पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन!
प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .
या महाकाय प्रकल्पातील मोठी आव्हाने-
१, गंगा किनार्यावर असणार्या प्रदूषणकारी प्रकल्पांचे विस्थापन
२, साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर गंगेचे दोन्ही काठ कॅनॉल प्रमाणे बांधून दोन्ही तीरावर मोठी गटारे बांधणे
३, धार्मिक व अन्य कारणामुळे होत असलेले प्रदूषण रोखणे , ज्यात मॄतदेह गंगेत फेकणे / गंगाकिनारी प्रेत जाळून राख नदीत फेकणे इत्यादी गोष्टी ना(श्रद्धा न दुखावता) पर्यायी व्यवस्था निर्माण करणे
४,वाराणसी व गंगा किनारी राहणार्या रहिवाश्यांचे प्रबोधन करून गंगा शुद्धीकरण व स्वच्छता नियमांचे महत्त्व पटवणे , ज्यायोगे भविष्यातही गंगा शुद्ध राहिल .(असे नको की वारेमाप पैसा खर्च करून सरकारने गंगा स्वच्छ आणि शुद्ध करायची आणि लोकानी पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत पुन्हा अशुद्ध करायची )
५, वाराणसी ते कोलकाता एवढ्या प्रचण्ड अन्तराच्या भागावर ही योजना राबवणे व त्यासाठी आवश्यक त्या प्रचंड खर्चाची तरतूद करणे / कामाचा दर्जा उच्च राखणे
अशी अनेक आव्हाने आहेत . तरीही काल वर्तमान-पत्रात आलेल्या या बातमीने मन हरखून गेले -
http://timesofindia.indiatimes.com/india/A-waterway-from-Varanasi-to-Ko…
अशी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्या महापुरुषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम!
कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!
तसेच यातून गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर होत असलेला प्रचंड खर्च देखिल वसूल होईल अशीही शाश्वती वाटते!
आपणास काय वाटते?
वाचने
28120
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशी कल्पना ज्याच्या डोक्यात
!!!
कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!याऐवजी हे "कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक सुनियोजीतपणे केलेले आवश्यक आणि अभिमानास्पद असे मोठे विकासकाम ठरेल यात संशय नाही!" जास्त व्यवहार्य आहे दुर्दैवाने गेल्या काही शतकांत भारतिय नागरिकाला "सुनियोजीत गैरनियोजन (well managed mismanagement)" पाहण्याची इतकी सवय लागली आहे की सर्वसामान्य आणि आवश्यक विकासकाम देखील त्याला अद्भुत आश्चर्य वाटू लागले आहे !+१
In reply to !!! by डॉ सुहास म्हात्रे
शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग
आपण रस्ते, रेल्वेरूळ बांधतो
In reply to शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग by कवितानागेश
+१
In reply to आपण रस्ते, रेल्वेरूळ बांधतो by विश्वनाथ मेहेंदळे
राम गोपाल वर्मा म्हणाला
In reply to शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग by कवितानागेश
.
कॉणी काय चांन्गले कॅरायचे
In reply to . by पोटे
>>>टिथे गन्गेच्या काठी इतकी
In reply to . by पोटे
मिठी नदीपेक्षाही मोठी आहे
In reply to >>>टिथे गन्गेच्या काठी इतकी by विश्वनाथ मेहेंदळे
मुंबईकरांना मिठी बद्दल
In reply to मिठी नदीपेक्षाही मोठी आहे by यशोधरा
मी काही टोमणा मारला नव्हता.
In reply to मुंबईकरांना मिठी बद्दल by विश्वनाथ मेहेंदळे
>>> टिथे गन्गेच्या काठी इतकी
In reply to . by पोटे
जलमार्ग
क्रूझ
नदीजोड
In reply to क्रूझ by प्रदीप
समजा जोडल्या नद्या, हुबळी ला
In reply to नदीजोड by सुनील