Skip to main content

जेवणाची चव

लेखक कहर यांनी बुधवार, 17/09/2014 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे. काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना" बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले bazar

वाचने 53848
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

सैल टीशर्ट जीन नेलपोलिश, मोबाईल.. ही कसली आई.. छे.. छे.. छे.. ही आई नथी छे.. माता न ही वैरिणी. बिचारी ती चिमुरडी..

In reply to by गवि

मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी. त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै. हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय हे काय चालु आहे? आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...! बकि तुमचे चालु देत..! :)

In reply to by रुमानी

अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ? (फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) आई एक नाव असतं घरातल्या घरात जीन्स घातलेलं गाव असतं ! बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही मिपा पांगते प्रतिसादांचे बाजार उठतात उदास धाग्यात उमाळे दाटतात. आई असतो एक जिन्सचा धागा चिमुरड्यासह बाजार करणारी समईतली जागा आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))

In reply to by बॅटमॅन

जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!

In reply to by रुमानी

बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!? धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)

In reply to by रुमानी

हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्‍यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?

In reply to by पोटे

भाषांतर करुन घ्या ब्वा !! I look around and wonder why do people look at a married woman differently?? She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married.. But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman.. She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'.. Marriage doesn't suddenly turn a girl into a woman.. For that matter having kids doesn't necessarily do the same either.. Celebrate who she really is, celebrate the child in her.. She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger.. She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does.. This is for every wonderful woman I know.. Grow up.. But take your own sweet time & let the li'l girl in you live forever.. And for the men- Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'.. She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.

मी प्रयत्न करतेय चांगली आई बनण्याचा पण त्या वरच्या पयल्या आईने काय घातलं होतं हेच स्पष्ट होत नाहीये...श्शी बाई...

In reply to by स्वप्नांची राणी

आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?

In reply to by पैसा

नसली तर शिवून घे.
शिवून? छे छे!!! शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची... आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत.. पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!

In reply to by पैसा

>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!

In reply to by सूड

@प्रचंड गचाळ दिसतं ते!!>>> +++१११ अश्येच म्हन्तो! हाडं सोडून लोंबणार्‍या कातडीसारखं..कायच्याकाय!

In reply to by पैसा

हा हा हा!!! :) ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!! हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)

In reply to by सूड

होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!! अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!

पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्‍या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते! जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!

In reply to by पैसा

अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?

In reply to by काळा पहाड

आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला?
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्‍यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका! बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?

In reply to by पैसा

अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.

In reply to by पैसा

एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले. अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का? सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी. तुम्हाला आत काहीच कालवत नाही?

In reply to by गवि

गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं? (खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्‍या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)

In reply to by पैसा

आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही.
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))

In reply to by पैसा

तु वल्कले घालणार...मग रावण तुला पळवणार दोन बाप्यात युद्ध लावणार....रामायणात महाभारत घडवणार निश्चीत!!

In reply to by पैसा

विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै. जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा. यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं. सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठल्या जगात वावरता तुम्ही???? आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?

संपादीत.


In reply to by यसवायजी

कोकणीतलं 'वगी रंव' म्हणजे मराठीत 'गप बस' -पिवळाशास्त्री डांबिस कोकणी-मराठी भाषांतरकार (नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)

In reply to by पिवळा डांबिस

असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली. बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय. @ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))

In reply to by पिवळा डांबिस

>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!! हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)

साहेब, काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता. एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.

In reply to by सुबोध खरे

मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?

In reply to by कहर

भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।

In reply to by कहर

मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना. बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by विजुभाऊ

तो भैया हो. बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.

In reply to by काळा पहाड

णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)). सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))... बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की, 'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्‍यासदृश दिसणार्‍या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

१००% सहमत!
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
Marketing करणार्‍या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.