नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा
सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते.
आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट नियतीच्या खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं.कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील ....
यशवंत
वाचने
12161
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>सिद्ध करू शकते .
In reply to त्याचे प्रतिसाद नेहमीच by म्हैस
बाकीच्या लेखावारचे प्रतिसाद
कोंबडयाला वाटत असेल त्याच्या
In reply to बाकीच्या लेखावारचे प्रतिसाद by म्हैस