Skip to main content

श्यामची आई..

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 09/03/2014 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले... ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत... माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते. अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल. कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे इत्यलम

वाचने 42300
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

एकूणच संस्कारांसाठी चांगले पुस्तक. मात्र आधीच भावनाशील मुले जास्त हळवी होऊ शकतात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी शामची आई वाचले आहे ,एका विशिष्ट काळापुरताच कोणत्याही पुस्तकाचा प्रभाव टिकतो.

"परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते." "भावनांची फोडणी" पर्यन्त ठीक पण त्यालाहि "विलक्षण तीव्र" हे विशेषण लावणे ही तर फक्त शब्दान्ची फोडणी वाटते. आणि या वर बालमनाशी "अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक"----हे तर खुपच unfair व उगाचच भडक.

माझ्या लहानपणी हे पुस्तक मी वान्चलय पण या 'अक्षम्य आणि भडक खेळ करणार्या' पुस्तकाचा माझ्यावर काही दुष्परिणाम झालाय अस मला अजिबात वाटत नाही. मी एक वर्ष (१९५६) बोर्डीच्या (डहाणुजवळ) शारादाश्रमात होतो, तिथ साने गुरुन्जीचे धाकटे बन्धु--मला वाटत पुरुषोत्तम--होते. त्या "अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण" असलेल्या वातावरणात सम्पूर्ण वाढलेला हा माणुस असामान्य अजिबात नव्हता, चारचौघान्सारखा सर्वसाधारण होता पण त्याचे कुठल्याही प्रकारचे खच्चीकरणझाल्याचे दिसत नव्हत. श्यामची आई हे पुस्तक 'कालबाह्य' आहे अस म्हणण्याला माझा काही आक्षेप नाही पण या वर दिलेल्या विशेषणाना आहे.

तुमची विचार करण्याची पद्धत थर्ड ग्रेड आहे इतकेच नोंदवू इच्छितो. बाकी जिलब्या पाडून प्रसिद्धी मिळवायची असेल तर शुभेच्छा.

In reply to by अप्पा जोगळेकर

माझी विचार करण्याची पद्धत ह्यावर तुमचे मत कुणाला हवंय ? आणि जिलब्या पाडून प्रसिद्धी? ... जाऊदे तुमचे मुद्दे संपलेले दिसतात ...

In reply to by अत्रन्गि पाउस

शामची आई याबद्दल तुमचे मत कोणी विचारले होते काय? आणि हो, सदर धागा चर्चेच्या पात्रतेचा नाही. कळावे. रजा घेतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

इथे विषय मांडायला कुणी विचारात नसतो... आणि विषय मांडून जुना झाल्यावर चर्चेत आपण आला आहात..चर्चेत स्वागत सर्वांचेच असते...आणि धागा चर्चेच्या पात्रतेचा नही म्हणजे चर्चेत पूर्वी आलेल्यांवरहि आपण अप्रत्यक्ष रोख धरला आहे.. व्यक्तिगत टीका तुम्ही केलीत.. असो ..रजा घेताय ..जरूर..तुमचे मुद्दे संपलेत हे मी आधीच म्हटलंय...आपल्यापुरती चर्चा मी हि थांबवली आहे..

तुम्हाला आवडणारे, भावणारे, प्रभावित करणारे एखादे विशिष्ट पुस्तक न वाचणारे किंवा ते न आवडणारे लोक (त्यांचे विचार) थर्ड ग्रेड असतात? मग फर्स्ट ग्रेड कोण असतात, तालिबानी वॄत्तीचे लोक? तुम्हाला हा धर्मग्रंथ आवडत नसेल तर तुम्ही धर्मद्रोही आहात, आणि तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही.

बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ? म्हणजे ह्या पुस्तकात ह्याबद्दल काही माहीती आहे का ? आपले काम असंपले की आत्महत्या करावी असे श्यामच्या आईने शिकवले असे काही आहे का हो ह्या पुस्तकात ?

In reply to by आदूबाळ

डिप्रेशनमुळे
>>> ह्म्म , माझ्याही माहीतीत असेच आहे , साने हे "गांधीवादी टेररिस्ट"* होते , सत्याग्रहाची बंदुक कानपटीवर ठेवुन पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन करु पहात होते (जे की कायद्याने काही महिन्यात होणार होतेच) ह्याबद्दल दस्तुरखुद्द गांधींनीच त्यांना झाडले ...(पुढे मंदीर प्रवेश नक्की कशामुळे झाला हे माहीत नाहे , ह्यांच्या दहशतवादामुळे की कायद्यामुळे ?) एकुणच ह्या प्रकाराने निराश होवुन त्यांनी आत्महत्या केली . तेव्हा त्यांना श्यामच्या आईची शिकवण आठवली नसावी बहुधा !!! (* "माझं ऐका , नाहीतर सत्याग्रह करेन " ह्याला गांधीवादी टेररिझम असे म्हणतात )

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?
लोक सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी आता करण्यासारखे काहीही विशेष ध्येय उरलेले नाही या मानसिकतेतुन आत्महत्या केली असे ऐकले... अधि़कृत कारण माहित नाही. अवांतरः- शामची आइ डोक्यात जाते पण त्यांच्या अनेक बालकथा सानेगुरुजिंच्या गोड गोश्टी या कथा मालिकेतुन विवीध पुस्तकातुन प्रकाशीत झाल्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या कथा आहेत, जसे सोहराब नी रुस्तुम, शेवटी नदी समुद्राला मिळेल, फुलाचा प्रयोग आणी इतरही अनेक. मला वाचनाची आवड लहानपणीच लागली या मधे सानेगुरुजिंच्या गोड गोष्टी या सिरीजचा फार मोठा हात आहे.

In reply to by चिगो

अशीच शंका यायला लागलीय राव....असे असेल तर मग शाम म्ह. फेल्युअरच खंप्लीट =))

श्याम ची आई आजच्या काळातील कालबाह्य पुस्तक सुखवस्तू घरातील श्याम च्या वडिलांची व चुलत्यांची भाऊ बंदकी झाल्याने कोर्ट वार्या करून आयती गरिबी स्वतःवर ओढवून घेतली. हे पुस्तक वाचून कितीजणांनी बोध घेतला , आजही भाऊ बंदकी संपली आहे का हे पुस्तक टाकाऊ नाही आहे एखाद्या पिढीच्या जीवन शैलीचे वर्णन ,तत्कालीन काळ उभा करण्यात ते यशस्वी होते त्यातून प्रेरणा , आदर्श घेणे म्हणजे अती आहे , पूर्वी च्या काळी मुंजीत आहेर म्हणून काय द्यायचे हा प्रश्न ह्या पुस्तकाने जरी सोडवला असला तरी साडे तीन टक्क्या पलीकडे आपल्या समाजात हे पुस्तक ............ बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत, पण श्यामची आई व त्यात आईची भूमिका करणारी वनमाला आणि तिचा तो छापील डोक्यात तिडीक जाणारा स्वर डोक्यात जातो.

In reply to by निनाद मुक्काम …

मह्याला ३र्या यत्ते मंदी टाकले नं भौ धाग्या बद्दल... आणि मग मंग तुमची ह्यो प्रतीर्कीया ..

In reply to by निनाद मुक्काम …

आजही भाऊ बंदकी संपली आहे का
भाऊ बंदकीचा शाप महाराश्ट्रा इतका कोणत्याही राज्याला ना याआधी झाला ना पुढे होइल. तिकडे नॉर्थला फिरलो तर मोठ्या भावाच्या आज्ञेत आख्खे कुटुंब जगते हे लगेच लक्षात येते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती आणि खटपट्या यांची युती झालेली दिसतेय. ख.फ. वर खटपट्या ने हेच चित्र चढवले आहे.

कम्युनिस्ट रशियात कमालिचे लोकप्रिय झाले असते. आजही होउ शकते. कम्युनिजम म्हणजे सर्वानाच शिळी भाकरी, व तिचेच उदात्तीकरण.... सर्वांना पनीर बटर मसाला न्हवे.

भारतीय संस्कृती नावाचे एक गुरुजींचे पुस्तक आहे .. तसे पुस्तक बरे आहे पण काही काही वाक्ये इअतकी बालीश आहेत की जाम हसायला येते.

नावाचे सुधा त्यांचे एक पुस्तक असल्याचे स्मरते. जान्कारान्नी उजेड टाकावा

In reply to by आत्मशून्य

हे कधी वाचनात आलेले नाही. त्यासारख्या नावाचे 'श्यामकांताची पत्रे' हे पुस्तक मात्र कधीकाळी थोडेसे वाचलेय. हा श्यामकांत म्ह. रियासतकार सरदेसायांचा मुलगा, शिकायला शांतिनिकेतनात होता.

साने गुरुजिनी फक्त आत्महत्या केली म्हणुन त्याना खाली लेखायच का? अर्नेस्ट हेमिन्ग्वे सारख्या कणखर पुरुषानेदेखिल आत्महत्या केली होती त्याच काय? त्याने तर लिहुन ठेवलय की (त्याच्या म्रुत्युपुर्वी) आत्महत्येसारखा दुसरा उदात्त म्रुत्त्यु नाही म्हणुन. आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा, जगण्याच्या सन्घर्षापासुन दुर पळणे वगैरे वगैरे.आपण किती माणस पाहिली आहेत जी म्रुत्युला घाबरत नाहित? जवळजवळ प्रत्येक जण घाबरतो पण या सर्वाना आत्महत्या करण्याच धाडस होत नाही अस म्हणण चुक होइल का? मग जो माणुस आत्महत्या करतो त्याला भ्याड म्हणण चुकीच आहे अस नाही वाटत? सने गुरुजिन्च लिखाण आत्ता कालबाह्य वाटु शकेल पण तस (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना-अजिबात वाटत नाहीय.कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का? मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का? मला वाटत माझ्यावर काही सन्स्कार साने गुरुजिने या त्यान्च्या पुस्तकाने केले आहेत व काही या पुस्तकावर आधारलेल्या चित्रपटाने केले आहेत. तुम्ही आमच्या पीढीला जरुर हसा कारण आम्ही कालबाह्य झाले असु पण क्रूपया या आमच्या आयुष्यातिल या आधाराना--मैलदगडाना- हन्सु नका.

मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का? हे वाक्य फार म्हणजे फारच आवडलं. कुठल्याही पुस्तकाचंच नाही तर ऐतिहासिक व्यक्तिंचंही मूल्यमापन त्यांच्या काळाच्या तुलनेतच व्हायला पाहिजे. साने गुरूजींना शामळू म्हणणारे लोक उद्या शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली म्हणून त्यांना क्रूरकर्मा म्हणायलाही कमी करणार नाहीत. बाकी याच शामळू माणसाने आपली नोकरी सोडून देऊन इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात तुरुंगवास भोगला आणि दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उपोषण केलं होतं. आज फेसबुकावर लाईक ठोकून क्रांत्या करणार्‍या या macho लोकांपैकी किती जण एखाद्या ध्येयासाठी तुरुंगात जायला तयार होतील?

खुप वाइट वाटल साने गुरुन्जिच्या आत्महत्येबद्दलच लिहीलेल वाचुन. खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?अर्नेस्ट हेमिग्वे सारख्या दमदार लेखकाने सुद्धा केली होती की आत्महत्या. तो तर म्हणतो (त्याच्या आत्महत्येपुर्वी)की अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे. मला वाटत आपण सर्व जण म्रुत्युला घाबरतो मग जी माणस या मुलभुत भीतिवर अम्मल बजावुन आत्महत्या करतात त्याना भ्याड म्हणण्याचा नैतिक अधिकार कोण देतय आपल्याला? साने गुरुन्जिच्या या पुस्तकाने व त्यावरच्या चित्रपटाने माझ्यावर कान्ही सन्स्कार केले आहेत्."मोहावर सन्य्यम ठेवणे म्हणजेच धर्म" हे श्यामच्या आईच वाक्य किन्वा घरचा खरवस घेउन श्यामचे वडिल त्याला शाळेत भेटायला जाणे हे सर्वच मला तेन्व्हा तरी खुप स्पर्शुन गेल होत. माझ्या मते मराठीत आत्तापर्यन्तचा सर्वात चान्गला लेखक --भालचन्द्र नेमाडे-यान्च साने गुरुन्जिबद्दलच मत देखिल लक्षात घेण्याजोग आहे. कुणितरी प्र के अ यान्च्या नाटकान्बद्दल लिहिलय ते अवास्तव नाही पण सावरकर हे टिकेच्या पलिकडे होते अस म्हणण चुकीच होईल्.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही.हे खरही नसेल आणि नसुदेत. आमची पिढी कालबाह्य जरुर झाली असेल पण आमच्या आयुष्यतिल हे दगड असेच राहुद्या. हा आमचा मारुती नसेल पण हा आमच्या आयुष्यातिल 'मैलाचा दगड' नक्किच आहे.

In reply to by kurlekaar

या पोष्ट वर इतक्या प्रतिक्रिया आल्या की माझी पहिली प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेली हे माझ्या लक्षातच आल नाही व काहीतरी गोन्धळ झालाय अस समजुन मी दूसर्यान्दा लिहिल. म्हणुन थोडासा overlap झालाय.

In reply to by kurlekaar

खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?..... अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे.
बरं .... मग ज्यानं त्यानं स्वतःच्या मुलां समोर हा असला आदर्श ठेवावा ... पण एकुणच समाजाच्या दृष्टीने आत्महत्या हे पापच आहे ... Life is an unalienable right of every human being , unalienable means no one can take it from him ...not even God... even he himself can not give it out !
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे . घुसडलेली आहे , प्रक्षिप्त आहे ... त्या मुळे ते जाऊनदेच ... राहता राहिले सावरकर , सानेंची चर्चा चालु असताना सावरकरांवर गाडी ढकलणे काही योग्य नाही .... (वाटल्यास त्यावर स्वतंत्र धागा काढा ... शिवाय सावरकरांनीही प्रायोपवेशन करुन देहत्याग केला होता हा मुद्दा ही त्यात घालता येईल तुम्हाला ) पण इन जनरल हे साने हे १९५०-६० च्या दशकात भारतात असलेल्या समाजवादासारखे आहेत .... त्यांचे असणं हे "ते का नकोत " हे समजुन घेण्याव्यतिरिक्त काही येक उपयोगाचे नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

"बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत" सानेन्ची चर्चा चालु असतानाच सावरकर व अत्रे यान्चा उल्लेख वर आलेला आहे व त्याच अनुषन्गाने दोन्हि व्यक्तिन्चा उल्लेख केला गेलाय; सावरकरान्वर 'गाडी ढकलण्याचा' हा प्रकार अजिबात नव्हता. 'श्यामची आई' या पुस्तकाच साहित्यिक मुल्यान्कन राहिल बाजुलाच व त्याच धाग्याने साने गुरुजिना फान्सावर चढवल जात होत ते बघवल गेल नाही इतकच. तुम्ही ज्या समाजवादाची साने गुरुन्जिशी तुम्ही तुलना करता त्याच समाजवादाने लोहिया, नाथ पै, जयप्रकाश नारायण, मधु दन्डवते ही माणस देशाला दिली. दिसतात का अशी माणसे आत्ता? मला माहित नव्हत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे, घुसडलेली आहे ते. कुठल्या इतिहासकाराने अस लिहिल्याच सान्गितलत तर बर होइल. आणि ही जरी आख्ययिका असली तरी हरकत नाही कारण तरीहि त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला ती नक्किच शोभण्यासारखी आहे.

In reply to by kurlekaar

दिसतात का अशी माणसे आत्ता?
>>> अजिबातच नाहीत दिसत ...ह्याचाच अर्थ ते एक्स्टिन्क्ट झालेत ...सरव्हायवल ऑफ द फिट्टेस्ट ....आजच्या काळात ते जगायला फिट्ट नाहीयेत ... आजच्या समाजात त्यांना जागाच नाहीये ... साने वगैरे ह्या लोकांचे आणि त्यांच्च्या उगाच्च्याउगाचकाहीच्याबाही आदर्शवादाचे एकदा नव्याने अवलोकन करायची गरज आहे. जग बदललय , बदलतय ...आपणही बदलायला हवं ....

साने गुरुजींचे व्यक्तिगत/सार्वजनिक आयुष्य सामाजिक कार्य हे चर्चेतील अवांतर मुद्दे आहेत.. नेमाडे हे सर्वश्रेष्ठ मराठी लेखक हे वाचून थक्क झालो... विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हि तसाच अचंबित करणारा .. अध्यात्म/भक्तीरस,वीररस,अद्भुत रस वगैरे ह्याचे मार्केट सध्या डाऊन आहे ??? (मी बीभत्स रसोल्लेख टाळलेला आहे ) जाता जाता : पुलंचे 'विनोदी साहित्य हे साहित्य का नाही' हा लेख आठवला ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे वगैरे..==))

श्याने गुर्जींचं "श्यामची शाई" कुणी वाचलं आहे का?

दुसर्या व्यक्तिच्या विधानान्चा विपर्यास करुनच तुम्हाला तुमची प्रति-प्रतिक्रिया द्याविशी वाटत असेल तर मला काहिच म्हणायचे नाही. (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना- .कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का? नेमाडेना 'माझ्या मते' सगळ्यात श्रेष्ठ लेखक मी म्हणणे याच्याशी तुम्ही फार तर असहमत असु शकता पण त्यात थक्क होण्यासारख काय आहे? आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना यातुन विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हा कसा काय निघु शकतो? आणि समजा तो तसा निघालाच तर तुमच्यासारखे चोखन्दळ व उच्चभ्रु वाचक सोडले तर नाही तरी बहुतेक सर्वसामान्य वाचकाना दुसर काय हव असत? ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे डोक्यावरुन गेल. मला बर्गन्डि रन्ग व वाइन ठाउक आहे, अरिस्टोटल वाचलाय तो फक्त Will Durant च्या The Story of Philosophy तुन. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेसाठी Touche हा शब्द नक्किच वापरलेला नाही. मला वाटत आपण इथच थाम्बुया.माझ्याकडे या विषयावर दुसर लिहिण्यासारख काही उरल नाही.

या पुस्तकावर माझ्या शाळेतील मराठीच्या सरांचे मत आठवले: तुम्ही याच वयात (१०-१४) हे पुस्तक वाचा. एकदा २५-३० वर्षाचे झालात आणि तुमच्या भावना बोथट झाल्या तर तुम्हाला पुस्तकाचा भावर्थ कळणार नाही.....किती बरोबर...!!!

In reply to by अत्रन्गि पाउस

संवेदनशील वयात हे वाचावे कि नही
नकोच .... त्या पेक्षा पोरांना रिच डॅड पूअर डॅड , द फाउंटनहेड अशी पुस्तकं द्या वाचायला

In reply to by अत्रन्गि पाउस

पावसा, शामची आई समजून् घ्यायचे असेल तर त्या काळात जावे लागेल.वूड हाउस सम्जून घ्यायचा तर त्या काळाची थोडीफार माहिती हवी. पुलंच्या साहित्याबद्दल काय मत आहे?"ते बटाट्याची चाळ म्हणजे लोअर मिडल क्लास मराठींचे ग्लोरिफिकेशन" ह्यांच्या एका तरूण मित्राने तारे तोडले होते पूर्वी.'म्हैस' वाचून त्यालाच हसता येईल ज्याने एस.टी.ने प्रवास एकदा तरी केलाय. जे 'एन्जॉय' करता येत नाही ते सगळे व्यर्थ ही तुझी मानसिकता तू बदलायला हवी.

केवळ आपल्यामुळे मी काल हे पुस्तक वाचले. पहिल्यांदाच. त्यातल्या काही गोष्टी माहित होत्या. पण पुस्तक असे कधी वाचले नव्हते. परत एकदा - मनापासून धन्यवाद.