Skip to main content

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

लेखक गुल-फिशानी यांनी रविवार, 11/05/2014 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय. त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं. मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत १-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला? २-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ? ३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ? ४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ? मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय. तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार? तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?

वाचने 39957
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

गिरीजाशेठ, अहो, नमोजी असे लिहिले आहे! 'जी' हा बहुवचनी आदरार्थी प्रत्यय आहे. व्यक्तीद्वेषाचा आरोप टाळण्यासाठी आता गोब्राम्हणगुजरातीप्रतिपालक, अविवाहिततरुणीपाळतकारक, मोदीकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज नरेंंद्रमहाराजसाहेब म्हणायचे की काय? नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.

In reply to by आजानुकर्ण

नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.
अता कसं जरातरी सकारात्मक बोललात :) पृथ्वीराज साहेबांना खरचं पत्र लिहा . त्याचा फोटो इथे शेयर करा . त्यांचे उत्तर आले तर तेही शेयर करा ... आणि उत्तर नाही आले तर मी स्वतः मोदीजींना पत्र लिहिन ... तेही तुमच्या पत्राची अटॅचमेन्ट लावुन :) शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही :) (फक्त पृथ्वीराजांच्या हातुन जर काही कारवाई झाली तर महाराष्ट्राचे प्रश्ण महाराष्ट्राला सोडवता येतात , सारखी दिल्लीची चरणधुळ घावी लागत नाही येवढेच काय ते समाधान मिळेल !)

In reply to by प्रसाद गोडबोले

शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही
हो पण पृथ्वीराजजींऐवजी नमोदीजींना पत्र लिहिले तरी तुम्हाला राग आला आणि व्यक्तिद्वेषाचा आरोप तुम्ही केला. राजकारण घुसडायचे नव्हते तर पृथ्वीराजजींचा विषयही काढायचे कारण नव्हते. कोणाच्याही हातून नायनाट झाला तर नमोदीजींच्या हातून झाला तर काय हरकत आहे? पृथ्वीराजजींच्या हातून फाईल पुढे सरकत नाही असे म्हणतात आणि नमोदीजी कार्यकुशल असल्याची वावडी आहे मग दोन वेळा पत्र पाठवून प्रोसीजरमध्ये वेळ घालवायचा की प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे?

In reply to by आजानुकर्ण

१.अहो घटना महाराष्ट्रात घडली आहे ,सो आधी महाराष्ट्रातच त्यावरचे उत्तर शोधुन काढले पाहिजे . २. तुम्ही नमो चे नाव घेवुन राजकारण घुसडलेत , त्या आधीच्या कोणत्याही प्रतिसादात कोणीही कोणत्याही राजकीय नेत्यावर ह्या घटनेचे खापर फोडल्याचे मलातरी दिसलेले नाही . त्यातही तुमचा प्रतिसाद सकारात्मक नाही , उपरोधिकच आहे हे कोणही सांगेल. "मोदी कार्यकुशल आहेत ते नक्कीच हा विषय योग्य रितीने हाताळु शकतील" असा प्रतिसाद असता तर हा इतका काथ्याकुट झालाच नसता ३.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या पृथ्वीराज आहेत (भले मग निवडुन आलेले नसले तरीही ) आणि मुख्यमंत्री ह्या नात्याने माणुसकीला काळीमा पुसणार्‍या ह्या घटनेचे जबाबदारी सर्वप्रथम त्यांच्यावर येत ...येतेच ! ४. मोदींकडुन प्रश्न सुटला तर आनंदच आहे हो ...पण सारखं काय दिल्ली कडे पळायचे ...महाराष्ट्र राज्य आहे , केन्द्रशासित प्रदेश नव्हे. ५.आता कोणताही गुन्हा घडल्यावर स्थानिक कोर्ट > जिल्हा न्यायालय > उच्च न्यायालय > सर्वोच्च न्यायालय असाच खटल्याचा प्रवास होतो ... आणि तो तसाच योग्य आहे . प्रोसीजर मधे वेळ गेला तरी तो योग्यच आहे . ६. केवळ प्रश्न दिल्लीकडे घेवुन जाणे म्हणजे प्रामाणिक प्रयत्न नव्हे.... आधी तो स्थानिक पातळीवर सोडवायचा प्रयत्न तरी करा . बाकी पत्र लिहुन झाले की मिपावर एकदा ड्राफ्ट दाखवा , सुजाण मिपाकर आनंदाने सुधारणा सुचवतील .... आणि तुम्ही पत्र पाठवले नाहीत तर निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

फक्त उद्याचा एक दिवस आहे गिरीजा काकू, नंतर आवाज बंद च होणार आहे त्यांचा. तुम्ही कशाला डोक्याला ताप करुन घेता?

In reply to by प्रसाद गोडबोले

१. महाराष्ट्र भारतात आहे. संपूर्ण भारतासाठी उत्तर शोधले तर महाराष्ट्रासकट इतर राज्यांमधील जातीभेदावरही उपाययोजना होईल की नाही? २. नमोंचे नाव घेतल्याने लगेच राजकारण कसे काय झाले बॉ? नमोंवर खापर वगैरे तर काहीच्या काहीच आरोप आहेत. नमो दलितांप्रती अन्यायकारक असल्याचे मी कुठे लिहिले आहे बॉ? ३. पृथ्वीराजजींवर जबाबदारी येतेच पण कामे करण्यात ते संथ आहेत की नाहीत? ४. मोदींकडून प्रश्‍न सुटल्याने आनंदच असणार आहे तर मग मोदींनी प्रश्‍न सोडवायला काय हरकत आहे? की मुळात प्रश्‍न सोडवायचाच नाहीये? ५. सदर गुन्हा प्रोसीजर पाळत बसण्याइतका सामान्य आहे का? निर्भया खटल्यात स्पेशल कोर्टाची स्थापना करुन झपाट्याने न्यायनिवाडा झाला होता. शिवाय न्यायालयात गेल्यास चित्रपटांसंबंधी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकार वगैरे नसती झेंगटे उपस्थित होतील. ६. या प्रश्‍नाच्या मुळाशी असलेल्या चित्रपटांवर बंदी आणण्याचे काम स्थानिक पातळीवर कसे काय होईल? चित्रपटांवर बंदी आणायची आहे की स्थानिक थेटरांवर? पत्र आधीच लिहिले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गंगामैयाची माफी ते पंतप्रधानांना विनंती ही सर्व कामे आंतरजालावरच होतात.
निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल
तुम्हाला काय वाटते व म्हणायचे आहे यावर माझे नियंत्रण नाही.

In reply to by आजानुकर्ण

बरं

आजकल फायरफॉक्स चालत नाय ;) !