधिक माहिति घेवुन नक्किच योग्य तो सल्ला देता येईल. योग्य सल्लाच आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपुर मोबदला देवु शकेल.

पैसे पोस्टात ठेवावेत. एकोळी प्रश्नाचे एकोळी उत्तर

मध्ये पैसे अडकवले तर व्याज मिळेल जे करपात्र तर असेलच पण इंफ्लेश्नला मात करण्यासाठीसुद्धा उपयोगी नाही. मग एफ डी करूच नये का? घर घेतले तर मिळणारा परतावा (भांडवलवृद्धी, भाडे + भाडेवृद्धी) सुद्धा करपात्र (अर्थात काही गणितानंतर) आहे. मग घर किंवा दुकान किंवा जमीन घेऊच नये का? शेअर्स तर फुल टू बदनाम, रिस्क ओरिएन्टेड आहे आणि म्युच्युअल फंड्स किचकट विषय आहे मग नकोच ते. सोने वाढते कुठे? ते गेल्या काही वर्षात वाढले आहे आणि आता गडगडले आहे. इतके नकारात्मक वातावरण "गुंतवणूक" ह्या विषयात बरेच वेळा आढळते. (आणि जे हि मते मांडतात तेच भरपूर गुंतवणूक करतानाही आढळतात) पण जर तुमच्याकडे एफ डी करण्या इतके पैसे आहेत आणि घर घेण्याबाबत दुविधा आहे तर मी म्हणेन एक चांगला बिल्डर (हा आणि कुठे सापडतो ?) बघा आणि बुकिंगला पैसे गुन्तवा. जर तुम्ही त्या बिल्डरशी लॉंग टर्म नाते तयार करू शकलात तर त्याच्या अनेक प्रोजेक्टेस मध्ये तोच तुम्हाला चांगले पैसे कमावून देईल. बुकिंगला पैसे लावताना तुम्ही जी रक्कम लावलीत ती (आणि जर तुम्हाला कर्ज मिळत असेल तर त्यावरचे व्याज) किंवा एकूण लागलेले भांडवल आणि मार्केट रेट ह्याचा सतत अपडेट ठेवा जेव्हा वार्षिक परतावा ३०% किंवा जास्त असेल तेव्हा विकून मोकळे व्हा. हा परतावा तुम्ही गुंतवणूक कोणत्या स्टेजला केली त्यावरही अवलंबून असतो असे निरीक्षण आहे (भूमिपूजनाला, पायाभरणीला, २०% ते ५०% बांधकाम झाल्यावर ई.) हा मार्केट मधला बाराही महिने चालणारा एक प्रकार आहे पण ह्यात नफ्यावर लागू होणारा कर आणि मार्केट रेट ह्याचे गणित तसेच बिल्डरशी तुमचे निर्माण होणारे नाते महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणूकदार म्हणून बिल्डरशी व्यवहार करणे आणि तुम्ही सदनिकाधारक होण्याच्या इराद्याने व्यवहार करणे ह्यात जमीन आस्मानचा फरक पडतो. आता वर मी जे म्हंटले आहे तसे करणे म्हणजे बरेचजणांना नकोसेच होते कारण त्यात "बरीच" मेहनत आहे. (बिल्डर फसवतोच हे गृहीतकही काम करते.) आता तुम्ही ह्यात कुठे फिट होता ते पहा आणि निर्णय घ्या.

बँकिंग सेक्टर मध्ये थोडी ओळख वाढावा....आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक घरे एन पी ए म्हणून विकायला येतात ती अगदी 20% स्वस्त, क्लीयर टायटल मिळतात...थोडी माहिती काढली तर सहकारी बँक, सरकारी बँक यांच्या मॅनेजर बरोबर सेटिंग लावून अशी घरे मिळतात...निव्वळ गुंतवणुकीचे किडे करायचे असतील तर थोडे डोके घाला ह्यात.