Skip to main content

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

लेखक गुल-फिशानी यांनी रविवार, 11/05/2014 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय. त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं. मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत १-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला? २-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ? ३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ? ४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ? मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय. तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार? तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?

वाचने 39957
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

सिरीयसली सांगतो पेपर बदला. घटना घडली त्यानंतर दुसर्यादिवशी लोकसत्तामध्ये डिटेल आलाय . नंतरही पाठपुरावा केला जातोय. abp maza वर चालुय बगा जरा. काल राष्ट्रिय चॅनलवरपण आलत. वाईट घडल.

In reply to by जेपी

जेपी जी मला माहीत नव्हतं लोकसत्ता मध्ये आलय माझ्या कडे दिव्य मराठी येतो व लोकमत मी बघितला त्यात ही नव्हत. योगायोगाने मी एबीपी माझा ही बघितला नाही. माझी माहीती व रीसोर्सेस कमी आहेत बहुधा मी अजुन शोध घेतो. पुन्हा माहीतीसाठी आभार.

In reply to by नगरीनिरंजन

नगरी जी काही करण्याचा वगैरे हेतुने नाही हो बोललो मी मला अस्वस्थ होत होत की कोणी बोलत नाहीय कुठे च उल्लेख नाही प्रकरण इतक झाल आणि कुठेच कस नाही आल. पण वरील जेपी च्या प्रतिसादाने लक्षात आल की बहुधा दिव्य मराठी लोकमत मध्ये कव्हरेज नाही झाल पण लोकसत्ता त वगैरे आहे माझे च वाचन आणि रीसोर्सेस कमी पडले बहुधा. बाकी काही अजुन नाही मला वाटल की प्रकरण दडपल जातय की आचार संहीतेमुळे कोणी बोलत नाही इ. व तो मुलगा फारच कोवळ्या वयाचा असल्याने इमॅजिन करुन अस्वस्थ झालोय इतकचं अशी अनेक प्रकरणं सहसा दडपुन टाकली जातात असा अनुभव आहे ते या बाबतीत न व्हाव इतक्याच साध्या अपेक्षेने ते प्रकरण अस सुटुन जाउ नये म्हणुन

In reply to by गुल-फिशानी

तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून नाही म्हणालो मी; पण अशा घटना घडतात, चार दिवस चर्चा होते मग दुसरी घटना घडेपर्यंत सगळं कसं शांत शांत. आणि लपवण्याचं म्हणाल तर लपवा-छपवी सोडून यात जातीपातीचं काहीच नसून निव्वळ दोन कुटुंबांमधला झगडा होता असं छातीठोकपणे सांगितलं जातंय. काय करणार आहे जन्ता? हे वाचा:http://www.loksatta.com/maharashtra-news/squat-down-and-march-in-jamkhed-protest-to-nitin-age-case-508605/

मी कालच खर्ड्यावरुन परतलो , मंजुळेंच मला माहीत नाही, पण माझ्या आधी वाघमारे तिथे येवुन गेले होते.. असो ...प्रकाराची बरीच शी माहीती गोळा केली आहे मी ...पण माझं मन मात्र इथ(मिपावर) लिहायला तयार नाही... इतकच सांगतो की ..त्या माय माऊलीच्या डोळ्यांतल्या अश्रुचं थांबेनात, त्या असं टाहो ई. फोडुन रडत नाहीयेत..आवाज देखील निघत नाही ...डोळ्यांमधुन सदैव धारा लागलेल्या असतात ..

तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाउन काय परीस्थीती आहे ते बघितलय त्यामुळे तुमच्या भावना समजु शकतो. लिहीणे न लिहीणे हा ही अर्थातच तुमचा निर्णय आहे त्याचा ही पुर्ण आदर करतो. मी स्वत: मंगळवारी जायच ठरवलेलं आहे असो.

१७ वर्षाच्या कोवळ्या जीवाला फार हालहाल करून मारले. पोस्ट-मार्टम या सगळ्याचा उल्लेख नाही असेपण कळते. सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दलित (मातंग) समाजातील मुलगा आणि आपली मुलगी (सवर्ण- मराठा) बोलतात, कथित प्रेम वगैरे आहे म्हणूनच ही घटना घडली आहे.अर्थात अश्या स्वरूपाची हि काही पहिलीच घटना नाही. आता बघूया मीडिया आणि काही दलित संघटनानी ओरड केल्यावर काय होतंय ते. संपूर्ण मराठा समाजाला आरोपीच्या पिंजर्यात उभे कार्नायचे पण प्रयत्न होत आहेत मात्र ते चूक आहे.नितीन आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळो हीच अपेक्षा.पुरोगामी वगैरे म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात अश्या क्रूर हत्या घडत आहेत ही चिंतेची बाब आहे.

काहीतरीच काय लिहिताय? असे कुठे होते का? आजकाल असा जातीभेद कुठे शिल्लक तरी आहे का? असलाच तर या पुरोगामी महाराष्ट्रात तरी नाही. फँड्री आला तेव्हाच आम्ही म्हटलं होतं, हा अवास्तव सिनेमा आहे. आता तर काय पेवच फुटणार अश्या खोट्या गोष्टींचं.

दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. तरी ही जात नि पक्ष निरपेक्ष विचार होऊन (तथाकथित किमान) 'न्याय' मिळावा हीच अपेक्षा आहे. बाकी महाराष्ट्र पुरोगामी कधी होता??????? अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.

In reply to by बॅटमॅन

>>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय. शक्यता आहे देखील आणि नाही देखील. दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत. (जर तर : प्रस्तुत केसमध्ये असं झालं नसेल देखील अथवा तेवढी कसलाच विचार करण्याची क्षमता देखील नसेल त्या मुलाची पण तरी पुढील संभाव्य गोष्टी टाळण्यासाठी घेतली गेलेली फारच पुढची पायरी असेल.) मात्र कुणाचाही जीव जाणं तितकंच तिरस्करणीय आणि घृणास्पद आहे. बहुसंख्यांक समाज असला की साहजिक संख्याबळामुळं, सांपत्तिक स्थितीमुळं आणि इन जनरलच येणारा माज आणि तथाकथित प्रतिष्ठा वाचवणे ह्या साठी सो कॉल्ड जमीनदार वतनदार मिशीवर ताव देणारे लोक ह्या गोष्टी करताना दिसतात. बर्‍याचदा समाजात एकदा बोलबाला झाला की केस आपल्या हातातून निसटून समाजातल्या पुढा र्‍यांच्या हाती जाते नि तिथं राजकारण सुरु होतं. माझ्या नात्यातल्याच एकाला (चुलतचुलतभाऊ) एका ओळखीतल्या मुलीशी फोनाफोनी आणि मेसेज देवाणीघेवाणीवरुन असंच सतरा अठरा वर्षांचा असताना माझ्या भावोजींना सांगून (त्यांच्या गावाजवळ असल्यानं) गावी बोलावलं आणि तिथे मारलं. (लाथाबुक्क्या) मारल्यावर त्याला फिट आली मग मारणारांनीच दवाखान्यात नेलं.

In reply to by प्यारे१

दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत.
हजारो वर्षांपूर्वीचे तथाकथित स्कोर सेटल करायचे म्हणून त्या मुलींचा बळी घेतलेल्या अशाच काही केसेसबद्दल ऐकून आहे खरा. याचा निषेध किती करावा त्याला सीमा नाही. फक्त या केसमध्ये तो मुद्दा कितपत आहे हे स्पष्ट नसताना तो मुद्दा तिथे आणणे अप्रस्तुत आहे असं आणि इतकंच म्हणणं आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

मराठ्यांची मराठ्यांशीच लव म्यारेज होताना हाणामार्या होतात,मुडदे पडतात…मग बाकीच्यांनी मध्ये पडायचंच कशाला म्हणतो मी ;)

In reply to by मालोजीराव

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .

In reply to by नानासाहेब नेफळे

आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक नेहमीच वाटत आलंय.. :) असल्या फालतु माहीतीचा स्त्रोत कुठला हे सांगाल का? की आपल्याच अपार ज्ञानाचं पिल्लु आहे .

In reply to by नानासाहेब नेफळे

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात . हे मराठा - मराठा म्हणजे ९६ कुळी मराठ्यांबद्दल बोलत आहात का? कारण आम्ही पण ते आहोत. आणि आमच्यात माझ्या पिढीत आम्हा भावंडांमध्ये टोटल १०-१२ असू तर दोनच अपवाद वगळता सर्वांचीच आंतरजातीय लव्हमॅरेज आहेत. किंबहुना आंतरधर्मीय देखील आहेत. आंतरप्रांतीय देखील आहेत. पण आपण म्हणता तसे असेल, किंबहुना कुठल्याही जातीधर्मात असेल तर दुर्दैवी आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

@सगळया मराठ्यात ही रितभात आहे.>>> नेफळे महाराज..तुमच्या ठरवलेल्या जगातून बाहेर या. मी माझ्या कामा निमित्तानी याच अंतरपाटाच्या जवळचं आयुष्य गेली १६ वर्ष जगतोय. त्यामुळे,तुंम्हाला हा अस्तित्वात नसलेला हणुभव कुठून आला म्हंन्तो मी??? ;) की स्वखुषिनी अंधत्व पत्करलय आपण..काही ठराविक विषयात! :p तसं असेल..तर चालू द्यात..निवांत!

In reply to by प्यारे१

अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.
बदाऊंच्या ताज्या घटनेबद्दल तुम्हांस काय म्हणायचे आहे? “Members of dominant castes are known to use sexual violence against Dalit women and girls as a political tool for punishment, humiliation and assertion of power.” दर आठवड्याला २१ दलित स्त्रियांवर बलात्कार होतात. स्त्रियांवरील अत्याचारासंबंधीचा संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल वाचून पहा. दलित असणं आणि त्यातही दलित स्त्री असणं ही किती मोठी शिक्षा असेल... शिक्षा म्हणून, अपमान म्हणून किंवा बळाचा धाक घालण्यासाठी दलितांच्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचाराचे शस्त्र सवर्ण पुरुषांकडून सर्रास वापरले जाते आणि त्याचे सुप्तपणे समर्थनही केले जाते याबद्दल काय म्हणाल? क्षमा करा प्यारेकाका, पण आपल्या प्रतिसादाचा स्वर पाहून तिडीक आली म्हणून हा प्रतिसाद.

मराठा समाजात अशा प्रकारच्या घटना खुप प्रमाणात आढळातात. पुण्यामधे आमच्या एका ओळखीच्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न जबरदस्तीने लावले होते. त्या मुलीला इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न करायचे होते म्हणुन. तो मुलीला लग्नाला तयार करण्याचा प्रकार फार भयंकर होता. दुर्दैवाने ते सगळे अतिशय जवळुन आणि मुकाट पणे पहावे लागले होते.

हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक पिढी जावी लागेल. म्हणजे आणखी वीस वर्ष. कारण कोणताही बदल तडकाफडकी होत नसतो. घडलेली घटना खरच वाईट. सगळ्यांसाठीच वाईट.

दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. तरी ही जात नि पक्ष निरपेक्ष विचार होऊन (तथाकथित किमान) 'न्याय' मिळावा हीच अपेक्षा आहे.+१

जर कोणी कायदा हातात घेवून शिक्षा केली असेल किंवा जर तो खून असेल तर अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यात वादच नाही. यात कोणीही जातीचा/धर्माचा बावू करू नये व प्रसंगाला विपरीत वळण लावू नये. फार वाईट घडले. पण...... विषय चुकीच्या दिशेने नेणाऱ्या लोकांसाठीच लिहितो आहे ते असे : परंतु मला कीव येते त्या पोराची आणि त्याच्या चुकीवर पांघरून घालनारयांची. १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? तोवर नुकतेच १२ पास असेल किंवा नसेलही! म्हणजे हा मुलगा कमावता तर नक्कीच नसावा. मग प्रेम करायचे हे उद्योग शिकवले कोणी? कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! ज्याला दोन वेळेला खायची मारामार आहे, त्यांच्या आई बापांनी आपल्या मुलाला कडक शब्दात परिस्थितीची जाणीव करून देणे हे पालकांचे कर्तव्य नाही का? आजकाल मुलांना फारच लाडावून ठेवले आहे असे नाही का वाटत? माझा त्यावेळचा प्रतिसाद बघा. नवा विचार काय दिला आहे समाजाला ? यावरून जर कोणाला बोध घ्यायचा असेल तर फ़्यंड्री सारखे Teen age love चे सिनेमे बंद केले पाहिजेत, नाही तर असे प्रसंग अजून होतील व नवीन पिक्चरही निघेल ह्या सत्य घटनेवर आधरित. नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.

In reply to by आयुर्हित

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? मग २७ की ३७व्या वर्षी करायचे का?असो विष्य तो नाही. ज्यांनी ही हत्या केली त्यांचे कुटुंबीय रयत शिक्षण संस्थेशी संबंधीत आहेत.त्या भागातल्या राजकिय पुढार्‍यांचा प्रामाणीक म्हणून काही नावलौकिक नाही. केस कशी हाताळली जाते पोलिसांकडून ते पाहुया.

In reply to by आयुर्हित

>>>> १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे ? समजा तो प्रेमात पडलाय, तो काही काम करत नाही त्याला कमवायाची अक्कल नाही. त्याच्या घरात खायची मारामार असेल, पालकांनी त्याला वळण लावलं नसेल, आजकाल मुलांना खुप लाडावून ठेवलं असेल. म्हणुन प्रेमात पडायचं नसतं ? आणि समजा एखादा मुलगा कोणाच्या प्रेमात पडला म्हणून एखाद्याचा जीव घ्यावा काय ? दुसरे कोणतेच पर्याय नसतात ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेमात पडा हो सर पण या अश्या कोवळ्या वयातल्या गोष्टींवर थोडा निर्बंध असावा. उगा टाईमपास सारखे चित्रपट अश्या गोष्टींना अवास्तव महत्व देतात. ही बातमी काय सांगते? माझ्या मते तरी यातली ५०% प्रकरण तरी असल्या कोवळ्या प्रेमाची असावीत.

In reply to by स्पंदना

अपर्णाताईंशी सहमत. टाईमपास सारखे चित्रपट या सारासार विवेक नसलेल्या वयात प्रेम (शरीरसंबंध) करायला उत्तेजन देतात अप्रत्यक्षपणे. तथाकथित फँड्री देखील याच वाटेने जातो. अप्रत्यक्षपणे या वयातल्या संबंधांना उत्तेजनच देतो. यावयातले शारीरीक आकर्षण नैसर्गिक असते मान्य, परंतु त्यातून अप्रत्यक्ष बोध घेऊन तसे वागून कोणाचे नुकसान होत असेल तर त्या चित्रपटांचे समर्थन करणे अयोग्य. त्याच्यातच समाधान मानायचे असेल तर ठीक.

In reply to by आयुर्हित

त्याचे काहीही प्रेम वगैरे नव्हते . ती मुलगीच मागे होती याच्या. फोन नंबर मागत होती. हा हे आईला बोलला. आई म्हणाली लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. हे सगळे पेपर मध्ये आले आहे. आणि दुसरे म्हणजे समजा असलेच प्रेम तरी हि शिक्षा द्यायचा अधिकार यांना कोणी दिला ? फार तर तुम्ही आपली मुलगी सांभाळा , समजावा तिला .. दुसर्याच्या मुलाला का शिक्षा ?

In reply to by आयुर्हित

अरेरे, बळी पडलेल्याच व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची प्रवृत्ती इतक्या निरर्गलपणे प्रकट झालेली पाहून अतिशय वाईट वाटलं. अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात. फ्यंड्री सारखे सिनेमे बघून तरुण पोरं प्रेमात पडतात वगैरे काहीही त्यातून बकलं जातं. 'आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.' ही गर्भित धमकी तर फारच घृणास्पद. अवांतर - कृपा करून ती सही बदला हो, या प्रतिसादाला ती शोभत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

अत्यंत समर्पक प्रतिसाद राजेश... अगदी अवांतरसुद्धा समर्पक. तुझ्या प्रतिसादाशी सहमत.

In reply to by राजेश घासकडवी

नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.क्रुपया पुर्ण ओळ वाचावी.....ज्यामुळे अर्थबोध होइल ही खात्री. सही गहन अर्थपुर्ण आहे. प्रतीसाद व सही वरवर वाचणार्याला समजत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

समर्पक प्रतिसाद, गुर्जी.. आता मुळ प्रतिसाद..
कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे!
अरे च्यामारी ! हा असला सल्ला द्यायला कुणी शहाणी व्यक्ती नसल्याने, प्रेम करते, ते निभावून सुखाचा संसार करणारे लोक पाहीले आहेत ब्वॉ.. अस्मादिकही त्यांतलेच.. आणि तो लाखो रुपयेवाला महिन्याला वाला फंडा लावला तर आणखी दहाएक वर्षं तरी वाट बघायला पाहीजे होती आम्ही.. ;-)
नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.
देवा !! मीच गर्भगळीत का काय म्हणतात ते झालोय.. असो.. शक्य झाल्यास, मोठे व्हा !! (श्रामो, तुम्ही आठवलात बघा एकदम)

In reply to by आयुर्हित

अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात.
आयुर्हित साहेब, जाऊ द्या हो, ते पुरोगामी मराठावाले आणि पुरोगामी दलितवाले बघून घेतील. तुम्ही काहीही प्रतिसाद द्या, हे लोक स्वतः पुरोगामी असतात आणि तुम्ही कायमच प्रतिगामी असता. अशा प्रतिसादातून तुमच्या जातीवर हल्ला करायची संधीच शोधत असतात हे लोक. यांना पुरोगामीत्वाची फार चाड असते असं नाहीये, असतात हे स्वतःपण जातीयच (जाणता राजा पहा कसं सोयीस्कर रित्या राजू शेट्टींची जात काढतात, किंवा चड्डीवाल्यांबद्दल विधान करतात, पण ते पुरोगामीच! तसेच हे पण!) पण काही जातींना शिव्या दिल्याशिवाय काही लोकांना जेवण जात नाही. आपापसात लढाया करून मरतील झालं.

In reply to by आयुर्हित

कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! यालाही आक्षेप आहे !

In reply to by आयुर्हित

१७ हे प्रेम करायचे वय नाही? आयुर्हितजी, आपल्या प्रतिसादातली भाषा चुकून वेगळी पडली असे वाटते. १७व्या वर्षीही प्रेम करता येऊ नये असा समाज आपण निर्माण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं होतं बहुतेक. १७वे वर्ष हेच खरे तर प्रेमाचे वय आहे पण आमच्या अपयशामुळे कृपया मुलांनो तुम्ही तुमच्या जिवाला धोका असल्याने आणखी दहा-बारा वर्षे थांबावे आणि शक्यतो स्वतःच्या जातीतलीच मुलगी बघून लग्न 'उरकावे' असेच तुम्हाला म्हणायचे होते ना? शिवाय समाजाने तुम्हाला काय दिले किंवा जुन्या विचारावर काय कृती केली हे तुम्ही विचारायचं नाही पण तुम्ही समाजाला काय नवा विचार दिला हे तुम्हाला सांगावंच लागेल हेही म्हणायचं होतं बहुतेक. :-)

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? पहिल्या प्रेमाचे हेच वय असते. असो, कोणते वय प्रेमाचे हा धाग्याचा विषय नाही. एखादी मुलगी जीन्स-टीशर्ट असा मॉडर्न पेहराव करायची मग तिच्यावर बलात्कार नाहीतर आणखी काय होणार असे या गुन्ह्याचे समर्थन या धाग्यावर करू नका. जर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून त्या मुलीची छेड काढली असेल (जे अजूनपर्यंत तरी कुठे बातमीत आले नाहीये) तरच त्याला धडा शिकवण्याचे समर्थन होऊ शकते. अर्थात त्या ही परिस्थितीत हि असली क्रूर हत्या, जी थंड डोक्याने ठरवून केली आहे असे वाटतेय, ती खरेच शॉकींग आणि अजूनही आपला समाज कुठे आहे हे दर्शवणारी आहे.

त्यातल्या त्यात समाधान येवढेच की ज्या एका विशिष्ठ समाजाविरुध्द महारष्ट्रात( विशेषकरुन पश्चिम महाराष्ट्रात) हेतुपुर्वक पोलरायझेशन चालु आहे त्या समाजाचा ह्या प्रकरणाशी डायरेक्टली संबंध नाही . (डायरेक्टली असे म्हणण्याचे कारण हेच मी , "मनुवादी" ह्या शब्दाखाली इन्डायरेक्टली त्यांचाच दोष आहे असे ठासुन सांगायलाही लोक पुढे मागे पहाणार नाहीत. )

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि ह्या घटनेच्या निमित्ताने "जब्याने मारलेला दगड" नक्की कोणत्या "समाजाच्या" थोबाडावर मारला आहे ह्यावर एकदा चिंतन होण्याची गरज आहे असे वाटते .

In reply to by प्रसाद गोडबोले

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं. जब्याने दगड मारलाय तो त्याला माणूस म्हणून जगू न देणा-या माणसाच्या थोबाडावर. मग ही माणसं कोणत्याही जाती-पातीची असू द्या. माणसांनी 'जब्याच्या' शोषनाच्या आणि त्याच्यावर अन्याय करण्याच्या ज्या ज्या गढ्या उभारुन ठेवल्या त्या त्या गढ्यांविरुद्ध जब्याचा दगड आहे. आपापली सर्व 'शस्त्रे' वापरून ज्यांनी ज्यांनी त्या त्या 'शस्त्रांच्या' आधारे 'जब्याला' माणूस म्हणूण जगू द्यायचे नाकारले त्या त्या विरोधात जब्याचा दगड आहे. माणूस म्हणून मला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच एक उदाहरण होऊन अन्यायाविरुद्ध ,समतेसाठी विषमतेविरुद्ध आणि माणुसकीचे हक्क हिरावून घेणा-या अमानुषतेविरुद्ध मारलेला तो दगड आहे. माणसाचा माणसाला स्पर्श नको म्हनणारी, घाणेरडी माणसं स्वच्छ माणसात यायलाच नको असे म्हणनारी, बकाल जीवन जगणा-यांनी आपापल्या औकातीने राहावं असं समजणारी, भिकारडी साली एक वेळ खायची सोय नाही आणि निघालीत प्रेमाची स्वप्न बघायला, अशांवर तो भिरकावलेला दगड आहे. प्रत्येक माणसाला विकासाची संधी आहे पण तशी संधी न मिळू देणा-याच्या तोंडावर तो दगड आहे. जात-धर्मभेद, वर्ण-वंशभेद, लिंगभेद आदींचाचा विचार करणा-यांच्या तोंडावर तो मारलेला दगड आहे. माणूस म्हणून आपूलकीची जिव्हाळ्याची भावना व्यक्त करण्यापेक्षा, स्वार्थभाव, परस्परद्वेष मत्सर, तिरस्कार वा तुच्छताभाव बाळगणा-यांच्या विरुद्ध जब्याचा दगड आहे. जब्याला अक्कल नाही, जब्याला शिक्षण नाही, जब्याला ढुंगावर गुंडाळायला नीट कपडे नाहीत, जब्याला वळण नाही, जब्याला नैतिकता बैतिकता समजत नाही, जब्याची काय चूक त्याच्या आई-बापाची चूक कारण त्यांनी त्याच्यावर संस्कार केले नाही, आणि साला अल्लड वयात प्रेमाची स्वप्न बघतो, असा विचार करणा-यांया थोबाडावर तो दगड आहे. आणि सांगू फँड्रीतला 'जब्या' असू दे नाही तर 'किरवंत' मधलं 'अंत्येष्टी संस्कार’ करणारं पात्र असू दे यांची जात आणि समाज मला माहिती असते नसते तरी त्यांचं जर माणूसपण नाकारलं गेलं असेल तर अशा दोघांनाही अशा कोणत्याही लोकांच्या विरुद्ध दगड मारण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by आत्मशून्य

सुरेख प्रतिसाद !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं.
बिरुटे सर , हे इतकं सोप्पं आहे ? माझ्या माहीतीत तर फक्त एक विषिष्ठ समाजच शोषक आहे आणि त्यांच्या थोबाडावर मारलेला आहे तो दगड असे आजवर ऐकत होतो , रादर सर , तुम्ही येथे सातारा कराड कोल्हापुरात येवुन पहा जब्याच्या आडुन कोण कोण दगड मारत होते ते ही तुमच्या लक्षात येईल , पण ह्या घटने मुळे जब्याच्या आडुन दगड मारणारेच जब्याच्या जिवावर उठलेत हे स्पष्ट झालय म्हणुन म्हणलं की एकदा परत चिंतन करायची गरज आहे :) आता जरा स्पष्टच : ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादातल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या असमानते बद्दलचा सारा रोष रीतसर पणे ब्राह्मण समाजाकडे वळवला ... पण आता हळु हळु लोकांच्या लक्षात येतय की जब्याला मारणारे कोणत्या गटातील आहेत ते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं असतं त्याच्याकडं समाजाच्या वाटचालीच्या चाव्या असतात. १९४८ पर्यंत तरी ब्राह्मण समाज सगळ्या समाजाच्या शीर्षस्थानी होता हा इतिहास आहे. बुद्धीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर नि धूर्तपणा, लवचिकपणा, स्वतःमध्ये कालानुरुप बदल करण्याची क्षमता (पुन्हा बुद्धीच) ह्या गुणांच्या आधारे सगळ्यांवर वरचष्मा ठेवणं शक्य होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील डोकं शांत ठेवून नि अनुकूल परिस्थितीमध्ये उतमात कमी करुन त्यांनी हे शक्य केलं होतं. ह्याच्या विरुद्ध खालचा समाज अशिक्षित, वर येण्याचा विचार न करणारा, अंधश्रद्ध असा तर 'वरचा' समाज देखील पैशानं बरा पण परिस्थिती अनुकूल असली की उधळपट्टी नि प्रतिकूल झाली की 'गावातल्या ब्राह्मण+/सावकाराकडं' जमीन्/दागिने गहाण ठेवून उधळपटटीच असं करणारा झाला. ४८ च्या गांधीहत्येनंतर बर्‍याच जणांनी 'स्कोअर सेटल' केले नि ब्राह्मणांचं वर्चस्व बर्‍यापैकी कमी झालं. आजही जुनी पुस्तकं वाचून नि जुन्या आठवणी/जखमा भळभळत्या ठेवून लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेतच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास प्रतिसाद! कोणावरही दगड भिरकावून व्यवस्था बदलत नसते तर समतावादी विचारांची मुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजवूनच व्यवस्था बदलता येते हे सत्य बाबासाहेबांना उमजले होते. म्हणूनच त्यांनी दगड मारण्याच्या फंदात न पडता व्यवस्था बदलणाऱ्या विचारांची मुळे समाजात रुजवली. त्या मुळांचा आज वृक्षविस्तार होऊन त्यांना पालवी फुटत आहे. हे सत्य स्वीकारण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनाच कोणत्यातरी "एका समाजावर" दुसऱ्या समाजाने दगड मारला हे आठवून वांझोटा मानसिक आनंद मिळतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

बिरुटेंचा प्रतिसाद आवडला. मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्रा. बिरुटे, प्रगल्भ प्रतिसाद १+ राजेश १+ मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे या आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा -
" History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr."
लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्‍या लोकांची निष्क्रियता!

>>>>१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? कुठल्या वयापासून मुलगा आणि मुलगी ह्यांना परस्परांबद्दल 'शारीरिक' औत्सुक्य आणि आकर्षण निर्माण होतं. त्या वयापासून 'प्रेम' ह्या विषयी मनांत विचारमंथन आणि धारणा बनण्यास सुरुवात होते. कोणासाठी हे वय १२ असेल तर कोणासाठी १७. पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे. मग ते २५-३० काहीही असू शकेल. असो. मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. जे कांही नव्या पिढीचे व्हायचे असेल ते होऊ द्यावे. ज्याचे त्याचे पालक पाहून घेतील. आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे. नव्हे, मिपाकरांनीच आणून सोडले आहे. मिपाकरांना दोन्ही बाजूंनी बोलताना पाहिलं आहे. शहाण्याने, योग्य असली तरी, कुठली बाजू घेऊ नये. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' ?????????????? इथपर्यंत मजल गेली का? वा वा ...चान चान !

In reply to by मंदार कात्रे

होय मंदार. तेंव्हा जी जखम मनाला झाली ती कधीच भरून येणार नाही. मी आजतागायत माझ्या कट्टर शत्रूचेही मरण इच्छिलेले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण वेगवेगळ्या मुशीतून बनलेला असतो. प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही.आपल्या भावना समजू शकते. पण असे शेरे अजिबात मनाला लावून घ्यायचे नसतात.

In reply to by शुचि

>>>>प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही. खरं आहे शुचि. ज्या सदस्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्या सदस्याबद्दल मला आदर होता. तो इतका अस्थानी ठरेल असे वटले नव्ह्ते. मिपावर मी, 'संस्थळावर कसे वागावे/लिहावे आणि किती संवेदनशील असावे' हे नाईलाजाने शिकलो आहेच. मिपा किंवा इतर कुठलेही संस्थळ हे फक्त मनोरंजनाचे/टवाळकीचे/आपल्या वैफल्याला दूसर्‍यावर शाब्दिक आसूड ओढून नकारात्मक वाट करुन देणारे नसावे. तिथे चांगल्या विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान व्हावे असे वाटते. थोड्याफार टवाळक्या ह्या होणारच पण त्या जेवणातील मीठाइतक्याच असाव्यात. असो. धाग्याच्या विषयाला सोडून बरेच अवांतर झाले. क्षमा असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे अवांतर नसून समांतर आहे. अशा प्रवृत्ती समाजात असणारच. कधी कधी उन्मादाच्या भरात इतर वेळी सुज्ञ वाटणारे लोक देखील असे खरडतात.आताही खरडणारे हा धागा वाचत असतील तर बोध घेतील अशी आशा करु या.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.
बाप्रे.. पहिल्या वाक्याचा अर्थ बराच वेळ लागलाच नाही. सावरकरांच्या वर्ताण झाले