मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी .
टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही .
तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक..
तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू .
मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची ..
तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं .
तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ..
तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )
खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) .
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो .
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)
मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं .
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे .
१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )
मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .
२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..
३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात .
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो.
४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो .
५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)
६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात .
७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ..
८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ).
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात.
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)
१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात.
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .)
११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)
१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.
असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
33392
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुणेकरांची विनोद करण्याची
In reply to निनाद, उद्या जर्मनीला युरोपचे by यशोधरा
निनाद, तू आयडी बदलली का? का?
In reply to पुणेकरांची विनोद करण्याची by प्यारे१
अरारारा!
In reply to निनाद, तू आयडी बदलली का? का? by यशोधरा
स्मायल्या पहा, गंमतीत धागा
In reply to अरारारा! by प्यारे१
धागा गमतीत आहे काय? बरेच
In reply to स्मायल्या पहा, गंमतीत धागा by यशोधरा
बरोबर, आपापली समजूत
In reply to धागा गमतीत आहे काय? बरेच by प्यारे१
नाही!
In reply to निनाद, तू आयडी बदलली का? का? by यशोधरा
(No subject)
In reply to नाही! by निनाद
>>डोंबिवली ही विद्येची नगरी
In reply to डोंबिवली ही विद्येची नगरी आहे by निनाद मुक्काम …
हेच एक
In reply to >>डोंबिवली ही विद्येची नगरी by सूड
व्य नि बघ.
In reply to हेच एक by निनाद मुक्काम …
व्वा! काय आठवण आणुन दिलि यार.
In reply to खरंय खरय, by तुमचा अभिषेक
व्वा! काय आठवण आणुन दिलि
In reply to खरंय खरय, by तुमचा अभिषेक
चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं
+१
In reply to चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं by यसवायजी
बॅटॅ
In reply to +१ by बॅटमॅन
अगदी हेच म्हणायला आलो होतो.
In reply to बॅटॅ by आदिजोशी
तुम्ही काहीही म्हणा हो. पण,
In reply to अगदी हेच म्हणायला आलो होतो. by सूड
बघण्यासारखी बहुतेक स्थळे या
In reply to बॅटॅ by आदिजोशी
टीचभर मुंबै अन चिमूटभर पुणं
In reply to बघण्यासारखी बहुतेक स्थळे या by बॅटमॅन
+साडेबत्तेचाळीस
In reply to टीचभर मुंबै अन चिमूटभर पुणं by बॅटमॅन
+अष्ट्यात्तर
In reply to +साडेबत्तेचाळीस by प्यारे१
+ एकोणवीसशे अष्टेचाळीस !!
In reply to +अष्ट्यात्तर by आदूबाळ
माझे बाकिचे लेख हि वाचुन पाहु शकता तुम्हि.. मिपा वर उपलब्ध आहेत
In reply to चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं by यसवायजी
लिहिल आहे आधिच....
In reply to चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं by यसवायजी
टीचभर मुंबई
मुंबै अन पुणे सोडून
In reply to टीचभर मुंबई by सुबोध खरे
अगदी मनातले लिहलेत
In reply to मुंबै अन पुणे सोडून by बॅटमॅन
स्वतःच्या पोळीवर तुप ओढून घेतलेली शहरे.
In reply to अगदी मनातले लिहलेत by मराठी_माणूस
हेच ते. णुस्ता पैसा पैसा आनी
In reply to टीचभर मुंबई by सुबोध खरे
मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक
सु
In reply to मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक by सुबोध खरे
@अरे मुंबाई सोडली तर उर्वरित
In reply to सु by माईसाहेब कुरसूंदीकर
एकाच प्लास्टिकच्या पिशवीत
In reply to मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक by सुबोध खरे
ओ काका!
In reply to एकाच प्लास्टिकच्या पिशवीत by दिनेश सायगल
आमची पोष्ट कोणतीही असो. तसा
In reply to ओ काका! by पैसा
अरे धाग्यात कोकण काढू नका....
In reply to ओ काका! by पैसा
>>ही दळभद्री वृत्ती कोकणातून
In reply to एकाच प्लास्टिकच्या पिशवीत by दिनेश सायगल
बाटलेला फकिर मोठ्याने बांग
In reply to >>ही दळभद्री वृत्ती कोकणातून by सूड
जी महाराष्ट्रात यायला लोकांनी
In reply to >>ही दळभद्री वृत्ती कोकणातून by सूड
जी महाराष्ट्रात यायला लोकांनी जीव दिला तिथं महाराष्ट्राची मराठी बोलायला लोकांना लाज वाटते.हा एकतर बहुतांश लोकांनी चुकीचा काढलेला निष्कर्श आहे किंवा जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा. साधा सरळ हिशोब आहे, एखाद्याशी संवाद साधताना कम्युनिकेशन होणे महत्वाचे. मुंबईत हे एक गावखेडॅ वा छोटेमोठे शहर नसून मेट्रोसिटी आहे, इथे अठरापगड जातीप्रांताचे लोक आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना सामाईक अश्या राष्ट्रभाषेतच बोलणे सोयीचे पडते. मागाहून समजले की आपण दोघेही मराठी आहोत तर मराठीतच बोलणे सुरू होते. यात लाज वा अभिमान हे दोन्ही कुठेच हिशोबात येत नाहीत.सायगल साहेब
In reply to एकाच प्लास्टिकच्या पिशवीत by दिनेश सायगल
+ ७८६
In reply to सायगल साहेब by सुबोध खरे
मुंबईत आलेला कोकणी माणूस आपली कोकणाशी नाळ तोडत नाही तर अभिमानाने जपतो.+७८६ कोकणी चाकरमान्यांना नेहमीच मुंबई आपली वाटते. कदाचित एकच सागरकिनारा जोडत असल्याने असावे, येथील हवा पाणी माती आपलीच वाटते. शहरात राहणार्या कोकणवासीयांना आपले गाव कोकणात आहे जसे वाटते तसेच कोकणात राहणार्यांना आपले शहर मुंबई आहे अशीच भावना असते. आणि म्हणूनच हे कोकण-मुंबईचे नाते, मुंबईतून मराठी माणूस कधीच हद्दपार होऊ देणार नाही .!जाता जाता -- मुंबई कोकणातच
In reply to सायगल साहेब by सुबोध खरे
तुम्ही साड्या विकत घ्यायला
In reply to एकाच प्लास्टिकच्या पिशवीत by दिनेश सायगल
ही दळभद्री वृत्ती कोकणातून
In reply to एकाच प्लास्टिकच्या पिशवीत by दिनेश सायगल
चोक्कस!
In reply to ही दळभद्री वृत्ती कोकणातून by मनीषा
चितळे बंधू च्या दुकानात लोणी
In reply to मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक by सुबोध खरे
ओ हॅलो
In reply to मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक by सुबोध खरे
उलट पुण्यात व्यवसाय करणे फायद्याचे नाही का?
In reply to मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक by सुबोध खरे
च्च! च्च! असे काय ते?
In reply to उलट पुण्यात व्यवसाय करणे फायद्याचे नाही का? by फारएन्ड
अगदी मनातले लिहलेत
अजून ७१ च?? पुर्वी असे धागे
म्हंजे काय!
In reply to अजून ७१ च?? पुर्वी असे धागे by सूड
मुलुंडच्या अलिकडं मुम्बई आणि
In reply to म्हंजे काय! by पैसा
हॅ हॅ
In reply to मुलुंडच्या अलिकडं मुम्बई आणि by प्यारे१
हल्ली मुंबै कर्जतपर्यंत
In reply to मुलुंडच्या अलिकडं मुम्बई आणि by प्यारे१
सूड साहेब,
In reply to हल्ली मुंबै कर्जतपर्यंत by सूड
एकदम कडक प्रतिसाद.
In reply to सूड साहेब, by सुबोध खरे
आता
In reply to एकदम कडक प्रतिसाद. by आत्मशून्य
डॉक्टर..
In reply to सूड साहेब, by सुबोध खरे
+१
In reply to डॉक्टर.. by सूड
सुड साहेब
In reply to डॉक्टर.. by सूड
हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे
In reply to सुड साहेब by सुबोध खरे
हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे नाही. हडपसरला राहून रोज हिंजवाडी(कि हिंजवडी) ला आपल्या दुचाकीवर किंवा कंपनीच्या बसने प्रवास करणारे लोक पुण्यातही आहेतच.सहमत आहे, म्हणजे पुण्याचे मला माहीत नाही पण हे कोणत्याही शहराला लागू होतेच. आता बदलापूर-विरारला राहून जर ट्रेनचा तासदोनतासांचा प्रवास करावा लागतो म्हणून मुंबई वाईट म्हटले तर हे का लक्षात घेत नाही की मुंबई हे शहर लाखो लोकांना रोजगार मिळवून देते. कुछ तो बात है यार मुंबईमध्ये म्हणून ती एवढ्या वर्षांमध्ये पसरतच चालली आहे. जागांचे भाव गगनाला भिडत चाललेत ते का उगाचच म्हणून. तीस हजार रुपये तोळा किंमत सोन्यालाच असते चांदीला तो भाव येत नाही. त्यामुळे या निकषावर तर मुंबई सर्वश्रेष्ट आहेच.... तसेच सुबोध खरे यांच्या वर्क कल्चरच्या पोस्टला तर +७८६^+७८६ मुंबई याच साठी ओळखली जाते. वरच्या पोस्टमध्ये हेच चुकीच्या आणि नकारात्मक अँगलने बघितले जातेय बस्स.दादा, मुंबैचं किंवा पुण्याचं
In reply to हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे by तुमचा अभिषेक
चिंता नसावी, मला दुसर्याची
In reply to दादा, मुंबैचं किंवा पुण्याचं by बॅटमॅन
अर्थातच, ती काडी तुमची नाही
In reply to चिंता नसावी, मला दुसर्याची by तुमचा अभिषेक
कशाला रक्त आटवताय
In reply to अर्थातच, ती काडी तुमची नाही by बॅटमॅन
थोडक्यात तुझी टिका मुंबईवर
In reply to डॉक्टर.. by सूड
कारण मुंबईची कार्य संस्कृती
In reply to सूड साहेब, by सुबोध खरे
मुंबई च्या बाहेर देखील
In reply to सूड साहेब, by सुबोध खरे