आदिकैलास,ओमपर्वतदर्शन आणि पार्वतीसरोवर परिक्रमा भाग १
कैलास-मानससरोवर यात्रा करण्यासाठी १लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, कारण तिबेटमधील प्रवासासाठी चीन सरकारला ७०० डॉलर द्यावे लागतात. पासपोर्टही लागतो. त्याशिवाय या यात्रेसाठी 'स्ट्रेसटेस्ट' वगैरेसारख्या महागड्या, पण आवश्यक तपासण्या कराव्या लागतात. आमच्याजवळ पासपोर्ट नाही आणि एवढे पैसेही नाहीत. कैलासयात्रा घडावी असे खूप वाटत असे. पण हे आपल्याला शक्य नाही म्हणून गप्प बसत होतो.
शिवशंभोला आम्हाला यात्रा घडावी असे वाटत होते, म्हणूनच एक दिवस म.टा.मधील एका बातमीकडे लक्ष गेले. गोरेगाव-मुंबई येथील श्री. वाशीकर यांनी ती बातमी दिली होती. 'आदिकैलास-ओमपर्वत यात्रा आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा.' फोन नंबरही दिला होता. लगेच त्यांना फोन केला. वाशीकर हे वयोवृद्ध गृहस्थ आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना चीन दौर्यावर गेले होते, तिथे त्यांनी चीनबरोबर करार करुन कैलास-मानस यात्रा पुन्हा सुरू केली होती; जी १९६२च्या लढाई पासून बंद पडली होती. श्री. वाशीकर या यात्रेच्या पहिल्या ट्रीपचे सदस्य होते. आणि आता महाराष्ट्राचे या यात्रेचे ऑनररी सेक्रेटरी आहेत.
वाशीकरांना फोन केला. ते स्वतः भेटले. त्यांनी प्रत्येकी १५०० रुपयांचा ड्राफ्ट 'कुमाऊं मंडल विकास निगम' यांच्या नावाचा त्यांच्या गोरेगावच्या पत्त्यावर पाठवायला सांगितला. एकूण खर्च प्रत्येकी १२,५०० रुपये येईल असे सांगितले. लगेच दोघांसाठी म्हणून ३००० रुपयांचा ड्राफ्ट पाठवला. त्यांनी फॉर्म पाठवले.
जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात एकूण आठ ग्रुप पाठवतात. एक ग्रुप २०/२५ जणांचा असतो. नोंदणी झाल्यावर त्यांनी पाठवलेले फॉर्म भरून, एम.डी. फिजिशियनकडून मेडिकल करून, पोलिस क्लिअरन्स घेऊन ११,००० प्रत्येकीचा 'कुमाऊं मंडल विकास निगम' यांच्या नावाचा ड्राफ्ट फॉर्मसोबत पाठवायचा. आपल्याला हव्या त्या महिन्यातील तारीख आपल्याला निवडता येते. सरकारी नोकरी असलेल्यांना ट्रेकिंगसाठी असलेली स्पेशल भरपगारी रजा मिळते.
दिल्ली ते दिल्ली साधारण २०/२१ दिवसांची यात्रा असते. त्यापैकी दोन दिवस जाताना आणि दोन दिवस येताना असा चार दिवसांचा प्रवास बसने असतो. आणि १६ दिवस पायी किंवा घोड्यावरुन असतो. दिल्लीबाहेरून येणार्यांसाठी रेल्वे यात्रीनिवासात स्वखर्चाने राहण्याची सोय होते. तिथूनच यात्रेला सुरवात होते. यात्रेच्या आदल्या दिवशी इथेच सर्व यात्रेकरूंची मिटिंग होते. ओळखदेख व यात्रेच्या कार्यक्रमाची, तेथील हवामान, संभाव्य धोके याची कल्पना त्यावेळी दिली जाते. दिल्लीपासून महाराष्ट्रातर्फे एक मार्गदर्शक असतो, तर निगमचा मार्गदर्शक काठगोदामला भेटतो.
आम्ही २००२ साली जून महिन्यात गेलो होतो. त्यावेळीचा खर्च मी सांगितला आहे. आता कदाचित जास्त असेल. असो, आता उद्यापासून आपण प्रत्यक्ष यात्रेला निघू.
हर हर महादेव. नर्मदे हर!
वाचने
10013
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अरे वा
छान!
In reply to छान! by एस
शुद्ध लेखन.
In reply to छान! by एस
मला वाटतं एखाद्याने काही
In reply to मला वाटतं एखाद्याने काही by जयंत कुलकर्णी
तुमचा दृष्टिकोनही बरोबर आहे.
In reply to तुमचा दृष्टिकोनही बरोबर आहे. by एस
स्वॅप्स,
In reply to तुमचा दृष्टिकोनही बरोबर आहे. by एस
धन्यवाद.आपण सर्वजण वाचता
कैलास-मानसरोवर ह्या यात्रेबद्दल मला प्रचंड
In reply to कैलास-मानसरोवर ह्या यात्रेबद्दल मला प्रचंड by दिपक.कुवेत
धन्यवाद.मला फोटॉ टाकता येत
शीवाय स्वॅप्सचे अनेक धन्यवाद
चला सुरुवात तर झाली .छान !
छान सुरुवात