उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा.
मिळवले :
१. तंत्रज्ञान प्रगती
यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
अर्थात ब्रेन ड्रेन मधेही आपण बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहोत.
२. शैक्षणिक क्षेत्र
१९४७ मध्ये आपला साक्षरता दर १२ % होता तो सध्या ७४.०४ % झाला आहे. यावरून आपण शैक्षणिक क्षेत्रात केलेली भरीव प्रगती दिसते. एकविसाव्या शतकात भारतात शैक्षणिक संस्थांचे अमाप पीक उगवून आले आहे. इतर कोणत्याही देशात मिळणारे सर्व शैक्षणिक पर्याय आज भारतात उपलब्ध आहेत. कित्येक परदेशी विद्यार्थी आज भारतात शिक्षणासाठी येत आहेत. हि नक्कीच गौरवास्पद बाब आहे.
३. शेतकी
शेतकी क्षेत्रात आपण भरघोस प्रगती केली असून धान्ये, फळे, भाज्या ए. शेतकी उत्पादनांच्या बाबतीत आपण पहिल्या पाचात जागतिक स्थान मिळवले आहे. विविध शेतकी उत्पादनांची आकडेवारी इथे आहे.
४. आर्थिक
आर्थिक बाबतीत आपण केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जागतिक बँकेचा हा अहवाल बोलका आहे. त्यानुसार आपण लवकरच जपानला डावलून आर्थिक क्षेत्रात जगात तिसरे स्थान पटकावत आहोत. अर्थात याचा अर्थ आपण श्रीमंत आहोत असा होतो का याचा उहापोह इथे केला नाही.
५. क्रीडा जगत
एक क्रिकेट आणि नेमबाजी वगळता इतर खेळांमध्ये आपण फारशी चांगली कामगिरी करू शकलो नाहीओत. क्रिकेटमध्ये आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत तर नेमबाजीमध्ये नवव्या.
६. वैद्यकीय
वैद्यकीय क्षेत्रात भारत अग्रेसर आहे हे सत्य पचायला जड वाटते. पण ते खरे आहे. टॉप टेनच्या जागतिक क्रमवारीत दोन भारतीय हॉस्पिटल्स चा समावेश आहे. एक फोर्टिस हॉस्पिटल, बेंगलोर आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई.
...आता, तुमच्या गावात तुम्हाला कोणत्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळते हे कृपया विचारू नये अन सांगू नये !
गमावले :
७. अस्थिर राजकीय सत्ता.
सुरुवातीला काँग्रेसने भरीव कार्ये केली अन स्थिर सत्ता देण्यात यशस्वी ठरली. नंतर कुठेतरी बिनसले. लोककल्याण बाजूला पडले अन सत्तेचे राजकारण सुरु झाले. कार्ये संपली अन कार्यकर्ते उदंड झाले. मोदीजी हे चित्र बदलू शकतील का ?
८. दहशतवाद
स्वातंत्र्यातच याची बीजे रोवली गेली. आज त्या बीजाचा बऱ्यापैकी विशाल वृक्ष झाला आहे. आपण जगात चौथ्या क्रमांकाचे दहशतवादी राष्ट्र आहोत.
९. लोकसंख्या
याबाबतीत आपण भलतीच नेत्रदीपक प्रगती केली आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १२७ करोड आहे आणि आपण जगात याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
भ्रष्टाचार
स्वातंत्र्यानंतर भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे दूरवर पसरून एकूण सर्वांगीण विकासामध्ये ही कीड खीळ घालते आहे. भ्रष्ट्राचारात आपण ९४ व्या जागतिक स्थानावर आहे तर आपल्यापेक्षा १ दिवसाने मोठा असलेला पाकिस्तान १२७ व्या स्थानावर आहे. आकडेवारीवरून सत्तेचे राजकारण यातून वगळले असावे अशी शंका घ्यायला जागा आहे.
१०. नैतिकता आणि संस्कृती
सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यानंतर समाजात जी नैतिक अन सांस्कृतिक पातळी आढळत होती त्यापेक्षा सध्याची पातळी नक्कीच बऱ्याच अंशी खालावली आहे. १९५३ पासून २००७ पर्यंतचे दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाण असे आहे.
सांस्कृतिक ऱ्हास अन नैतिक अध:पतन यासाठी अगदी आंतरजाल धुंडाळण्याची गरज नाही. रोजच्या वर्तमानपत्रावरची एक नजर पुरेशी आहे.
........ अशी आहे आपली ६७ वर्षांची वाटचाल.
भारतीय स्वतंत्रता चिरायू होवो ! ! !
संकलन संदर्भ :
http://www.thetoptens.com/high-tech-countries/
http://en.wikipedia.org/wiki/International_rankings_of_India
http://thediplomat.com/2014/05/world-bank-india-overtakes-japan-as-worl…
http://www.mtqua.org/providers/top-10-worlds-best-hospitals-for-medical…
http://en.wikipedia.org/wiki/Global_Terrorism_Index
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-12-04/news/44757314_1…
वाचने
8147
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैला...
छान
मग २००-३०० तर नक्कीच होतील
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
बघा बर!
>>आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान
In reply to बघा बर! by केदार-मिसळपाव
जापान, द. कोरिया, जर्मनी , फ्रांस, अमेरिका, सौदी अरबिया, चीन
In reply to >>आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान by आदूबाळ
प्रातिनिधिक उदाहरण म्हणूनः
In reply to जापान, द. कोरिया, जर्मनी , फ्रांस, अमेरिका, सौदी अरबिया, चीन by केदार-मिसळपाव
तंत्रज्ञान वापरण्यातली प्रगती
In reply to बघा बर! by केदार-मिसळपाव
आणि हो
आपण जगात चौथ्या क्रमांकाचे
खालून दुसरा दुवा पहा.त्यात
In reply to आपण जगात चौथ्या क्रमांकाचे by मृत्युन्जय
दहशतवाद करणारे भारतीय नागरीक
In reply to आपण जगात चौथ्या क्रमांकाचे by मृत्युन्जय
मला वाटते...
नीरक्षीरविवेकातून बोलायचे झालेच तर ..
प्रतिसादातला १९२० ते १९६० या
In reply to नीरक्षीरविवेकातून बोलायचे झालेच तर .. by चौकटराजा
असो
In reply to प्रतिसादातला १९२० ते १९६० या by नितिन थत्ते
मंत्री खातो, तसा नागरिकही
In reply to नीरक्षीरविवेकातून बोलायचे झालेच तर .. by चौकटराजा